Thursday, 4 July 2024

जाणून घ्या तीन कायद्यामुळे नागरिकांना होणारे फायदे:*

 🔷🔷🔷

*नुकतेच लागू झालेले तीन नवीन कायदे आणि त्यामुळे होणारे क्रांतिकारी बदल तुम्हाला माहित आहे का?*


इंडीयन पिनल कोड 1860 च्या जागी भारतीय न्याय संहिता 2023, इंडीयन क्रिमिनल प्रोसिजर ॲक्ट 1873 ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि  इंडीयन एविडन्स ॲक्ट 1872 ऐवजी भारत साक्ष संहिता ही तीन कायदे लागू झाले आहेत. 


*जाणून घ्या तीन कायद्यामुळे नागरिकांना होणारे फायदे:*


➡️आता आपल्यावर कुठेही अन्याय झाला तरी त्याच ठिकाणच्या पोलीस स्टेशनला तक्रार देणं बंधनकारक नाही. देशात कुठेही तक्रार देता येईल. पोलिसांची मनमानी बंद!


➡️गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांना कुठल्याही परिस्थितीत 60 दिवसात तपास पूर्ण करावा लागेल आणि चार्जशीट फाईल करावी लागेल. म्हणजे खोट्या केसेस आणि खोट्या गुन्ह्यामुळे कोणाला त्रास देता येणार नाही. 


➡️न्यायाधिशांना 45 दिवसाच्या आत न्याय करावा लागेल आणि आपला निर्णय सांगावा लागेल. म्हणजे कोर्टात होणारी सामान्य माणसाची हेळसांड थांबेल. 


➡️दहशतवादाची व्याख्या करून त्याचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. त्यामुळे दहशतवाद्याला तत्काळ शिक्षा होणार. 


➡️देशात घोटाळे करून विदेशात पळून जाणाऱ्या आरोपींना त्या देशातून पकडुन आणणे कायद्याने शक्य होणार. त्यामुळे भारत विरोधी जगात कुठेही लपून बसला तरी त्याच्या मुसक्या आवळल्या जाणार.


➡️देशविरोधी घोषणा देणाऱ्यांची आता खैर नाही. पूर्वी कायद्यात भरीव तरतूद नसल्यामुळे देशविरोधी गँग वारंवार राष्ट्राचा अवमान करत होती. आता गंभीर गुन्हे दाखल होतील. 


➡️सायबर घोटाळा आता गंभीर गुन्हा करण्यात आला आहे. त्यामुळे हा कायदा सायबर चोरट्यांचा काळ ठरणार.  


➡️आणि सर्वात महत्त्वाचं बदल माहितीये? खोटं बोलून, फसवून लग्न केल्यास गंभीर गुन्हा ठरणार. यामुळे *लव जिहाद* सारख्या घटनेतील आरोपींना गंभीर शिक्षेला सामोरं जावं लागेल. 


➡️नवीन भारतीय पुरावा कायद्यानुसार आता व्हॉट्सॲप, टेलीग्राम सारख्या प्लॅटफॉर्म वरील डेटा स्क्रीनशॉट पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार. 


अश्या अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह नव्या भारताचे नवीन कायदे नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत. 


*ब्रिटिशांनी भारतीयांचे शोषण करण्यासाठी जे जाचक कायदे तयार केले होते ते कायदे बदलण्यासाठी तब्बल 163 वर्ष आणि स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष वाट पाहावी लागली. मोदी सरकारने या कायद्यांच्या माध्यमातून देशाला खूप मोठी देण दिली आहे.*


*या नवीन कायद्यांनी भारताचे संविधान आणि लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट झाली!*


=====

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi