. *"कुप्लर रोस मॉडेल"* या तत्वज्ञान सिद्धांतानुसार, जेव्हा माणूस कुठल्याही दुःखात, नैसर्गिक आपत्ती, अपघात या गोष्टींना सामोरे जातात तेव्हा ते ५ टप्प्यामधून जातात आणि हे ५ टप्पे म्हणजे
(१) नकार
(२) राग
(३) वाटाघाटी
(४)नैराश्य
(५) स्विकार
(१) *नकार* - ही गोष्ट होऊ शकते यावर विश्वास ठेवण्यास संपूर्ण नकार.
उदाहरणं म्हणजे आपल्याला वाटले होते की कोरोना आपल्याकडे येणारचं नाही.
(२) *राग* - संताप आणि चिडचिड, गोष्टी मनाविरुद्ध झाल्याने
रोजनिशी, पगार, नोकरी कपात गेल्यावर राग अनावर
(३) *वाटाघाटी* - स्वतःच्या मनाला सतत सांगत राहणे की जर असे झाले नसते तर सगळं ठीक झालं असतं.
(४) *नैराश्य* - संताप, चिडचिड याचे परिणामतः नैराश्यात रूपांतर होते.
(५) *स्विकार* - सगळ्यात शेवटचा टप्पा, आता काहीच समोर दिसत नसल्याने जे आहे ते जसेच्या तसे स्वीकार करणे
आयुष्यातील सर्व प्रसंग याप्रकारे येतात पण जो कोणी शेवटचा आणि महत्वाचा 'स्वीकार' टप्पा घेत नाही तो मानसिक संतुलन बिघडवून घेतो हे अढळ सत्य!
No comments:
Post a Comment