Sunday, 6 March 2022

 *☘️ जीवनात चांगली कर्म करा, कर्माप्रमाणे फळ मिळते.*🙏 

*☘️ सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते, परंतु जेव्हा सीतेचे हरण झाले तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ द्रौपदीचे रक्षक पाच पाण्डव करीत होते, पण जेव्हा द्रोपदीचे वस्त्र हरण झाले, तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते; जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता; पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते ; जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते; पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ शरशय्या वरती भीष्म पितामह होते; वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते...!!!*

*☘️ राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते ; पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते...!!!*

*☘️ सर्वांसाठी त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे, की या जगात आपले कोणीही नाही. ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे, त्यापुढे कोणी जाऊ शकत नाही. "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर" हेच सत्य आहे...!!!*

*☘️ आपले चांगले कर्मच केवळ आपल्याला संकटातून बाहेर काढू शकतो, म्हणून देवापेक्षा आपण केलेल्या कर्माची नेहमी भिती बाळगावी, एक वेळ देव आपणास माफ करील पण आपली कर्म नाही. आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा शेवटी हिशोब होतो व त्याप्रमाणे तुम्हाला मोक्ष मिळतो*

*☘️ फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विझवु शकत नाही...!!!*

*☘️ आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!✌*

   *❣स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!❣*

|| *जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा*||

🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi