Friday, 17 May 2024

पावसाळी हंगामात जलयानांना समुद्रात जाण्यापासून प्रतिबंध

 पावसाळी हंगामात जलयानांना 

समुद्रात जाण्यापासून प्रतिबंध

            मुंबईदि. 17 : पावसाळी हंगामात सुरक्षिततता आणि पर्यावरणाच्या कारणास्तव समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास बंदी घातली जाते. त्यामुळे आंतरदेशीय जलयाने कायदा 1917 (इनलँड व्हेसल कायदा 1917) च्या अंतर्गत नोंदणी झालेल्या जलयानांनी 26 मे 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामात जलयाने घेऊन समुद्रात जाऊ नयेअसे आवाहन मुंबईच्या महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ.प्रवीण एस.खरा यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi