Tuesday, 7 May 2024

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

 

            मुंबईदि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात  दुपारी १ वाजेपर्यंत  सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे.

        तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

लातूर - ३२.७१  टक्के

सांगली - २९.६५  टक्के

बारामती - २७.५५   टक्के

हातकणंगले - ३६.१७  टक्के

कोल्हापूर -  ३८.४२ टक्के

माढा - २६.६१  टक्के

उस्मानाबाद -  ३०.५४ टक्के

रायगड - ३१.३४   टक्के

रत्नागिरी –सिंधुदूर्ग -  ३३.९१  टक्के

सातारा -  ३२.७८  टक्के

सोलापूर - २९.३२   टक्के

**

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi