Tuesday, 1 July 2025

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार,कृषी विभागातर्फे महाकृषी ए. आय. धोरण कार्यशाळेचा शुभारंभ

 शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून

शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार

- कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी ए. आय. धोरण कार्यशाळेचा शुभारंभ

 

मुंबईदि. १ : मानव विरहित शेती‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणेकाटेकोर सिंचन पद्धती विकसित करणेजिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणेशेतीसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणेपीक साठवणूक सुविधा वाढवणे, शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरूनउत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे, असे मत कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सभागृह येथे दि. १ जुलै २०२५ रोजी स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिनानिमत्ताने 'महाकृषी ए. आय. धोरण या विषयावरकृषी विभागातर्फे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वालप्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीकृषी आयुक्त सूरज मांढरेनानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यावेळी उपस्थित होते.

कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे म्हणाले कीशेतकऱ्यांच्या हिताच्या शासन अनेक योजना राबवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली जावी यासाठी महाकृषी ए. आय. धोरण शासन राबवत आहे. काळाची गरज ओळखून शेतीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. शेतीतील उत्पादन वाढले आहे मात्र शेत मालाची गुणवत्ता कायम राखणे हे मोठे आव्हान आहे. फक्त भरमसाठ खत वापरणे हा जास्त उत्पादन देण्याचा मार्ग नाही. पिकाला जे आवश्यक तीच खतयोग्य पाणी याची  मात्रा  देणे आवश्यक आहे.

कृषीमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. शेतकऱ्यांना काळानुरुप प्रशिक्षण देणेनैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे. शेतकरी केंद्रित योजनाशाश्वत विकासच्या योजना राबवणे यावर शासन भर देत आहे. शेतमालाला योग्य हमी भाव मिळवून देणे हेच शासनाचे धोरण आहे असेही ॲड. कोकाटे म्हणाले.

शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती

 .




*शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती पहा.....*


*कॅल्शिअम कशात असतं?*

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर.

*कमतरतेमुळे काय होतं?*

हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे.

*कार्य काय असतं?*

शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.


*लोह कशात असतं?*

खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी.

*कमतरतेमुळे काय होतं?*

शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

*कार्य काय असतं?*

शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असते.


*सोडिअम कशात असतं?*

मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं.

*कमतरतेमुळे काय होतं?*

रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.

*कार्य काय असतं?*

शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.


*आयोडिन कशात असतं?*

शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.

*कमतरतेमुळे काय होतं?*

थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.

*कार्य काय असतं?*

शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.


*पोटॅशिअम कशात असतं?* सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.)

*कमतरतेमुळे काय होतं?*

अ‍‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.

*कार्य काय असतं?*

शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.


*फॉस्फरस कशात असतं?*

दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.

*कमतरतेमुळे काय होतं?*

ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.

*कार्य काय असतं?*

मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.


*सिलिकॉन कशात असतं?*

गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,

*कमतरतेमुळे काय होतं?*

कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.

*कार्य काय असतं?*

जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.


*मॅग्नेशिअम कशात असतं?* बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.

*कमतरतेमुळे काय होतं?*

उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

*कार्य काय असतं?*

पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.


*सल्फर कशात असतं?*

दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.

*कमतरतेमुळे काय होतं?*

प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.

*कार्य काय असतं?*

इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.


*क्लोरिन कशात असतं?*

पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

*कमतरतेमुळे काय होतं?*

अ‍‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍‍ॅलर्जी.

*कार्य काय असतं?*

सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.


*खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे...*

*फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.


*डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.


*काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.


*दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.


*फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*F7K0fdMXsySAClWJ5rC5MC


**

Policy Measures Must for Safety, Employment, and Economic Empowerment of Single Women

 Policy Measures Must for Safety, Employment,

and Economic Empowerment of Single Women

– Vice Chairperson Dr. Neelam Gorhe

 

Mumbai, June 28: To ensure safety, employment, and financial independence of single women—including widows, divorced, abandoned, and unmarried women—it is essential to implement strong policy-driven interventions, said Legislative Council Vice Chairperson Dr. Neelam Gorhe. She emphasized that departments such as Revenue, Food and Civil Supplies, Women and Child Development, Health, Employment Guarantee Scheme (EGS), and Rural Development must collect data on single women and prioritize them in government welfare schemes.

A review meeting on the issues and policy solutions for single women was held today at Vidhan Bhavan, Mumbai, where Dr. Gorhe was joined by Additional Chief Secretary V. Radha (GAD)Commissioner Naina Gunde (WCD)Resident Commissioner R. Vimala (Maharashtra Sadan)Deputy Commissioner Rahul MoreTribal Development Department Joint Secretary Machhindra ShelkeEGS Joint Secretary Atul Kode, and State Convener of SAU Single Women Rehabilitation Committee Heramb Kulkarni, along with Member Milind Salve.

Dr. Gorhe stated that single women face social and financial challenges, and there is a need to work on their legal awareness, property rights, dignity, and security. She called for alignment with the Sustainable Development Goals (SDGs) and urged all departments to synchronize efforts and collect comprehensive data to provide targeted benefits.

She suggested that guardian secretaries and district collectors should be tasked with executing a special campaign for linking single women to relevant schemes. Issuing identity cards would help ensure that these women receive priority services in police stations and hospitals. Additionally, she stressed the importance of preventing forced property transfers in rural areas.

Dr. Gorhe also noted that the employment challenges faced by single women in rural and urban areas differ, and solutions should be tailored accordingly.

Commissioner Naina Gunde shared plans under the ‘Adishakti Abhiyan’, where multiple departments will implement women-centric schemes with a clear implementation policy.


मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क जेईई, नीट प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्याचे आवाहन

 मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क जेईई, नीट

प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 28 : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) वतीने राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षांचे निः शुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित संस्थांमार्फत दिले जाणार आहे. मुंबईपुणेनाशिकछत्रपती संभाजीनगरलातूरअमरावती व नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र असतील.

त्याकरीता मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जे उमेदवार सन- 2025 ची इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेतअशा उमेदवारांचे सन 2025 ते मे 2027 या कालावधीसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. 

या प्रशिक्षणासाठी 10 वीच्या गुणांच्या आधारे व 8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवड केली जाईल. त्याकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी 1 जुलै पासून 30 जुलै 2025 पर्यंत https://cpetp.barti.in या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वयंसेवा संस्थासेाबत सामंजस्य करार

 गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वयंसेवा संस्थासेाबत सामंजस्य करार

 

शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मे 2025 ते मार्च 2028 या कालावधीसाठी एक महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 30 गावे समाविष्ट करण्यात आली असून सुमारे 3,000 शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून 3,000 एकर क्षेत्रावर शेतीविकासजलसंधारणपायाभूत सुविधा आणि उत्पादनक्षमता वाढीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणेशेती टिकाऊ होणे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे अपेक्षित आहे.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा प्रकल्पांसाठी शासनाच्या निधीचा समन्वय साधूनअधिकाधिक लाभदायी रूपात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासन यांच्यात औपचारिक सामंजस्य करार  देखील करण्यात यावा.

हिंदुस्तान युनिलिव्हर फाउंडेशनकडून दीर्घकालीन व सातत्यपूर्ण पाठींब्याची अपेक्षा व्यक्त करून राज्यातील दुष्काळग्रस्त भागांत पाणीटंचाईचे आव्हान अधिक प्रभावीपणे हाताळता येईल असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पाणी संवर्धन कार्यात स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे

 पाणी संवर्धन कार्यात स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यात पाणी संवर्धनासदर्भात सामंजस्य करार

 

मुंबई,दि.28 :  विदर्भात जलसंधारण व जलस्रोत विकासाचे काम होणे आवश्यक आहे.  पावसाच्या अनियमिततेमुळे या भागातील शेतकरी संकटाच्या छायेखाली आहेत. अशा पार्श्वभूमीवरया भागात पाण्याच्या टिकवणुकीसाठी स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतलेले कार्य खरोखरच उल्लेखनीय असून भरीव काम गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी  प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणासाठी कामाचा व्यापक स्वरूपात विस्तार करावा. राज्यात गाव पातळीवरील पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवननव्याने जलसाठवण व जलनियंत्रण रचनांची उभारणीलोक सहभाग व वैज्ञानिक दृष्टिकोनातून दीर्घकालीन टिकाऊ जलव्यवस्थापन यांचा समावेश करावा.

बिहारमध्ये ‘विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीम’ला उत्साहात सुरुवात

 बिहारमध्ये विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमला उत्साहात सुरुवात

 

मुंबईदि.२८: भारतात संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. सर्व नागरिकराजकीय पक्ष आणि भारत निवडणूक आयोग संविधानाचे पालन करतात. भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२६ नुसारफक्त भारतीय नागरिकज्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे आणि जे संबंधित मतदारसंघात वास्तव्यास आहेततेच मतदार होण्यासाठी पात्र असतात. बिहारमध्ये विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीम (Special Intensive Revision - SIR) यशस्वीपणे सुरू झाली असूनसर्व राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग या प्रक्रियेत आहे. निवडणूक आयोगाकडे सध्या ७७,८९५ बूथ स्तर अधिकारी (BLO) कार्यरत आहेततर नवीन मतदान केंद्रांसाठी आणखी सुमारे २०,६०३ BLO नियुक्त करण्यात येत आहेत. या मोहीमेदरम्यानअधिकृत मतदारांनाविशेषतः वृद्धआजारीदिव्यांग (PWD), गरीब व इतर दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी एक लाखाहून अधिक स्वयंसेवक कार्यरत असतील. ECI मध्ये नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरीय सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आतापर्यंत १,५४,९७७ बूथ स्तर एजंट (BLA) नियुक्त केले आहेत. पक्षांना अजूनही अधिक एजंट नेमण्याची मुभा आहे.

बिहारच्या सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान ७,८९,६९,८४४ मतदारांसाठी नवीन गणना फॉर्म (Enumeration Form - EF) छापण्याचे आणि घरोघरी वितरणाचे काम सुरू झाले आहे. यासोबतचऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. या ७.८९ कोटी मतदारांपैकी ४.९६ कोटी मतदारांची नावे १ जानेवारी २००३ रोजीच्या अंतिम मतदार यादीत आधीच आहेतअशा मतदारांनी केवळ ते पडताळूनफॉर्म भरून सादर करायचा आहे. या विशेष मोहिमेत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी BLO ना पूर्णवेळ या कार्यात गुंतवून घेत आहेत. राज्यातील ५,७४,०७,०२२ नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS द्वारे देखील माहिती पाठवली जात आहेजेणेकरून नागरिकांना प्रक्रिया अधिक सोयीची आणि पारदर्शक वाटेल. या विशेष व्यापक पुनरिक्षण मोहिमेतील सर्व उपक्रम वेळापत्रकानुसार यशस्वीरित्या पुढे चालू आहेतअशी माहिती भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

Featured post

Lakshvedhi