Wednesday, 28 June 2023

आला .. पावसाळा... स्वास्थ सांभाळा

 *... आला .. पावसाळा... स्वास्थ सांभाळा...☔️💨...*


##.. कडक- रणरणत्या उन्हाने तापलेल्या भूमिला, मलूल झालेल्या तना मनाला जून महिना सुरू झाला की वेध लागतात ते वरुणराजाचे..

...आणि मग..,, नेमेची आला पावसाळा,, करत मेघराजा आपलि दणक्यात वर्दि लावतो..

      सगळि स्रूष्टि हिरविकंच दिसते, वातावरण एकुणच प्रफूल्लित होते,, ...हे सगळे खरे असले तरी, याच दिवसात आपलि प्रक्रूति सांभाळणे तितकेच महत्वाचे असते.. हवेत खुप दमटपणा येतो, त्रिदोषांचा विचार करता पावसाळ्यात विशेषतः वातदोषाचा प्रकोप होतो व पित्तदोष साठायला सुरूवात होते,


##.. धातूंचिहि शक्ति कमि झालेलि असते, अग्नि मंद झाल्याने पचनहि मंदावते, व दमटपणामूळे जंतूंचि वाढ होते, शरिराचि प्रतिकारशक्ति कमी होते, म्हणुनच या काळात आहार, आचरण, व आरोग्यरक्षण या त्रिसूत्रिच्या माध्यमातून, ऋतूचर्या ठरवायचि असते..

       ## पाण्याचे प्रदूषण हि समस्या उद्भवते पावसाळ्यात पाण्याचा विपाक आंबट होतो असे आयुर्वेदात सांगितले आहे, जंतूंचि वाढ होते, तेव्हा पिण्याचे पाणी, २० मिनिटे उकळावे, व उकळतांना, त्यात, चंदन, वाळा, अनंतमूळ, वावडिंग, सुंठ, यासारखी द्रव्ये टाकावित पाणि शुद्ध होऊन पचायला हलके होते.


##*. मंद झालेल्या अग्निला प्रज्वलित करण्यासाठि, जेवण तयार करतांना, हिंग, धने, तमालपत्र, ओवा, जिरे, दालचिनि, आले, हळद, आमसूल, अश्या मसाल्यांचा वापर योग्य प्रमाणात करावा, अधून मधून जेवणापूर्वी काळे मिठ व जिरेपुड टाकून लिंबुरस घ्यावे

    .. आले व सुंठ म्हणजे पावसाळ्यात मोठे वरदानच.. अग्निमांद्य दूर करते.. आयुर्वेदात तर आल्याला। ,, विश्वषौधा,, म्हटले आहे, पावसाळ्यात शक्य तिथे आल्याचा वापर करावा, चहात आले घालावे, भाजि, कढि, आमटित घालावे, दूधात सुंठ टाकुन प्यावे,

     प्रवासात आलेपाक चघळावा,..

          घरातला दमटपणा जाण्यासाठि, वेखंड, सुंठ, ओवा, कडूनिंबाची पाने यांचा धूप करावा,, हवा शुद्ध होते

   अभ्यंग स्नान करावे, उटणे वनौषधि असलेले वापरावे चर्मरोग होत नाही, रात्रि झोपतांना कोमट पाण्यात मध टाकून प्यावे व जागरण करू नये..

     नियमितपणे अंगाला तिळाच्या तेलाने मालिश करावी,

....। आहारः

      ।। भजेत्साधारणं सर्वं उष्मणस्तेजनं च यत्।।

 अश्या अन्नाचे सेवन करावे कि जे वात पित्त, कफ या तिघांचे संतूलन करतिल, उष्ण असेल, व अग्निला प्रदिप्त करण्यास सक्षम असेल... या दिवसात अल्प आहार घ्यावा, संद्धाकाळि लवकरच जेवावे, मुगाचि मवु खिचडि, कढि भात, मेतकुट भात, पेज, टोमटो सार, हे पदार्थ ठेवा, नाश्यात, दूध साळ्याच्या लाह्या, तांदळाचि उकड, गरम गरम, नाचणि लापशि, ज्वारिच्या पिठाचा उपमा, राजगिरा चिक्कि, असे घ्यावे,


##*.. भाज्यामद्धेः। दूधि, तोंडली, परवर, दोडकि, घोसाळि, कार्ले, कोहळा, गाजर, भेंडि, करटोलि, व काहि पालेभाज्या , टाकळा, कूरडयी, घोळ, लाल माठ, भारंगि, अश्या खाव्या.. कडधान्येः। मूग, कुळिथ, तूर, मटकि, अंकुरित.. धान्येः.. तांदुळ, ज्वारि, बाजरि, नाचणी, गहू, . शक्यतोवर भाजून घ्यावी.

       फळेः... सफरचंद, अंजिर, पपयि, शहाळे, मोसंबि, संत्रि, नाश्पति, घरचे साजूक तुप वापरावे, ख डिसाखर, सैंधव मिठ, मध, याचा वापर करावा,

..... मसालाः। बडिशेप, आले, हिंग,लवंग, पुदिना, कोथिऔबिर, हिंग, ओवा,..


##*.. दमछाक होणारे व्यायाम न करता, योगासने, लोम, विलोम, प्राणायम, भस्रिका, करावे, पावसाळ्यात सर्दि खोकला, दमा बळावतो, तेव्हा सितोपलादि चूर्ण घ्यावे. ओव्याच्या पुरचुंडीनै छाति शेकावी, रूईच्या पानाने शेकावे, कफ मोकळा होतो, कपभर पाण्यात, गवति चहा, सुंठ, तुळशिचे पाने, काहि पुदिन्याचि पाने, आले हळद, बडिशेप , मिरे लवंग, दालचिनि घालून काढा घ्यावा,.. जुलाब झाल्यास जायफळ उगाळून चाटण घ्यावे

     मेथिचे दाणे पाण्यासोबत गिळावे..


##*.. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, डास निर्मूलनाकरता विविध उपाययोजना अंमलात आणाव्या,

   अश्या प्रकारे काळजि घेतल्यास नक्किच तुमचा.. नेमेचि पावसाळा, आल्हाददायक, सुसह्य, व सुखाचा जाईल.....,, Happy Rainy season.....💐



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi