नेहरूंचे लोकशाहीवरील अजब प्रेम. प्रसाद क्षीरसागर यांची पोस्ट
*नेहरूंच्या काळातील व नेहरूंच्या आदेशाने घडलेली पहिली बुथ कॕप्चरिंगची कथा*
देशातील पहिली लोकसभा निवडणूक....लोकसभा मतदारसंघ रामपूर, उत्तरप्रदेश (आत्ता आजम खान व जयाप्रदा उभे आहेत तो मतदारसंघ..) *काँग्रेसकडून मौलाना अब्दुल कलाम आझाद उभे होते.*
*त्यांच्याविरोधात हिंदू महासभेचे विशनचंद सेठ उभे होते.* जवाहरलाल नेहरूंनी रामपूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण जोर लावला होता...कारण मौलानांचे व नेहरूंचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते..
मात्र, मतमोजणी झाल्यावर मौलाना अबूल कलाम आझाद साधारण ८००० मतांनी पडल्याचे लाउडस्पीकरवरून जाहीर झाले.
हिंदू महासभेच्या विशनचंद सेठ व त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला...जल्लोश सुरू होता...मिरवणूक निघाली..
इकडे रामपूर कलेक्टरकडून मौलान आझाद पडल्याची बातमी लखनौला व तिथून दिल्लीला पोचली.
बातमी ऐकताच नेहरूंचे पित्त खवळले...
दिल्लीहून जवाहरलाल नेहरूंचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रींना (गोविंद वल्लभ पंत) फोन आला...जवाहरलाल म्हणाले,
"गोविंदजी आपको आज रात तक समय है...कुछ भी करीये..मौलाना जितने चाहिये..वर्ना इस्तेफा तैयार रखे..."
गोविंद पंतांचे धाबेच दणाणले...त्यांनी रामपूर कलेक्टरला फोन केला...काहीही करा...मौलाना विजयी झाले पाहिजेत...कलेक्टर म्हणाले..निकाल जाहीर केलाय..आता कसा बदलू...? ते तुमचे तुम्ही पाहा...मला संध्याकाळच्या आत मौलाना विजयी झाल्याचा फोन तुमच्याकडून आला पाहिजे...नाहीतर.....
कलेक्टरसाहेबांनी आपल्या अधिकाऱ्याला शंभूनाथ टंडनला बोलावले व असतील तिथून विशनचंद सेठला इकडे घेऊन या असा आदेश दिला...
शंभुनाथ टंडन रामपूर कलेक्टर अॉफिसमधे सुचना विभाग पाहात होते...टंडन विशनचंद सेठ यांच्या विजय मिरवणूकीत गेले...व कलेक्टर साहेबांचा निरोप सांगितला...विशनचंद सेठ कलेक्टर अॉफिसमधे आले...कलेक्टरसाहेब म्हणाले," फेरमोजणीचा अर्ज आला आहे...तेव्हा परत एकदा मोजणी केल्यानंतर फायनल निकाल जाहीर होईल. विशनचंदांना आश्चर्य वाटले...तुम्हीच तर मोजणी केलीय...तुम्हीच निकाल जाहीर केला...आता म्हणता फेरमोजणी करायची...कसं शक्य आहे...? माझे कार्यकर्ते तिकडं माझ्या विजयाच्या मिरवणूकीत आहेत....बुथ प्रतिनिधीला बोलावून आणणे शक्य नाही...
कलेक्टरसाहेब म्हणाले...ते काही मला सांगू नका...आधीचा निकाल रद्द करतोय...व फेरमोजणीचा आदेश देतोय...
त्याकाळी मतदान कसं व्हायचे ते समजून घ्यावे...
सगळ्या उमेदवारांचा समान बॕलेट पेपर असायचा..बॕलेट पेपरवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर शिक्का मारायची पद्धती नव्हती....तर प्रत्येक उमेदवाराची वेगवेगळी मतपेटी असायची...म्हणजे मला काँग्रेसला मत द्यायचे आहे तर मी बॕलेट पेपर घेऊन फक्त काँग्रेसच्या मतपेटीत टाकायचे....झाले मतदान..
तर, आता कलेक्टरसाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या (शंभुनाथ टंडन व इतर) मदतीने काय केले....तर हिंदू महासभेच्या व काँग्रेसच्या मतपेट्या उघडल्या त्यातील बॕलेट पेपर एकत्रित सतरंजीवर टाकले....बिशनचंद यांनी आक्षेप घेतला....तेव्हा अत्यंत नम्रपणे विनवणीच्या स्वरात कलेक्टरसाहेब म्हणाले...दिल्लीवरून आदेश आहे....तुम्हाला हरावच लागेल.....आमचा नाइलाज आहे...आमच्या नोकरीचा प्रश्न आहे....जास्तीतजास्त बॕलेट पेपर काँग्रेसच्या मतपेट्यात भरले...व मतपेट्या परत सील केल्या...हे सगळे कृत्य बिशनचंद सेठ यांच्या समोरच केले गेले...बिशनचंद सेठ हतबल होते...
संध्याकाळी फेरमतदानानंतर काँग्रेस उमेदवार मौलाना अबूल कलाम आझाद २००० मतांनी जिंकल्याचे जाहीर केले.....!
देशातील पहिली बुथ कॕप्चरींग कथा समाप्त.
- प्रसाद राजन् क्षीरसागर
*संदर्भ- स्व. विशनचंद सेठ यांच्या स्मृती प्रित्यर्थ १८ नोव्हेंबर २००५ साली अटलजींच्या हस्ते प्रकाशीत*
*'हिंदुत्व के पुरोधा' ग्रंथातील शंभुनाथ टंडन यांचा लेख...लेखाचे नाव,*
*"जब भईये विशन सेठ ने मौलाना आजाद को धूल चटाई थी, भारत के इतिहास की एक अनजान घटना")*
*म्हणजे हा लेखही कोणी लिहिला आहे तर तो शंभूनाथ टंडन यांनी म्हणजे या प्रकरणाचे साक्षीदार असलेल्या सरकारी अधिकार्याने.*
No comments:
Post a Comment