Wednesday, 18 September 2024

पूर्वजांविषयी कृतज्ञतेची* *महालयारंभ*

 🌹⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


         *पूर्वजांविषयी कृतज्ञतेची*

                 *महालयारंभ*


🚩⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🚩


        *भारतीय संस्कृतीचा कृतज्ञता हा स्थायीभाव आहे. या कृतज्ञता भावनेत विशाल दृष्टिकोन आहे. ही कृतज्ञता जशी जिवंत व्यक्तींविषयी असते.. निसर्गाविषयी असते तशीच आमच्या पितरांविषयीही. हा कृतज्ञता संस्कृती संस्कार वेगवेगळ्या सणावारातून व्यक्त होतो.* 

        *आज हा कृतज्ञता भाव व्यक्त करणारा पितृपक्ष पंधरवडा प्रारंभ होतोय. या जगतात आज असलेले आमचे अस्तित्व आहे ते या थोर पितरांमुळेच.*

        *आम्हांला जगाचा इतिहास ठाऊक असतो. पण ज्यांच्या कृपेने हे अस्तित्व आहे त्यापैकी आमच्या खापर पणजोबांचे नावही आम्हांला ठाऊक नसते. पण ते होते म्हणूनच आम्ही आहोत हे मात्र सत्य आहे.*

        *भारतीयांच्या वंश  उगमाचे मुळपुरुष हे विश्वामित्र, जमदग्नी, भारव्दाज, गौतम, अत्री, वशिष्ठ, कश्यप आणि अगस्ती हे आठ ऋषी समजले जातात. त्यांच्यापासून जवळपास ५० प्रमुख गोत्रांचा विशाल परिवार देशभरात निर्माण झालाय.* 

        *या आमच्या पूर्वजांचे किती किती म्हणून उपकार सांगावेत ? आज जगात विज्ञान.. तंत्रज्ञानक्षेत्रात प्रगती झालीय. माहितीचे स्रोत घरबसल्या उपलब्ध आहेत. तरीही या प्रगतीनंतरही घर कुठे घ्यावे हा प्रश्न पडतो. पण हजारो वर्षे सुविधांचा अभाव असतानाही आमच्या पूर्वजांनी जिवापाड संघर्ष करुन आमच्या घराण्याची वंशवेल.. धर्म.. संस्कृती.. स्वातंत्र्य अबाधित राखलेय.*

        *आमच्या पूर्वजांनी अतिवृष्टी.. महापूर.. अवर्षण.. भूकंप अशा घटनांचा.. अचानक उदभवणाऱ्या अनाकलनीय साथीच्या रोगांचा.. लहरी जुलमी परकीय आक्रमकांचा सामना केलाय. जीव वाचवत प्रसंगी रानोमाळ भटकत डोंगर दऱ्यात ते आश्रय घ्यायचे. या सर्वच संकटातून वाट काढून कुटुंबाचे पालनपोषण केलेय.. ही वंशवेल वाढवलीय. आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणाऱ्या परंपरा.. रीतीरिवाज.. श्रद्धास्थाने यांचे रक्षण केलेय. या त्यांच्या कार्यामुळेच आज आम्ही हे आनंदी जीवन जगतोय. येत्या पंधरा दिवसात पितरांविषयी हाच कृतज्ञता भाव श्रद्धापूर्वक श्राद्धातून व्यक्त केल्या जाणार.*

        *आजपासून या पंधरा दिवसात एकदिवस आपल्या मातृ पितृ गोत्रातील सर्वच पितरांचे तसेच गुरुवर्य, सहकारी.. आप्तेष्ट पितरांचे स्मरण करुन श्राद्धविधी.. तर्पण केले जाते. तर्पण अर्थात तृप्त करणे. ते जिथेकुठे असतील त्यांना आवडणारे सारे पदार्थ अर्पण करणे. त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करणे. त्यांच्यासोबतच आम्ही चराचराची.. पंचमहाभूताचीही काळजी घेतो.* 

        *कावळा हे निसर्गाच्या जीवसाखळीचा महत्त्वाचा पक्षी. ते निसर्गात स्वच्छता दूताचे काम करतात. त्यांना जगवणे मानवी हिताचे आहे. वड असो वा पिंपळ या प्राणवायूच्या वृक्षाच्या संवर्धनासाठी एकाक्ष कावळ्यांची मदत होते. म्हणूनच या पंधरवाड्यात त्यांना भात अर्पण केला जातो. या पंधरवाड्यात आमच्या पूर्वजांच्या आठवणीत आम्ही रमतो.*    

        *जन्म-मृत्यू हे अटळच. पण घराण्यातील संस्कृती संस्कारच जीवनाला खरा अर्थ देतात. आमची श्रद्धा आहे ती संत वचनांवर.*

    *देह जावो अथवा राहो,*

    *पांडुरंगी दृढ भावो..*

        *संत आम्हांला भक्ती मार्ग दाखवतात. संत नामदेव म्हणतात की हा देह जावो किंवा राहो, याची पर्वा नाही. पण परमेश्वरावरील विश्वास अढळ आहे. त्या पांडुरंगावर त्यांचाच नाही तर आमचा.. आमच्या घराण्याचा हजारो वर्ष दृढ विश्वास आहे, आणि म्हणूनच या भवसागरात आम्ही आनंदी जीवन जगतोय.*


🌺🌿🌸🍃🌸🍃🌸🌿🌺


  *हे आदिमा, हे अंतिमा*

  *जे वांछिले ते तू दिले*

  *कल्पद्रुमा*


  *या मातीचे आकाश तू*

  *शिशीरात या मधुमास तू*

  *देशी मृता तू अमृता*

  *पुरोषोत्तमा*


  *देणे तुझे इतुके शिरी*

  *झालो ऋणी जन्मांतरी*

  *अपकार मी, अपराध मी*

  *परी तू क्षमा*

                    

🌺🌿🌸🔆🙏🔆🌸🌿🌺


  *गीत : वसंत निनावे*  ✍

  *संगीत : यशवंत देव*

  *स्वर : रामदास कामत*


  🎼🎶🎼🎶🎼  🎧       


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१८.०९.२०२४-*


🌻🌿🥀☘🌺☘🥀🌿🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi