Friday, 14 March 2025

वसई-विरार घनकचरा व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती गठीत

 वसई-विरार घनकचरा व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती गठीत

- मंत्री उदय सामंत

मुंबईदि. १२ : राज्यातील महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे.  वसई-विरार महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अधिवेशन संपल्यानंतर  ३० दिवसांच्या आत समिती स्थापन केली जाईलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

               याबाबत सदस्य राजेंद्र गावित यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य योगेश सागर यांनीही सहभाग घेतला.

               मंत्री श्री. सामंत म्हणालेवसई विरार शहर महानगरपालिकेच्या गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास केंद्र शासनाने २०११ मध्ये मान्यता दिली होती. तसेच २०१५ मध्ये २४.६४ कोटी रुपये खर्चून प्रकल्प पूर्ण करण्यात आला. मात्र२०२१ मध्ये चरण भट यांनी हरित न्यायाधिकरणात (एनजीटीयाचिका दाखल केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi