Friday, 3 January 2025

दुर्बल, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणावे

 दुर्बलवंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणावे

-         सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा

 

मुंबईदि. : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन समाजातील दुर्बलवंचित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणावेअसे निर्देश नगरविकासपरिवहनसामाजिक न्यायवैद्यकीय शिक्षणअल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

 

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेतला. यावेळी  सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे,  संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या महासंचालक प्रेरणा देशभ्रतारसमाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरीसहसचिव सो.ना.बागुलमहात्मा फुले विकास महामंडळाचे लहुराज माळी व अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या कीसामाजिक न्याय विभागाच्या योजना स्थानिक पातळीवर सुलभतेने पोहचविण्यावर भर द्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची कामे गतीने करावी. यावेळी 2025-मधील अर्थसंकल्पीय तरतूदगोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ,विभागातील रिक्त पदेवसतिगृहेरमाई घरकुल योजनांचा तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi