शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणार
-मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि.21 : शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी मिशन "झिरो ड्रॉप आउट" मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये 9 हजार 305 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या शाळाबाह्य बालकांपैकी 9 हजार 4 बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.
राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत असल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, सुनील राणे यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, शाळाबाह्य मुला मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) समग्र शिक्षण योजना व मध्यान्ह भोजन यासारख्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ठाणे जिल्ह्यात सिग्नल शाळेसारखे अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या सिग्नल शाळा सुरू करता येतील किंवा कसे याबाबतीतही विचार करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment