Monday, 14 July 2025

सर्वसामान्यांची घरे प्रकल्पातून वगळल्याप्रकरणी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती

 सर्वसामान्यांची घरे प्रकल्पातून वगळल्याप्रकरणी

अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती

- मंत्री डॉ.उदय सामंत

 

मुंबईदि. ११ : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत अनेक नामांकित विकासकांनी सन २०१७ पासून २०२२ पर्यंत अनेक गृह प्रकल्प उभारून सर्वसामान्यांना परवडणारी घरे प्रकल्पातून वगळल्या. या प्रकरणी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईलअसे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

यासंदर्भात सदस्य विक्रांत पाटीलशशिकांत शिंदेसंजय खोडकेसचिन अहिर यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

उद्योग मंत्री डॉ.सामंत म्हणाले कीएकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली झाल्यानंतरही यासंदर्भात उचित कार्यवाही न झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi