Tuesday, 9 August 2022

 There's a difference between knowing the path and walking the path.........


Good Morning.

Monday, 8 August 2022

जय उलटा हनुमान

 *हनुमानाची उलटी मुर्ती* . . मित्रांनो, भारतात भगवान हनुमान यांची खुप आणि सर्वत्र मंदिरे आहेत पण भगवान हनुमानाचे एक खास मंदिर आहे, जो सावेर नावाच्या ठिकाणी आहे. या हनुमान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमानजीची उलटी मूर्ती स्थापित केलेली आहे आणि या कारणास्तव हे मंदिर मालवा प्रदेशात उलटा हनुमानाच्या नावाने प्रसिद्ध आहे.


येथे हनुमान मंदिरातील स्थापित मूर्तीच्या अगदी खाली पाताळ लोकाकडे जाण्याचा मार्ग आहे असे सांगितले जाते. येथील हनुमानजी स्थापित केलेल्या मूर्तीचे मुख हे जमिनीकडे आणि पाय आकाशासारखे आहेत. तसेच या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती रामायण काळातील आहे.


इंदूर शहरापासून 30 किमी अंतरावर सावेर गावात हे अद्भुत हनुमान मंदिर आहे. या प्राचीन मंदिरातील हनुमानजीची मूर्ती जगातील एकमेव उलटी मुर्ती आहे आणि ती लोकांमध्ये श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानली जाते. येथील लोकांच्या मते, जर एखादी व्यक्ती या मंदिरात बजरंगबलीच्या दर्शनासाठी 3 ते 5 मंगळवार सतत येत असेल तर त्याचे सर्व दु: ख दूर होतात. तसेच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

रामायण काळात जेव्हा भगवान श्री राम आणि रावण यांच्यात यु-द्ध सुरु होते, तेव्हा राक्षसांचा राजा रावणाने एक युक्ती करून स्वत: चे रूप बदलुन भगवान रामाच्या सै-न्यात सामील झाला. मग यानंतर, जेव्हा रात्रीच्या वेळी सर्वजण झोपल्यानंतर रावणाने श्री राम आणि लक्ष्मण यांना आपल्या सामर्थ्याने बेशुद्ध केले आणि त्यांचे अपहरण केले आणि आपल्या बरोबर त्यांना पाताळ लोकात घेऊन गेला.


जेव्हा ही गोष्ट वानर सै-न्याला कळली तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली. परंतु हनुमानजी भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांना पाताळ लोकामधून शोधून काढले आणि तेथे अहिरावणांचा पराभव करून त्याचा व-ध केला. मग पाताळ लोकातून भगवान राम आणि लक्ष्मण जी यांना परत आणले.


असे म्हणतात की हनुमान सावेर या ठिकाणाहून पाताळ लोक मध्ये गेले होते. त्यावेळी, हनुमान जीचे पाय आकाशाकडे, मुख जमीनीच्या दिशेने होते, त्या कारणास्तव त्यांच्या उलट्या मूर्तीचे पूजन अजूनही या ठिकाणी केले जाते.


आजही या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच काही रिसर्च नुसार ही मूर्ती रामायण काळातील आहे हे सिद्ध देखील झाले आहे.


 *रामभक्त हनुमान की जय, बजरंगबली हनुमान की जय.*

*!!🚩श्रीराम जय राम जय जय राम🚩!!*

■■■■🙏🏽🙏🏽🙏🏽


ऋण सामाजिक

 *वरसोली किनारा झाला स्वच्छ*

दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर झेंडा या कार्यक्रमांतर्गत तहसीलदार कार्यालय, वारिसे क्लासेस माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग, फॉरेस्ट ऑफिस, महा सेना ग्रुप वरसोली ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त वर्सोली किनारा तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच प्लास्टिक मुक्ती ची शपथ घेण्यात आली. वारिसे क्लासेस चे माजी व आत्ताच्या विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग दर्शवत वर्सोली किनारा स्वच्छ करण्यात आला.

 माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी आरोग्य व स्वच्छतेबद्दल मुलांना मार्गदर्शन केले तसेच प्लास्टिक चा वापर कमी करण्याबद्दल देखील माहिती दिली व प्लास्टिक कचरा करणार नाही व लावलेल्या झाडांचे संगोपन नीट रित्या करण्याची शपथ देण्यात आली.

 या कार्यक्रमास अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महा सेना ग्रुप नी प्लास्टिक गोळा करत जेसीबीच्या साह्याने आजूबाजूला पडलेले कचरा एका ठिकाणी करून ठेवले. गोळा झालेले प्लास्टिक पुनर्निर्मिती करीता पाठविण्यात आले व इतर कचरा गोळा करून घंटागाडी ने नेण्यात आले.

 कार्यक्रमाच्या शेवटी वारीसे सरांनी सर्वांचे आभार मानत असेच सामाजिक कार्य पुढे चालू राहावे असे आवाहन केले

ऋण सामाजिक

 


माणुसकी प्रतिष्ठान वरसोली बिच सफाई

पा न च ट

 






In veseel rule


 

हर घर तिरंगा.

 हरघर तिरंगा

        नवी दिल्ली, दि.7- दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला.

            येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात सकाळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार हरिभाऊ राठोड, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सचिव तथा आयुक्त (गुंतवणूक व राजशिष्टाचार) निवासी आयुक्त (अ. का.) डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश आडपवार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा, यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र सदन येथे निवासी असलेले अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी ध्वज उंचावून ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाचा रितसर शुभारंभ करुन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित मुख्य सचिव श्रीवास्तव, श्रीमती पांडे यांच्यासह उपस्थितांनीही ध्वज उंचावून ‘वंदे मातरम्’ , ‘भारत माता की जय’ या घोषणा दिल्या. या घोषणांनी महाराष्ट्र सदन निनादले. 


            दिल्लीत मराठी भाषीक लोकांची जवळपास अडीच लाख लोकसंख्या असून, हे लोक दिल्ली व परिसर क्षेत्रात वास्तव्यास आहेत. या सर्वांची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली असून राज्यात साजरे केले जाणारे सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम येथेही सार्वजनिकरित्या साजरे केले जातात. महाराष्ट्र शासनाच्या दिल्ली स्थित कार्यालयांच्या समन्वयातून यांना एकत्रित करुन अनेकदा कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले जाते. ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) या अभिनव उपक्रमा अंतर्गत दिल्ली स्थित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी भाषीक मान्यवरांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे महत्व पटवून, या अभियानाचा प्रचार-प्रसार महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांवरुन प्रसृत करण्यात येणार आहे.


00000



 

Featured post

Lakshvedhi