Tuesday, 1 July 2025

भिवंडी ‘लॉजिस्टीक हब’ निर्मितीसाठी उच्चस्तरीय समिती

 भिवंडी लॉजिस्टीक हब’ निर्मितीसाठी उच्चस्तरीय समिती

- उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १ : भिवंडी शहर व परिसरात लॉजिस्टीकच्या अपार संधी आहेत. या परिसरातील लॉजिस्टीक उद्योगाचा विकास करणे आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी यामधून निर्माण होतील. आशिया खंडातील सर्वात चांगला लॉजीस्टीक हब निर्माण होण्याची क्षमता भिवंडी शहर परिसरात आहे. येथील लॉजिस्टीक हबचा सुनियोजित विकास होण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईलअसे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य रईस शेख यांनी याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती.

उत्तरात मंत्री श्री. सामंत म्हणालेभिवंडी परिसरातील पायाभूत सोयी सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करून या भागातील शक्तीकेंद्र असलेल्या लॉजिस्टीक हबचा विकास करता येईल. तसेच कासिमपुराखंडू पाडा ता. भिवंडीजि. ठाणे येथील उस्मान शेठ इमारतीच्या शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा झालेल्या मृत्यू प्रकरणाचीसुद्धा उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. याबाबत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

भिवंडी शहर परिसरातील लॉजिस्टीक हबच्या विकासासाठी समितीने सूचीत केलेल्या शिफारशीनुसार धोरण ठरविण्यात येईल. या भागातील लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन लॉजिस्टीक हबच्या निर्मितीत सहकार्य करावेअसेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.  

-

विचाराधीन बंदियों को न्याय दिलाने वाला विधि सहायता उपक्रम

 विचाराधीन बंदियों को न्याय दिलाने वाला विधि सहायता उपक्रम

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल पर शुरू हुआ उपक्रम

 

मुंबईदिनांक 19 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल पर वर्ष 2018 में शुरू किए गए देश के पहले विधि सहायता उपक्रम का क्रियान्वयन राज्य में प्रभावी रूप से किया जा रहा हैजो कारागृहों में बंद विचाराधीन कैदियों के लिए न्याय का मार्ग प्रशस्त कर रहा है। इस उपक्रम से अब तक लगभग 20,000 विचाराधीन बंदियों को लाभ हुआ हैजिनमें से लगभग 9,000 यानी 45 प्रतिशत बंदियों को विभिन्न कानूनी प्रक्रियाओं के माध्यम से रिहा किया गया है।

इस उपक्रम की विशेष बात यह है कि केंद्र सरकार ने भी इसे राष्ट्रीय स्तर पर अपनाया है और इसके क्रियान्वयन के लिए आर्थिक प्रावधान भी किया है।

प्रिजन स्टैटिस्टिक्स इंडिया रिपोर्ट 2021 के अनुसारभारत की जेलों में औसत कैदी दर 130% हैजिसमें लगभग 77% कैदी विचाराधीन (अंडर ट्रायल) होते हैं। इस गंभीर स्थिति को देखते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पहल कर उद्योगपति अज़ीम प्रेमजी से चर्चा की और उनके फाउंडेशन के साथ समझौता ज्ञापन (MoU) कर देश का पहला विधिक सहायता उपक्रम शुरू किया।

कई बंदी आज भी केवल इस कारण से जेल में हैं क्योंकि उन्हें विधिक प्रतिनिधित्व नहीं मिल पाया है या वे ज़मानत की राशि नहीं चुका सकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की दूरदृष्टि से आरंभ किए गए इस उपक्रम की मदद से विचाराधीन बंदी कानूनी प्रक्रिया का पालन कर न्याय प्राप्त कर रहे हैं।

राज्य सरकार ने अज़ीम प्रेमजी फाउंडेशनकार्यान्वयन सहयोगी संस्था टाटा सामाजिक विज्ञान संस्थान (TISS) तथा राष्ट्रीय विधि विश्वविद्यालयदिल्ली के सहयोग से इस विधि सहायता उपक्रम को राज्यभर में शुरू किया है। यह उपक्रम महाराष्ट्र के आठ प्रमुख कारागृहों — आर्थर रोडभायखळाकल्याणतळोजालातूरठाणेपुणे और नागपूर — में प्रभावी रूप से क्रियान्वित किया जा रहा है।

इन कारागृहों में तथा जिला विधि सेवा प्राधिकरणों में सामाजिक कार्य तथा विधि क्षेत्र के फेलोज़ की नियुक्ति की गई है। ये विशेषज्ञ बंदियों को उनके मामलों की तैयारीन्यायिक प्रक्रिया में मार्गदर्शन तथा प्रभावी विधिक प्रतिनिधित्व उपलब्ध कराने का कार्य करते हैं।

इस उपक्रम के चलते विधिक सहायता व्यवस्था में मूलभूत सुधार हुए हैंसेवाओं में समन्वय बढ़ा है तथा दुर्बल व संवेदनशील बंदियों के लिए न्याय की उपलब्धता में भी उल्लेखनीय सुधार हुआ है। नीति स्तर पर भी इस पहल से सकारात्मक बदलाव देखने को मिले हैं।

इस उपक्रम की सफलता को देखते हुए राज्य सरकार ने अज़ीम प्रेमजी फाउंडेशन के साथ हुए समझौता ज्ञापन का नवीनीकरण किया है और इसे दीर्घकालीन स्वरूप में विस्तारित किया जा रहा है। वर्तमान में इस उपक्रम की प्रभावी रूप से क्रियान्वयन प्रक्रिया जारी है।

अगले चरण में सूचना प्रबंधन प्रणाली को सुदृढ़ करनाजेलों में संचालित विधिक क्लिनिक’ की कार्यक्षमता बढ़ाना तथा संस्थागत क्षमता को विकसित करना मुख्य उद्देश्य रहेगा। महाराष्ट्र राज्य गृह विभाग की कारागृह सुधार शाखा ने इस पहल के माध्यम से विधिक सहायता और न्याय सुलभता के क्षेत्र में देश के लिए एक अनुकरणीय मॉडल प्रस्तुत किया है।

0000

. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली पाहणी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली पाहणी

 

नवी दिल्ली दि. १९ : मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार होत असून या ठिकाणी ३५० फूट उंच तयार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा हा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेलअशी प्रतिक्रिया पुतळ्याचे सुरू असलेले काम पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली.

          सुप्रसद्धि मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गाझियाबाद येथे त्यांच्या वर्कशॉपमध्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे काम जलदगतीने सुरू आहे. उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी पुतळ्याच्या कामाची पाहणी केलीतसेच या प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. हा पुतळा तयार झाल्यावर जागतिक किर्तीमान तर ठरेलच सोबतच देशासाठी प्रेरणादायीही ठरेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

          राम सुतार यांचे चिंरजीव अनिल सुतार प्रत्यक्ष काम पाहत असून त्यांना येणाऱ्या अडचणी श्री बनसोडे यांनी समजून घेतल्या तसेच त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासक आश्वासनही दिले. पुढील आठवड्यात यासंदर्भात मुंबई येथे बैठक आयोजित करून या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागाची बैठक आयोजित करण्यात येईलअशी माहितीही उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी योवळी  दिली.

विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी पुतळ्याच्या निर्मिती प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली. १०० फुट  उंच पादपीठासह ३५० फूट उंचीच्या या पुतळ्याचे काम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पुतळ्याचा पायाचा भाग (बूट) ६५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद असूनत्यासाठी सुमारे २० टन धातूचा वापर होणार आहे. या पुतळ्याचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. श्री. बनसोडे यांनी पुतळ्याच्या गुणवत्तेची आणि तांत्रिक बाबींची तपासणी करून राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आज पार पडलेल्या बैठकीत राम सुतारत्यांचे चिंरजीव अनिल सुतारमहाराष्ट्र विधानसभेचे सचिव डॉ. विलास आठवलेएमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरेउमेश साळवीशापुरजी पालंजीचे उमेश साळुंखेशशी प्रभू अँड असोसिएट्सचे अतुल कैटीकवारभदंत राहूल बोधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळेसुबोध भारत हे यावेळी उपस्थित होते.

          तत्त्पुर्वी  विधानसभा उपाध्यक्ष यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र सदनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर त्यांनी अलीपुर रोडवरील डॉ.आंबेडकर नॅशनल मेमोरियलला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित तसेच त्यांनी केलेल्या कार्याची माहिती या संग्रहालयाच्या माध्यमातून सामान्य माणसांही कळेल असे सुरेख संग्रहालय शासनाने बनविले असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरचे संचालक आकाश पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जनपथ येथे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरलाही त्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत तयार करण्यात आलेली खासदार परिचय पुस्तिका श्री. बनसोडे यांना यावेळी  देण्यात आली.

0000

सोलापूर महानगरपालिकेतील कामगारांना नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठवा

 सोलापूर महानगरपालिकेतील कामगारांना

नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठवा

- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबईदि. १९ :- सोलापूर महानगरपालिकेतील विविध खात्यांमध्ये १९९५ नंतर रुजू झालेल्या पण नियमित न झालेल्या कामगारांच्या सेवा नियमित करण्यासाठी महानगरपालिकेने ठरावासह परिपूर्ण प्रस्ताव शासनास पाठवावाअशा सूचना विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या.

विधिमंडळात उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी बैठकीस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच अतिरिक्त आयुक्त रवी पवारनगरविकास विभागाचे अवर सचिव श्री. वाणीकामगारांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत जवळपास २४९ कामगार नियमित करण्यात आलेले नाहीत. महानगरपालिकेचा आस्थापना खर्च विहित मर्यादेच्या पुढे गेला असल्याने अहवाल पाठविण्यात आला होता. परंतु या कामगारांना नियमित करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव ठरावासह शासनास पाठवण्यात यावा, असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

0000

विचाराधीन बंद्यांना न्यायाचा मार्ग दाखवणारा विधी साहाय्य उपक्रम

 विचाराधीन बंद्यांना न्यायाचा मार्ग दाखवणारा विधी साहाय्य उपक्रम

·                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरु असलेला उपक्रम

 

मुंबईदि. १९ : कारागृहांमधील विचाराधीन बंद्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून २०१८ मध्ये सुरू केलेल्या देशातील पहिल्या विधी सहाय्य उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे जवळपास २० हजार विचाराधीन बंद्यांना लाभ झाला आहे. त्यापैकी ९ हजार म्हणजेच  ४५ टक्के बंदी विविध कायदेशीर प्रक्रियांद्वारे मुक्त करण्यात आले आहेत.  या उपक्रमाचे महत्व म्हणजेकेंद्र शासनाने देश पातळीवर हा उपक्रम स्वीकारला असून अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूदही केली आहे. 

 ‘प्रिझन स्टॅटिस्टिक्स इंडिया रिपोर्ट २०२१नुसारभारतातील कारागृहांमधील बंद्यांचा सरासरी दर १३० असून त्यामध्ये सुमारे ७७ टक्के बंदी हे विचाराधीन (अंडर ट्रायल) आहेत. या बंद्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत उद्योगपती अज़ीम प्रेमजी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करीत देशातील पहिला विधी साहाय्य उपक्रम सुरू केला.

कायदेशीर प्रतिनिधीत्वाच्या अभावामुळे किंवा जामीन घेण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे अजूनही शिक्षा न ठरलेले बंदीजन आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विचाराधीन बंदी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करीत आहेत.

विचाराधीन बंदीगृहातील बंद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने अज़ीम प्रेमजी फाउंडेशन आणि अंमलबजावणी भागीदार टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टी आय एस एस ) आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठदिल्ली यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या विधी साहाय्य उपक्रमाने राज्यभरात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील आर्थर रोडभायखळाकल्याणतळोजालातूरठाणेपुणे आणि नागपूर या आठ प्रमुख कारागृहात  प्रभावीपणे राबविला जात आहे. या ठिकाणी सामाजिक कार्य व कायदा फेलोज यांची नेमणूक कारागृहांमध्ये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांमध्ये करण्यात आली आहे. हे तज्ज्ञ बंद्यांना प्रकरणाच्या तयारीसाठीन्यायालयीन प्रक्रियेत मार्गदर्शन करतात आणि प्रभावी विधी प्रतिनिधित्व मिळवून देतात.

या उपक्रमामुळे विधी साहाय्य व्यवस्थेत मूलभूत सुधारणा झाल्या असून सेवांमध्ये समन्वय वाढला आहे. दुर्बल व संवेदनशील बंद्यांसाठी न्यायाची उपलब्धता सुधारली आहे आणि धोरणात्मक स्तरावरही महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. या यशस्वी उपक्रमामुळे राज्य शासनाने अज़ीम प्रेमजी फाउंडेशनसोबतच्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले आहे. या उपक्रमाचा दीर्घकालीन पद्धतीने राबवीत विस्तार करण्यात येत आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

माहिती व्यवस्थापन बळकट करणेकारागृह विधी क्लिनिकची कार्यक्षमता वाढवणे आणि संस्थात्मक क्षमता वृद्धिंगत करणे यावर पुढील टप्प्यात भर दिला जाणार आहे. या पुढाकारामुळे गृह विभागाच्या महाराष्ट्र राज्य कारागृह सुधारणा शाखेने विधी साहाय्य व सुलभता या क्षेत्रात देशासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

00000

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी

 राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन 

ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा

कोणताही प्रकल्प रखडणार नाही 

याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

          मुंबईदि. १९ : राज्यातील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

          राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचना दिल्या. यावेळी नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गविरार – अलिबाग कॉरिडोरजालना – नांदेड द्रुतगती महामार्गपुणे रिंग रोड पूर्वपश्चिम व विस्तारीकरणभंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्गनागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्गनागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्गनवेगाव (मोर) – सुरजागड मिनरल कॅरिडोरवाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्ग या राज्यातील रस्ते प्रकल्पांच्या भूसंपादनाचा तसेच वर्धा -  नांदेडवडसा – गडचिरोली रेल्वे प्रकल्प आणि कोल्हापूरकराडअकोलागडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

            प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते असे सांगून मुख्यमंत्री  श्री. फडणवीस म्हणाले कीभूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांनी मिशन मोडवर काम करावे. भूसंपादनाची कामे गांभीर्याने घेऊन तातडीने मार्गी लावावीत. याबाबत सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक काम करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

          मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीशक्तिपीठ महामार्ग आराखडा गतीशक्तीवर रन करून त्याचा आराखडा तयार करून घ्यावा. जेणे करून कमीत कमी वन जमीन बाधित होईल. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या १२ हजार कोटींच्या निधीची वित्त विभागाने तरतूद करावी. विरार अलिबाग कॅरिडोरच्या मोरबे ते कारंजा टप्प्यामध्ये वन जमिन व कांदळवन असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. तसेच या प्रकल्पाच्या परवानग्या घेत असतानाच प्रशासकीय प्रक्रिया समांतर सुरू ठेवावी. त्यामुळे कामास गती देता येईल. वाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्गाचा समावेश सागरमाला योजनेत करण्याविषयीचा प्रस्ताव सादर करावा. जालना – नांदेड द्रुतगती महामार्गाचे परभणी जिल्ह्यातील सेलू येथील भूसंपादनाची प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करावी. विदर्भातील भंडारा – गडचिरोलीनागपूर – चंद्रपूरनागपूर - गोंदिया या सर्व द्रुतगती मार्गांचा आराखडा गतीशक्तीवर रन करून अंतिम करुन घ्यावा. वडसा - गडचिरोली व वर्धा – नांदेड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करून काम मार्गी लावण्यात यावे,  अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

          गडचिरोली विमानतळाचा ओएलएस करून घ्यावा आणि त्याचा प्रस्ताव गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी पाठवावा. तर अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २४०० मीटर पर्यंत वाढवावी. अकोला येथे सुंदर आणि अत्याधुनिक तसेच मोठे विमानतळ उभारण्यात यावेअशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील विमानतळ प्रकल्पांचा आढावा घेताना दिल्या. राज्यातील महत्त्वाकांक्षी ११ प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या ५३ हजार ३५४ कोटी रुपयांच्या निधीची तरतुदही करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

            या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरपरिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तामहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

0000

भुसावळ येथे महावितरण मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात आढावा

 भुसावळ येथे महावितरण मंडळ कार्यालय 

स्थापन करण्यासंदर्भात आढावा

 

मुंबईदि. 19 : भुसावळ (जि. जळगाव) येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत फोर्ट येथील उर्जा विभागाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी महावितरण कंपनीचे संचालक प्रदीप भागवत उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, महावितरण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या सुविधांकडेही लक्ष देण्यात यावे तसेच कार्यालयीन कर्मचारीतांत्रिक कर्मचारी व स्थानिक पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात याव्यातअसे त्यांनी यावेळी  सांगितले.

या बैठकीत भुसावळ आणि परिसरातील वीज समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी स्थानिक वीजपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करूनसमस्या क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पाहाव्यातलोकांच्या अडचणी समजून घेत ठोस उपाययोजना कराव्यातअसे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या कीभुसावळ शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज पुरवठा योग्य प्रकारे आणि वेळेवर होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि क्षेत्राच्या गरजेनुसार वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा. महावितरणच्या नवीन मंडळ कार्यालयामुळे भुसावळसह परिसरातील वीज सेवा अधिक सुलभकार्यक्षम आणि ग्राहकाभिमुख होईलअसा विश्वास राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीस महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारीभुसावळ विभागातील  स्थानिक उर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Featured post

Lakshvedhi