*काही धरायचं असतं,*
*काही सोडायचं असतं...*
*एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून,*
*एकमेकाला सोडायचं नसतं,*
*चुकल्यावर बोलावं,*
*बोलल्यावर ऐकूण घ्यावं,*
*एकांतात बसल्यावर,*
*अंतरंगात डोकवावं,*
*राग मनात ठेवला म्हणून,*
*कोणाचं भलं झालं का ?*
*बिन फुलाच्या झाडा जवळ पाखरूं कधी आलं का ?*
*समोरची व्यक्ती चुकली,*
*तरी प्रेम करता आलं पाहिजे,*
*झालं गेलं विसरून जाऊन,*
*गच्च मिठी मारली पाहिजे.*
*स्वागत होईल न होईल,*
*जाणं येणं चालू ठेवल पाहिजे.*
*समोरचा जरी चुकला तरी,*
*आपण मात्र समजुन घेतलचं पाहिजे.*
*आयुष्य खुप छोटं आहे,*
*हां हां म्हणता संपुन जाईल,*
*प्रेम करायचं राहिलं म्हणून,*
*शेवटी खूप पश्चात्ताप होईल.*
*लक्षात ठेवा नात्यापेक्षा,*
*दुसरं मोठं काही नाही मग नाते कोणतेही असो.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*नवरात्रोत्सवाच्या पवीत्र पावन पर्वावर आपणास हार्दिक शुभेच्छा. माता आई तुळजाभवानीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहो हीच प्रार्थना करतो आहे*
🙏🙏🙏🌹
No comments:
Post a Comment