Wednesday, 10 January 2024

पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड सर्वोत्तम पर्याय पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन

 पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड सर्वोत्तम पर्याय

पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन

 

            मुंबईदि. 9 : पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मनोगत पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळमाझी वसुंधरा अभियानफिनिक्स फाऊंडेशन संस्थारोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिखर परिषदेमध्ये चार सत्रांमध्ये पर्यावरण बदलाविषयीच्या समस्याबांबू लागवड म्हणजे कायबांबू लागवडीचे महत्व आणि वातावरण बदलामध्ये बांबू लागवडीचे महत्व या विषयावर चर्चासत्रे झाली. या चर्चासत्रामध्ये बांबू लागवडीचे महत्व सांगताना मार्गदर्शकांनी बांबू लागवडीमध्ये असलेल्या संधीबांबू लागवडीमधून साधता येणारी आर्थिक प्रगतीत्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा उत्तम पर्याय असल्याचे मनोगत सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच बांबू लागवडीमध्ये भविष्यातील देशाच्या आर्थिक प्रगतीच्या  अनेक संधी असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

            या शिखर परिषदेमधील चर्चेमध्ये राष्ट्रीय बांबू मिशनचे संचालक प्रभातकुमारउद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहआसाम बायो रिफायनरीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भास्कर फुकनअदानी एन्टरप्रायजेसचे अमोल जैनमुठा इन्डस्ट्रीचे नीरज मुथासीएनबीसीच्या मनीषा गुप्तारेणुका शुगर्सचे अतुल चतुर्वेदीपीस ॲन्ड सस्टेनिबिलिटीचे संदीप शहाआंतरराष्ट्रीय बांबू संघटनेचे बोर्जा दे ला इस्कार्बोटेरीचे अरुपेंद्र मुलिकनॅशनल रिफाईन्ड एरिया ॲथॉरिटीचे अशोक दहिवालएमएसएमई क्लस्टरचे मुकेश गुलाटीभारतीय विज्ञान संस्थेचे माजी प्रमुख के.पी.जे.रेड्डीपर्यावरण कार्यकर्त्या निशा जांमवल यांनी सहभाग घेतला.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi