Wednesday, 1 October 2025

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली

 पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ;

टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणारजीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य

आपत्तीग्रस्तांकडून वसुली नकोबँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबईदि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरीआपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावीअसे निर्देश बँकाना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेशेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळडाळी व आवश्यक वस्तूंचा संच वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणेशेतजमीन खरडून जाणेयावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊनझालेल्या नुकसानीवरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मात्रकेंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे. केंद्राकडून ती रक्कम रिइम्बर्समेंटच्या स्वरूपात मिळेलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


तंत्रज्ञानामुळे महापारेषणची प्रगती :

 तंत्रज्ञानामुळे महापारेषणची प्रगती :   :डॉ. संजीव कुमार

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महापारेषणमध्ये विविध प्रकल्प व संचलन चांगल्या पध्दतीने व वेगाने होत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता वाढली आहे. भविष्यातहीअधिकारी व कर्मचारी नावीन्यपूर्ण काम करून महापारेषणचे नाव नक्कीच उंचावतीलअसे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

नवी दिल्लीत महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान

 नवी दिल्लीत महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी केले अभिनंदन

 

नवी दिल्लीदि. ३० : डन ऍन्ड ब्रॅडस्ट्रीट या संस्थेच्या वतीने दिला जाणारा पॉवर ट्रान्समिशन (स्टेट पीएसयू) पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) मिळाला. केंद्रीय वित्त विभागाचे सहसचिव नवीन अग्रवाल यांच्या हस्ते महापारेषणचे मुख्य अभियंता किशोर गरूड व जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकाबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

नवी दिल्लीतील हॉटेल ताज मानसिंगमध्ये १७ व्या पीएसयू आणि शासन परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय ग्रामीण विकास विभागाचे सहसचिव कुणाल सत्यार्थी उपस्थित होते.

 

महापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी आहे. अति उच्चदाब वाहिन्यांचे जाळे सर्वदूर आहे. महाराष्ट्र राज्याची ३० हजार मेगावॉटपेक्षा अधिक विजेची मागणी महापारेषणने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महापारेषणने वीजक्षेत्रात नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः दुर्गमडोंगराळ भागात ड्रोनच्या सहाय्याने कामे केली जात आहेत. तसेच हाय परफॉर्मेस कंडक्टर बसविण्यात आले आहेत. ग्रिड स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी धुळे व लोणीकंद (पुणे) येथे स्टॅटकॉम प्रकल्प प्रस्तावित आहेत. टी.बी.सी.बी.च्या माध्यमातून प्रकल्पांकरिता खुला सहभाग महापारेषणने ठेवला आहे.

तंत्रज्ञानामुळे महापारेषणची प्रगती : डॉ. संजीव कुमार

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महापारेषणमध्ये विविध प्रकल्प व संचलन चांगल्या पध्दतीने व वेगाने होत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता वाढली आहे. भविष्यातहीअधिकारी व कर्मचारी नावीन्यपूर्ण काम करून महापारेषणचे नाव नक्कीच उंचावतीलअसे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

०००

दौंड, आष्टी, माळशिरस विधानसभा मतदार संघातील जल सिंचनाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

 दौंडआष्टीमाळशिरस विधानसभा मतदार संघातील

जल सिंचनाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

 

मुंबईदि. ३०:-  दौंड (जि. पुणे) आष्टी (जि. बीड)माळशिरस (जि. सोलापूर) आणि आष्टी (जि. बीड) विधानसभा मतदार संघातील जलसंपदा विभागाकडील विविध जलसिंचनाच्या कामाचा आढावा जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला. 

 

मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस आमदार राहुल कुलआमदार सुरेश धसमाजी आमदार राम सातपुतेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणालेमुख्य अभियंता श्री. धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर  बैठकीस गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

जलसंपदा मंत्री विखे-पाटील म्हणालेदौंड तालुक्यात खानोटा येथे बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे सर्वेक्षण काम सुरू करावे. या बंधाऱ्याच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मान्यता गतीने घेण्यात याव्यात आणि एक महिन्यात याचा सविस्तर अहवालात तयार करावाअशा सूचना जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या. यावेळी त्यांनी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतर करण्याबाबतचाही आढावा घेतला. जनाई शिरसाई योजनेतील जी कामे करायचे आहेत त्या कामांची निविदा काढण्याची कार्यवाही करावी. यासाठी आवश्यक प्रस्ताव दाखल करून मान्यता घ्यावी. दौंड मतदार संघातील जलसिंचनाची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

माळशिरस तालुक्यातील नीरा उजवा कालव्यावरील माचणूर विभागातील गावांना बारमाही पाणी देण्याबाबत कार्यवाही करावी,अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.

 

आष्टी तालुक्यातील जलसिंचनाच्या कामांचा आढावा घेताना जलसंपदा मंत्री विखे-पाटील म्हणालेज्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत ती कालमर्यादेत पूर्ण करावीत. प्रकल्पाची सर्वेक्षण अंदाजपत्रके तातडीने सादर करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा -

 अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या

 बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा

-         जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. ३०: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बरेचश्या कोल्हापूर पद्धतीचे बंधारे क्षतिग्रस्त झाले आहेत. या बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर होणे आवश्यक असल्याने यासाठीचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनास त्वरित सादर करावाअसे निर्देश जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

 

जलसंपदा मंत्री श्री विखे-पाटील यांनी मंत्रालयात राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे आणि इतर प्रकल्पाचे झालेले नुकसानीबाबतचा आढावा घेतला.

 

 या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणालेमुख्य अभियंता श्री. धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर बैठकीस गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

जलसंपदा मंत्री विखे-पाटील म्हणालेयंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे.  काही बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूस तर काही बंधाऱ्यांच्या एका बाजूचे नुकसान झाले असून काही बंधाऱ्यांच्या गेटचेही नुकसान झाले आहे. या बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानाची तातडीने पाहणी करावी. हे बंधारे तातडीने दुरुस्त करून पाणी अडविणे आवश्यक असल्याने याबाबतचा सविस्तर अहवाल शासनास सादर करावाअशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

देवस्थानच्या शेतजमिनींचे मॅपिंग करून जिल्हानिहाय याद्या तयार करा

 देवस्थानच्या शेतजमिनींचे मॅपिंग करून जिल्हानिहाय याद्या तयार करा

विधि व न्याय राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल

 

मुंबईदि. ३०: राज्यामध्ये देवस्थानच्या शेतजमिनी आहेत. या जमिनी हडपण्याच्या बऱ्याच तक्रारी येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी देवस्थानच्या जमीन शेतजमिनींचे मॅपिंग करून त्याच्या जिल्हा निहाय याद्या तयार कराव्यात असे निर्देश विधि व न्याय राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

 

बैठकीस विधि व न्याय विभागाच्या अवर सचिव मनीषा कदममहाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल म्हणालेदेवस्थानच्या शेतजमिनी बाबत संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पोर्टलवर माहिती घेण्यात यावी जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अतिक्रमित तसेच हडपलेल्या देवस्थानच्या शेतजमिनी मोकळ्या करण्यात याव्यात. देवस्थानच्या शेत जमिनींबाबत झालेल्या व्यवहाराची धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी.

 

देवस्थान जमिनीच्या ७/१२ वर चुकीच्या नोंदणी करण्यात आल्या असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मदाय आयुक्त यांनी तपासणी करावी. तपासणीचा अहवाल सादर करावा. देवस्थान शेत जमिनी बाबत अवैधरित्या झालेला फेरफार हा अवैधच मानला जाईल. अशा फेरफारची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईलअसेही विधि व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 245 देवस्थाने आहेत ही देवस्थाने समितीच्या कार्यक्षेत्रातून उघडण्याबाबत पडताळून कार्यवाही करण्यात यावीअसेही विधि व न्याय राज्यमंत्री ॲड जयस्वाल यांनी निर्देशित केले.

००००

या महोत्सवाच्या अधिकृत लोगो करिता कौशल्य विभागाच्या अंतर्गत बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेचे आयोजन

 या महोत्सवाच्या अधिकृत लोगो करिता कौशल्य विभागाच्या अंतर्गत बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या 'वंदे मातरमया भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात मंत्री लोढा म्हणाले कीवंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्फुर्त सहभागाने झाला पाहिजे. त्यामुळेच या महोत्सवासाठी जनतेच्या सहभागातून बोधचिन्हाची निवड करण्यात आली आहे. ५ ते १० सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन झालेल्या या बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेत राज्यातल्या ३५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयातील तज्ञ परीक्षकांनी  पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे प्राध्यापक रवी पवार यांनी डिझाईन केलेल्या आकर्षक आणि कलात्मक बोधचिन्हाची निवड केली आहे. 

देशभक्ती जागृत करणाऱ्या सार्ध शताब्दी महोत्सवात सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन मंत्री लोढा आणि शेलार यांनी जनतेला केले आहे. राज्यातील कौशल्य विद्यापीठआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रशासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल.तसेच सांस्कृतिक विभागाकडूनही राज्यातील ग्रामीण  भागातही सार्ध शताब्धी  महोत्सव साजरा होणार आहे. त्यासंदर्भात शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समितीही  स्थापन करण्यात आलीय. प्रतिष्ठित व्यक्तींचा त्यात समावेश करण्यात आला आहेअशी माहितीही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi