Sunday, 2 April 2023

वजन वाढवण्यासाठी घरगुती*

 *वजन वाढवण्यासाठी घरगुती*


उपाय / जाड होण्यासाठी उपाय

खालील दिलेल्या घरगुती उपायांचा नियमित अवलंब केल्यास आपण वजन वाढवू शकता. चला तर मग बघूयात वजन वाढवण्याचे काही गुणकारी उपाय.


पूर्ण झोप – वजन वाढवण्यासाठी फायदेशीर


हल्लीच्या धावपळ व कामाचा अतिरिक्त ताण असल्याने आपली झोप कमी होते व त्यांचे पडसाद आपल्या शरीरावर आपल्याला जाणवतात त्यामुळे भरपूर झोप घ्या. दररोज कमीत कमी ७ तासांची झोप ही तुमच्या शरीराला गरजेची आहे. चांगली झोप घेतल्याने देखील वजन वाढण्यास मदत होते. तुमच्या शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास तुम्ही जे काही खाता त्याच्या तुमच्या शरीरावर चांगला परिणाम दिसतो. त्यामुळे तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर नियमित पणे पुरेशी झोप गरजेची आहे.


बटाटा – वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय


बटाटा – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

वजन वाढवण्यासाठी बटाटयाचा तुमच्या जेवणात सहभाग असणे गरजेचे आहे. बटाटामध्ये कार्बेहाइड्रेटस असते जे की तुमचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर बटाटा खाल्लाच पाहिजे. शक्यतो उकडलेला बटाटा खावा आणि तळलेला बटाटा खाणे टाळा. असे केल्याने तुम्हाला 2 महिन्यांमध्ये फरक दिसायला सुरवात होईल.


केळे – वजन वाढवण्यासाठी उपयुक्त


केळे – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

केळ हा एक प्रकारे संपूर्ण आहार मानला जातो.केळयात असणारे कॅलरीज व कार्बोहायड्रेट वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे दररोज किमान दोन केळी खालयाने लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.


खजूर


खजूर आणि दूध – जाड होण्यासाठी उपाय

खजूर खल्ल्यानेही वजन वाढण्यास मदत होते. रोज रात्री दूधात खजूर भिजत ठेवून ते खजूर सकाळी खाल्याने व दूध पियाल्यानेही वजन वाढवण्यास मदत होतो. हा प्रयोग तुम्ही कमीत कमी २ महीने सलग न चुकता केल्यास तुम्हाला तुमच्या वजनात आमुलार्ग बदल झालेला दिसेल.


मनुका


मनुका – जाड होण्यासाठी उपाय

मनुका रात्री पाण्यात टाकून भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. मनुका हा फँटस ला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलतो ज्यामुळे तुमचे वजन वाढते. मनुकासोबतच तुम्ही आक्रोड व बदाम देखील नियमित पणे खाऊ शकता. सतत दोन महिने जरी तुम्ही हा प्रयोग केल्यास तुम्हाला तुमचे वजन वाढल्याचे नक्की जाणवेल.


नारळाचं तेल


नारळाचे तेल

तुम्ही आता तुमच्या स्वयंपाकामध्ये मोहरी,सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल वापरत असाल पण काही दिवस तुम्ही जेवण हे मोहरी किंवा कोणत्याही रिफाइंड ऑईलमध्ये बनवण्यापेक्षा नारळाच्या तेलात बनवावे. नारळांच तेल हे दुबळेपणा दूर करून वजन वाढवण्यास गुणकारी आहे.दक्षिणे कडील लोक नारळाचे तेल आहारात वापरतात आपल्या कडच्या लोकांना त्याची सवय नसल्यामुळे ते आपल्याला नको वाटते परंतु नारळाचे तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.


काळे चणे


काळे चणे

काळे चणे वजन वाढवण्यास फायदेशीर ठरतात. काळया चण्यांमध्ये प्रोटीन असतात जे की तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. खजूर आणि मनुक्या प्रमाणेच रोज रात्री थोडे काळे चणे पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. तुमचे वजन वाढण्यास नक्कीच मदत होईल.


अश्वगंधा

वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा हा आयुर्वेदिक पर्याय आहे. एक ग्लास दूधात साधारण पणे २ चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पिल्याने त्याचा नक्कीच वजन वाढण्यास फायदा होतो. दिवसांतून दोन वेळा याचे सेवन करावे.असे केल्यास साधारण २ महिन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवेल.


   🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे फायदे..!*

 *रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे फायदे..!* 


बरेच लोक आता आरोग्याबाबत खूप काळजी घ्यायला लागले आहेत. आरोग्य चांगलं रहावं म्हणून बरेच लोक दिवसाची सुरूवात फळं खाऊन किंवा ज्यूस पिऊन करतात.


मात्र, ज्यूसच्या तुलनेत फळ खाणंच अधिक फायदेशीर मानलं जातं. कारण फळांमधूनच डायट्री फायबर आणि अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. ज्यामुळे पचनतंत्र चांगलं राहतं. आता उन्हाळा सुरू झालाय. या दिवसांमध्ये तुम्ही जर रिकाम्या पोटी डाळिंब खाल्लं तर याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

चला जाणून घेऊ रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे काय फायदे मिळतात.


*अ‍ंटीऑक्सीडेंट :* 

डाळिंबामध्ये पॉलिफेनोल्स नावाचं फायटोकेमिकल्स असं जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डाळिंब रोज जर रिकाम्या पोटी खाल्लं तर शरीरातील पेशांनी फ्री-रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर रोज डाळिंबाचं सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट करण्यासही मदत मिळते.


*किडनी राहते हेल्दी :* 

डाळिंबातील अ‍ॅंटीऑक्सीडेंट किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तेच जर तुम्हाला किडनी निरोगी ठेवायची असेल तर डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करा. डाळिंब रिकाम्या पोटीच खाल्लं तर जास्त फायदा मिळेल.


*सूज होते दूर :* 

डाळिंबामुळे शरीरातील सूज कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात सूज कमी करणारे अनेक तत्व असतात. शरीरावर सूज असेल तर सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचं सेवन करा.


*अनेक आजार राहतात दूर :* 

डाळिंबातील अ‍ॅंटीमाइक्रोबियल गुण याला एक प्रभावी अ‍ॅंटीबायोटिक बनवतात. ज्यामुळे संक्रमण आणि नुकसानकारक बॅक्टेरियासोबत लढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला हेल्दी रहायचं असेल डाळिंबाचं सेवन नियमितपणे करा.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️

जिंदगी imitihan लेती है

 








Saturday, 1 April 2023

कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित रोजगारमेळाव्यात 8 हजार 322 पदांकरिता घेतल्या मुलाखती

 कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित रोजगारमेळाव्यात 8 हजार 322 पदांकरिता घेतल्या मुलाखती


 


            मुंबई, दि. 1 : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नायगाव, दादर (पूर्व) येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील 8 हजार 322 पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्यात नोकरीइच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मेळाव्यात 30 उद्योग तथा कंपन्यांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.


            नायगाव, दादर (पूर्व) येथील स्प्रिंग मिल कंपाउंड येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या मेळाव्याला भेट देऊन पाहणी केली. 


5 लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा


            मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात पाच लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.


            मेळाव्यात विविध कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.


0000


 



गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे

 कुणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप छान लिहिले आहे


*समाजाला वेळ द्यायचा कधी*


*वय 20* वर्षे - आता शिक्षण चालू आहे .

*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे.

*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.

*35 वर्षे* -- मुलं लहान आहेत

*40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.

*45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.

*50 वर्षे* -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.

*55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते. 

*60 वर्षे* -- मुलामुलींचे लग्न करायची.

*65-75 वर्षे* -- इच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.

*80 वर्ष*-- मेला.


17 दिवसाच्या आत सर्व प्रॉपर्टीवरून तुमचे नाव कमी


अरेच्चा 

*समाजाला वेळ द्यायचं राहूनच गेले … !*

  


आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात


बाकी 

सर्व 

इथेच 

राहणार 

आहे .

झाडू,

जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,तोपर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो *स्वतः"कचरा" होवून जातो.*

*त्यामुळे समाजात एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*

मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .

मी विचारले *"काय भाव आहे ?*

त्यांनी सांगितले : *"60 रूपये किलो ."*

त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. मी विचारले: *" याचा काय भाव आहे "*

तो बोलला : *"20 रूपये किलो"*

मी विचारले :"इतका कमी भाव .? 

तो बोलला :"साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! 

पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे 

तेव्हा मला कळाले

जो व्यक्ती *संगठन...समाज* आणि *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...

कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटन* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा...

समाजाला वेळ द्या.

काकडीचा रस - बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर !*

 *काकडीचा रस - बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर !* 


काकडी आपल्याला सर्वांना माहिती आहे. काकडीचा वापर कोशिंबीर आणि सलादमध्ये केला जातो. त्याचप्रकारे काकडीचा रस पिऊन तुम्ही आरोग्यासंबंधित अनेक फायदे मिळवू शकता.


काकडीमध्ये भरपूर न्यूट्रीशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात काकडीचा रस प्यायल्याने शरीरात दिवभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. त्यासोबतच काकडी शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्याचे महत्वाचे काम करते.


आता हवामानातील बदल दिसून येत असल्याने सकाळी आणि रात्री थंडीचा अनुभव तर दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास होत असल्याने, अशा वेळेस स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा रस पिणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.


जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा (Blood Pressure) त्रास खूप जास्त होत असले तर काकडीचा रस बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच काकडीचा रस पचनासाठीदेखील फायदेशीर आहे.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



सेपक टेकरा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार

 सेपक टेकरा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार


                                                            - उपमुख्यमंत्री


 


33 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा नागपूरात थाटात शुभारंभ


 


 


        नागपूर, दि.1 :- देशात सेपक-टेकरा या खेळाची पाळेमुळे प्रथम नागपूरात रुजली आहेत. नागपूरमध्ये रुजलेला खेळ देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देत असेल तर या खेळाचे पालकत्व घ्यायला निश्चित आनंद होईल. या खेळाचे प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            33 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ विभागीय क्रीडासंकुल, मानकापूर येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. पोलीस आणि सीमासुरक्षा दलाचे दोन संघ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहे. 1 ते 5 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. पायाने चेंडू टोलवत खेळला जाणारा हा खेळ शारीरिक तंदुरुस्तीची परीक्षा घेणारा आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये प्रामुख्याने हा खेळ खेळला जातो. भारतामध्ये नागपूर शहरात हा खेळ रुजला आहे. नागपूरने या खेळात अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले आहे.


            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर या खेळाची भारतातील जननी आहे. त्यामुळे निश्चितच या खेळाच्या लोकप्रियतेसाठी आणि प्रशिक्षणासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय स्तरावरील आयोजक व स्थानिक स्तरावरील आयोजक यांनी एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सुचविले. यावेळी स्पर्धक खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. “ या स्पर्धेत प्रत्येकाने आपले राज्य जिंकावे यासाठी प्रयत्न करा आणि जेव्हा देशासाठी खेळाल त्यावेळी तिरंग्याचा सन्मान राखा,” असे आवाहन त्यांनी केले.


            यावेळी त्यांनी सेपक-टेकरा खेळाला नागपूरमध्ये पालकत्व देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सेपक टेकरा फेडरेशनचे राष्ट्र्रीय उपाध्यक्ष डॉ. योगेंद्र सिंह दाहिया, सचिव श्री विरेगोडा, महाराष्ट्राचे प्रमुख विपीन कामदार, सचिव डॉ. योगेंद्र पांडे, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, आयोजक डॉ. अमृता पांडे यांच्यासह या खेळातील मान्यवर खेळाडू उपस्थित होते.


 

Featured post

Lakshvedhi