Monday, 8 May 2023

गणेश चतुर्थी,अर्थात संकष्टी चतुर्थी....

 : गणेश चतुर्थी,अर्थात संकष्टी चतुर्थी......

सर्व. देवात पाहिले वंदन गणेशाला असते.नवीन काम सुरू करणे असो अथवा प्रवासाला निघालो असता आधी गणपतीची.आराधना करतात.अगदी नाटक सिनेमा कला दाखवणे असो आधी नमन गणेशाला असते.आधी गणेश पूजा करून च कार्याला सुरवात करतात गणेशाला हे मोठेपण कसे मिळाले तर ऋषी सांगतात गणपतीने पृथ्वी प्रदक्षिणा करण्या ऐवजी आई पार्वती माता आणि पिताशिव शंभू यांना हात जोडून विनम्र भावाने तीन प्रदक्षिणा घातल्या व पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे बक्षीस मिळवले त्या मुळे गजाननाला या बुध्दीच्या दैवताला प्रथम पूजेचा मन मिळाला सर्व.संकटातून,विघ्न तून पार पडावे.म्हणून पहिली आराधना श्री गणेशाची होते आधी वंदू तुज मोरया.म्हणून नमस्कार करून आधी पूजन होते.

या गजाननाच्या पहिला अवतार हा महोत्कट.हा आहे.त्याची कथा मोठी रंजक आहे.देवांतक,आणि नरांतक हे दोघे जुळे राक्षस भाऊ होते.शरीर सामर्थ्याच्या व बुध्दी सामर्थ्याच्या जोरावर ते शक्तिशाली बनले. व मग उन्मत्त होऊन प्रजेला गोर गरीब लोक,साधू संत यांना त्रास देवू लागले.छळू लागले.लोकांनीगणराया. चा धावा केला.संकट नाशक गणेशाने मग लोकांना या दुष्ट राक्षसाच्या तावडीतून सोडवण्यासाठी कश्यप ऋषी व देव माता अदिती याच्या पोटी माघ शुद्ध चतुर्थी ला दुपारच्या वेळी जन्म घेतला व या दुष्ट राक्षसांचा वध केला व प्रजेला अभय दिले.वयाच्या पाचव्या वर्षी या बालकाची मुंज झाली.त्यावेळी सर्व देव,दानव,मानव,ऋषी तेथे हजर होते.क्षत्रिय राजे होते.सर्वांना सन्मानाने बोलावले होते.प्रत्येकानी या महोत्कट ला,बाळाला निरनिराळ्या वस्तू भेट दिल्या.देवराज इंद्राने त्याला अंकुश दे वून विनायक हे नाव दिले.वडील. व गुरू असणाऱ्या कश्यप ऋषींनी वेद विद्येचे शिक्षण दिले.सर्व.देवांनी निरनिराळी शस्रे दिली मग या शूर महोत्तकटने काशी नगरीत जाऊन तेथील दुष्ट राजाला दुरा सद. ला जो भस्मासुराचा मुलगा होता त्याचा पाडाव.करून त्याला शरणं येण्यास लावून मग जीवदान दिले. व सन्मार्गावर आणले व काशीचा रक्षणकर्ता बनवले व काशी तील लोकांना राक्षसाच्या भया पासून सोडवले.हा पराक्रमाचा संघटना कौशल्याचा अवतार आहे म्हणून त्याला वंदन करावे.

[08/05, 20:01] Mahendra Gharat: तर गणेशाचा दुसरा अवतरशिव.पार्वतीच्या घरी होता.केदारनाथ ला जाताना गौरीकुंड नावाची एक जागा आहे.तेथे गरम पाण्याचे कुंड आहे तेथे पार्वती माता स्नानासाठी जाणार होत्या त्यांनी स्नान करताना कोणी त्रास देवी नये म्हणून स्वतःच्या अंगाच्या उटी ने बाळ गणेशाची मूर्ती बनवून मग ती सजीव करून त्याला दारात बसवले दारातून आत येणाऱ्या सर्वांना बाळ गणेश अडवत होते. शिवाला ही त्यांनी अजाण तेने अडवले आव्हान दिले रागावलेल्या शिवानी त्रिशूल ने बाळ गणेशाचे शिर तोडले पार्वती माता धावत बाहेर आल्या त्यांनी हे पहिले व खूप आक्रोश केला शिवाना विनवले बाळाला परत पहिल्यासारखे करण्याची विनंती केली.प्रसन्न होऊन शिव शंभूनी त्यांच्या साठी तप करणाऱ्या.आपल्या भक्ताचे शिर कापून गणेशाच्या शरीरावर लावले गजासुर सतत शिवाजवल राहायला मिळावे म्हणून जीव धरून तप करीत होता योग्य वेळी मी तुला माझ्या जवळ घेईन या शिवांनी दिलेल्या वचनानुसार गजसुर याचे डोके गणेशाला मिळाले वर शीवांनी वरद हस्त देवून ज्ञान व आशीर्वाद दिला. व गणेशाला पुन्हा जिवंत केले.सर्व.लोकांना तू विघ्णातुन संकटातून वाचव शिल.असे वरदान शिव महादेवांनी गणेशाला दिले.तुला शरण आलेल्या वर तू कृपा कर,त्यांना मदत कर त्यांची दुःखातून सुटका करून तू सुख कर्ता,दुःख हर्ता हो असे सांगितले व गणेश भगवान सुख कर्ता.दुःख.हर्ता होऊन सगळ्यांचे कल्याण करतात.अशी ही बुध्दीची शक्तीची प्रेमळ देवता आहे म्हणून प्रथम तिला वंदन करून पुढील काम करतात.हरी ओम अनुराधा कुलकर्णी

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi