Friday, 31 May 2019

खातेनिहाय यादी

केंद्र सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज शुक्रवारी (दि.31) मंत्र्यांची खातेनिहाय यादी अखेर प्रसिद्ध

खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे : 

▪ पंतप्रधान नरेंद्र मोदी : कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही असेल. 
▪ अमित शहा : केंद्रीय गृहखाते
▪ निर्मला सितारामन : केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
▪ राजनाथ सिंह : संरक्षण मंत्रालय
▪ एस. जयशंकर : परराष्ट्र मंत्रालय
▪ नितीन गडकरी : परिवहन 
▪ पीयुष गोयल : रेल्वे मंत्री 
▪ धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम 
▪ रविशंकर प्रसाद : कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय
▪ स्मृती इराणी : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ राम विलास पासवान : ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
▪ नरेंद्र सिंह तोमर : कृषी व शेतकरी 
▪ प्रकाश जावडेकर : पर्यावरण आणि माहिती प्रसारण
▪ हरसिमरत कौर बादल : अन्न प्रक्रिया उद्योग
▪ रमेश पोखरियाल निशंक : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ थावर चंद गहलोत : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
▪ अर्जुन मुंडा : आदिवासी व्यवहार
▪ डॉ. हर्षवर्धन : आरोग्यमंत्री
▪ किरेन रिजीजू : क्रीडा
▪ मुख्तार अब्बास नक्वी :अल्पसंख्यांक मंत्री
▪ प्रल्हाद जोशी : संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री
▪ डॉ. महेंद्रनाथ पांडे : उद्योजग कौशल्य विकास मंत्रालय
▪ अरविंद सावंत : अवजड उद्योग मंत्रालय 
▪ गिरिराज सिंह : पशुसवंर्धन आणि मत्स पालन
▪ गजेंद्रसिंह शेखावत : जल मंत्रालय 

सुविचार

छोट्या गोष्टींमधून किती अर्थ बदलतो,
तुमच्याकडे कुणी बोटं दाखवली तर बदनामी
तुमच्याकडे कोणी अंगठा केला तर प्रोत्साहन
आणि अंगठा व बोट एकत्र आले तर प्रशंसा 

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकी प्रदानासंबंधी सप्ष्टीकरण








प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळाची शपथ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळाची शपथ; महाराष्ट्राला 4 कॅबिनेट, 3 राज्यमंत्रीगुरुवार, ३० मे, २०१९
बातमी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रीमंडळास आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री (स्वंतत्र प्रभार) व 24 राज्यमंत्री यांचा समावेश आहे. यावेळी ब्रेक्सिस्ट देशाचे प्रमुख, उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्यासह विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयुष गोयल आणि अरविंद सावंत यांना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली. तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.

याआधी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री, जलसंसाधन मंत्री म्हणून तर पीयुष गोयल यांनी ऊर्जा मंत्रालय व कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरणमंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून मंत्रीपद भुषवीले आहे. तर रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाचे राज्यमंत्री म्हणून पद भुषवीले आहे. रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्री पद भूषविले होते. अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांनी प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दिव्यांग अधिनियम २०१६ अनुसार शासन सेवेतील पदांवर शारीरिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी ४ % आरक्षण विहित करणे व आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती......







सुंदर विचार

ओढ म्हणजे काय?
हे जीव लावल्याशिवाय कळत नाही...

प्रेम म्हणजे काय?
हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...

विरह म्हणजे काय?
हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...

जिंकण म्हणजे काय?
हे हरल्याशिवाय कळत नाही...

दुःख म्हणजे काय?
हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...

सुख म्हणजे काय?
हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

समाधान म्हणजे काय?
हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

मैत्री म्हणजे काय?
हे ती केल्याशिवाय कळत नाही...

आपली माणस कोण?
हे संकटांशिवाय कळत नाही...

सत्य म्हणजे काय?
हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...

उत्तर म्हणजे काय?
हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...

जबाबदारी म्हणजे काय?
हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही...

काळ म्हणजे काय?
हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही...



मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात.
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण माझा विश्वास आहे की, माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु, मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी आयुष्यातील खरी कमाई असेल...

Thursday, 30 May 2019

मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत.


मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन निर्णय क्रमांक : विकास २००९/प्र.क्र.१९३/पं.रा.८
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : ३ मे, २०११.

वाचा :-
१)   शासन निर्णय, ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्र. विकास २००९/प्र.क्र.८/पं.रा.८, दिनांक २४.२.२००९.
२)   शासन निर्णय, ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्र. झेडपीए २००८/प्र.क्र.४७२/वित्त-९ (३३), दिनांक ९.२.२००९.
३)   शासन निर्णय, ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्र. विकास २००९/प्र.क्र.५७/पं.रा.८, दिनांक २.६.२००९.
४)   शासन परिपत्रक ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. तेविआ २०१०/प्र.क्र. ७३/वित्त-४, दिनांक ८.१२.२०१०.
प्रस्तावना :
     मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे, व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांसाठी ग्राम विकास विभागाकडे विशेष निधी मंजूर करण्यासंदर्भात कामाचे निकष व निधी वितरित करण्याची कार्यपध्द्‌ती याबाबतचा शासन निर्णय क्र. विकास २०९९/प्र.क्र.८/पं.रा.-८, दिनांक २४.२.२००९ अन्वये निर्गमित करण्यांत आलेला आहे. सदर योजनेच्या निकष व कार्य पध्द्‌ती संदर्भात काही बाबी लोकप्रतिनिधींनी शासनाच्या निदर्शनास आणलेल्या आहेत. त्या अनुषंगाने उपरोक्त दि. २४.२.२००९ च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनच्या विचाराधीन आहे. शासनाच्या निदर्शनास आणलेल्या बाबींवर सांगोपांग विचार करुन आता शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय :
     लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामासंदर्भात शासन निर्णय क्र. विकास २००९/प्र.क्र. ८/पं.रा.८, दिनांक २४ फेब्रुवारी, २००९ च्या शासन निर्णयातील परि. २ मध्ये सुधारणा करण्यात येत असून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांबाबत प्राप्त मागण्या विचारात घेवून उपलब्ध निधी वितरित करण्यासंदर्भात आता खालीलप्रमाणे कार्यपध्द्‌ती निश्चित करण्यांत येत आहे.
१)   सदर योजनेतंर्गत पुढील कामे विचारात घेण्यांत येतील
     गावांतर्गत रस्ते, गटारे, पाऊस पाणी निचरा (strom water drainage) दहनभूमी व दफनभूमीची सुधारण करणे, संरक्षक भिंत, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, आठवडी बाजारासाठी सुविधा, गावामध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा, सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण.
२)   लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांबाबतचे मागणीपत्र/प्रस्ताव शासन स्तरावर स्विकारण्यात येतील. तसेच संबंधीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही लोकप्रतिनिधींकडून मागणीपत्र अथवा प्रस्ताव स्विकारण्यांत येतील.
३)   मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव एकत्रितपणे विचारात घेऊन खालील तक्त्यामध्ये माहे ऑगस्ट अखेरपर्यत शासनास सादर करावेत. कामाचे अंदाजपत्रक तपासण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील. शासनास अंदाजपत्रके पाठविण्याची आवश्यकता नाही.
४)   शासन स्तरावर लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेले मागणीपत्र/प्रस्ताव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून त्या त्या जिल्हा परिषदांचा एकत्रित प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रस्ताव विचारात घेऊन कामाच्या निकडीनुसार तसेच निधीच्या उपलब्धतेनुसार लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यांत येईल.
५)   शासन स्तरावर मंजूर झालेल्या कामांमध्ये अत्यंत अपवादात्मक परिस्थितीशिवाय बदल करता येणार नाही. कामात बदल करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार देण्यासंदर्भात शासन परिपत्रक दि. २.६.२००९ याद्वारे रद्द करण्यांत येत आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत कामामध्ये बदल करण्याचे अधिकार ग्रामविकास विभागास राहतील. मात्र, कामामध्ये किरकोळ स्वरुपाच्या टंकलेखनाच्या चुका असतील तर त्यामध्ये सुधारणा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहतील.
६)   सदर योजनेअंतर्गत मंजूर झालेली कामे गावाच्या विकासाशी संबंधित असल्याने सदर कामे शासन निर्णय क्र. झेडपीए २००८/प्र.क्र. ४७२/वित्त-९(३३), दिनांक ९.२.२००९ अन्वये दिलेल्या सूचना व घालून दिलेल्या कार्यपध्द्‌तीनुसार ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावीत. तसेच ग्रामपंचायतीची सदर मर्यादा ज्या-ज्या वेळी सुधारित करण्यांत येईल त्या सुधारित मर्यादेनुसार ग्रामपंचायतीमार्फत कामे करण्यांत येतील. तेव्हा लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासन स्तरावर मंजूरी दिल्यानतर संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निधी वितरित करण्यांत येईल.  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर रक्कम मंजूर केलेल्या कामांकरिता खर्च करण्यासाठी त्या त्या ग्रामपंचायतींना गट विकास अधिका­यांमार्फत सुपूर्द करावी. मंजूर झालेली कामे ग्रामपंचायतीच्या तांत्रिक व वित्तीय मर्यादेबाहेरील असल्यास, सदर कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत प्रचलित नियमानुसार करण्यांत यावीत. सर्व कामांना उपरोक्त शासन निर्णयातील सुचनेनुसार तसेच प्रचलित नियमानुसार प्रशासकीय मंजूरी व तांत्रिक मंजुरी देण्याबाबत कार्यवाही करण्यांत यावी. कामावर संपूर्ण नियंत्रण संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे राहील. सदर सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
७)   कामांचा दर्जा व गुणवत्ता ही शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मानकाप्रमाणे असावीत. ती तशी नसल्यास ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व कंत्राटदार यांना सामुहिक व वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यांत य्‌ेईल.
८)   सदर योजनेसाठी गावातील योजनेअंतर्गत कार्यक्रमाची अंमलबजावणी तांत्रिकदृष्ट्या सक्षम व परिणामकारक व्हावी यासाठी संदर्भाधीन क्र. ५ वरील दिनांक ८.१२.२०१० च्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार ग्रामपंचायत स्तरावर कनिष्ठ अभियंता नेमण्याची कार्यवाही करण्यांत यावी.
अथवा
सदर योजनेसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर गावातील वर नमूद केलेल्या कामांचे प्रकल्प चित्र करणे, सर्व्हे करणे, तंत्रज्ञान इत्यादीसाठी सल्ला देण्याकरिता तांत्रिक पॅनल खालीलप्रमाणे गठित करण्यात यावे.
     अ)   प्रत्येक पंचायत समिती स्तरावर साधारणत: दहा ग्रामपंचायतीसाठी एक याप्रमाणे ग्रामपंचायतीना तांत्रिक सहाय्यासाठी अभियंत्यांचे पॅनल मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचेकडून पारदर्शक पध्द्‌तीचा अवलंब करुन तयार करण्यात यावे. सदर पॅनेलवरील अभियंत्यांचे सहाय्य ग्रामपंचायतींना तांत्रिक सेवा उपलब्ध करुन घेता येईल. (प्लॅन इस्टिमेट तयार करणे, ग्रामपंचायतीचे वतीने तांत्रिक संनियंत्रण करणे, ग्रामपंचायतीने काम बाहेरील कंत्राटदारांना दिले तर त्यांचे कामावर ग्रामपंचायतीच्या वतीने तपासणी करणे इ.) त्यांना आवश्यक शुल्क मुख्य कार्यकारी अधिकारी ठरवून देतील त्या दराने ग्रामपंचायतींनी अदा करावे.  यासाठी ग्रामपंचायती व संबंधित अभियंता यांनी करार करावा. कराराचे नुतनीकरण प्रत्येक वर्षी करण्यांत येईल.
ब)   या पॅनलमध्ये स्थापत्य अभियंता हा किमान पदविका धारण करणारा असावा व त्यास क्षेत्रिय कामाचा अनुभव असावा. अभियंता पॅनलची निवड जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यक्‌ारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता (बांधकाम) हे एकत्रितपणे व जाहिरात देऊन करतील.
क)   सदर पॅनलकडून प्रत्येक दहा ग्रामपंचायतीसाठी एक अशा नेमलेल्या तांत्रिक कामाचे अन्वेषण करणे, सर्वेक्षण करणे, अंदाजपत्रक तयार करणे, कामांची तांत्रिक मान्यता सक्षम अधिकां­र्‍याकडून प्राप्त करुन घेणे, कामांचे क्षेत्रीय स्तरावर रेखांकन करणे, तांत्रिक मार्गदर्शन करणे, मजुरांना कामांची आखणी करुन देणे, कामांचे मुल्यांकन करणे, मोजमाप पुस्तिकेत मापे नोंदविणे, कामाच्या पुर्णत्वाची कार्यवाही करणे इत्यादी कामे करावी लागतील.
ड)   सदर पॅनल गट विकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पंचायत समितीमध्ये काम करतील.
इ)   वरीलप्रमाणे नियुक्त केलेल्या तांत्रिक सहाय्यकांना कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेचा १% (एक टक्का) या दराने कामाचा मोबदला देण्यांत यावाव ही रक्कम कामाच्या अंदाजपत्रकामध्ये अंतर्भूत करावी.
९)   ग्रामपंचायतीने करावयाची कामे सुध्द्‌ा जर त्यांची किंमत ५ लाखाचे वर असेल व ती कंत्राटदाराकडून करुन घेणार असल्यास ई-निवीदा मागवूनच कामे करावी लागतील. जिल्हा परिषदेकडील यादीतील कंत्राटदाराकडून कामे करुन घेता येतील. तसेच ग्रामपंचायत स्वत: काम करणार असल्यास व कंत्राटदार नेमणार नसल्यास खरेदी करावयाच्या मटेरियलच्या प्रत्येक बाबीसाठी जर Procurement ची किंमत रु. ५०,००० पेक्षा जास्त असल्यास खरेदी ई-निविदेद्वारे करावी. त्यापेक्षा कमी किंमतीची सामुग्री किमान तीन कोटेशन मागवून व  ISI  प्रतिची खरेदी करावी.
१०)  अ)   सदर योजनेंतर्गत होणारी कामे चांगल्या दर्जाची व टिकाऊ व्हावीत यासाठी सध्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कार्यान्वित असलेल्या राज्य गुणवत्ता समन्वयक (SQC)  यांचे अधिपत्याखालील पॅनेलवरील राज्य गुणवत्ता नियंत्रक (SQM) यांचेकडून संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामाची तपासणी करुन घ्यावी. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्य गुणवत्ता समन्वयक (SQC) यांचेकडून आवश्यकतेनुसार यादी घ्यावी व त्याप्रमाणे वाटप करावे. यासाठी अदांजपत्रकीय रक्कमेच्या १% (एक टक्का) या दराने मोबदला देण्यात यावा व ही रक्कम कामाच्या अंदाजपत्रकामध्ये अंतर्भूत करावी. सदर यंत्रणेकडून कामाच्या विविध टप्प्यावर तपासणी करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही अचानकपणे यापैकी कोणत्याही कामाची तपासणी करावी.
ब)   वरील परिच्छेदामध्ये नमुद केल्यानुसार कामाची तपासणी करताना सदर कामे अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यांत येत आहेत याची संबंधितांनी खात्री करावी. तसेच आवश्यकता भासल्यास कामांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेतही चाचणी करता येईल.
क)   वरीलप्रमणे ठरलेल्या टप्प्यानुसार या यंत्रणेकडून गुणवत्ता तपासणी होवून कामाचे दर्जाबाबत प्रमाणित केल्याशिवाय कंत्राटदारांची बिले अदा करता येणार नाहीत. तपासणी यंत्रणेने तपासणी केलेल्या कामांबाबतचे अहवाल संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिका­यांकडे सादर करण्यात येतील व सदर अहवालांची तपासणी झाल्यानंतर संबंधित कामांची देयके मंजूर करण्यात येतील.
ड)   सदर कामांबाबत जनतेच्या तक्रारी उद्‌भवल्यास संबंधित जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांनी समक्ष जागेवर तक्रारीची शहानिशा करावी किंवा स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रकाकडून फेरतपासाणी करावी. जर कामाचा दर्जा निकृष्ट आढळून आल्यास संबंधित तपासणी यंत्रणा जबाबदार राहील.
११)  वर परिच्छेद ७ (ई) मध्ये नमूद केलेली १ऽ (एक टक्का) रक्कम व ८ (अ) येथे नमुद केलेली १% (एक टक्का) रक्कम या दोन्ही रकमा संबंधीत कामांच्या अंदाजपत्रकामध्ये अंतर्भूत असतील व या रकमा शासन स्तरावरुन प्रत्येक कामासाठी मंजूर होणा­या निधीमध्ये समाविष्ट असतील. कोणत्याही परिस्थितीत शासन स्तरावरुन प्रत्येक कामासाठी मंजूर केलेल्या निधीपेक्षा जास्त रक्कम देय होणार नाही.
१२)  सदर योजने अंतर्गत होणा­र्‍या कामांचे सामाजिक निरिक्षण करण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यांत यावी. :-
     मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ४९ (१) मधील तरतुदीनुसार ग्रामसभा ग्राम विकास समित्या गठीत करु शकतात. त्यानुसार सदर योजनेसाठी ग्रामसभेने एक ग्राम विकास समिती गठीत करुन त्याद्वारे सदर योजने अंतर्गत होणा­या कामांचे सामाजिक निरिक्षण करावे व सदर अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका­यांना सादर करावा.
१३)  सर्व कामे मुदतीमध्ये पूर्ण होतील यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियंत्रण ठेवावे व कामाचे पुर्णत्वाचे दाखले व उपयोगीता प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महालेखापाल, विभागीय आयुक्त व शासनास सादर करावेत.
२.   सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आला असून त्याचा संकेतांक २०११०५०३१२४४२६००१ असा आहे.  हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यांत येत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
                                              (दि.ग. मोरे)
                                        उप सचिव, महाराष्ट्र शासन

Give the new Govt Co-operation


A very humble request to all Indians. Send this message at least to five persons and ask them to further send it to five persons and keep the chain going*_

 1. Don't throw garbage on the roads/streets

 2. Don't spit on roads and walls

 3. Don't write on walls and currency notes

 4. Don't abuse and insult others

 5. Save water and electricity

 6. Plant a tree

 7. Follow traffic rules

 8. Take care of your parents and grand parents, take their blessings & always respect them

 9. Respect women

 10. Give way to ambulance

 We have got to change ourselves and not the country. Once we change ourselves the country will automatically change

 If we want our kids to live in a clean and safe environment then pledge to follow these in your everyday life.

 No leader can change the country, it's you & me who can change our beloved nation by changing ourselves

Kindly forward this important message to every single Friend or Group so that it reaches to every citizen of India. 

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

औरंगाबाद, दि.29 (जि.मा.का.) :- पिवळ्या, केशरी शिधापत्रिकाधारक, कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी नसेल, तर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा जवळील गॅस एजन्सीतून लाभ घ्यावा. अडचण आल्यास अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, औरंगाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन अन्न धान्य वितरण अधिकारी या कार्यालयाने केले आहे.

अनाथ प्रमाणपत्र देणेबाबत




जनजागर


८.  आपलं सरकार
                www.aaplesarkar.maharashtra.gov.in
     मा. ना.मुख्यमंत्री कार्यालयाच्या पुढाकाराने दि २६/१/२०१५ रोजी आपले सरकार या वेबपोर्टल आणि मोबाईल अॅपचे लोकार्पण झाले असून तक्रार निरवारण, सहयोग, माहितीचा अधिकार असे विभागांतर्गत सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्यांचे निवारण वा इतर अनुषंगिक माहितीसाठी सेवा उपलब्ध करुन घेऊ शकतो कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२२-२२०२४४९४६, Email : dstraininggad@maharashtra.gov.in

९.   मोफत विजजोडणी-पं दिनदयाळ ग्रामज्योती योजना
     महावितरण १८००२००३४३५/१८००२३३३४३५
     दारिदय रेषेखालील, अतिदुर्गम क्षेत्रातील, पंतपधान आवास, शबरी, रमाई, अदिवासी, सौभाग्य योजने अंतगत येणा-या घरांसाठी सौरउर्जा अंतर्गत वीजपुरवठा देण्यात येतो. ही वीज जोडणी मोफत असून इतर लाभाथीना ५००/-रु शुल्क असून १० टप्यात भरावयाचे आहे. स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून मोफत विज जोडणीचा लाभ घ्यावा.

१०.  स्मार्ट प्रवेश - मंत्रालयात 
आपल्या विविध कामासाठी मंत्रालयात अनेक जावे लागते व त्यासाठी रांगेत ताटकळत उभ रहावे लागत असल्याने अपंग, महिला, वृध्द ह्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.हा त्रास टाळावा ह्यासाठी  दि १५ जानेवारी २०१५ पासून ऑनलाईन पास सुविधा www.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर जनतेसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

११   विमा घ्या सुरक्षित रहा
     १८००१८०१११ टोल फ्री
     प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रु २.०० लाख ,१८ ते ७० वर्षे वयोगटासाठी अपघात विम्यासाठी रु १२/- तर जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत रु २.०० लाखाचे जीवन विम्यासाठी प्रतीवर्ष फक्त रु ३३०/- वय वर्षे १८ ते ५० वर्षे वयोगटासाठी असून नजिकच्या बँकेंत, बँक मित्र, विमा एजन्ट शी संपर्क साधावा.

१२  शेतीविषयक माहिती अॅपवर
     किसान कॉल सेंटर , १८००-१०-१५५१ टोल फ्री
     किसान सुविधा अॅप, अॅगीमार्केट पीकसुविधा अॅप,नवीन तंत्रज्ञान आणि पिकाची निगा ह्यासाठी पुसाकृषी, पीक विमा असे मोबाईल अॅप कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी कृषीविषयक माहिती उपलब्ध केले आहे. तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याच्या हेतूने किसान कॉल सेंटरला करा अथवा एसएसएसच्या सहायाने नोंदणी करावी. एसएसएस ५१९६९ किंवा ७७३८२९९८९९ या नंबरवर करावा.

दिनांक २६ जून - अंमली पदार्थ सेवन व बेकायदा व्यापार विरोधी दिन
     महाविदयालयीन तरुण तरुणींना केंद्रस्थानी ठेऊन अंमली पदार्थाच्या सेवनाची चटक लावून बेकायदा अंमली पदार्थाचा व्यापार करणारी टोळी महाविदयालयीन परिसरात लक्ष्य करते व त्यांचेकडून हवी तशी कामे करुन घेते.नशेच्या आहारी गेल्याने शारिरीक हानी तर होतेच. तथापी कौटुंबिक स्वास्थ्य पर्यायाने समाजाची ही हानी होते. हयासाठी महाविदयालयीन युवक युवतींनी आपल्या मित्र मैत्रणींवर लक्ष ठेऊन त्यांना प्रतिबंध करावा ,तसेच स्थानिक पोलिस यंत्रणेचीही मदत घ्यावी वा संपर्क- नाकोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई  कार्यालय, पत्ता -  ३ रा मजला, एक्सचेंज बिल्डींग, स्पोर्टी रोड, फोर्ट मुंबई ४००००१, बेलॉर्ड्‌ इस्टेट, ०२२-२२६२१५९३,०२२-२२६२०४२८,०२२-२२६२५१२६

रणरागिणी
     महिला व मुलींना कामानिमित,शिाक्षणानिमित्ताने, विविध कारणामुळे बाहेरगावी जावे लागते, अशावेळी रात्री दिवसा कोणत्याही वेळी समाजकंटकापासून संरक्षण करणेसाठी योजनेअंतर्गत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यांत येतात. महिला मंडळे, क्रीडा युवा मंडळे,शाळा महाविदयालये यांनी ह्या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणेसाठी लक्षवेधी रणरागिणी कार्यालयाशी संपर्क साधावा.

महात्मा गांधी तंटामुक्त गांव
     राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची १३८ वी जयंती पहिला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्ताने तंटामुक्त गांव गांव. करण्याची शपथ घेण्यात आली. गांवागांवातून होणारे तंटे,भांडणे वाळीत टाकणे असे समाजविघातक तंटे सामोपचार मिटवून गांवामध्ये बंधुभाव व सद्‌भावना निर्माण होणेसाठी गांवातील सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. ह्याकरिता महिला, युवक मंडळे, जेष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन सामोपचाराने तंटा निरसन करावे व गावामध्ये एकता, अखंडता निर्माण करावी.    

रोजगार व व्यवसाय प्रशिक्षण
     सुशिक्षित बेराजगारांमध्ये कुशलतेचा विकास व रोजगार उपलब्ध होणेसाठी भारत सरकारच्या सूक्ष्म व लधुउदयोग मंत्रालयाने औदयोगिक विकास केंद्र (आयडीईएमआय मुंबई) यांचे वतीने विविध कौशल्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शॉर्ट टर्म व लाँग टर्म चे विविध कोर्सेस प्रशिक्षण दिले जाते. अदिवासी युवक युवतींसाठी निशुल्क असून निवास व भोजनाची व्यवस्थ्‌ा शासनामार्फत करण्यांत येते.
संपर्क - आयडीएमआय, मुख्य, लघु व मध्यम उदयोग मंत्रालय, भारत सरकार, स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, चुनाभटटी, सायन, मुंबई ४०००२२, दुरध्वनी क्रमांक-०२२ २४०५०३०१ / २४०५०३०२ / २४०५०३०३ / २४०५०३०४ / ईमेल आयडी training@idemi.org

Wednesday, 29 May 2019

आमदार जयंत पाटील यांच्यावर करावाई करा

आमदार जयंत पाटील यांच्यावर करावाई करा या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील  पत्रकारांची  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक


अलिबाग (प्रतिनिधी) ः अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना  मारहाण कारणारे शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील  यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमावरी (दि. 27) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढला.

          लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी (दि. 23)  मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथिदारांनी मारहाण केली होती. याचा निषेध या मार्चात करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनाचे  पदाधिकरी व सदस्य या मार्चात सहभागी झाले होते.

          सकाळी 11.30 वाजता  पत्रकार भवन येथून हा र्चा निघाला. शिस्तबध्दपणे हा मार्चा पोस्ट ऑफिस-काँग्रेस भवन-स्टेट बँक -कोएसो शाळा-न्यायालय-पोलीस ठाणे  या मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचेल.  हिराकोट तलाव येथे हा मोर्चा पोलीसांनी अडवला. त्यांनतर मार्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी हे निवेदन स्विकारले.

          निवडणूक आयोगाची परवानगी नसताना मतमोजणी केंद्रात बेकायाद प्रवेश केल्याबद्दल आमादर जायंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथीदारांवर निवडणूक निर्णय अधिकरी म्हणून आपण स्वतः गुन्हा दाखल करावा.  मतमोजणी प्रक्रीया पूर्ण झालेली नसताना मतमोजणी केंद्रात घुसून या प्रक्रीयेत  अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमदार जयंत पाटील, पंडित पाटील यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची चौकशी जलदगतीने करावी .  आरोपपत्र तयार करून लवकरात लवकर न्यालायात खटला दाखल करावा  . पत्रकारावर हल्ला केल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवावा. सीसीटीव्ही कॅकेराचे फूटेज मिळावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणासाठी 20 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणासाठी 20 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        मुंबई, दि. 29 : ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
          मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. 2019-2020 या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 1 जुलै ते 31 डिसेंबर 2019 या 6 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक माहिन्यासाठी 450 रुपये तर दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीला दरमहा 100 रुपये इतके  प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.
          प्रशिक्षणार्थी निवडीचे निकष याप्रमाणे आहेत. प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छीमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे. पोहता येणे आवश्यक आहे. किमान 4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक कार्ड धारक किंवा आधार कार्डधारक असावा. संबंधित संस्थेच्या शिफारसीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा. प्रशिक्षणार्थी दारिद्रय रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षाकींत प्रत जोडणे आवश्यक आहे.
          निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक  मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे दिनांक 20 जून 2019पर्यंत करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सुविचार

"सृष्टी" कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही !! 
पण "दृष्टी" बदलली तर  नक्कीच सुखी होतो...
नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते..
सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते.

जाहीर आवाहन


New Cabinet for BJP

New Cabinet for BJP

Sports minister- Gautam Gambhir

Foreign minister- Miss Smriti Irani

Finance minister: Jayant Sinha

Defence minister: Rajiv pratap Rudi

Home minister: Amit Shah

Commerce minister: Varun Gandhi

Railways minister: Piyush Goyal

Agriculture minister: Rajnath Singh

Human Resource minister: Mrs Nirmala Sitaraman

Transport minister: Nitish Gadkari

Industry minister: Arvind Sawant ( SS)

Parliament minister: Shahnawaz Hussain

Minority’s affair: Mukhtar Abbas Naqvi

Civil aviation’s: Pawan Varma (JDU)

Information broadcasts: Babool Supriyo

Petroleum minister: Kiran Rijiju

Energy minister: Dr Arvind

Family planning minister: Anantkumar Hegde

Rural development: Shivraj Singh Chouhan

Women empowerment: Minakshi lekhi

Urban development: Gopal Shetty

Law minister: Ravishankar Prasad

Food processing minister: Chirag Paswan ( LP)

Tourism minister: Anurag Thakur

Make in India minister: Dharmendra pradhan

Health: J P Nadda

Coal & mineral: Giriraj Singh

Skill India: Jajyavardhan Rathor

Environment: Sadanand Gawda

Science & Technology: Haripriya Suresh

Labor minister: Anupriya Patel (AD)

Panchayati Raj: Dushyant Singh

Textile minister: Miss Saroj Pande

Consumer affairs: Harkirat Kaur Badal

Namami gange: Rita Bahuguna Joshi

Chemical ministers: Dr Harshvardhan

New portfolio: Employment generation minister: : Ram Madhav

New president of BJP: Bhupendra Yadav

सायबर क्राईम


सायबर क्राईम

सायबर गुन्हे म्हणजे काय ?
     “फौजदारी गुन्ह्यांचे कोणत्याही स्वरुपातील उल्लंघन, ज्यामध्ये संगणकीय तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा वापर करुन तपास किवा अन्वेषण आणि खटला चालविण्याच्यसा कामकाजातील प्रक्रियांचा समावेश म्हणजे “सायबर गुन्हे होय. (उदा. बँक फ्रॉड, फेसबुक, व्हॉटस अप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम इ. संदर्भातील गुन्हे).

सायबर गुन्ह्यांचे प्रकार :
     फिशींग, हॅकिंग, नायजेरियन फ्रॉड, सायबर बुलिंग, डेटा थेप्ट, क्रिप्टोग्राफी, सॉप­टवेअर पायरसी, सायबर स्टॉकिंग, पोर्नोग्राफी.

फिशींग :
     लोकांना फसवून त्यांची व्यक्तीगत खोटी माहिती, बँक अकाऊंट व क्रेडिट कार्डची माहिती वगैरे काढणे किंवा चोरणे, तसेच तुमचा पासवर्ड संस्थेच्या मूळ अधिकृत संकेतस्थळावर वापरुन तुमचे पैसे तुमच्या खात्यातून एका तात्पुरत्या बोगस खात्यात पाठवून नंतर लंपास करणे ह्या प्रकारच्या गुन्ह्याला “फिशींग गुन्हा असे म्हणतात.

हॅकिंग :
     संगणक, संगणक यंत्रणा आणि संगणक नेटवर्क यांचा मालक किंवा  त्यांची प्रभारी व्यक्ती यांच्या परवानगीशिवाय जर एखादी व्यक्ती संगणक, संगणकीय यंत्रणा व संगणक नेटवर्कमध्ये किंवा साधनांमध्ये प्रवेश करील किंवा प्रवेश मिळवेल त्यांस इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कायदा, २००० प्रमाणे कलम ४३(अ) अनुसार “हँकिग गुन्हा असे म्हणतात.

नायजेरियन फ्रॉड ­
     काही परदेशात स्थायिक झालेल्या कंपनया किंवा व्यक्ती संगणक धारकांशी ई-मेलद्वारे संपर्क करुन त्यांना मोठ्या रकमेचे बक्षीस लागल्याचे सांगून किंवा त्या देशातील त्यांचे नातेवाईकाचे पैसे हस्तांतरीत करण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिष दाखवून ते मिळविण्यासाठी आधी काही रक्कम जुजबी कामासाठी खर्च करण्यासाठी देण्यास किंवा पाठविण्यास भाग पाडून फसवणूक करणे म्हणजे “नायजेरियन फ्रॉड होय.

सायबर बुलिंग  (इंटरनेट माध्यमांद्वारे छळणे) :
     एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशाने किंवा मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने ई-मेल, इन्स्टंट मेसेजिंग, चॅट रुम्स, एसएमएस, मोबाईल सोशल नेटवर्किंग साईट, वेबसाईट, यांचा वापर करुन त्या व्यक्तीला घाबरवणे किंवा त्या व्यक्तीची बदनामी करणे, ह्या प्रकाराला “सायबर बुलिंग गुन्हा असे म्हणतात.

डेटा थेप्ट (डेटा चोरी करणे) :
     जर कोणी संगणक, संगणकीय यंत्रणा आणि संगणक नेटवर्कमधून कोणताही आधार सामग्री साठा किंवा माहिती उतरवून घेईल, नक्कल करील किंवा त्याचा गोषवारा घेईल तसेच काढून घेण्याजोगी साठवण माध्यमात, माहिती किंवा आधार सामग्री साठवून ठेवील त्यास इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कायदा, २००० प्रमाणे ४३(ब) नुसार “डेटा थेप्ट करणे हा गुन्हा असे म्हणतात.

साफ्टवेअर पायरसी :
     सॉफ्टवेअर पायरसी म्हणजे अवैधरित्या नक्कल आणि अधिकृत पत्रकाशिवाय (लायसन्स) सॉफ्टवेअरचा वापर करणे. त्याचबरोबर एकदाच वापरात येणा­या अधिकृत पत्रकाचा वापर एकापेक्षा जास्त वेळा अवैधरित्या एकापेक्षा जास्त लोकांनी केला तर त्याला “ सॉफ्टवेअर पायरसी असे म्हणतात.

सायबर स्टॉकिंग :
     नेटवर सातत्याने एखाद्याचा पाठलाग करणे, पिच्छा पुरविणे किंवा पाठपुरावा करीत त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ हरपून टाकणे होय. बुलेटीन बोर्डवर काही संदेश पाठविणे, जे बळी ठरलेल्या व्यक्तीच्या अनुभवात वारंवार येतात, त्याचप्रमाणे चॅटरुममध्ये अनधिकृतरित्या शिरकाव करुन अशा व्यक्तीस हैराण करण्यांत येत असते. त्यांस “सायबर स्टॉकिंग असे म्हणतात.

पोर्नोग्राफी (अश्लिल छायाचित्रण) :
     अश्लिल छायाचित्रे, चित्रफिती (क्लीपींग), अश्लिल मासिके जी इंटरनेटचा वापर करुन करण्यांत येतात त्याला “पोर्नोग्राफी असे म्हणतात. (अश्लिल छायाचित्रे उतरविणे, उतरवून घेणे, छायाचित्रे अश्लिल स्वरुपात काढणे किंवा अश्लिल स्वरुपाचे लिखाण करणे इत्यादी).

सोशल मिडीया (फेसबुक, व्हॉट्‌स-अॅप, टि्‌वटर) :
     विवाह विषयक फसवणुक, बदनामी, पोर्नोग्राफी, अफवा पसरविणे, खोटी बातमी पसरविणे, पाठलाग करणे, ब्लॅक मंलींग.

विवाह विषयक फसवणूक :
     शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम अशा मेट्रोमोनीयल वेबसाईटवर लग्नासाठी स्वत:चे प्रोफाईल तयार केले जाते व त्यानुसार वधू-वर शोधाशोध सुरु होते मग नंतर एखाद्या दुस­या देशातून एखाद्या परदेशी नागरिकांची फ्रेंड रिक्वेस्ट येते. मग दोघांमध्ये संवाद सुरु होतो. त्यानंतर एखादा बहाणा करुन पैसे उकळले जातात व आपण भावनेच्या भरात बळी पडतो. (उदा. हयात गिप­ट पाठवले आहे ते रिसिव्ह करायचे असेल तर करन्सी बदलावी लागेल, माझ्या आईला कॅन्सर झाला आहे. औषधोपचार करायचा आहे, अशा विविध प्रकारचे बहाणे करुन पैसे कधी कॅश डिपॉझिट तर कधी नेट बँकींगद्वारे भरायला सांगून नंतर संभाषण बंद करतात. आपण त्यात कसे गुंतत जातो याची आपल्याला कल्पना सुध्द्‌ा येत नाही).

बदनामी :
     बदनामी म्हणजे सायबर बदनामी जेव्हा संगणकाच्या वा इंटरनेटच्या मदतीने कोणातरी व्यक्ति, संस्था वा कार्य यांची बदनामी करण्यांत येते, तेव्हा त्यास “सायबर बदनामीम्हणतात. उदा. कोणीतरी व्यक्तीने कोणासाठी तरी अवमान, अपमानकारक असे वक्तव्य केले किंवा संकेतस्थळावर काही माहिती दिली जी त्या व्यक्तीबद्दल बदनामी करणारी असेल, किंवा असे काही ई-मेल पाठवले की ज्यात अवमानकारक माहिती ही व्यक्तीच्या सर्व मित्र मंडळीमध्ये पोहोचविण्यांत आली असेल.

अफवा पसरविणे :
     सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे सोपे असल्यामुळे अल्पावधीतच याची लोकप्रियता वाढली पण याचा वापर आता अफवा पसरविण्यासाठी अधिक होऊ लागला आहे. समाजात केवळ भिती पसरविणे आणि लोकांची फसवणूक करणे ही काही लोकांची मानसिकता झाली आहे. त्यातुनच असे संदेश तयार होत असतात. दंगली किंवा इतर घटनांवेळी समाज विघातक संघटना अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. तरी नागरिकांनी अशा अफवांना बळी न पडता शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा.

खोटी बातमी पसरविणे :
     हल्ली जगात कुठेही अपघात, घातपात, हल्ले, बॉम्बस्फोट अशा कोणत्याही दुर्घटनांच वृत्त त्या घडल्याक्षणी सोशत मिडीयावर येतात. सोशल मिडीयासारख्या तात्काळ व्यक्त होणा­या माध्यमात वावरणा­या बहुसंख्य माणसांकडे पेशन्स असतातच असे नाही. कोणतीही गोष्ट पाहिल्या क्षणी किंवा आपल्याला समजता क्षणी जशी दिसत आहे तशीच फेसबुक, टि्‌वटर, व्हॉटस्‌ अॅपवर लवकरांत लवकर टाकण्यासाठी जणू काय स्पर्धा लागलेली असते, ङक्ष्घ्, निषेध, भावपूर्ण श्रध्द्‌ांजली अशा पोस्ट, कमेंटस सारख्या सोशल मिडीयावर दिसत असतात, त्यामुळे नागरिकांनी खरे काय घडले आहे याचा तपास करुनच बातम्यांवर विश्वास ठेवावा.

पाठलाग करणे :
     नेटवर सातत्याने एखाद्याचा पाठलाग करणे, पिच्छा पुरविणे किंवा पाठपुरावा करीत त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ हरपून टाकणे होय. बुलेटीन बोर्डवर काही संदेश पाठविणे, जे बळी ठरलेल्या व्यक्तीच्या अनुभवात वारंवार येतात, त्याचप्रमाणे चॅटरुममध्ये अनधिकृतरित्या शिरकाव करुन अशा व्यक्तीस हैरान करण्यात येत असते. त्यास “पाठलाग करणे (सायबर स्टॉकिंग)” असे म्हणतात.

ब्लॅक मेलींग :
बँकिंग व इन्श्युरन्स संदर्भातील गुन्हे :
     अेटीएम संबंधीत गुन्हे, ओटीपी, डेबीट/क्रेडीट कार्ड नंबर, सीव्हीव्ही/पीन पासवर्डचे महत्व, फसवणूकीचे फोन कॉल्स, लॉटरी लागलेबाबतचे फोन, एसएमएस द्वारे फसवणूक, बिटकॉईन क्रिप्टाकरन्सी, मल्टिलेवल मार्केटींग

अेटीएम संबंधीत गुन्हे :
     आजकाल आपल्यातील प्रत्येकजण सोयीसाठी अेटीएम कार्ड आपल्याजवळ बाळगतो, पण या तंत्रज्ञानाच्या फायद्याप्रमाणेच त्यात काही धोकेही आहेत त्यामुळे अेटीएम वापरताना खालीलप्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन अेटीएम संबंधी गुन्ह्यांना आळा बसेल.
फसव्या कॉल्सपासून सावध रहा, एटीएम कार्डविषयी कोणतीही माहिती अज्ञात व्यक्तीला देवू नका.
·        तुमचा पिन नियमीतपणे बदला.
·        तुमचा पिन क्रमांक लक्षात ठेवा, तो कुठेही लिहून ठेवू नका, खास करुन तो कार्डावर लिहू नका.
·        तुमचे एटीएम कार्ड, पिन आणि इंटरनेट बँकींग यासंबंधीचा तपशील कोणत्याही देवू नका.
·        एटीएम बुथमध्ये कोणालाही आपल्याजवळ येऊ देवू नका किंवा एटीएम व्यवहारासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत मागू नका.
·        एटीएम मशीनला कोणतेही अज्ञात उपकरण किंवा संशयास्पद मशीन लावले आहे असे वाटल्यास तुमचे कार्ड स्वाईप करु नका.
·        तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी तुमच्या शाखेला भेट द्या, बँकेच्या व्यवहारासंबंधी एसएमएस अलर्ट मिळवा.
ओटीपी, डेबीट/क्रेडीट कार्ड नंबर, सीव्हीव्ही/पीन पासवर्डचे महत्व (ओटीपी, डेबीट/क्रेडीट कार्डद्वारे फसवणूक) :
डेबीट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरुन एटीएम मधून पैसे काढणे, दुकानातून खरेदी करणे, इत्यादी गुन्हे करणे होय. डेबीट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा नंबर कार्डधारकाचे सर्व डिटेल्स वापरुन इंटरनेटवरती खरेदी करणे, कार्डधारकाचा नंबर व माहिती दुस­याला विकणे, कार्डचा उपयोग करुन परदेशात खरेदी करणे, बनावट डेबीट/क्रेडिट कार्ड बनविणे किंवा कार्ड बनविण्यासाठी बँकेला खोटी माहिती देणे अशाप्रकारे घडणा­या गुन्ह्यांना ओटीपी, डेबीट/क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक म्हणतात.

फसवणूकीचे फोन कॉल्स  :
लॉटरी लागलेबाबतचे फोन :
     आपणास लॉटरी लागली आहे अशा प्रकारचे फसवे कॉल्स/मेसेजेस आपणांस येऊ शकतात, लॉटरीत लागलेली कार, लॅपटॉप, मोबाईल, टिव्ही, फ्रिज अशा प्रकारच्या वस्तू सोडविण्यासाठी टॅक्स भरावा लागेल वगैरे अशी कारणे दाखवून पैसे लूटले जातात. अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका आपले कष्टाचे पैसे दुस­याच्या स्वाधीन करु नका.

एसएमएस द्वारे फसवणूक :
सायबर गुन्ह्यांचे स्वरुप :
     सायबर गुन्हे म्हणजे असे गुन्हे की ज्या गुन्ह्यात कॉम्प्युटर व नेटवर्क सामील आहे. गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी कॉम्प्युटर मिळणे किंवा कॉम्प्युटर द्वारा गुन्हा करणे म्हणजे सायबर गुन्हा होय. एखाद्याच्या खाजगी माहितीचा गैरवापर करणे, माहितीची चोरी करणे म्हणजे कॉम्प्युटरमधून काढून घेणे. सायबर गुन्हे वेगवेगळ्या स्वरुपाचे असू शकतात. डाटा चोरी करणे, डाटा नष्ट करणे, माहितीत फेरबदल करणे, एखाद्याची माहिती दुस­याच एखाद्या व्यक्तीला देणे, कॉम्प्युटरच्या विशिष्ट भागांची चोरी करणे किंवा नष्ट करणे यास सायबर भाषेत स्पॅम ई-मेल, हॅकींग, फिशींग, व्हायरस टाकणे, एखाद्याची माहिती ऑनलाईन प्राप्त करणे, कोणावर कायम पाळत ठेवणे (पाठलाग करणे).

सायबर गुन्हा घडल्यानंतर काय कराल ?
     सायबर गुन्हा घडला आहे असे लक्षात आल्यावर सर्वप्रथम नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून काय घडले आहे ते सविस्तर सांगावे. त्याबाबत सविस्तर लेखी तक्रार नजिकच्या पोलीस स्टेशनमार्फत सायबर पोलीस स्टेशनकडे पाठवावी. बँक फ्रॉडबाबत तक्रार असेल तर बँकेचे स्टेटमेंट घेणे गरजेचे असते. डेबीट/क्रेडिट कार्डची फ्रंट साईडची सुस्पष्ट छायांकित (झेरॉक्स) प्रत अर्जासोबत जोडावी.

सायबर गुन्हे रोखण्याच्या उपाययोजना :
     संगणक तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे व संगणक तंत्रज्ञान हा महत्वाचा घटक बनला आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग दिवसेंदिवस वाढत असून त्यातील सर्व बाबींच्या सुरक्षिततेला महत्व प्राप्त झालेले आहे. भविष्यांत देखील माहिती तंत्रज्ञानात भरपूर वाढ होणार असून त्याच प्रमाणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर व गैरवापर होत आहे. भविष्यांत होणारा हा गैरवापर टाळण्यासाठी खालील गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

उपाययोजना :
१)   संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि त्यावरील आपला डेटा सुरक्षित करण्यासाठी उच्च प्रतिचा अद्ययावत अॅन्टीव्हायरसचा वापर करा.
२)   संगणक, लॅपटॉप, मोबाईल यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स साधनांचे पासवर्ड वेळोवेळी बदला तो ओळखण्याइतका सोपा ठेवू नका.
३)   विविध ई-मेल, सोशल मिडीया, नेट बँकिग किंवा इतर ऑनलाईन व्यवहारांसाठी कधीही एकच पासवर्ड वापरु नका त्यात विविधता ठेवा.
४)   मोबाईल - स्मार्टफोनला देखील पासवर्ड ठेवा, बँकेसंदर्भात किंवा इतर महत्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करु नका.
५)   क्रेडिट/डेबीट कार्ड यांचेवरील १६ अंकी नंबर/सीव्हीव्ही नंबर/पासवर्ड कुणालाही देवू       नये.
६)   बँकेचे खाते अेटीएम/डेबीट/क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही दुरध्वनीवर-मोबाईलवर देवू नका.
७)   लॉटरी, नोकरी, बक्षीस लागल्याचे ई-मेल/कॉल/एसएमएस आल्यास त्यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका त्याकडे दुर्लक्ष करु नका.
८)   संपूर्णपणे खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तींची फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका.
९)   फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आदी समाज माध्यमांद्वारे स्वत:चे सध्याचे लोकेशन शेअर करणे टाळा.
१०)  विविध समाज माध्यमांतून धार्मिक भावना भडकवणारे संदेश, व्हिडीओ, छायाचित्रे किंवा अश्लिल साहित्य पोस्ट करु नका अथवा फॉरवर्ड, लाईक व शेअर करु नका.
११)  कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपन्यांकडून आलेल्या ई-मेलवर क्लिक करु नका अथवा त्यांना कोणतीही संवेदनशील माहिती पुरवू नका.
१२)  https ने सुरुवात होणा­या सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करावा.
१३)  संगणक, मोबाईल विविध साईटस व अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यानंतर             आठवणीने लॉगआऊट करा.
१४)  ऑनलाईन शॉपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळांचाच वापर करा. सायबर गुन्हा घडल्यास आपल्या पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांची कर्तव्ये  :
हे करावे
१)   संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि त्यावरील आपला डेटा सुरक्षित करण्यासाठी उच्च प्रतिचा अद्ययावत अॅन्टीव्हायरसचा वापर करा.
२)   विविध ई-मेल, सोशल मिडीया, नेट बँकिग किंवा इतर ऑनलाईन व्यवहारांसाठी कधीही एकच पासवर्ड वापरु नका त्यात विविधता ठेवा.
३)   https ने सुरुवात होणा­या सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करावा.
४)   संगणक, मोबाईल विविध साईटस व अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यानंतर             आठवणीने लॉगआऊट करा.
५)   ऑनलाईन शॉपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळांचाच वापर करा. सायबर गुन्हा घडल्यास आपल्या पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांची कर्तव्ये  :
हे करु नका
१)   संगणक, लॅपटॉप, मोबाईल यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स साधनांचे पासवर्ड वेळोवेळी बदला तो ओळखण्याइतका सोपा ठेवू नका.
२)   मोबाईल - स्मार्टफोनला देखील पासवर्ड ठेवा, बँकेसंदर्भात किंवा इतर महत्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करु नका.
३)   क्रेडिट/डेबीट कार्ड यांचेवरील १६ अंकी नंबर/सीव्हीव्ही नंबर/पासवर्ड कुणालाही देवू       नये.
४)   बँकेचे खाते अेटीएम/डेबीट/क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही दुरध्वनीवर-मोबाईलवर देवू नका. लॉटरी, नोकरी, बक्षीस लागल्याचे ई-
५)   संपूर्णपणे खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तींची फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका.
६)   फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आदी समाज माध्यमांद्वारे स्वत:चे सध्याचे लोकेशन शेअर करणे टाळा.
७)   विविध समाज माध्यमांतून धार्मिक भावना भडकवणारे संदेश, व्हिडीओ, छायाचित्रे किंवा अश्लिल साहित्य पोस्ट करु नका अथवा फॉरवर्ड, लाईक व शेअर करु नका.
८)   कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपन्यांकडून आलेल्या ई-मेलवर क्लिक करु नका अथवा त्यांना कोणतीही संवेदनशील माहिती पुरवू नका.

Featured post

Lakshvedhi