Sunday, 16 February 2025

आरोग्य फक्त आपल्या हातात!!हे वाचून नक्कीच फ्री मेडिकल चेकअप ची पायरी लोक चढणार नाहीत.*pl share

 *हे वाचून नक्कीच फ्री मेडिकल चेकअप ची पायरी लोक चढणार नाहीत.*

*लक्षपूृर्वक वाचावा असा लेख.*

अहमदनगर आयुर्वेद एक्सपो मध्ये वैद्य सुविनय दामले सर यांनी दिलेल्या व्याख्यानाचा सारांश.

✍..आरोग्य फक्त आपल्या हातात!!

अनेक वेळेस अनेक मेडीकल चेकअप कॅम्प्स लावले जातात  तज्ञ डाॅक्टर येणार, आधुनिक यंत्रानी तपासण्या होणार, भविष्यातील रोगाचे निदान लवकर होणार, अर्ध्या किंमतीत तपासण्या, तपासणी पॅकेज ऑफर..

अशा कोणत्याही आमिषांना कुणी बळी पडू नये.🙏🙏🙏

एक वैद्य / डाॅक्टर म्हणून कुणीही असं जाहीरपणे सांगणार नाही.. पण... बुडते हे जन देखवेना डोळा.... म्हणून सांगायचं धाडस करतोय....

खरं सांगायचं तर अशा फ्री चेक  कॅम्प मधूनच नवीन नवीन रोग जन्माला घातले जातात. कुठेतरी रिपोर्ट मधे जरा कमी जरा जास्त दाखवले जाते. 

पण एक किडा डोक्यात सोडून दिला जातो. नसलेल्या रोगावर स्लो पाॅयझन औषधे सुरू होतात. कॅल्शियम कमी, थोडंस बीपी, थोड्डासा इसीजीतला बदल, कदाचित कॅन्सर होऊ शकेल अशी एवढुशी गाठ, थायराॅईड वाढतंय, शुगर बाॅर्डरवर आलीय, कोलेस्टेरॉल वाढलंय...

अश्या अनेक लक्षणांपैकी प्रत्येकाला एक एक संभाव्य धोकेदायक भीती सांगितली जातात. आपणही, "चला आता औषधाना सुरवात झाली..." असं स्वतःच कौतुक करीत एकच गोळी खायला सुरवात करतो. 

( सुरवातीला अभिमानाने फाईल फिरवली जाते. मोठ्या मोठ्या सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटलची नावे घ्यायला, इम्प्रेशन मारायला जरा बरं वाटतं...)

असं करता करता किती वर्ष आपण नाहक केमिकलची गोळी खातोय, हे पण लक्षात येत नाही.

जसं, जरासा रक्तदाब वाढला की एक गोळी आयुष्यभरासाठी सुरू होते, ( ज्या रक्तदाबाचा खरंतर आपल्याला काहीच त्रास नसतो  आणि काहीवेळा रक्तदाब वाढणे ही शरीराची गरज पण असते....)

त्या गोळीने लघवीला जास्ती होते . रक्तातील पाणी जबरदस्तीने बाहेर काढले जाते. ताण निर्माण करतो मनावर...

टेन्शन मेंदुला, 🧠 रोगाचे नाव रक्ताशी संबंधीत असलेल्या 🫀 ह्रदयावर... आणि औषध जातंय किडनीवर काम करायला !  यालाच म्हणतात रोग मांडीला औषध शेंडीला.. असो ! 

.....तर लघवीला जास्त झाल्याने रक्ताची पीएच बदलते. थोडक्यात रक्त जाड होते. 

आता रक्त पातळ करणारी गोळी सुरू होते. ही एस्पीरीनची एकच गोळी, ह्दयातील रक्त पातळ करताकरता सर्व अंगातील रक्त पातळ करते. (ही गोळी बाकी सर्व अवयवतज्ञांना देखील नको असते. जसे डेंटीस्ट,🦷 सर्जन, ऑर्थोपेडीक्स,👨‍🦽 गॅस्ट्रोएन्टराॅलाॅजिस्ट, इ.इ. कारण या गोळीने रक्त ❣गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ) परिणामी महत्वाच्या अवयवातील रक्ताची पीएच बदलते. ते अवयव कमजोर व्हायला लागतात. (दुधात पाणी घातलेल्या चहाचा आनंद कसा मिळेल. 🤨 ) अवयवांची उपासमार सुरू होते. अधिक केमिकलची भर रक्तात पडत जाते. तेवढे केमिकल बाहेर काढायला यकृत, किडनी, फुप्फुसे, गर्भाशय इ. अवयवांना आपण छळतो.

आवश्यकतेपेक्षा  रक्त जाड झाल्याने चिकटपणा वाढतो, (त्याला एलोपॅथीनुसार कोलेस्टेरॉल म्हणतात.) आणि चरबी चिकटणे सुरू होते.... 

इथेच फॅटी लिव्हर (या नसलेल्या आजाराचा ) जन्म होतो.

"आता त्यावरची गोळी सुरू करूया."

आता येतो औषधातील स्टॅटीन गट !  या गटातील औषधी सुरू झाल्या की रक्तातील साखर वाढायला सुरवात होते. 🧊 म्हणजे रिपोर्ट मधे डायबेटिस दिसतो.  (प्रत्यक्षात डायबेटिसचे एकही लक्षण रुग्णाला जाणवत नसते. मी याला टाईप 3 डायबेटिस म्हणतो.😶) 

अशीच पाच सहा वर्षे जातात. अजूनही एकही औषध बंद होत नाही. 

कधीतरी थायराॅईड तपासले तर ते पण हट्टाने वाढते किंवा कमी होते.... त्याचीच कमी होती... सुरवातीला 25 नंतर 50...100 अशी चढती भाजणी सुरू होते. आणि समप्रमाणात साईड इफेक्ट्स पण ! 

याच गोळ्यांचा परिणाम म्हणून क्रिएटीनीन वाढत जाते. आता ... ?

 डायलेसीस... 😡😡

तोपर्यंत भरल्या खात्यापित्या घरात😽 चार वेळेस जेऊन सुद्धा जीवनसत्वांची कमतरता दिसायला लागते. मग.... ?

 व्हिटॅमिन्सचा मारा सुरू होतो.

Vit A, B, C D ...Z पर्यंत गोळ्या सुरू होतात. ज्यांची खरंतर गरजच नसते.

आता... ? 

अनावश्यक केमिकल, सांध्यांच्या आजूबाजूला जमायला सुरवात झालेली असते. 

दुखतंय दुखतंय या गोंडस नावाने व्यायामाला फाटा देऊन, कमोडवर बसायला सुरवात झालेली असते. डाॅक्टरनी, "तुमच्यासाठी हा एकच व्यायाम आहे,"असं सांगितल्यामुळे वाढलेली ढेरी सांभाळत, गुडघ्यावर भार टाकत, एका बाजूने लंगडत चालायला सुरवात केली जाते. 

माॅर्निंग वाॅकच्या 🏃‍♀🏃‍♂ क्रेझपायी ( सक्काळी सक्काळी चालणे हा भारतीय व्यायाम प्रकारच नाही. )  आमचे सांधे आणखीनच झिजवले जातात. 

आता वेदनाशामक औषधे आत जायला लागतात. आतड्यांची कोमल त्वचा जळायला लागलेली असते.

पोटदुखी सुरू होती. त्याच्या तपासण्या आणि स्कोपी.. सगळ्या छिद्रातून आतमधे नळ्या घालून तपासून त्यातून अल्सर, टीबीची लक्षणे ते अगदी कॅन्सर पर्यंत शंका डाॅक्टर घेतातच. या खरंतर फक्त शंकाच असतात. बहुतेक वेळेस खरं काहीच नसतं.... केवळ सस्पेक्ट ऑफ.... असतं. 

काही महाभाग वाॅटसप एफबीचे सल्ले वाचून, जाहीरातींना बळी पडून तोडकरी आयुर्वेदीय बोगस सल्ले, एमवे हेल्थ, नोनी, आणि नको नको ती औषधे स्वतःच्या मनाने खातच असतात  (म्हणे आयुर्वेदाला साईड इफेक्ट नसतात....किती खोटं ? अहो, ज्याला इफेक्ट्स असतात, त्याला साईड इफेक्ट्स असणारच ना ! असो. ) यासाठी कायम आयुर्वेदातील तज्ञ, शासनमान्य अधिकृत वैद्यांचा सल्ला घ्यावा. 

एव्हाना दहा पंधरा प्रकारच्या गोळ्या सुरू झालेल्या असतात.

( बिचार्‍या पोटाने काय काय केमिकल सहन करायची ? )

 कुणीतरी आयुर्वेदातील तज्ञ गाठतोही, पण आधीच्या केमिकलच्या गोळ्या औषधे सुरू ठेवून स्वतःची चूर्णे, गोळ्या वट्या ते वैद्य देतातच. 

एवढं करून छातीत, पाठीत दुखणं सुरूच असतं.

फाईलमधील  कागद वाढतच जातात....

गोळ्या, 💉 औषधे सुरूच असतात...

गुण चार आणे पण नाही..

दुखणे वाढतच असते...

बाहेरची बाधा तपासून अंगारे धुपारेही होतात..☠

वास्तुशास्त्रानुसार ⚒🪚 तोडफोड होते...

नवीन रत्न, ♦️🟣आभूषणे खरेदी होते...

लांबलांबचे वैदू, डाॅक्टरही🩺 पाठी पडतात...

पण कोणालाच अचूक निदान☹️ मिळत नाही....

'एनर्जी' 💪💪काही वाढत नाही....

'इमर्जन्सीमधे' इसीजी, स्ट्रेसटेस्ट, एन्जियोग्राफी, लगेचच इमर्जन्सी एन्जीयोप्लास्टी 😡 करायला भागच पाडले जाते.

 ज्या कारणासाठी डाॅक्टरकडे जातोय, ते कारण/लक्षण बाजूलाच रहाते आणि नकोतेच निदान बाहेर येते आणि नकोती औषधे, नको ते पथ्य, पुनः त्यातून कमतरता... कायम स्वरूपी पाठी लागतात.

*बघा पटतंय का ? 👊*

याची सुरवात कुठुन झाली.. ते आठवा... फ्री चेकअप कॅम्प्स अथवा स्वतःच्या मनाने करवून घेतलेल्या तपासण्या, किंवा सहजपणे डाॅक्टरनी सांगितलेल्या आरोग्य तपासण्या ! ... आणि फक्त एकच 💊 गोळी ! 

*यालाच म्हणतात आ बैल मुझे मार !*

आता काय करायचं हे आपण ठरवा.

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

उगाच वाद घालत अथवा शंका घेत राहू नका.!    

*आरोग्यमं धन संपदा!*

*आनंदी रहा,  हसत रहा!*

म्हणूनचं तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात व्यायामाने करु या 💪

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi