जागतिक मंदी थोपवणारा सकारात्मक अर्थसंकल्प - ललित गांधी
जागतिक मंदी असतांनाही देशात जागतिक मंदीचा परिणाम जाणवू न देता मंदी थोपवणारा सकारात्मक अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. पुढे ते म्हणाले, या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, पर्यटन व कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसत आहे. व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी कोविड काळात नुकसान झालेल्या व्यापार्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. सुक्ष्म, लघु व व मध्यम उद्योगांसाठी 9000 कोटी रूपयांचा कर्जपुरवठा करून त्याकरीता वसुलीसाठीचे संरक्षण योजना 1 एप्रिल पासून अमलात येणार आहे, तसेच बॅटरीवर चालणार्या आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणारे कच्च्या मालाच्या आयातीवर स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली. अर्थसंकल्पातून व्यापार उद्योग क्षेत्राला जीएसटी संबंधी अथय योजना व सुधारणा अपेक्षित होत्या त्या मिळाल्या नाही.
देशात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींची तरतूद व देशांतर्गत विमानसेवेसाठी 50 विमानतळ उभारणे, रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद, प्रधानमंत्री कौशल्य योजनेत पुढच्या तीन वर्षात नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजानुसार युवकांचे कौशल्य विकास करण्यावर भर देणार असून त्यासाठी विविध राज्यांमध्ये 33 किल डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी,
1 कोटी शेतकर्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, यासाठी दहा हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना, छोट्या सहकारी संस्थांना प्रगतीसाठी प्रोत्साहन देणार या योजनांमधून अप्रत्यक्षरीत्या व्यापार उद्योगांना फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे. एक जिल्हा एक उत्पादनासाठी मॉल उभारणार राज्याच्या राजधानीमध्ये राज्याच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी युनिटी मॉल उभारणार यामुळे स्थानिक उत्पादनांना चालना व बाजारपेठ देण्याचा प्रयत्न चांगला आहे.
No comments:
Post a Comment