Monday, 30 August 2021

 प्र.के.अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले...

ही टीका तालिबानी वृत्ती पेक्षाही वाईट होती. 

तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही.

त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले,

" माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात

असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी  हल्ला केला,

व त्यात तिचा गर्भपात  झाला ...

आणि गर्भाशय कायमचे  निकामी झाले ..."


यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले , 

ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला...!


मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले.

त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली,

पश्चाताप केला आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले...!


ही महाराष्ट्रातील नेत्यांची  त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती...!


ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत ..??🤔


आजची संस्कृती म्हणजे ....,

तुला चप्पलने मारतो ...,

कानशिलात मारतो ...,

कोथळा काढतो....,

राडा...,

ही आहे...!


आता हा राडा पुढे न्यायचा ...?

का यशवंतराव - अत्रे यांची नीती पुढे न्यायची...??

हे आपल्या युवकांच्या  हातात आहे...!!

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi