Wednesday, 19 February 2025

कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारीसाठी इंग्लंडमधील उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत

 कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारीसाठी इंग्लंडमधील उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत

-         राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १८ : महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञानकृषी विद्यापीठांमधील संशोधनशेतमाल प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. इंग्लंडपेक्षा महाराष्ट्रात उत्पादन खर्च कमी आहे. तेथील शेतकरी आणि उद्योजकांनी भागीदारीसाठी महाराष्ट्रात यावेयेथे त्यांचे स्वागत होईलअसे प्रतिपादन राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

ब्रिटीश उप उच्चायुक्तालयातील द्विपक्षीय व्यवहार प्रमुख जॉन निकेल यांनी राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि इंग्लंडमधील परस्पर संबंध वृद्धींगत करण्याबरोबरच गुंतवणूक वाढविण्याबाबत चर्चा झाली.

राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल म्हणालेराज्यातील समृद्धी महामार्गामुळे राज्यातील सर्व विभाग जोडले गेले आहेत. सर्व विभागांमध्ये स्थानिक गरजांनुसार उद्योगवाढीला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यातील आंबाडाळींबकेळी अशा फळांना मोठे निर्यातमूल्य आहे. फलोत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी देखील येथे वाव आहे. इंग्लंडमधील शेतकऱ्यांनी राज्यातील शेतीला भेट द्यावीकृषी तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी पुढे यावे असे आवाहन करुन तंत्रज्ञानासह महाराष्ट्रात भागीदारी तसेच गुंतवणुकीसाठी आपले स्वागत होईलअसेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi