Saturday, 8 July 2023

पात्र गिरणी कामगारांना तातडीने घरे मिळण्यासाठीअधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार

 पात्र गिरणी कामगारांना तातडीने घरे मिळण्यासाठीअधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार


-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 7 - गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करून पात्र कामगारांना घरे देण्यासाठी शासनामार्फत जे निर्णय घेणे आवश्यक असेल ते घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि गिरणी कामगार सनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिल यामधील 251 पात्र गिरणी कामगारांना घरकुलांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या.


            या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रकाश आबिटकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’ चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, घर हे सर्वांचे स्वप्न असते. मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. पात्र गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या वाटपाचा 20 दिवसांतील हा दुसरा टप्पा असून कामाची ही गती यापुढेही कायम राहणार आहे. यापुढे देखील घर मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी गिरणी कामगारांची जशी पात्रता निश्चित होईल तसे चाव्या वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येतील. कामगारांना गिरण्यांच्या जागेवरच घरे देण्याचा प्रयत्न असून गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने कामगारांना आनंद होत आहे. त्यांच्या आनंदात शासन म्हणून आम्हालाही आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी आवास योजनेप्रमाणे विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून या माध्यमातून मुंबईतून बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. आज चाव्या मिळालेल्या गिरणी कामगारांचे त्यांनी अभिनंदन केले.


            मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार गतिमानतेने काम करीत आहे. यामुळेच ‘सर्वसामान्यांचे सरकार’ अशी या सरकारची ओळख आहे. ज्यांची अंमलबजावणी शक्य आहे असेच निर्णय घेतले जात आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. त्याचप्रमाणे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गिरणी कामगारांना हक्काची घरे लवकर मिळावीत यासाठी समिती नेमण्यात आली असून गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्याच्या आणि घरे वाटप करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यामुळे नक्की किती घरे द्यायची आहेत ते समजून त्यापद्धतीने घरांची उपलब्धता निर्माण करता येईल. आज 251 गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. याचपद्धतीने यापुढे जे पात्र होतील त्यांना तातडीने चाव्या देण्याची सूचना त्यांनी केली. पात्र कामगारांना घरांची उपलब्धता व्हावी यासाठी ठाणे जिल्ह्यात 43 हेक्टर जमिनीची पाहणी करण्यात आली असून यावर जेथे घरे बांधणे शक्य असेल तिथे घरकुल बांधून तयार करण्यात येतील, असे ते म्हणाले. या माध्यमातून घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, हा विश्वास गिरणी कामगारांमध्ये निर्माण केला जात आहे. ज्यांना आज घरे मिळाली त्यांना शुभेच्छा देऊन ज्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत त्यांनाही लवकरच घरे मिळावीत यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, मुंबई आणि गिरणी कामगारांचे आगळे वेगळे नाते आहे. मुंबईच्या विकासासाठी गिरणी कामगारांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. मुंबईबरोबरच देशाच्या जडण-घडणीत तसेच राजकीय, सामाजिक चळवळीत या कामगारांचे मोठे योगदान आहे. घर हा जगण्याचा आधार असतो, नात्यांचा ओलावा असतो. त्याच अनुषंगाने स्वतःचे घर हा गिरणी कामगारांचा हक्क असून त्यांना घरांच्या चाव्या दिल्या जात आहेत याचे वेगळे समाधान आहे. गिरणी कामगारांसाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली जात असून त्याचे वाटपही होत आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यात येत असून सर्वांना घरे मिळावीत यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार श्री. राणे यांनी प्रास्ताविकाद्वारे गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी म्हाडामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.


00000


पात्र मिल कामगारों को तत्काल निवास मिलने के लिए और घरकुल बनाएंगे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. 7- मिल मजदूरों की पात्रता निर्धारित करने के बाद पात्र मजदूरों को घर उपलब्ध कराने के लिए सरकार द्वारा आवश्यक निर्णय लिये जायेंगे, ऐसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज यहां कहा. उन्होंने कहा कि विभिन्न योजनाओं के माध्यम से आवास उपलब्ध कराये जा रहे हैं और सभी पात्र मिल मजदूरों को आवास उपलब्ध कराने के लिए और अधिक कॉटेज का निर्माण किया जाएगा, ऐसा श्री शिंदे ने कहा.   


            महाराष्ट्र गृहनिर्माण एवं क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) और गिरणी कामगार सनियंत्रण समिति के संयुक्त तत्वावधान में सह्याद्री अतिथिगृह पर आयोजित कार्यक्रम में मुख्यमंत्री श्री. शिंदे द्वारा बॉम्बे डाइंग और श्रीनिवास मिल के 251 पात्र मिल मजदूरों को घरकुल की चाबियाँ वितरित की गईं.


            कार्यक्रम में उप मुख्यमंत्री एवं गृहनिर्माण मंत्री देवेन्द्र फड़णवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाड़े, मिल मजदूर समिति के अध्यक्ष विधायक सुनील राणे, विधायक कालिदास कोलंबकर, प्रकाश आबिटकर, गृहनिर्माण विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह 'म्हाडा' के उपाध्यक्ष संजीव जयसवाल, मुख्याधिकारी मिलिंद बोरिकर आदि उपस्थित थे।


            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि घर हर किसी का सपना होता है. मुंबई के विकास में मिल मजदूरों की बड़ी भूमिका रही है. पात्र मिल मजदूरों को घर की चाबियाँ वितरित करने का 20 दिनों में यह दूसरा चरण है और काम की गति जारी रहेगी. मिल मजदूरों की पात्रता निर्धारित होते ही प्रमुख आवंटन कार्यक्रम आयोजित किए जाएंगे ताकि आवास मिलने में और देरी न हो. मजदूरों को को मिल की जगह पर मकान उपलब्ध कराने का प्रयास किया जा रहा है और मिल मजदूरों का सपना पूरा होने से मजदूर खुश हैं. उन्होंने कहा कि सरकार के तौर पर हम भी उनकी खुशी में खुश हैं. उन्होंने कहा कि मोदी आवास योजना जैसी विभिन्न योजनाओं के माध्यम से घर उपलब्ध कराये जा रहे हैं और मुंबई छोड़ चुके मुंबईकरों को वापस मुंबई लाने का प्रयास किया जा रहा है. उन्होंने आज चाबियां पाने वाले मिल मजदूरों को बधाई दी.


            मुख्यमंत्री ने कहा कि सरकार आम लोगों को न्याय दिलाने के लिए सक्रियता से काम कर रही है. यही कारण है कि इस सरकार को 'आम जनता की सरकार' कहा जाता है. ऐसे निर्णय लिये जा रहे हैं जिन्हें लागू किया जा सके. आम लोगों के जीवन स्तर को ऊपर उठाने के लिए विभिन्न परियोजनाएं चलायी जा रही हैं. रुकी हुई पुनर्विकास परियोजनाओं को शुरू किया जा रहा है. इसी तरह उन्होंने कहा कि 'शासन आपके द्वार' कार्यक्रम के माध्यम से एक ही छत के नीचे योजनाओं का लाभ दिया जा रहा है, ऐसा मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा. 


             उपमुख्यमंत्री श्री. फड़णवीस ने कहा कि यह सुनिश्चित करने के लिए एक समिति नियुक्त की गई है कि मिल मजदूरों को उनके उचित घर शीघ्र मिलें और मिल मजदूरों की पात्रता निर्धारित करने और घरों के आवंटन का काम तेज कर दिया गया है. इससे यह समझकर मकानों की उपलब्धता बनाई जा सकेगी कि कितने मकान दिए जाने हैं. आज 251 मिल मजदूरों को घर की चाबियां दी जा रही हैं. उन्होंने सुझाव दिया कि इस तरह से जो भी पात्र होंगे, उन्हें तुरंत चाबियां दे दी जाएं. उन्होंने कहा कि पात्र मजदूरों के लिए घरों की उपलब्धता के लिए ठाणे जिले में 43 हेक्टेयर भूमि का निरीक्षण किया गया है और जहां भी घर बनाना संभव होगा, वहां घरकुल बनाए जाएंगे. इससे घर का सपना पूरा हो रहा है, मिल मजदूरों में विश्वास पैदा हो रहा है. जिन लोगों को घर मिले हैं उन्हें बधाई देते हुए कहा कि, जिन लोगों को अभी तक घर नहीं मिले हैं, उन्हें भी जल्द घर दिलाने का प्रयास किया जा रहा है, ऐसा श्री फडणवीस ने कहा. 


             उपमुख्यमंत्री श्री पवार ने कहा कि मुंबई और मिल मजदूरों का अलग रिश्ता है. मुंबई के विकास के लिए मिल मजदूरों ने कड़ी मेहनत की है. इन श्रमिकों ने मुंबई के साथ-साथ देश के निर्माण के साथ-साथ राजनीतिक और सामाजिक आंदोलनों में भी बड़ा योगदान दिया है. घर जीवन का आधार है, रिश्तों की नमी है. तदनुसार, अपना घर मिल श्रमिकों का अधिकार है और उन्हें अपने घरों की चाबियाँ दी जाती हैं, जिसका एक अलग समाधान है. सरकार द्वारा मिल मजदूरों के लिए बड़ी संख्या में मकान बनवाकर वितरित किये जा रहे हैं. साथ ही केंद्र और राज्य सरकार की योजनाओं के माध्यम से सभी को आवास उपलब्ध कराये जा रहे हैं और उन्होंने कहा कि यह सुनिश्चित करने का प्रयास किया जायेगा कि सभी को आवास मिले, ऐसा श्री पवार ने कहा. 


             मिल मजदूर समिति अध्यक्ष विधायक श्री. राणे ने प्रस्ताविक के माध्यम से म्हाडा द्वारा मिल मजदूरों को घर उपलब्ध कराने के लिए म्हाडा की ओर से किये

 जा रहे उपाययोजनाओं की जानकारी दी.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi