Sunday, 18 June 2023

पितृ देवो भव

 



स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असावी का ?-


स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असावी का ?-----

का? नसावी ----

स्त्री-पुरुषांची मैत्री म्हटली की अनेकांच्या पोटात गोळा येतो एका वेगळ्या नजरेने बघितले जाते

आम्ही 21व्या शतकात वावरत असताना सुद्धा आमचे विचार मनुवादी विचारसरणीचेच आहेत,

खरंतर हा विषय गहन च आहे

लिहिण्याच धाडस करत आहे

किती पर्यंत जमेल माहित नाही,

 आज ही समाजव्यवस्थेत स्त्री पुरुषाच्या मैत्रीला कुटुंबात व समाजात मोकळे असे स्थान नाही ,

स्त्री पुरुष मैत्री म्हणजे फक्त शारीरिक संबंधच, असे आम्ही गृहीतच धरले आहे,

हाच विचार रूढ केला आहे,

'राधा 'आणि कृष्णाची '' मैत्री आम्ही स्वीकारली, कान्हा वर प्रेम व भक्ती करणारी '' मिरा" ही आम्ही स्वीकारली,

परंतु स्त्री पुरुषाची मैत्री म्हटलं की भुवया उंचावतात, त्यातल्या त्यात ते जर, विवाहित असतील तर मग बघायलाच नको,

मानवी संस्कृतीच्या इतिहासात स्त्री एक स्वतंत्र व्यक्तीमत्व असलेली मानव आहे, या विचाराशी परीचित व्हायला गेल्या शेदिडशे वर्षात सुरूवात झाली आहे. स्त्रीला एक मानव म्हणून स्विकारणे, तीला एकसमान समजणे तरी अजूनही रूजलेले नाही. 


स्त्री पुरूष यांच्यातील सबंधाचा विचार केवळ नरमादी वा केवळ एकच नात्याच्या अनुषंगाने करणारे लोक, निव्वळ संकुचित वा बुरसटलेले नव्हे तर ते मानव या अर्थाने उत्क्रांतही झालेले नसतात. स्त्रीयांना स्वतंत्र बुद्धी असते ही बाबच अनेकांना मान्य नसते असे लोक कोणत्याही स्त्रीपुरूषांना एकाच नात्याने पाहत असतात. 


लिओ टॉलस्टॉय म्हणताच ' nothing is so necessary for man, as to the company of intellectual women'. टॉलस्टॉय ने स्त्रींयाबाबतच लिहीलं कारण त्यावेळी स्त्रीया बुद्धीमान नसतात ,असा समज होता. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या वा स्त्रीच्या मागे पुरूष वा स्त्री असते. जरूरी नव्हे की ती स्त्री पत्नीच असेल वा तो पुरूष तीचा पतीच असेल! हा आधुनिक, स्त्रीपुरूष समतावादी, मुक्त, स्वतंत्रतावादी असू शकतात

मुळात मैत्रीचा पाया शारीरिक नसुन मानसिक भावनिक आणि वैचारिकतेचा आधारावर उभा असतो, हे आम्ही लक्षातच घेत नाही,

शारीरिक भुके पेक्षा ही बौद्धिक आणि मानसिक भुकेसाठी ते एकत्र येऊ शकत नाही का?

प्रत्येक नात्याला' एक मर्यादा असते 'हे तर आम्ही मान्य करतो,

पती -पत्नीशी जे बोलू शकत नाही' 

किंवा पत्नी - पतीशी जे बोलू शकत 'नाही परंतु आपल्या मित्रा शी नक्कीच बोलते हे हक्काचं विश्वासाचे नाते नाही का,?

मैत्री मध्ये समविचारांची देवाण-घेवाण विचार विनिमय संकटात एकमेकांना सहाय्य एकमेकावर आढळ विश्वास एकमेकांसाठी झोकुन देण्याची भावना अपार मायेची प्रेमाची श्रृंखला मी पनाचा व अहंकाराचा लवलेशही नसतो, एकमेकांचे हितचिंतक असतात.

ती त्याची मैत्रीण अगदी सहजतेने स्वीकारते तसेच त्यांने ही अगदी सहजतेने तिच्या मित्राला स्वीकारले पाहिजे. दोन्ही नात्यात सहजता असेल ना तर कुठेच प्रॉब्लेम येत नाही. परंतु तसे होत नाही,

 पती आपल्या पत्नीला म्हणत असतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो

परंतु प्रेम म्हणजे काय हे अनेक पतीला समजलेलच नसते, तिने जर सांगितलं की आज माझ्या मित्राचा फोन आला होता ,आम्ही भेटणार आहोत, तेव्हा त्याचा चेहरा बघा त्याच्या प्रतिक्रिया काय आहे, बायकोचा मित्र म्हटला की त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते, तेंव्हा त्याचे प्रेम कुठे गेल, म्हणजेच काय त्याचं प्रेम किती स्वार्थी विचाराच आहे ,तो जर खरं प्रेम करत असता त्याने खुशीने विचारलं पाहिजे अरे वा माझ्यासोबत पण त्याची ओळख करून दे,, असे मात्र होत नाही हेच तिच्यासाठीही लागू होते 

परंतु सहजतेने दोघांनीही समजून घेतल्यास

 दोघांच्याही वैवाहिक जीवनाला यत्किंचितही धक्का लागणार नाही ,

आता तरी 

या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे खूप महत्त्वाचे आहे,


🌹 ( *भाग 2)* 

 *स्त्री-पुरुषाची मैत्री असावी का ? का असू नये* ?


2 दिवसा पुर्वी याच विषयावर पोस्ट लिहीली होती अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रया आल्या अनेकांनी सूचना ही केल्या काहींनी आमच्या मनातील भावना तुम्ही व्यक्त केल्या आहेत असे सांगीतले, या विषयावर वर्ध्या वरुन ऐका मैत्रिणीने पोस्ट सेंड केली माझे काम सोपे केले,

मित्रानो!

आयुष्याच्या कोणत्याही स्टेज ला कोणीतरी आपलं असणं.. हक्काचं असणं... आपल्या पाठीशी असणं... समजून घेणारं असणं... खूप मॅटर करतं... मग ते एखद्या स्त्री ला असो वा पुरुषाला...

 

लग्न झाल्यावर... पहिली काही वर्षे खूप मस्त आनंदी जातात... दिवस ढळू नये अन रात्र सरु नये अशी अवस्था.... असते 

एकमेकांची खूप काळजी करणं... कौतुक करणं.. खूप प्रेम करणं... खूप छान दिवस असतात.... नाही का त्यात रुसवे फुगवे ही असतात.. मनवणं ही असतंच ... 

भांडणा नंतरचा समेट होणं अजुन गोड असतं....

यात २-३ वर्षे निघुन जातात... 

मग बाळाची चाहुल लागते.. 

त्या सर्व घडामोडी मधे १२-१५ वर्षे अशीच निघुन जातात... 

मुलांना मोठं करणं... त्यांच्या शाळा सुरु होतात... 

ही मधली १०-१५ वर्षे खूप धावपळीत निघुन जातात.. 

पहिल्या २-३ वर्षांची अनुभवलेली नवलाई संपलेली असते... अन ही मधली १५ वर्षे सुसाट निघुन गेलेली असतात..

स्त्री ३५-४० शीत आलेली असते.. मुलांच्या घराच्या जबाबदारीतुन थोडी बाहेर आलेली असते..... 

थोडी स्वतः कडे लक्ष देवु लागते... 

पती राजा ही थोडा घरच्या मुलांच्या अन बायकोच्या व्यापातुन बाहेर पडलेला असतो... त्याचे मित्र.. ऑफिसमधल्या किंवा ऑफिस बाहेरच्या मैत्रीणी.. पत्नी पेक्षा ही त्याला जवळच्या वाटू लागतात मग दोघांमध्ये प्रत्येक विषयावर एकमेकाचा शेअरिंग होत राहत वाढदिवसाचे एकमेकांना गिफ्ट एकमेकांचे शॉपिंग पार्ट्या... आउटींग मस्त सुरु असतं ...

हळु हळु बायकोकडे दुर्लक्ष झालेलंच असतं...

थोडं गृहीत धरणं ओघानेच आलेलं असतं.... 

बघेल तिचं ती काय ते.. बघेल मुलांचं... बघेल घरचं... आपण पैसा देतोय ना... मग झालं...

सुख म्हणजे अजुन काय हवं हिला.. 

घर.. मुलं ... नवरा... जॉब असेल तर जॉब... हे सर्व आपलं जग मानणारी स्री मात्र काहीतरी शोधत असते...

वयाच्या या स्टेज वर काहीतरी निसटुन गेलंय.. निसटुन चाललंय आपल्या हातातून याची जाणीव तिला क्षणोक्षणी होवु लागते... 

रितेपणा आलेला असतो... मित्र मैत्रीणी असल्या तर ठीक.. 

पण जिने नवरा... मुलं.. घर च सर्वस्व मानलंय तीच्या रीते पणाला मर्यादा च नसतात...

नवरा त्याच्या विश्वात दंग... मुलं त्यांच्या विश्वात ... दंग झालेले असतात 

मग हिने करायचं काय? 

नवऱ्याला आपलं काय चुकतंय हेच कळत नसतं... अन हिला सांगता येत नसतं... 

मनापासुन वाटत असतं कोणीतरी अशी व्यक्ती हवी.. जी आपल्याला व आपल्या भावनाना समजून घेइल.. आपल्या हक्काची असेल... माझे मुड्स त्याला कळतील ... माझं शांत रहाणं त्याला कळेल.. माझी चिडचिड तो सहन करेल... मला समजावेल.. 

या अपेक्षा खूप भयानक असतात...

नवरोबाला कधीही न कळणाऱ्या... 

त्याने तिला कधीच च गृहीत धरलेलं असतं... अन हिची मात्र घुसमट होत असते... 

आयुष्य असंच संपणार की काय अशी भिती मनात... वाटत असते ,

मग सुरु होतो खेळ चौकटीतला अन चौकटी बाहेर चा... 

आशा परिस्थितीमध्ये

एखाद्याला मित्र -मैत्रीण भेटते तिला समजून घेणारी.. पण तेंव्हा खरं युद्ध सुरु असतं तिच्या मनात, जिला मित्र मिळालाय ...

' हे योग्य आहे का ? आपण पाप करतोय का? समाज काय म्हणेल? कोणाला काही कळालं तर ?' वगैरे वगैरे.....

सगळीकडुन च घुसमट...


करायचं काय? 


समाजाने अधोरेखीत च केललं आहे .. की स्त्री अन पुरुषामधे कधीच चांगली.. निस्वार्थी.. निर्मळ मैत्री होवू च शकत नाही... 


मग भेटण्यात बोलण्यात चोरटेपणा येतो... 

कधी कधी या सगळ्यात ती वहावत जाते .. तर कधीतरी कोणी तरी स्वतः ला सावरुन घेते...


पण विषय हा आहे की तिने करायचं काय ? 


घरात जे हक्काचं आहे... ज्यांच्या साठी उभं आयुष्य खर्ची घातलंय ... स्वतः च्या इच्छा अपेक्षा ज्यांच्यासाठी मारल्यात... ज्यांच्या मुळे अन ज्यांच्या साठी स्वतः चं शरीर बेढब करुन घेतलंय ... त्या कोणालाच तीचं काही पडलं नसेल... तीला नक्की काय हवय हेच त्याना कळत नसेल तर तीने जावं कुठे? 


कोणाकडुन अपेक्षा कराव्यात? की करुच नयेत? 

तडफड तडफड अन नुसती तडफड....

 कोणीतरी कुटुंबातील व्यक्ती बोलते या बाबांच्या सत्संगला जाऊया का?

तिला बरे वाटते मग ती सत्संग ला जायला लागते बुवा, बाबा ,महाराज, अतिशय चतुर असतात स्त्रियांच्या मनातील द्विंधा

ते ओळखून असतात अध्यात्माच्या गोष्टी तिला ते बरोबर अडकवतात ,तू गेल्या जन्माची "राधा व मी गेल्या जन्माचा कृष्ण" आपली भेट,, देवानेच घडून आणली, आशा तिला थापा मारत असतो

मग आसाराम बापू सारखे बाबा समाजामध्ये कितीतरी आहेत मग अनेक स्त्रिया या बाबांना बळी पडतात, मुळात ती धार्मिक नव्हतीच,, चौकटीच्या बाहेर जाऊन मित्र जर जोडला तर समाज नाव ठेवेल बाबा बुवा सत्संग हा अस्थेचा भक्तीचा व सुरक्षित मार्ग वाटतो इकडे कोणी संशयाने आणि बघत नाही एरवी नवरोबा पत्नीस डॉक्टर कडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर चेक करत असताना हा बाहेर बसून कासावीस होतो इतका वेळ हा काय तपासतो आहे डॉक्टर

परंतु पत्नी सत्संग जात आहे तेव्हा मित्र मैत्रिणी सांगत असतो माझी पत्नी भक्ती मार्गाला लागली, सत्संग च्या नावाखाली तिकडे फक्त शोषणच असते 

 ... त्याला हिच्या मनात काय चाललंय याचं देणं घेणं नसतं...

नात्यामधे तोच तोच पणा आलेला असतो... फक्त एकमेकांच्या आयुष्यात असण्याची सवय झालेली असते ... 

ती हरलेली असते... मेंटली थकलेली असते.. 

Physical satisfaction पेक्षा स्त्री ला mental satisfaction खुप आवश्यक असतं हे नवरोबाला कळतच नसतं... किंबहुना बहुतांशी पुरुषांना कळलेलंच नसतं... 

खूप फरफट होते तिची यात.... मनात खूप मोठी उलथापालथ होत असते... अन ज्याने समजुन घ्यायला हवं तो आपल्या च विश्वात रममाण... त्याला या कसल्याचा गंधच नसतो...

अन मग सुरु होतो एकाकीपणाचा खेळ...

कितीतरी रात्रा तिने जागून काढलेल्या असतात त्याची वाट पाहत त्याच्या सोबत जेवणासाठी थांबलेली असते घड्याळाकडे पाहत, रात्री उशिरा नवराबा येतो मैत्रिणीबरोबर बाहेरच पार्टी करुन, ही जागी असल्याचे पाहून तो विचारतो' तू अजून झोपली नाहीस ' तिला हुंदका' येतो पण ती आतल्याआत तीआवंढा गिळते ,

तो तिला मिठीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याच्या तोंडाचा वेगळाच दर्प व शरीराचा स्प्रे मारल्याचा वास ती घेत असते हा अनोळखी वास असतो तो केव्हाच झोपी गेलेला असतो, ही मात्र त्याच्या कुशीत जागीच असते प्रेमाला वंचित झालेली असते भूतकाळातल्या आठवणी जागवत,

शरीराने व मनाने ति केव्हाच दूर गेलेली असते, त्याच्यात उरले होते फक्त पती-पत्नीचं नाते, हे नात समाजाने दिले होते, या नात्यात 'ना भावना' होती, ना '' आकर्षण, प्रेम तर आटलच होतं,


अशा वेळी तिने काय करावे ,

तुम्हाला काय वाटते ??


नक्किच प्रतिक्रिया द्या

सुपारि....(Areca Catecu)*

 *सुपारि....(Areca Catecu)*


         निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार

 सुपारी हा पदार्थ इतका घरगुती आहे कि त्याच्याशिवाय कोणतेच मंगलकार्य आपल्या घरात होत नाही.

 ,, लग्नाची सुपारी,,ही सर्वांच्या परिचयाचि आहे. संस्कृत मध्ये सुपारी ला..##पुगिफल. म्हणतात.

         बिन सोललेल्या सुपारिला पोफळ म्हणतात. सुपारी व नारळ ही झाडे बहुतेक सारखि असतात.

   सुपारीत अनेक प्रकार आहेत. हुबळी चि. तांबडि सुपारी. , गोमांतक श्रीवर्धन येथील पांढरि सुपारी

 मेंगलोर इकडिल चिकणी सुपारी प्रसिद्ध आहे..

                  सुपारी ही तोंडाला जेवणानंतर आलेला बुळबुळीत पणा घालवून तोंड स्वच्छ करण्यासाठी भोजनोत्तर सर्व लोक वापरतात.. ही दातात धरून चावली असता दात बळकट होतात.

  फार घाम येणाऱ्या मनुष्याने सुपारी विशेषतः चिकणी सुपारी खावि. शरिरास बळकटी येते. तोंडाचि रुची वाढते. व घाम कमी होतो


      सुपारी ही क्रुमिघ्न म्हणजे जंत नाहिसे करणारि असते. सर्व प्रकारचे जंत..दोर्या सारखे, चपटे, लहान , वाटोळे व मोठे जंत नाहिसे करते..बारिक पूड करून ती अंदाजे १\\ ग्रॅम मुलांना पाण्यासोबत 

खाऊ घाला. तर जंत मरून पडतात.. उलटि मळमळ. थांबवण्यासाठी सुपारी खातात..

       सुपारिचि राख करून ती लिंबाच्या रसासोबत चाटण्यास द्यावे. याने उलटि थांबते.

   तापात हि लिंबाच्या रसात मिसळून यांचे सरबत घ्यावे.. ताप उतरतो..

              मुतखड्याचे हे विशेष औषध आहे. सुपारिचि राख करून तिचा बस्तिवर लेप देतात.

 व पोटातून चिकणी सुपारी खायला देतात. सुपारी हि नशा देते. म्हणून सांभाळून खावि

  जास्त खाल्ली कि लागते म्हणतात. अशा वेळी थोडि साखर पाण्यात मिसळून प्यावे. मग बरं वाटतं

   ....... सुपारी ही कंठशुद्धी करणारी आहे. कफाने गळा धरला असता थोडि चिकणी सुपारी चघळावि कंठ लगेच मोकळा होतो.. आलेले तोंड सुपारी खाल्ल्यास बरं होतं.


        


##सुपारिचे ##वरूनहोणारे##उपयोग.. अर्धशिशी वर अर्धी सुपारी उगाळून लेप जिथं वेदना होतात तिथे लावा वा.. अर्धशिशी दुखायचे थांबते. खरूज, दाद, खाज यांवर सुपारी जाळून ति राख तिळाच्या तेलातुन लावावे. खरूज बरि होते.

              नायट्यावर चिकणी सुपारी पाण्यात टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी ते शिळं पाणी नायट्यावर लावावे म्हणजे नायटे बरं होतं. लहान मुलांना गालगुंड होतात त्यावर चिंचोका , चिकणी सुपारी ,व गुग्गुळ ही पाण्यात उगाळून घट्ट होईपर्यंत गरम करून गालगुंडाना लेप द्यावा..

      असे दिवसातून दोन तीन वेळा केल्यास गालगुंड बरे होतात..

   अशि हि सुपारी घरोघरी स्नेहसंबंध वाढविण्यासाठी मदत करते....


सुनिता सहस्रबुद्धे..

                          

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


पितृ देवो भव

 










करपट ढेकरा सारख्या येतात.* *मग हे करून पहा*

 *करपट ढेकरा सारख्या येतात.*

 *मग हे करून पहा*


१) विकारात सोडा पिणे फायदेशीर आहे. सोडा असॅडिक असल्यामुळे गॅसपासून मुक्ती मिळते.

 

 २)काही न मिसळता ताज्या लिंबाचे रस प्यावं.

 

 ३)आल्याचा चहा पिण्याने किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने फायदा होतो.

 

 ४)सतत ढेकर येत असल्यास तोंडात एक लवंग ठेवून चोखावी.

*निरामय आयुर्वेद प्रचार.तुमच्या आरोग्यासाठी निस्वार्थी सेवा.*

 

५)उचकी किंवा ढेकर येत असल्यास गार दूध पिण्याने फायदा होतो.

६)ढेकर येत असल्यास कोथिंबीरची दंडी चावावी.


 ७)सतत ढेकर येत असल्यास घुट घुट गार पाणी प्यावं.


८)सुतशेखर रस दोन गोळ्या घ्या ढेकरा येणे थांबेलच.


निरामय आयुर्वेद प्रचार


वैद्य. गजानन



*_📍हिमोग्लोबिन_* *_🎯

 *_📍हिमोग्लोबिन_*


*_🎯हिमोग्लोबिन म्हणजे काय :_*


_हिमोग्लोबिन हे तांबड्या पेशींमधील प्रोटीन Molecule असून ते फुफ्फुसांकडून ऑक्सिजन शरीरातील उतींना पुरवण्याचे आणि उतींकडील कार्बनडॉय ऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांकडे पोहचवण्याचे महत्वत्वपुर्ण कार्य करतात. पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो आयर्न (लोह) आणि प्रोटीन (प्रथिने) यापासून बनलेला असतो._


*_🎯हिमोग्लोबिन टेस्ट – HB test in Marathi :_*


_रक्त परिक्षणाद्वारे हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते. 10 ते 15 मिनिटात HB Test पूर्ण होते. हिमोग्लोबिन कमी झाल्यास रक्तातील ऑक्सीजनच्या वहनाची क्षमता कमी होते. ज्यामुळे लाल रक्त-कणिकांची (RBC रक्तातील लाल पेशींची) संख्या कमी होते आणि अनीमिया होतो. जर शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर भरपूर कमी असेल तर किडनी रोग, रक्ताची कमतरता, कँसर, पक्षाघात यासारखे आजार होऊ शकता. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, सुस्ती येणे अशा समस्या येऊ निर्माण होतात._


*_🎯कोणकोणत्या कारणांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते..? :_*

_*☞* अयोग्य आहाराच्या सेवनामुळे, पोषणतत्वांच्या कमतरतेमुळे मुख्यतः आहारातील लोह, ब-12 जीवनसत्व, फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते._

_*☞* जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने. उदा. अपघातामुळे, शस्त्रक्रियेवेळी रक्तस्त्राव होणे, मुळव्याध किंवा मलाशयाचा कैन्सर, पोटाचा कैन्सर या विकारात रक्तस्त्राव झाल्यामुळे,_

_*☞* किमोथेरपी औषधांच्या दुष्पपरिणामातून,_

_*☞* किडन्यांचे विकार उद्भवल्याने, किडन्या निकामी झाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते._



*_🎯हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे व घरगुती उपाय :_*


_हिमोग्लोबिन कसे वाढवावे याची माहिती आत्ता जाणून घेऊया. हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी बीट, काळ्या मनुका, खजूर, आंबा, पेरू, सफरचंद ही फळे खावीत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. हे रक्तातील हीमोग्लोबीनची निर्मीती करते आणि लाल रक्तकणांच्या सक्रियतेला वाढवते._


*_🎯रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार :_*


_*☞* हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाल्या पाहिजे. या व्यतिरिक्त तीळ, पालक, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, नारळ, शेंगदाणे, गुळ, मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल._

*_🖊️Written By : डॉ. सतीश उपळकर_*



महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार

 


महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार


साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद, जालन्यातील कडेगाव ग्रामपंचायतीसह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार


 नवी दिल्ली, दि. १८ : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले.


येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, केंद्रीय सचिव पंकज कुमार आदी उपस्थित होते.


कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महानगरपालिकांना, नगरपालिकांना, ग्रामपंचायतींना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला. हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्रामपंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.


 


कडेगावचा झाला असा कायापालट


कडेगाव हे खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत येते. राष्ट्रीय नाविन्यपूर्ण हवामान लवचिक कृषी कार्यक्रम (NICRA- National Innovative Climate Resilient Agriculture program) प्रकल्पा अंतर्गत 2015-16 मध्ये कडेगावाला दत्तक घेण्यात आले. या गावात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनानुसार विविध हवामान अनुकूल उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यापैकी नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या घटका अंतर्गत गावात सिमेंट नाल्याचे बांधकाम, बांधामधील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे, भूमिगत प्लास्टिक बंधारा बांधणे, कृत्रिम विहीर पुनर्भरण करणे, शेततळ्यातील गाळ काढणे, वाळूच्या गोण्या दाबून चेकडॅम बनविणे, भूमिगत प्लास्टिक बंधारे बांधणे असे उपक्रम हाती घेण्यात आले.


            यासह कमी पाण्यावर येणारी पिके जसे तुती (रेशीम उद्योग), गव्हाऐवजी कमी पाण्यावर येणारी ज्वारी, हरभरा या पिकांना प्रोत्साहन देण्यात आले. कापूस आणि मूग, सोयाबीन आणि तूर अशा आंतरपीक पद्धतींना प्रोत्साहन देण्यात आले. सोयाबीन आणि हरभरा पिकांसाठी बीबीएफचा वापर करण्यात आला. कापूस पिकात ठिंबक सिंचनाचा वापर करण्यात आला. पाणलोट क्षेत्र आधारित उपक्रम-नवीन शेततळी, शेतीचे यांत्रिकीकरण याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता वाढविण्यात आल्या. या सर्व उपाय योजनांमुळे गावातील पाणी टंचाईवर पुर्णपूणे मात करण्यात आली. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कडेगावाची मोहर राष्ट्रीय पातळीवर उमटली आहे.


सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मलकापूर या नगरपरिषदेस उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या श्रेणीत तिसरा राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नगराध्यक्ष निलम येडगे आणि उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा जलनिस्सारण व आरोग्य सभापती मनोहर शिंदे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार सुरत महानगरपालिकेसह विभागून देण्यात आला.


 


मलकापूर नगर परिषदेतील 24X7 नळ पाणीपुरवठा ठरला पथदर्शी प्रकल्प


             मलकापूर नगरपरिषदेने वर्ष 2009 पासून 24X7 नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली होती. सलग 15 वर्षे अखंडितपणे ही योजना सुरु आहे. यामुळे मलकापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो. 24X7 नळ पाणीपुरवठा योजनेस वर्ष-2011 चा नॅशनल अर्बन वॉटर ॲवार्ड व पंतप्रधान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.


ही योजना देशभरातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरली आहे. 24 तास पाणी मीटरद्वारे देण्यात येते. यामध्ये जे स्थाननिक नागरिक दर महिन्याच्या 15 तारखेच्या आत पाणीपट्टी कर भरतात त्यांना 10 टक्के सवलत दिली जात असल्याने 90 टक्के नागरिक पाणीपट्टी कर भरतात, अशी माहिती उपनगराध्यक्ष श्री. शिंदे यांनी दिली.


            24X7 नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कोयना नदीच्या पात्रातून जॅकवेल मधून रॉ-वॉटर घेऊन त्याच्यावर 24X7 फिल्टर प्लांटद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रक्रिया केली जाते. डी.आय व एचडीपीई बंद नलिकेद्वारे एएमआर मीटरचा वापर करुन संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो. 


         मलकापूर नगरपरिषद 24X7 नळ पाणीपुरवठा योजने बरोबरच मलकापूर नगरपरिषदेने सांडपाणी प्रक्रिया योजना राबविली आहे. या अंतर्गत पाण्याचा पुर्नवापर अतिशय नियोजनबद्दरित्या केला जात आहे. हे पुर्नवापर केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या एकूण कार्याचा गौरव राजधानी दिल्लीत करण्यात आला.


स्वयंसेवी सामाजिक संस्था या श्रेणीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे येथील ‘भारतीय जैन संघटनेस’ (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख शांतीलाल मुथा आणि सहायक संचालक स्वप्ना पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बीजेएस ही संस्था मागील 37 वर्षांपासून जलस्त्रोत विकास, मुल्य आधारित शालेय शिक्षण, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन या विषयांवर अविरत काम करीत आहे. 2013 पासून जलसंधारणावर सातत्याने संस्थेचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन, जलाशयांचे व तलावांचे पुनरुज्जीवन, त्यातून निघणारी माती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे नापीक झालेली जमीन सुपीक होत आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी साधारण 65% खर्च हा गाळ शेतात नेऊन टाकण्याचा असतो तो शेतकरी स्वत: उचलतात, हे विशेष. राज्यातील बुलढाणा जिल्ह्याला जलपर्याप्त करण्याचे महत्त्वाचे नियोजन कार्य बीजेएस संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे. आता संस्था राज्य सरकारची ‘गाळ-मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबवण्यात सरकारी यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत आहे.


0000


 


                                             


 


 

Featured post

Lakshvedhi