Sunday, 5 June 2022

 जिवाभावाचे जवळ चार मित्र होते,

तोंडात आपलुकीचे दोन शब्द होते ,

हातात चहाचा कप होता ,

चेहऱ्यावर प्रेमाचा भाव होता ,

मिळून संवाद रंगायचा ,

गमतीचा विषय निघायचा ,

हास्याचा कल्लोळ उडायचा , 

राबलेल मन विसावा घ्यायचं , 

चांदण्या मोजत निजायच ,

असं ते ऐक गावं होत , 

जिथं मन शांत होत ,

आज दिखाव्याचे प्ननास मित्र असतात ,

 तोंडात स्वार्थाचे साठ शब्द असतात ,

हातात मोबाईल फोन असतो ,

चेहऱ्यावर टेन्शनचा भाव असतो ,

तशी चॅटिंग होत असते ,

विनोदावर ईमोजी हसत असते , 

टेन्शन नि डोकं दुकत असत ,

आरामासाठी मन शांत नसत ,

काही म्हणा जुना काळ छान होता , 

ज्याकाळी माझ घर , माझा गावं होता.

 

    ✍ 🟨🔶🔸🟡

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi