Tuesday, 19 April 2022

 पां.वा.काणे यांचे संशोधन कार्य पुढे नेण्याचा विद्यापीठांनी संकल्प करावा                                                           - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी .

            मुंबई दि. 18 : भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्र व भारतीय संस्कृती याविषयी केलेले अफाट संशोधन कार्य केवळ थक्क करणारे आहे. आपल्या कार्यातून काणे यांनी देश, समाज व संस्कृतीचा गौरव वाढविला. विद्यापीठ, संशोधक व शिक्षणतज्ज्ञांनी संकल्प करून त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.    

            थोर कायदेपंडित व धर्मशास्त्राचे अभ्यासक महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या 50 व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  

            एशियाटिक सोसायटी तसेच टपाल विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एकनाथ क्षीरसागर, सोसायटीच्या अध्यक्ष विस्पी बालापोरिया, विश्वस्त डॉ भालचंद्र मुणगेकर, महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्ट मास्तर जनरल वीणा श्रीनिवास, मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, सोसायटीच्या कार्यवाह मानद सचिव मंगला सरदेशपांडे तसेच काणे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.      

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले,सार्वजनिक जीवनात वावरत असताना देखील काणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जोपासलेल्या व्यासंगाचा विचार करतो त्यावेळी हे कुणी अवतारी पुरुषच असावे असे आपल्याला वाटते असे नमूद करून एशियाटीक सोसायटीमध्ये बसून त्यांच्यासारख्या महान लोकांनी तपस्या केली असल्यामुळे ज्ञानाचे भंडार असलेली सोसायटी सर्व संकटांवर मात करून अवश्य जगेल याबद्दल आपण आश्वस्त असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

            काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राचे हिंदी अनुवादित खंड वाचले असल्याचे नमूद करून विद्यापीठांमध्ये आता आंतरशाखीय अध्ययनाचे पर्याय उपलब्ध असताना संशोधकांनी काणे यांचे ग्रंथ अवश्य अभ्यासावे. त्यातून समाजाला उत्तम नेतृत्व लाभेल असे राज्यपालांनी सांगितले.  

एशियाटिक सोसायटी तसेच पोस्ट विभागाचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ सुरज पंडित यांनी काणे यांच्या कार्याचा परिचय करून दिला तर मंगला सरदेशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. 


0000

Governor Koshyari releases commemorative postage stamp of Indologist P V Kane.

            Mumbai;Date 18:Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released a commemorative stamp on Bharat Ratna Mahamahopadhyaya Dr Pandurang Vaman Kane on the occasion of the 50th death anniversary of the great Indologist and Sanskrit scholar at Raj Bhavan Mumbai on Monday (18 April)

            The postage stamp was brought out by the Asiatic Society of Mumbai in association with the Department of Posts. 

            Chairman of the Board of Trustees of the Asiatic Society Eknath Kshirsagar, President of the Society Prof. Vispi Balaporia, Trustee Dr B L Mungekar, Chief Post Master General of Maharashtra Circle Veena Srinivas, Post Master General of Mumbai Circle Swati Pandey, Officiating Honorary Secretary Mangala Sirdeshpande and family members of late Kane were present on the occasion.

000000


 



 



 कनोईंग व कायाकिंग खेळासाठीच्या आरक्षणासाठी एकच संघटना हवी.

- क्रीडा व युवक सेवा आयुक्तांची माहिती.

        मुंबई, दि. 18 :- कनोईंग व कायाकिंग या खेळाच्या “ महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग “ राज्य संघटनेच्या दोन कार्यकारिणी अस्तित्वात असल्याने राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त खेळाडूंना ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी लाभ देण्यात येणार नसल्याचे क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

            शासकीय व निमशासकीय सेवेत खेळाडूंना 5% आरक्षण असून, कॅनोईंग अँन्ड कयाकिंग हा खेळ ऑलिंपिक, एशियन व कॉमनवेल्थ या स्पर्धांमध्ये खेळला जात असल्याने या खेळाला शासकीय/निमशासकीय सेवेत 5% खेळाडू आरक्षण देण्यात येत .

            कनोईंग व कायाकिंग या खेळाच्या “महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग” राज्य संघटनेच्या दोन कार्यकारणी अस्तित्वात असल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र राज्यात संबंधित खेळाची एकच संघटना अस्तित्वात असणे आवश्यक आहे. जेणेकरुन संघटनेमार्फत आयोजित अधिकृत स्पर्धांमधील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनामार्फत विविध योजनांचा लाभ अनुज्ञेय राहील. यामुळे “ महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग “ राज्य संघटनेतील वाद संपुष्टात येऊन एकच अधिकृत कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत. धर्मादाय आयुक्त यांच्याकडून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व भारतीय कनोईंग आणि कयाकिंग असोसिएशन यांच्या मार्फत या खेळाच्या एकाच अधिकृत राज्य कार्यकारणीस मान्यता मिळेपर्यंत कनोईंग व कायाकिंग खेळाच्या आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंची प्राविण्य प्रमाणपत्रे 5 टक्के खेळाडू आरक्षण अंतर्गत पात्र करण्यात येणार नाही.

            भारतीय कनोईंग आणि कयाकिंग असोसिएशन यांच्या मार्फत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल. वरील बदलाची नोंद कनोईंग व कायाकिंग या खेळातील खेळाडूंनी घ्यावी असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य श्री. ओम प्रकाश बकोरिया यांनी केलेली आहे.

0000




 उष्माघातासंदर्भात ‘दिलखुलास’ कार्यक्रमात

डॉ. मधुकर गायकवाड यांच्या मुलाखतीचे पुन:प्रसारण

            मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबईतील जे. जे. रूग्णालयाचे औषध वैद्यक विभाग प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांच्या विशेष मुलाखतीचे पुन:प्रसारण होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 19 व बुधवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान कमालीचं वाढू लागलं आहे. विशेषतः विदर्भ, खानदेशाबरोबरच मराठवाड्यातील तापमानही वाढत आहे. वातावरणीय बदलामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत असताना या काळात आपली काळजी कशी घ्यावी, उष्माघातापासून स्वत:चे रक्षण कसे करावे, याविषयीची सविस्तर माहिती डॉ. गायकवाड यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

००००

 अंगारकी चतुर्थी

इतर भाषांत वाचा

Download PDF

पहारा

संपादन करा

अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.[१]



गणेश मूर्ती दर्शन

धार्मिक महत्त्व संपादन करा


नैवेद्याला उकडीचे मोदक

गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे.[२] या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी श्रीगणेशाची पूजाही करतात.


भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात..[३]


कथा व व्रत संपादन करा

मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला 'मंगलमूर्ती" असे नाव मिळाले.[४]

 



 

सुंदर संदेश, मातृ पितृ देवो

  *राजकीय नेत्याला बाप मानणाऱ्या*

*मुलाच्या कानाखाली जाळ*

*काढणारा बाप माणूस.......*

साधारणपणे ५-१० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग! दिवाळीची सुट्टी लागली म्हणून गावाकडे निघालो होतो. 

दिवाळीमुळे प्रचंड गर्दी होती. 

माझ्या शेजारी जागा रिकामी होती. 

एक पन्नाशीला टेकलेला मनुष्य घाम पुसत माझ्या जवळ आला. 

जागा रिकामी आहे का चौकशी केली. 

मी अगदी मनमोकळेपणाने बॅग वर टाकून जागा करून दिली.

गाडी नगरहून निघाली आणि 

गावाच्या दिशेने निघाली. 

माझं तरुण वय आणि हातात अग्निपंख पुस्तक पाहून न राहवून त्या सद्गृहस्थाने माझी चौकशी केली.

मी सांगितलं की, कॉलेजमध्ये आहे. सुटीला घरी जातोय.

गप्पांच्या ओघात ती व्यक्ती शिक्षक असल्याचं कळलं! मी पण उत्सुकतेने शाळेतल्या गमतीजमती विचारायला सुरुवात केली

 आणि

 त्यांनी पण त्या मोठ्या आवडीने सांगायला सुरुवात केली.

बोलता बोलता त्यांनी मला विचारलं, तू कोणता व्यवसाय करणार?

मी म्हटलं - मला व्यवसाय करायला आवडेल पण मला शिकवायला आवडतं!

*माझ्या उत्तरावर त्यांनी कुतूहलाने माझ्याकडे पाहिलं. 

आणि

 म्हणाले - "शिक्षक होणं ही साधी गोष्ट नाही.

 त्यासाठी पाठ हे स्वतः जगावे लागतात 

आणि 

विद्यार्थ्यांना जगायला शिकवावे लागतात."

कोणत्या तरी धड्याचा संदर्भ देऊन हे त्यांनी सांगितलं. 

वाक्य आवडलं म्हणून लक्षात राहिलं.

 पण पुढे त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती.

आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. 

नगरपासून ४०-५० किलोमीटर वर गाव होतं त्यांचं! 

गेली २० ते २५ वर्षे एसटी ने अप डाऊन करुन नोकरी केली होती.

 माणूस प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक होता. 

पोरगा नुकताच १२ वी झाला. 

मार्क पण चांगले पडले होते. 

नगरला यायला त्रास होऊ नये, म्हणून सरांनी मुलाला दुचाकी गाडी घेऊन दिली होती. 

साहजिकच पोराच्या हुशारीचं कौतुक बापाच्या डोळ्यातून पाझरत होतं.

गाव १० किमीवर आलं, तसा सरांनी मुलाला एसटी स्टॅन्डवर घ्यायला ये असा फोन केला. 

पोराने पण लगेच तत्परता दाखवून येतो असं उत्तर दिलं 

आणि 

एसटी स्टॅण्डकडे निघाला. गाव आलं..

एसटी थांबली. 

तसा पोरगा 

आणि 

त्याचे मित्र सरांना घेण्यासाठी गाडीवर आले होते.

सर खाली उतरले. 

नवीन कोऱ्या गाडीवर एका राजकीय पक्षाचे चिह्न आणि 

त्याचा फोटो चिकटवलेला दिसला. 

पुढच्या क्षणी एसटी स्टॅन्ड मुस्काडात मारल्याचा आवाजाने चपापले!

सरांनी पोराच्या जोरदार कानाखाली वाजवलीं होती. सरांचा आवाज 

आणि 

राग दोन्ही चढत होते.

*तुझा बाप गेली वीस वर्षे तुझ्या बुडाखाली गाडी असावी, या करिता झिजतोय आणि तू मात्र नव्या कोऱ्या गाडीवर अनोळखी नेत्याचा फोटो लावून हिंडतोय?*

 *तुझ्या बापापेक्षा भारीय का रे .... तो?*

तो पण जिवंत आहे 

आणि 

तुझी आई 

आणि 

बाप पण! 

मग *आईबाप विसरुन तुला त्याचा फोटो का लावावा वाटला?*

राजकारण करायचंय जरुर कर! 

मास्तरांचा पोरगा मास्तर व्हावा असा काही नियम नाही. 

*पण कर्तृत्व असं घडवं की नेता तुझ्या दारात येऊन म्हंटला पाहिजे - "साहेब माझ्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे. ह्या वेळी तिकीट तुम्हाला द्यायचं ठरलं आहे.*"

सरांच्या डोळ्यातून आग

 आणि

 मुखातून शिशाचा रस कानात ओतला जात होता.

*जो पोरगा त्याच्या आईबापाच्या रक्ताच्या कमाईला कुणा नेत्याच्या प्रचाराचं लेबल लावत असेल, तर ती औलाद हरामखोर म्हणावी लागेल*

 अशी औलाद असण्यापेक्षा नसलेली परवडली.

*छत्रपती शिवाजी महाराजांनी पण स्वराज्याचं तोरण बांधलं, पण माता आणि* 

*मातृभूमीला वंदन करून, *

 *आणि*

*माता पित्याला विश्वासात घेवून* *लाचारी आणि*

 *लाळघोटेपणा करून नाही*

 घरी येईपर्यंत जर गाडीवरची ठिगळ जर निघाली नाहीत तर गाडी जाळून टाकेन.

 " असं म्हणून सर पायीचं घराकडे निघाले.

मी म्हटलं, साधी गोष्ट होती. जी घरी पण समजावून सांगणे शक्य होते. इतकं आक्रमक होण्याची गरज नव्हती. 

सर

 पायीच घरी निघाले. 

तसं पोराने आधी भराभर स्टिकर फाडले. 

पुढचं दृश्य फार पाहण्या सारखं होतं.

सर 

फक्त त्यांच्या मुलाला बोलले, पण त्याच्या मित्रांना पण ते लागलं होतं. पोरांनी भराभर स्टिकर फाडली. सरांच्या शब्दांत दम होता.

 उद्या हा प्रसंग आपल्या कुणाच्या वाट्याला येणार नाही असं नाही.

 आणि 

त्यात चूक काहीच नाही. पोरांनी नीट घरचा रस्ता धरला.

 पोरगा मात्र घरी जायला धैर्य एकवटत होता.

*सरांनी स्वतःच्या मुलाच्या थोबाडात वाजवून वेदना मात्र सगळ्यांच्या हृदयात जागवल्या होत्या*. 

पाठ जगणे कशाला म्हणतात हे सरांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं होतं.

गप्पा आणि अचानक घडलेला पुढचा प्रसंग यात सरांचं नाव विचारायचं राहून गेलं. 

इतक्यात कंडक्टरने डबल बेल मारली आणि गाडीतल्या अनेक बापांच्या मनात एक नवीन विचार

 आणि

 *पोरांच्या मनात कृतज्ञतेच्या जाणिवा जाग्या करून गाडी गावाच्या दिशेने निघाली*

*वेळीच घातलेला एक टाका पुढचे शंभर टाके वाचवतो ते असं* 

*नातं वृद्धाश्रमात पोहोचण्या इतकं फाटल्यानंतर त्याला सहानुभूतीचे टाके घालण्यापेक्षा वेळीच जबाबदारीच्या जाणिवा थोडं कठोर होऊन जाग्या केलेल्या उत्तम नाही का?*

*© श्री. अमेय कानडे.*


*नेत्याला बाप समजणाऱ्या सगळ्या गाढव तरुणांना आवर्जून पाठवा.. कदाचित अक्कल येईल आणि त्यांच्या आयुष्याचे मातेरे होणार नाही...* 


🌸

  सुंदर संदेश, मातृ पितृ देवो

Featured post

Lakshvedhi