Monday, 24 February 2025

विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे –

 विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे

– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ उत्साहात साजरा

अमरावतीदि. २३ : पदवी पूर्ण होणे ही विद्यार्थ्याच्या आयुष्याची सुरुवात आहे. पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांनी जगभरातील ज्ञानशाखांमध्ये पारंगत होऊन ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा. तसेच राष्ट्र निर्माणासाठी अविरत कार्यरत रहावेअसे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षान्त समारंभ विद्यापीठ परिसरात पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवईराज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरेकुलगुरू डॉ. मिलींद बारहाते आदी उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांना परवडणारे उच्च शिक्षण दिले जात आहे. दर्जेदार शिक्षण देऊन विद्यापीठाने नागरिकांचे जीवनमान बदलण्यात आणि संपूर्ण प्रदेशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगडेटा सायन्ससायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स या प्रगत क्षेत्राचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील गुणवत्तेसोबतच खेळामध्येही प्राविण्य मिळवावे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. संत ज्ञानेश्वरसंत नामदेवसंत तुकारामसंत जनाबाईसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदींनी मराठी भाषेतून विपूल लेखन आणि उपदेश केले आहे. मातृभाषा ही प्रत्येकाच्या हृदयस्थानी असते. त्यामुळे भाषेला अभिजात दर्जा मिळणे गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांनी जगातील विविध भाषा शिकून प्रगती करावी. भाषेसोबतच विविध बोलींचा अभ्यास आणि  तिचे जतन करावे. इतर भाषांमधील ज्ञान मराठीत भाषांतरीत केल्यास त्याचा सामान्यांना फायदा होईल. भाषेसोबतच विद्यापीठाने उद्योगांच्या गरजा पूर्ण होतील असे अभ्यासक्रम तयार करावेत. स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनक्युबेशन केंद्रांमुळे स्थानिक उद्योगांना पूरक वातावरण तयार होईल. रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करताना काम आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन येणेही गरजेचे आहे. या सर्व प्रयत्नांतून प्रधानमंत्र्यांचे 2047 मधील विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार होईल, असेही राज्यपाल म्हणाले.

न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले की, जिल्ह्याला संतांची महान परंपरा लाभली आहे. त्यांनी समाजाचे प्रबोधन करून मत परिवर्तन केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनस्वच्छता आणि शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती बाळगून शिक्षणातून प्रगती करावीतसेच शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा.

यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते मुलींचे वसतीगृह आणि विस्तारीत इमारतीचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. बारहाते यांनी स्वागत करुन अहवालाचे वाचन केले. सुरवातीला राज्

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi