Wednesday, 9 August 2023

नारळी पौर्णिमे दिनी "शेतकरी दिन” साजरा करण्यात येणार

 नारळी पौर्णिमे दिनी "शेतकरी दिन साजरा करण्यात येणार

— पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


            मुंबईदि. ८ : यावर्षी ३० ऑगस्ट२०२३ रोजी म्हणजेच नारळी पोर्णिमा दिनी राज्यात 
शेतकरी दिन साजरा करण्यास येणार आहे.

            पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस "शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून यावर्षी ३० ऑगस्ट२०२३ या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
            शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालयाने निर्गमित करण्यात येणार आहेत. या दिवशी
वेबिनार संवाद / मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या
 www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi