Wednesday, 4 June 2025

संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू · वाढवण बंदराभोवती नवीन शहर · टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट · महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा

 आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू

·         वाढवण बंदराभोवती नवीन शहर

·         टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट

·         महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच

 

मुंबईदि. ४ : महाराष्ट्र आता केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाचे केंद्र बनत आहेआणि भविष्यातील उद्योग आणि नाविन्यतेसाठी राज्य तयार होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल ताज पॅलेस येथे  बँक ऑफ अमेरिकातर्फे आयोजित २०२५ इंडिया कॉन्फरन्समध्ये : एक्सेलेटरिंग ग्रोथमहाराष्ट्रा @वन ट्रिलीयनया कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

संरक्षण उत्पादनाचा केंद्रबिंदू

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमेक इन इंडिया या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे.  तसेच नुकतेच यशस्वी झालेले ऑपरेशन सिंदूर ने भारतीय संरक्षण उत्पादनक्षमता किती प्रगत झाली आहेहे दाखवून दिले आहे.  उत्तर प्रदेश व तमिळनाडूमध्ये संरक्षण उद्योगाचे क्लस्टर्स असले तरी खऱ्या अर्थाने भारतातील संरक्षण उत्पादनाचे केंद्र महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात मोठी घोडदौड केली असूनराज्य आज मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादनाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

देशातील सुमारे ६० % डेटा सेंटर क्षमता आता महाराष्ट्रात आहे. मुंबई ही आधीच देशाची प्रमुख फिनटेक राजधानी झाली आहेतसेच महाराष्ट्र हे स्टार्टअपसाठी देखील एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संधींबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीजगभरातील गुंतवणूकदार आता सुरक्षित पर्याय शोधत आहेत, जे जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतीलआणि भारत या संधीसाठी सर्वात योग्य स्थानावर आहे. महाराष्ट्र शासन या संधीसाठी पूर्णतः सज्ज आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi