Thursday, 31 October 2024

राज्यात 18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 704 तर वयाची शंभरी पार केलेले 47 हजार 392 मतदार

 राज्यात 18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 704 तर

वयाची शंभरी पार केलेले 47 हजार 392 मतदार

 

मुंबईदि. 31 : राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले 47 हजार 392 मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

            राज्यातील एकूण मतदारांमध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरुष4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला तर 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार असे एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 मतदारांमध्ये पुरुष मतदार 12 लाख 91 हजार 8479 लाख 30 हजार 704 महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 153 इतकी आहे. 20 ते 29 या वयोगटातील एकूण 1 कोटी 88 लाख 45 हजार 005 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 1 लाख 62 हजार 412महिला मतदार 86 लाख 80 हजार 199 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2394 इतकी आहे. 30 ते 39 या वयोगटातील एकूण 2 कोटी 18 लाख 15 हजार 278 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 11 लाख 21 हजार 577महिला मतदार 1 कोटी 6 लाख 91 हजार 582 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 हजार 119 इतकी आहे.

            40 ते 49 या वयोगटातील एकूण 2 कोटी 7 लाख 30 हजार 598 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 7 लाख 49 हजार 932महिला मतदार 99 लाख 79 हजार 776 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 890 इतकी आहे. 50 ते 59 या वयोगटातील एकूण 1 कोटी 56 लाख 10 हजार 794 मतदारांमध्ये पुरुष मतदार 78 लाख 54 हजार 052महिला मतदार 77 लाख 56 हजार 408 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 334 इतकी आहे. 60 ते 69 या वयोगटातील एकूण 99 लाख 18 हजार 520 मतदारांमध्ये पुरुष मतदार 50 लाख 72 हजार 362महिला मतदार 48 लाख 46 हजार 25 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 133 इतकी आहे.

वर्ष 70 ते 79 या वयोगटातील एकूण 53 लाख 52 हजार 832 मतदारांमध्ये पुरुष मतदार 26 लाख 36 हजार 345महिला मतदार 27 लाख 16 हजार 424 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 63 इतकी आहे. 80 ते 89 या वयोगटातील एकूण 20 लाख 33 हजार 958 मतदारांमध्ये पुरुष मतदार 9 लाख 15 हजार 798महिला मतदार 11 लाख 18 हजार 147 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 13 इतकी आहे. 90 ते 99 या वयोगटातील एकूण 4 लाख 48 हजार 38 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 लाख 97 हजार 323 तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 50 हजार 715 इतकी आहे.

वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या 100 ते 109 या वयोगटातील एकूण 47 हजार 169 मतदारांमध्ये पुरुष मतदार 20 हजार 983महिला मतदार 26 हजार 184 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 आहे. 110 ते 119 या वयोगटातील एकूण 113 मतदारांमध्ये पुरुष मतदार 52 तर महिला मतदारांची संख्या 61 आहे. तर 120 हून अधिक वयोगटातील 110 मतदारांमध्ये पुरुष मतदार 56 तर महिला मतदारांची संख्या 54 आहे.

            विशेष वयोगटामध्ये 85 ते 150 वयोगटामधील एकूण 12 लाख 40 हजार 919 मतदारांमध्ये 5 लाख 42 हजार 891 पुरुष6 लाख 98 हजार 022 महिला आणि 6 तृतीयपंथी मतदार आहेत. तर 100 ते 150 वयोगटामधील एकूण 47 हजार 392 मतदारांमध्ये 21 हजार 91 पुरुष26 हजार 299 महिला आणि 2 तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचबरोबर एकूण 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार 3 लाख 84 हजार 69महिला मतदार 2 लाख 57 हजार 317 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 39 इतकी आहे. सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स)  एकूण 1 लाख 16 हजार 170 मतदारांमध्ये 1 लाख 12 हजार 318 पुरुष तर 3 हजार 852 महिला मतदार आहेत.

            राज्यात मतदानासाठी एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 केंद्र असणार आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

00000


निवडणुकीसाठी राज्यात ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार

  निवडणुकीसाठी राज्यात

९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार

 

मुंबईदि. ३१ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ तर तृतीयपंथी मतदार ६ हजार १०१ इतक्या मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहितीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरूष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ३ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे.

या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) १ लाख १६ हजार १७० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरूष मतदार तर ३ हजार ८५२ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे.

राज्यात वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार २१ हजार ८९, महिला मतदार २६ हजार २९८ तर तृतीयपंथी मतदार २ इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे.


महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध

 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध

 

मुंबईदि. ३१ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७ हजार ९९४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून २८८ मतदारसंघातील एकूण ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचप्रमाणे ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

00000

एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक

 एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक

 

 

मुंबईदि.31  अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज अभिनंदन केले.

काम्याने बुधवारी (दि. 30) आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांचेसह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्या एव्हरेस्ट व इतर शिखर गिर्यारोहण अनुभवाची माहिती दिली. 

 मे महिन्यात काम्याने नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट सर करुन भारतातील सर्वात तरुण आणि जगातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा मान मिळवलाअसल्याचे तिच्या वडिलांनी यावेळी सांगितले.

मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन शाळेची बारावीची विद्यार्थिनी असलेल्या  काम्याने मिशन "साहस" अंतर्गत प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याचा तसेच दोन्ही ध्रुवांवर स्की करण्याचा संकल्प केल्याचे तिने सांगितले.

0000

 

Maha Governor applauds Young Mountaineering Prodigy

 

Mumbai Dated ३१ :Maharashtra Governor C P Radhakrishnan congratulated Kaamya Karthikeyan, the १६ year old mountaineering prodigy, who recently became India's youngest and the world's second youngest to scale Mount Everest from Nepal.

Kaamya, a class XII student at Navy Children School, accompanied by her father Cdr S Karthikeyan and mother Lavanya met the Governor at  Raj Bhavan Mumbai on Wednesday (३०th Oct)

 The Governor blessed the young mountaineer in her mission "SAHAS"which aims at climbing the highest peak in each continent and ski to both poles.

 

 

0000

 

 

 

 


🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻नरकचतुर्दश *अभ्यंगस्नानाची* संगीत

 ⚜🔆🚩🔆🕉🔆🚩🔆⚜


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                   

                 *नरकचतुर्दशी*

               *अभ्यंगस्नानाची*


        *सैनिकांविषयी कृतज्ञतेची*


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

    *🪔 दीपोत्सव विशेष पर्व  🪔*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🌹🔆🌸🔱🪔🔱🌸🔆🌹


        *गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।*

        *नर्मदे सिन्धु कावेरि जलऽस्मिन्सन्निधिं ॥* 


        *आज दीपोत्सवातील तनामनाला अत्यंत सुखावणारा नरकचतुर्दशी.. अभ्यंग स्नानाचा दिवस.*

        *बाहेर धुक्याची चादर पसरलीय. बोचरे वारेही सुरु आहेत. आकाश कंदीलाच्या प्रकाशात अंगणातील शुभदायी रंगीबेरंगी रांगोळी आणखी खुलल्यात. पण थंडीची पर्वा न करता भारवर्षातील लोकांची सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नानाची लगबग सुरु आहे.*

        *बदलत्या ऋतूचा.. थंडीचा सामना करण्यासाठी शरीराला अत्यावश्यक हे स्नान. आज राजालाही हेवा वाटावा असे सुख जनसामान्य आज उपभोगतात. औक्षण करून तीळाचे तेल.. उटणे लावून होणारे हे पवित्र अभ्यंग स्नान. उटणे याला आयुर्वेदीय मान्यता आहे. नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद, मसूर डाळ, जटामासी, वाळा इ. औषधीचे हे चूर्ण. या उटण्याचे लेपन करुन नंतर होणारे हे स्नान शरीर.. मन टवटवीत.. प्रफुल्लीत करणारे.*

        *यानंतर नववस्त्रे परिधान करुन देवपूजा होणार. दिवाळी फराळाचा नैवेद्य दाखवला जाणार. वर्षभर आरोग्यासाठी गरजेचे हे अभ्यंग स्नान व्हावे म्हणून आज अभ्यंग स्नान करणारा नरकात जाणार नाही हा कृष्ण वरदानाचा श्रद्धा भाव जोडला गेलाय.* 

        *आमच्या पुराणकथा सदैव.. प्रेरणादायी. प्रत्येक युगात देव आणि दानव वृत्ती असणारच. दुर्जनांना अस्त्र शस्त्र शक्ती लाभते तेव्हा ते नेहेमीच जन सामान्यांना वेठीस धरतात.*

        *एखाद्या खेळात विजय प्राप्त झाला तरीही लोकं आनंदाने जल्लोष करतात. मग जेव्हा अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या जनतेची त्यातून कायमची सुटका होते.. अत्याचारी दानवाचा अंत होतो तेव्हा तर आनंदाला पारावर नसतो. त्रेता युगात रावण संपला म्हणून श्रीरामाच्या स्वागताला दिवाळी साजरी झाली.*  

        *व्दापार युगात प्रागज्योतिष्यपूर राज्यातील नरकासूर दैत्याने अत्याचाराचा कळस गाठला होता. सोळा सहस्त्र निरपराध स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते. त्यांच्या मुक्ततेसाठी श्रीकृष्णानं सत्यभामेकडून त्याला यमसदनी धाडले. अन्यायाने जीणे नकोसे झालेल्यांचा हा स्वातंत्र्य दिनच.*

        *नरकासूराच्या अत्याचाराच्या बळी पिडीतांचा उद्धार व्हावा, बंदिवान स्त्रियांना समाजात सन्मान मिळावा म्हणून श्रीकृष्णानं त्यांना आपले नाव देत त्यांना संरक्षण दिले. असूर ही वृत्ती आहे. सामान्याच्याही मनात ती उसळी घेते तेव्हा तो पण असूर होतो.* 

        *या नरकासूराचा अंत होताच जनतेने मुक्त श्वास घेत आनंदोत्सव केला. लक्ष लक्ष दिव्यांनी प्रकाशवाट उजळली, म्हणून आजही मनोमनीचा अंधार नष्ट होण्यासाठी "तमसो मा ज्योर्तिगमय" हे वरदान मागायचे. भारतीय संस्कृतीचा दिपोत्सव शांत.. सुसंस्कृत.. आनंदी आदर्श जीवन कसे जगावे हे शिकवतो.*

        *नरकासुरासह सगळ्याच असुरांचे निर्दालन करुन भक्त कल्याण करणाऱ्या श्रीकृष्णाला वंदन करुया.* .

▪️▫️▪️▫️▪️▫️▪️

        *भारताचा आज पर्यंत झालेला विकास.. सगळ्याच क्षेत्रातील गगनभरारी.. साधनसंपत्ती, नागरिकांचे सुख आणि मुख्य म्हणजे देशातील शांतता.. एकात्मता हे शेजारी देशांना डोळ्यांत सलते. मग ते देशावर आक्रमणाचा सतत अयशस्वी प्रयत्न करतात.*

        *आमची भूमी बळकावणे शत्रूला आजवर शक्य झालेले नाही.. आणि होणारही नाही. आमचे शूर सैनिक सीमेवर अहोरात्र अखंड सावध राहून जागता पहारा ठेवतात. आमचे वीर सैनिक प्रतिकूल हवामान जीवघेणी थंडी.. वादळवारा.. पाऊस कशाचीही पर्वा न करता लढतात. प्रसंगी देशासाठी सर्वोच्च असे बलिदानही देतात.*

        *देशात दिवाळी आनंदाने संपन्न होताना देशवासीयांनाही याची तेवढीच जाण आहे. सैनिकांच्या पराक्रमाने त्यांचा उर भरुन येतो. सारे देशवासी सैनिकांविषयी कृतज्ञ आहेत. सैनिकांविषयी सार्थ अभिमान वाटतो. सैनिकांविषयी देशवासियांना प्रेम आहे. या पराक्रमी सैनिकांना शतशः वंदन. दिवाळीच्या शुभेच्छा !!*

        *आपण आहात म्हणून आम्ही आहोत.. आमची ही सुखद.. हर्षोल्हासी दिवाळी साजरी होत आहे.*

*वंदे मातरम्.. !!*

*🇮🇳 जयहिंद 🇮🇳*

              

🌸🔱🌷🌺🙏🌺🌷🔱🌸

  

  *धीर धरि धीर धरी*

  *जागृत गिरीधारी*

  *तारितसे भाविकांस*

  *तोच चक्रधारी ॥*


  *अढळ पदी अंबरात*

  *बसविले धृवाला*

  *संकटात पीतांबर*

  *दिला द्रौपदीला*

  *दिधली वैकुंठपेठ*

  *सकल गोकुळाला*

  *ऐसा दाता थोर*

  *कुंजवन-विहारी ॥*


  *होसी का भयकंपित*

  *धरसि का शंका ?*

  *गाजतसे वाजतसे*

  *तयाचाच डंका*

  *'जय गोविंद जय मुकुंद*

  *जय जय सुखकारी' ॥*


⚛️🪔🌸🔆🪔🔆🌸🪔⚛️


  *गीत : विद्याधर गोखले*  ✍️

  *संगीत : पं. राम मराठे*

  *स्वर : पं. वसंतराव देशपांडे*

  *नाटक : मेघमल्हार*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-३१.१०.२०२४-*


🌻🌸🪔🔆🌺🔆🪔🌸🌻

a Senior citizen help line phone no. 14567 (just dial the number *directly* without any area code or any

 Dear all,


I wish to inform you all that the Govt. of India has set up a Senior citizen help line phone no. 14567 (just dial the number *directly* without any area code or any prefix).  I checked on this phone and I was pleasantly surprised by the response by a lady.  This centre provides any help / support needed by Senior citizens between 8 am and 8 pm.  One can refer to a case of Senior citizens in distress, medical help needed, or protection from harassment, vaccination centres nearby etc.  I was very impressed by the person who expressed concern with the  promise for immediate help.  I would suggest we must share and circulate this information widely to help those in need of help.


Please note that the service is available between 8 am to 8 pm only and this service is available in every State except in Haryana and West Bengal, where it has not started as yet but will shortly.  Will you please circulate this message to all the Senior citizens in your circle (friends, relatives, neighbours).  This is a great initiative taken by the Government of India and will definitely extend benefits to those Senior citizens who are in need of assistance.

 

Very informative, it’s working.  Please share the same in all of your groups.

Saint Amma hospital , फरिदाबाद

 



Wednesday, 30 October 2024

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे नवीन कार्यालय मरीन ड्राईव्ह येथे

 मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे नवीन कार्यालय मरीन ड्राईव्ह येथे

 

मुंबईदि. ३० : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना 'विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबईमित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारतआठवा मजलानेताजी सुभाष मार्गचर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळकैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागेमरीन ड्राईव्हमुंबई - 400002या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात यावाअसे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

          सर्व अधिनस्त कार्यालयेशिक्षणाधिकारी (प्राथमिक) (माध्यमिक) जिल्हा परिषद / मनपाप्राचार्यकनिष्ठ महाविद्यालयेमुख्याध्यापकपालकविद्यार्थी यांनी याची नोंद घ्यावीअसे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी केले आहे.

00000

भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित

 भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी

 गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित

 

मुंबईदि. ३० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांना गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरच्या मतदानासाठी अर्ज दाखल केलेल्या मतदारांना गृह टपाली मतदानाची सुविधा १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान उपलब्ध होणार आहे.

मतदान केंद्रावर उपस्थित राहू न शकणारे निवडणूक कर्तव्याच्या कामावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांना प्रपत्र १२ ड’  दाखल केलेल्यांसाठी टपाली मतदान करण्यासाठी खास केंद्रे उभारण्यात आली आहेत.

भायखळा विधानसभा मतदारसंघात १८९ प्रौढ आणि ४९ दिव्यांग मतदारांसाठीगृह टपाली मतदान १४ ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत होईल.

भायखळा विधानसभा मतदारसंघ कार्यालयरिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेडतळ मजला हॉलजे. जे. रोडह्युम हायस्कूल शेजारीभायखळा येथील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक १ येथे टपाली मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत खुले राहील.

अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांसाठी टपाली मतदान रिचर्डसन अँड क्रूडास लि.तळ मजला हॉलजे. जे. रोडह्युम हायस्कूल शेजारीभायखळा येथील आवारातील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक २ येथे मध्ये उपलब्ध आहेज्या ठिकाणी १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मतदान करता येईल. भायखळा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रौढ आणि दिव्यांग मतदारतसेच निवडणूक कर्तव्याचे अधिकारी आणि पोलिसांनी टपाली मतदानाची सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा वराळे यांनी केले आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा

 केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील

 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा

 

मुंबईदि. ३० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार२० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहरातील १७८-धारावी१७९-सायन-कोळीवाडा१८०-वडाळा१८१-माहिम आणि १८२-वरळी या पाच विधानसभा मतदारसंघांची केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आज भेट देऊन स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाचा आढावा घेतला.

निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठीमुंबई शहर जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १० विधानसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टीमच्या कामकाजावर खर्च निरीक्षक लक्ष ठेवत आहेत.

माहीम विधानसभा मतदारसंघातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाबद्दल माहिती घेतल्यानंतर श्री. वसंता यांनी वाहन तपासणीसाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने रोख रक्कममद्यसाठाभेटवस्तू आणि शस्त्रसाठा तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली. सर्व तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक टीमने त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधितांना वेळेत पाठवावाअसे निर्देशही त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यातयासाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने २४ तास तीन शिफ्टमध्ये काम करण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी त्यांचे संपर्क अधिकारी संदिपान मते उपस्थित होते.

००००

कोकणी आकाशकंदिल नीसर्गिक उत्पादन

 कोकणी आकाशकंदिल


आगतं दीपावली पुण्या सकलार्थ प्रदायिनी।
शुभं भवतु सर्वेषां सा दिव्या विश्वमोहिनी ॥

पुण्यकारक अन् सगळ्यांना सगळी सुखं देणारी, दिव्य,विश्वाला मोहून टाकणारी अशी दीपावली आली आहे ती सर्वांना शुभकारक आणि सुखकारक होवो ही शुभकामना. 

निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली

 निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून

निवडणूक कामकाजाचा आढावा

 

मुंबई दि 30 :- वर्सोवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 164 मधील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला.

या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन श्री बाली यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री बाली यांनी यावेळी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी सादरीकरण केले.

------000------

केशव करंदीकर/विसंअ/


निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत

१८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. ३० :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहितीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.

यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सी-व्हिजील ॲपवर तक्रार  करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.

0000

निवडणूक प्रक्रियेत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

 निवडणूक प्रक्रियेत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा               

 

निवडणूक निरीक्षक गोपाल चंद , निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा

 

धाराशिव दि.३० (माध्यम कक्ष) :  येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर  सोपविण्यात आली आहे.निवडणूक प्रक्रियेच्या कामात कोणतीही चुक होणार नाही यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) गोपाल चंद यांनी दिले.

 

२९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विधानसभा निवडणूक कामकाजाचा आढावा घेतांना श्री.चंद बोलत होते.यावेळी निवडणूक निरीक्षक ( सामान्य) श्री.पंकज कुमार, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, निवडणूक निरीक्षक (खर्च) अलुरु व्यंकट राव निवडणूक निरीक्षक (पोलीस) आर एस.बेलवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी उदयसिंह भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

श्री पंकज कुमार म्हणाले,उमेदवारांच्या नामांकन अर्जाची छाननी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावी. छाननी करताना ती अतिशय काळजीपूर्वक आणि दक्षतेनी करावी. छाननीच्या वेळी आवश्यक तेवढा पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

 

 डॉ.श्री.ओंबासे यांनी निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.स्थिर पथके व फिरती पथके आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.आंतरराज्य व जिल्ह्याच्या सीमेवर पुरेसा पोलीस व निवडणुक यंत्रणाचा कर्मचारी वर्ग २४ तास तपासणी नाक्यावर उपस्थित राहणार आहे. बॅरिकेट्स व सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली असून अधिकारी व कर्मचारी प्रत्येक वाहनाची तपासणी करून रोख रक्कम, मद्य वाहतूक होत आहे का तसेच संशयास्पद बाबीवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

          जिल्ह्यातील मतदार संघातील मतदान केंद्र, मतदार, क्रिटिकल मतदान केंद्र, मतदान प्रक्रियेसाठी लागणारे मनुष्यबळ, क्षेत्रीय वाहतूक नियोजन याबाबतची माहिती डॉ.ओंबासे यांनी दिली.

निवडणूक निरीक्षकांनी  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आवश्यकता त्या सूचना दिल्या व निवडणुकीच्या तयारीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.बारगजे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमी जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून हातभट्टीच्या दारुसह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती यावेळी दिली. या बैठकीला सर्व नोडल अधिकारी, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक ए.एम.पिललेवार, राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त एन.व्ही.शिंदे, आयकर अधिकारी संजय पानसरे व डाक विभागाचे अधीक्षक श्री.अंबेकर उपस्थित होते.


भारत की विविधता, विविधता मे भारत


 

हायातीच दाखला 30पेन्शन धारक साठी


 

*दीपोत्सवातील कलेच्या* *आस्वादाची*

 🌹⚜🌻🔆🌅🔆🌻⚜🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

        

         *दीपोत्सवातील कलेच्या*

                 *आस्वादाची*              


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

           *दीपावली विशेष पर्व*  

            ⚜️⚜️🪔⚜️⚜️


⚜🌺☘🔆🪔🔆☘🌺⚜


        *भारतीय संस्कृती आणि कला यांचे अतूट नाते आहे. कलोपासना ही स्वानंदासाठी असली तरीही त्या सृजनाचा आनंद संपूर्ण विश्वाला होतो.*

        *भारतवर्षातील समस्त महिला वर्गाने परंपरेने जपलेला स्वतःसोबत इतरांना आनंद वाटणारा कलाप्रकार म्हणजे रांगोळी. दिवाळी आणि रंगवल्ली अगदी प्राचीन.. वेदकाळापासूनचे नाते.*  

        *रंगवल्ली हे नावही कित्ती सुंदर आहे ना.. नाव उच्चारताच मन रंगून जाते ते बालपणीच्या दिवाळीच्या गोड आठवणीत. घरोघरी भल्या पहाटे अंगण झाडून सडासमार्जन व्हायचे. सड्याचा आणि बागेतील फुलांचा सुगंध दरवळायचा. मग आजी, आई, ताईंची शेजारच्या मंडळींशी रांगोळी काढण्याची जणु स्पर्धा सुरु व्हायची.*           

        *भारतीय संस्कृतीचा हा वसा आजही घरोघरी जतन केला जातोय.. यामध्ये वाढ होतेय. रांगोळी जी मांगल्य.. उदारता.. शक्ती प्रदान करते. दिवाळी म्हणजे तर सुंदर.. कलात्मक रांगोळी रेखाटनाची पर्वणीच. रांगोळी शिवाय दिवाळी ही कल्पनाही अशक्य. रांगोळी म्हणजे सौंदर्याचा साक्षात्कार.. मांगल्याची सिद्धी.*

        *घर लहान असो वा मोठे, मोठे कार्य असो वा नसो, नित्य उंबरा.. देवघर.. तुळशीच्या वृंदावनासमोर शुभ रांगोळी ही हवीच. प्रत्येक भारतीय महिलांना उपजत येणारी ही कला. आईने रेखाटलेल्या रांगोळी बघताना लुडबुड करणाऱ्या बालिका केव्हा यामध्ये तरबेज होतात हे कळतच नाही. दिवाळीत मग पहिले तजविज केली जाते ती रांगोळीच्या विविध रंगांची. रोज कोणकोणत्या प्रकारच्या रांगोळी काढायच्या हे ठरविले जाते. तर कधी नकळत स्वयंप्रेरणेने रांगोळी साकारली जाते.*          

        *रांगोळीच्या आकृतीप्रधान.. वल्लरीप्रधान आणि ठिपक्यांची रांगोळी या  तीन प्रकारचे दर्शन घरोघरी घडते. रांगोळी काढणे आरोग्यदायी व्यायामच. यामुळे ठराविक वेळ.. विशिष्ट पद्धतीने बसण्याची सवय होते. यामध्ये निष्ठेचे दर्शन घडते. एकाग्रता.. संयम वाढविणारी ही रांगोळी.*

        *सुरेख रेघा आणि रंगसंगती जमली की रस्त्यावरून जाणाऱ्यांची पाऊले थबकतात. शेजारच्यांशी निखळ स्पर्धा करायला शिकवणारी.. स्वानंद देणारी ही कला. यामुळे एकमेकांचा फायदा होतो. दिवाळीतील आमच्या घरातील फराळाचे पदार्थ कसे झाले याबरोबरच रांगोळी रेखाटन किती सुंदर झाले हाही विषय आनंद देतो. आज समाज माध्यमाच्या मदतीने विदेशातही याचे फोटो पाठवून आप्ताना आनंद वाटता येतो.*            

        *तुमची कला, त्याची साधना.. त्यात नैपुण्य प्राप्ती साठी उपसलेले कष्ट हे जेव्हा लोकांच्या समोर पोहोचतात तेव्हाच कलावंत आणि कलेचा उदगाता सुखावतो. गावोगाव दिवाळीत होणाऱ्या 'दिवाळी पहाट' संगीत कार्यक्रमात म्हणूनच हजारो लोक आस्वादासाठी जमतात. उत्तमोत्तम संगीताचा 'दिवाळी पहाट' च्या निमित्ताने रसिकांना आस्वाद घेता येतो. नव्या पिढीतही किती प्रतिभावंत कलाकार आहेत, गुणवत्ता आहे याची प्रचिती येते.*


🌟🏮🎶🎊🪔🎊🎶🏮🌟

  1️⃣

  *पानाफुलांचे तोरण दारी*

  *अंगणी देखणी साजे रांगोळी*

  *उटण्याचा सुगंध साऱ्या* 

  *शिवारी पसरुदे*

  *सुखाची चाहूल होऊ दे*

  *सारे दुःख ते विसरू दे*


  *फुलवाती अंगणात सोनसकाळी*

  *सौख्य जणू भरुनी*

  *हे आले ओंजळी*

  *आली दिवाळी, आली दिवाळी*


  *दिन दिन दिवाळी*

  *गाई म्हशी ओवाळी*

  *गाई म्हशी कुणाच्या*

  *माझ्या लक्षुमणाच्या*

  *......*

  *गीत : शशांक कोंडविलकर*  ✍️

  *संगीत : शशांक कोंडविलकर*

  *स्वर : युक्ता पाटील आणि*

  *सत्यम पाटील*


⚜🌺⚜🎶🥀🎶⚜🌺⚜

  2️⃣

  *घर हे माझे आनंदाचे*

  *दाराशी सुरेख नक्षी*

  *जोडीत जाती मना मनाला*

  *नात्यांचे हळवे पक्षी*

  *या वातीला वात मिळुनी*

  *आसमंत उजळी*

  *सांगते कथा घराची*

  *माझी ठिपक्यांची रांगोळी*


  *रचूनी एक एक वीट*

  *बांधले मायेचे घरकुल*

  *होईल दुरावा दूर,*

  *टाकता हसून पुढे पाऊल*

  *दृष्ट घराची काढण्याला*

  *सूर्य ये सकाळी*

  *नांदते सुखात अवधी*

  *माझी ठिपक्यांची रांगोळी*


  *गीत : रोहिणी निनावे*  ✍

  *संगीत : निलेश मोहरीर*

  *स्वर : सई टेंभेकर*

  *शिर्षक गीत : ठिपक्यांची रांगोळी*

  

  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-३०.१०.२०२४-*


🌻⚜🌺🌟🏮🌟🌺⚜️🌻

एक् salute

 रस्त्यावरच्या भटक्या गाई वाहनचालकांना दुरूनही दिसाव्यात आणि अपघात टळावा यासाठी गाईंच्या गळ्यात लाल पट्टा अडकवणाऱ्या या पोलीसबंधूने “वसुबारस” खऱ्या अर्थाने साजरी केली.


आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’

 आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’


 


            विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


            आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत.


आचारसंहिता काळात काय करावे?


            निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची किंवा इतर वैद्यकीय मदत देता येईल. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका ही त्यांची धोरणे, पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.


प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक किंवा इतर सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळवावी आणि ते वापरण्याच्या नियमांचे पालन करावे. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या, सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. मिरवणूक सुरू होण्याची तसेच संपण्याची वेळ व जागा आणि ती जिथून जाणार असेल तो मार्ग अगोदर निश्चित करून पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये.


आचारसंहिता काळात काय करू नये?


            निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन करताना राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे. उमेदवार आणि मतदानासाठी आलेला मतदार यांच्याशिवाय इतर कोणाही मंत्र्याला मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येणार नाही. शासकीय काम आणि निवडणूक मोहीम/ निवडणूक प्रचार यांची सरमिसळ करू नये. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करू नये. वेगवेगळ्या जाती, समूह आणि धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष, तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासाठी करू नये. मतदारांना लाच देणे, दारुचे वाटप करणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण वा धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या गोष्टींना मनाई आहे.


इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करू नयेत. याचबरोबर मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाजवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.


            आचारसंहितेच्या या तत्त्वांचा भंग झाल्याचे नागरिकांना आढळल्यास त्यांनी सी-व्हिजील ॲपवर ध्वनीमुद्रण, ध्वनीचित्रमुद्रण या माध्यमातून तक्रार करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्या

त आले आहे.


0000


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; ठिकठिकाणी तपासणी

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

बंदोबस्तात वाढठिकठिकाणी तपासणी

तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. 29 :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात बंदोबस्त वाढविण्‍यात आला असून स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आदर्श आचारसंहितेची 28 पथके स्थापन करण्यात आली आहेत. 211-भरारी पथके, 226- स्थिर पाहणी पथके, 172- व्हिडिओ निगराणी पथके,65- व्हिडिओ पाहणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. 105- तपासणी नाके आहेत.

 

तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन

निवडणूक काळात नागरिकांनी, व्यापाऱ्यांनीव्यावसायिकांनी कोणतेही साहित्यरकमा सोबत ठेवतांना त्‍यासंदर्भाचे योग्य दस्‍तऐवज सोबत ठेवावेतअसे आवाहन प्रशासनाने केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून दाखल झालेले निवडणूक निरीक्षक तपासणी संदर्भात जागरूक असून जिल्ह्यातील जप्ती प्रकरणातील आढावा घेण्यात येत आहे.

विविध यंत्रणांकडून तपासणी

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापरमद्याचा मोफत पुरवठाभेटवस्तूंचे वाटपकिंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नयेयासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्सराज्य उत्पादन शुल्ककेंद्रीय वस्तू आणि सेवा करराज्य वस्तू आणि सेवा करव्यावसायिक करअमली पदार्थ नियंत्रण दलसीमा सुरक्षा दलसशस्त्र सीमा दलपोलीस दल केंद्रीयऔद्योगिक सुरक्षा दलभारतीय किनारा दलरेल्वे संरक्षण दलपोस्ट विभागवन विभागनागरी उड्डयन विभागविमानतळ प्राधिकरणराज्य नागरी विमान वाहतूक विभागराज्य परिवहन विभागयांच्यासह  फिरते पथक ( एफएसटी ) स्टॅटिक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) कार्यरत आहेत.

निवडणूक काळात  वाहनांची कसून तपासणी होत असून दररोज हा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला जात  असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.

- - - - - ००० - - - - -

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पुढे सरसावले सदिच्छादूत करणार मतदान करण्याचे आवाहन

 मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पुढे सरसावले

सदिच्छादूत करणार मतदान करण्याचे आवाहन

            मुंबई दि. 29 : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावामतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. हे सदिच्छादूत मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत.

            समाज माध्यमेमुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलकभित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरसाहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिकअभिनेते प्रशांत दामलेअभिनेत्री मृणाल कुलकर्णीअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाडअभिनेत्री उषा जाधवमहिला क्रिकेटपटू स्मृती मनधनासुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबतअर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबरअर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडेतृतीयपंथी कार्यकर्त्या श्रीगौरी सावंततृतीयपंथी प्रणीत हाटेतृतीयपंथी झैनब पटेलदिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीतदिव्यांग कार्यकर्ती व साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका सोनाली नवांगुळ यांचा समावेश आहे.

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

 उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना

मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

            मुंबईदि. २९ येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावायाकरिता उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी उद्योग,ऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाने जाहिर करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा१९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायातव्यापारातऔद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीलामतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूहमहामंडळेकंपन्या व संस्थाऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत कामगारअधिकारीकर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तरमतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईलमात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहीलकोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळेउद्योग समूहकंपन्या व संस्थांमध्येऔद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यासत्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईलअसे उद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित परिपत्रकात नमूद केले आहे.

००००

-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या १६४६ तक्रारी निकाली

 सी-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या

१६४६ तक्रारी निकाली

 मुंबईदि. २९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दि. १५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण १६४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १६४६ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

 सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.


निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा

 निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून

निवडणूक कामकाजाचा आढावा

 

मुंबई दि 29:- वर्सोवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 164 मधील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला.

या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन श्री बाली यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री बाली यांनी यावेळी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी सादरीकरण केले.

------000------

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल

 २८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ७९९५ उमेदवारांचे

१०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबईदि. २९ : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहितीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत आलेल्या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.


निवडणूक निरीक्षक डॉ हीरा लाल यांनी साधला मतदारांशी संवाद हरित निवडणूकीची संकल्पना राबविण्याचे आवाहन




 निवडणूक निरीक्षक डॉ हीरा लाल यांनी साधला मतदारांशी संवाद

 

हरित निवडणूकीची संकल्पना राबविण्याचे आवाहन

 

मुंबई दि 29:- मतदार जागृती कार्यक्रम अंतर्गत 172- अणुशक्तीनगर आणि 173- चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक डॉ हीरा लाल (भा.प्र.से 2009) यांनी वडाळा येथील भक्ती पार्क येथे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी डॉ हीरा लाल यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

हरित निवडणूकीच्या संकल्पनेवर भर देत केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक डॉ हीरा लाल यांनी पर्यावरण रक्षण करत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे तसेच झाडे लावण्याचेही आवाहन केले. यावेळी डॉ हीरा लाल यांनी नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिक मतदार यांच्याशीही संवाद साधला. यावेळी उपनिबंधक सुनिल बनसोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

Tuesday, 29 October 2024

निवडणूक निरीक्षक अंजना एम. आणि पी. रामजी यांची मुंबई शहर माध्यम कक्षास भेट

 निवडणूक निरीक्षक अंजना एम. आणि पी. रामजी यांची

मुंबई शहर  माध्यम कक्षास भेट

 

             मुंबईदि. 29 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ करिता नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) अंजना एम. आणि केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) पी. रामजी यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम संनियंत्रणासाठी स्थापन केलेल्या माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

     यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

    मुंबई शहर जिल्ह्यातील १८४ - भायखळा१८५ - मलबार हिल या दोन विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) अंजना एम. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) पी. रामजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

   केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांनी या माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडियासोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया कक्षाची पाहणी केली व आढावा घेतला. निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी सतर्क व दक्ष राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पडाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

  यावेळी जिल्हाधिकारी श्री.यादव म्हणालेमाध्यम कक्षाद्वारे समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सी-व्हिजिल ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील फेसबुकइन्स्टाग्राम आदींवरील उमेदवारांच्या अकाऊंटवर कशा प्रकारे नजर ठेवली जात आहेयाचीही त्यांनी माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi