एकदा प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरलेयत... दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे... मग असे दोन वेगळे शब्द का ..?
शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा..
त्या म्हणाल्या...चुकतोयस तू प्रविण...
जे निरभ्र असते ते आकाश..आणि.. ..जे भरून येते ते आभाळ..!!
आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या... त्या भगवंताच्या असीम कृपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाऴमाया म्हणतात ..!!
#मराठी_भाषा_दिन
No comments:
Post a Comment