चरखा कातणाऱ्या मजुराला मजुरी किती द्यावी?’ - या गांधीजींच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी विनोबांनी सहा महिने मागून घेतले. सहा महिन्यांनी ते गांधीजींना भेटायला परतले तेव्हा त्यांचं वजन तीस पौंड कमी झालेलं होतं.
‘विनोबा, हे काय झालं?’ - गांधीजींनी विचारले
‘गेले सहा महिने रोज आठ तास कातून त्यातून मिळालेल्या सहा पैसे मजुरीमध्ये जगून पाहिलं. अशी अवस्था होते. कातणाऱ्यांची मजुरी चारपट वाढवली पाहिजे’ - विनोबा उत्तरले.
अशी तज्ज्ञ समिती पुन्हा झाली नसणार!
१३ वर्ष पायी फिरून, एकूण जवळजवळ सत्तर हजार कि.मी. प्रवास करून, ४५ हजार एकर जमीन दान मिळवून, भूमीहिनांकरिता भूमी दान चळवळ सुरू करणारे
विनोबा भावे यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन!.....🙏🙏🙏
No comments:
Post a Comment