राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात
अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान
मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
नंदुरबार - ६७.१२ टक्के
जळगाव - ५३.६५ टक्के
रावेर – ६१.३६ टक्के
जालना – ६८.३० टक्के
औरंगाबाद - ६०.७३ टक्के
मावळ – ५२.९० टक्के
पुणे – ५१.२५ टक्के
शिरूर - ५१.४६ टक्के
अहमदनगर - ६२.७६ टक्के
शिर्डी – ६१.१३ टक्के
बीड - ६९.७४ टक्के
No comments:
Post a Comment