जिवाभावाचे जवळ चार मित्र होते,
तोंडात आपलुकीचे दोन शब्द होते ,
हातात चहाचा कप होता ,
चेहऱ्यावर प्रेमाचा भाव होता ,
मिळून संवाद रंगायचा ,
गमतीचा विषय निघायचा ,
हास्याचा कल्लोळ उडायचा ,
राबलेल मन विसावा घ्यायचं ,
चांदण्या मोजत निजायच ,
असं ते ऐक गावं होत ,
जिथं मन शांत होत ,
आज दिखाव्याचे प्ननास मित्र असतात ,
तोंडात स्वार्थाचे साठ शब्द असतात ,
हातात मोबाईल फोन असतो ,
चेहऱ्यावर टेन्शनचा भाव असतो ,
तशी चॅटिंग होत असते ,
विनोदावर ईमोजी हसत असते ,
टेन्शन नि डोकं दुकत असत ,
आरामासाठी मन शांत नसत ,
काही म्हणा जुना काळ छान होता ,
ज्याकाळी माझ घर , माझा गावं होता.
✍ 🟨🔶🔸🟡
No comments:
Post a Comment