लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान
मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
नंदुरबार - ६०.६० टक्के
जळगाव - ५१.९८ टक्के
रावेर - ५५.३६ टक्के
जालना - ५८.८५ टक्के
औरंगाबाद - ५४.०२ टक्के
मावळ - ४६.०३ टक्के
पुणे - ४४.९० टक्के
शिरूर - ४३.८९ टक्के
अहमदनगर - ५३.२७ टक्के
शिर्डी - ५२.२७ टक्के
बीड - ५८.२१ टक्के
No comments:
Post a Comment