नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय.
*महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सच्या मागणी व पाठपुराव्याला मोठे यश : ललित गांधी*
---------------------------०००००---------------------------
कोल्हापूर : नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सने सातत्याने केलेली मागणी आणि पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे, ही माहिती महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये पिशव्या, ताटे, स्ट्राँ, वाटय़ा, ग्लास, काटे, चमचे आदींच्या वापरावरील निर्बंध राज्यात शिथिल केले आहेत. महाराष्ट्र चेबर आँफ काँमर्स सोबत झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, असे साकडे या वस्तूंची उत्पादन करणाऱ्या लघु व सूक्ष्म उद्योजकांनी व व्यापार्यांनी घातले होते. या मागणीची तातडीने दखल घेऊन महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सने ३१ जुलै, २०२२ रोजी औरंगाबाद येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर चेंबरने हा प्रश्न गांभीर्याने मांडून लघुउद्योजक विशेषता बँकांच्या कडून कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू करणारे युवक व महिला यांच्यासाठी जीवनभरणाचा बनलेला हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. बंदी आदेश असल्याने राज्यातील सुमारे सहा लाखांवर युवक, महिलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. हा उद्योग उभारणीसाठी उद्योजकांनी विविध बँकांकडून सुमारे ३ हजार कोटी रुपयाचे अर्थसहाय्य घेतले होते. सरकारने बंदी घातल्याने या उद्योजकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. या सर्व गंभीर परिस्थितीची दखल घेऊन महाराष्ट्र चेंबरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने मागणी आणि पाठपुरावा केला होता. वेळोवेळी निवेदन, चर्चा आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच हे यश मिळाले आहे. या निर्णयाने राज्यातील व्यापारी, उद्योजकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. या वेळी चेंबरचे प्रभारी सहकार्यवाह जनरल सागर नागरे, विपुल मेहता, संचालक सूर्यकांत रोकडे, पी. सी. जैन, मधुसुदन बियाणी यांच्यासह चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयासाठी मुख्यमंत्र्याचे सचिव विकास खारगे, पर्यावरण सचिव प्रवीण दराडे, आमदार प्रकाश आवाडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
००००
या वस्तूवरील बंदी उठविली*
नॉन वोवन बॅग, पेपर म्हणजेच कागदापासून व विघटन होणाऱ्या तत्सम पदार्थापासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या वस्तूंवरील बंदी उठविली आहे. स्ट्रॉ, ताटे, कप, प्लेट्स, ग्लास, काटे, चमचे, भांडे, वाडगे, कंटेनर आदीच्या वापरास आता मुभा असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
No comments:
Post a Comment