लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात
दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
वर्धा - ३२.३२ टक्के
अकोला -३२.२५ टक्के
अमरावती - ३१.४०टक्के
बुलढाणा - २९.०७ टक्के
हिंगोली - ३०.४६ टक्के
नांदेड - ३२.९३ टक्के
परभणी -३३.८८ टक्के
यवतमाळ - वाशिम -३१.४७ टक्के
000
निलेश तायडे / वि.स.अ
No comments:
Post a Comment