भारतातील एकमेव मंदिर चतुर्वेदेश्र्वर धाम. आपल्याला चार वेद माहीत असतात, पण आपण कधी त्यांचं मूर्तीस्वरूपात दर्शन घेतलेलं आहे का? नसेल तर आज घेऊ या. या आहेत चार वेदांच्या चार मूर्ती, डावीकडून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. इथे १०० वर्षांपासून वेदकार्य चालू आहे, आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी इथे वैदिक शिक्षण घेतले आहे. जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील हे सावरगाव आहे. या आश्रमाची स्थापना ब्रह्मर्षी यज्ञेश्र्वर शास्त्री कस्तुरे यांनी केली आहे.
श्री चतुर्वेदेश्वर धाम येथील चतुर्वेदेश्वराची मूर्ती ही प.पू. श्री यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे उपाख्या बाबा यांना स्वप्नदृष्टांत होऊन स्वतः भगवान चतुर्वेदेश्वरांनी "मी गोदावरी नदीत अमक्या ठिकाणी असून मला तिथून बाहेर काढ असे बाबंना सांगितले." त्यावेळेस गुरूजी नांदेडला होळी येथे संस्कृत पाठशाळा चालवत होते.
No comments:
Post a Comment