Friday, 2 May 2025

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये (WAVES 2025) मुकेश अंबानी यांनी मांडली भारताच्या नेतृत्वातील जागतिक मनोरंजन विश्वाच्या क्रांतीची कल्पना

 जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये (WAVES 2025) मुकेश अंबानी यांनी मांडली भारताच्या नेतृत्वातील जागतिक मनोरंजन विश्वाच्या क्रांतीची कल्पना

 

मुंबई,: दि. : भारत केवळ एक देश नाही ती कथांची एक अशी समाजव्यवस्था आहेजिथे कथात्मक मांडणी ही एक जीवनशैलीच आहे," असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी नुकतेच जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील भाषणात  केले.

 

             कथात्मक मांडणी ही भारतीय जीवनशैलीशी घट्टपणे विणलेली वीण असूनइथल्या  महाकाव्यांपासून पौराणिक कथांपर्यंतकथात्मक मांडणी हा भारताचा वारसा राहिलाआशय हा महत्वपूर्ण असूनचांगल्या कथांना कायमच बाजारपेठेत मोल  मिळतेहे कालातीत तत्त्व असूनहेच जागतिक मनोरंजनाचा आधार आहे असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी अंबानी यांनी  भारत हा जगाच्या मनोरंजन उद्योग क्षेत्राचे मुख्य केंद्र बनणार असल्याची कल्पना उपस्थितांसमोर मांडलीआपल्या संबोधनातून त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनाची प्रेरणा देणार्या  दृष्टिकोनाबाबत प्रशंसा केली तसेच वेव्हज शिखर परिषद ही याच भविष्याच्या  दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे गौरवोद्गारही काढले.

 

            आपल्या भाषणातून अंबानी यांनी जागतिक संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात भारताचा वाढत्या प्रभावावावरही शिक्कामोर्तब केलेमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्र ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ अर्थात राजकीय क्षेत्रापलीकडची सांस्कृतिक ताकद असल्याचे लोक म्हणतातमात्र ही भारताची खरी ताकद असल्याचे आपण  मानतो असे त्यांनी सांगितले.

 

श्री.अंबानी म्हणाले कीआकर्षक आशय मांडणीगतिमान लोकसंख्याशास्त्र आणि तंत्रज्ञानात्मक नेतृत्व या तीन स्तंभांनी बळकट असलेल्या मनोरंजन क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी देश सज्ज आहेभारताची डिजिटल क्रांती ही केवळ व्यापकतेची कथा नाही तर ती आकांक्षामहत्त्वाकांक्षा आणि परिवर्तनाची कहाणी आहेअसे मत त्यांनी व्यक्त केले.

 

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi