Thursday, 1 June 2023

आषाढी एकादशी पालखीमार्गात भाविकांना

 आषाढी एकादशी पालखीमार्गात भाविकांनास्वच्छता - सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये


                                                                                                                        - गिरीश महाज


            मुंबई, दि. १ : आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता - सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी २१ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी दरवर्षी पायी चालत पंढरपूरला जात असतात, यामध्ये विविध दिंड्यांचाही सहभाग असतो.पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी मुक्काम केला जातो. या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाच्या वतीने सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही तरतूद करण्यात आली आहे.


            पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान काका महाराज या प्रमुख पालख्यांचा प्रवास जवळपास २२ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा असतो. वारकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.


ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये


            सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये वारी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधून जाणार आहे, त्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता राखणे व भाविकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचातींवर असणार आहे.


पुणे जिल्हा परिषदेला १७ कोटी ६४ लाख रुपये निधीस मान्यता


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या निधी मधून संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय व संत सोपान देव या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते शौचालय, निवारा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे यांनी चालू वर्षात आषाढी वारीनिमित्त शासनास सादर केलेल्या १७ कोटी ६४ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

हृदयाची दुर्बलता*

 *हृदयाची दुर्बलता*


◼️तुळशीच्या बियांचे अर्धा ते एक ग्रॅम चूर्ण तेवढ्याच खडीसाखरेबरोबर घेतल्याने किंवा मेथीच्या २० ते ५० मि.ली. काढ्यात (२ ते १० ग्रॅम मेथी १०० ते ३०० ग्रॅम पाण्यात उकळावी) मध घालून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


◼️अर्जुनसालीचे १ चमचा चूर्ण व दोन चमचे धने पूड, १ ग्लास पाण्यात उकळून घ्यावे. प्यायल्याने खूप लाभ होतो. याशिवाय लसूण, आवळा, मध, आले, बेदाणा, द्राक्षे, ओवा, डाळींब इ. पदार्थांचे सेवन हृदयासाठी लाभदायक आहे.


◼️लिंबाच्या सव्वा तोळा (सुमारे १५ ग्रॅम) रसात आवश्यकतेनुसार खडीसाखर घालून प्यायल्याने हृदयाचे स्पंदन सामान्य होते तसेच स्त्रियांमध्ये हिस्टेरियामुळे वाढलेली हृदयाची धडधडदेखील दोन लिंबांचा रस पाण्यात घालून प्यायल्याने शांत होते.


◼️गुळवेलीचे चूर्ण मधाबरोबर घेतल्याने किंवा आल्याचा रस व पाणी समप्रमणात एकत्र करून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


◼️उगवत्या सूर्याच्या शेंदरी किरणांमध्ये (सुमारे दहा मिनिटेपर्यंतच्या) हृदयरोग दूर करण्याची अपरिमीत शक्ती असते. म्हणून रुग्णाने प्रातःकाळी सूर्योदयाची वाट पहावी आणि सूर्याचा पहिला किरण त्याच्यावर पडेल असा प्रयत्न करावा.


◼️मोठ्या गाठीच्या हळकुंडाची वस्त्रगाळ पूड करून आठ महिने ठेवून द्यावी. नंतर दररोज देशी गाईच्या दूधतून किंवा तुपातून एक चमचा घालून प्यावी. हळदीत हा खास गुण आहे की ती रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले रक्ताचे थर विरघळविते आणि रक्तवाहिन्या साफ करते. जेव्हा रक्तवाहिन्या साफ होतात तेव्हा तो कचरा म्हणजेच विजातीय द्रव्ये पोटात गोळा होतात व नंतर मलावाटे बाहेर टाकली जातात.


◼️रोहिणी हिरड्याचे वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवून द्यावे. रोहिणी हिरडा न मिळाल्यास बेहड्याच्या आकाराचा कोणताही हिरडा घ्यावा. या हिरड्याचे सुमारे १ चमचा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईच्या दुधातून किंवा तूपाबरोबर घ्यावे. यामुळे विजातीय द्रव्ये मल, मूत्र व घाम इ. रूपात शरीरातून बाहेर टाकली जातात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



आय आय टी कानपूर उपक्रम

 फारच छान...You may like to save this and, if found interesting & informative, forward it to all your like-mind


ed contacts 🙏

शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे.....?*

 शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे.....?* 

*

बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. 


*माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते अशावेळी...*

*मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.


*आहारात सिझनल फळांचा समावेश करा.


*गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे,


*राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.


*सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे


*सुकामेवा शेंगदाणे खावे, 

अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा.


*सुनील इनामदार.*



🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺

*

कांदिवली पूर्व स्थानकाच्या सरकता जिन्याचे भूमीपूजन उत्साहात

 कांदिवली पूर्व स्थानकाच्या सरकता जिन्याचे भूमीपूजन उत्साहात




आमदार अतुल भातखळकर यांचा पाठपुरावा

मुंबई : कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकाचा सरकता जिना आता सुरु होणार आहे. मागील तीन वर्षांपासून हा जिना सुरु करण्यात यावा, यासाठी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपोषण, मोर्चा अशी विविध आंदोलने केली. पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश मिळाले असून गुरुवारी आमदार भातखळकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.


यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, आज या सरकता जिना कामाचे भूमिपूजन झाले आहे. येणाऱ्या अडीच, तीन महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे. कांदिवली पूर्व स्थानकाचा उपयोग करणारे अशोकनगर, चाणक्य नगर, पोईसर, ठाकूर कॉम्प्लेक्स अशा सर्व ठिकाणच्या नागरिकांना या कामामुळे दिलासा मिळणार आहे. याशिवाय गोशाळेजवळील बंद असलेला सरकत जिनाही येणाऱ्या काळात सुरु करण्यात येईल. मागील तीन वर्षापासून हा सरकता जिना बंद असणे हा २५ वर्ष मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या 'कारभाराचा' हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. मुंबई पालिकेचा कारभार अत्यंत संथ गतीने आणि नियमांच्या जंजाळयात अडकवण्याचे काम आतापर्यंत केले, अशी टीकाही आमदार भातखळकर यांनी केली.


स्वागत प्रास्ताविक मंडळ अध्यक्ष आप्पा बेलवलकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक ठाकूर सागरसिग यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विधानसभेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में आपत्तिजनक लिखान

 क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में आपत्तिजनक लिखान करनेवाली 'इंडिक टेल्स' वेबसाइट पर कार्रवाई करने का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का निर्देश


· आपत्तिजनक सामग्री की जांच कर उस पर कार्रवाई करने के लिए मुख्य सचिव को निर्देश


· महापुरुषों के बारे में आपत्तिजनक लिखने वालों को बख्शा नहीं जाएगा - मुख्यमंत्री की चेतावनी


 


               मुंबई, दि. 31: क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में आपत्तिजनक लिखान करनेवाली वेबसाइट 'इंडिक टेल्स' पर कार्रवाई करने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मुख्य सचिव को दिए हैं।


               वेबसाइट 'इंडिक टेल्स' ने अपने प्रकाशित लेख में क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में कई आपत्तिजनक बातें लिखी हैं, कई राजनीतिक संगठनों और सामाजिक संगठनों ने सरकार के पास आपत्ति जताई है। इन आपत्तियों को संज्ञान में लेते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस वेबसाइट की सामग्री की जांच करने और इसके खिलाफ कार्रवाई करने का निर्देश दिया है।


                महापुरुषों के बारे में लिखते समय अत्यंत अध्ययनशील होना चाहिए, साथ ही लेखकों व प्रकाशकों को यह ध्यान रखना जरूरी है कि उससे उनका अपमान न हो। महापुरुषों के बारे में आपत्तिजनक लिखने वालों को सरकार नहीं बख्शेगी।‌ यह चेतावनी देते हुए मुख्यमंत्री शिंदे ने स्पष्ट निर्देश दिए हैं कि 'इंडिक टेल्स' के लेख में आपत्तिजनक बातें होने पर उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाए।


0000

इसबगोल औषधी उपयोग

 *इसबगोल:-*


इसबगोल आता भारतामध्ये गुजरात, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात इंदोर इ. ठिकाणी याची लागवड होते. इसबगोल साधारण तीन फूट उंच वाढते. या वनस्पतीला गव्हासारख्या ओंब्या येतात. त्यामध्ये इसबगोलाच्या बिया असतात. इसबगोलामध्ये सफेद, तांबडे व काळे असे तीन प्रकार असतात. त्यातील औषधांमध्ये सफेद श्रेष्ठ असते तर काळे रंगाचे औषधांत वापरत नाही.


इसबगोलात फायबरचे प्रमाण भरपूर असते


इसबगोलामध्ये मधुर, शीत, कफ, पित्त, रक्तातिसार, रक्तपित्त, ज्वरातिसार, प्रमेह, दाह, वीर्यक्षय, ग्राही, वीर्यस्तंभक इ. गुणधर्म असतात.


*औषधी उपयोग:-* 


◼️वीर्यक्षय, दाह, प्रमेह यांवर इसबगोल रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी त्यात खडीसाखर घालून द्यावे.


◼️डोकेदुखीवर इसबगोल निलगिरीच्या पानांत वाटून मस्तकास लेप करावा.


◼️दमारोगात दोन ते तीन ग्रॅम इसबगोल कोमट पाण्यातून सकाळ- संध्या. द्यावे.


◼️रक्त-संग्रहणीवर इसबगोल आणि खडीसाखर चावून खाण्यास द्यावी.


◼️जीर्ण आमातिसार व रक्तातिसार यांवर इसबगोल दोन चमचे दह्यातून दोन वेळेस द्यावे.


◼️पोटात आग पडते, आतड्यांना सूज येते अशा वेळी दहा ग्रॅम इसबगोल थंड पाण्यात भिजत घालून ते फुलल्यावर खाण्यास द्यावे.


◼️कब्जरोगात इसबगोल एक चमचा रात्री झोपताना दुधातून द्यावे.


◼️अर्सेनिक (एक विषारी पदार्थ) मुळे विषार झाल्यास इसबगोल भिजवून त्यात बेदाणा, दही व गुलाबपाणी एकत्र करून द्यावे; म्हणजे विषार कमी होतो.


◼️ज्वरातिसारामध्ये इसबगोलाचा काढा करून द्यावा.


◼️धात-पुष्टतेस इसबगोल दोन भाग, वेलची एक भाग व खडीसाखर तीन भाग रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे.


◼️स्वप्नदोषावर इसबगोल आणि खडीसाखर समप्रमाणात एकत्र करुन त्यातून एक चमचा मिश्रण अर्धा ग्लास दुधातून झोपण्याच्या एक तास अगोदर द्यावे. झोपण्याच्या अगोदर लघवीला जाऊन झोपावे.


◼️लघवीला आग होणे, जळजळ होणे अशावेळी एक ग्लास पाण्यात चार चमचे इसबगोल भिजवून स्वादानुसार खडीसाखर मिसळवून पिण्यास द्यावे.


◼️वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर एक चमचा इसबगोल पाण्यातून द्यावे. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पोट भरल्याची जाणीव राहते व पुन्हा-पुन्हा खाण्याची इच्छा कमी होते.


◼️मधूमेहात याच्या सेवनाने शुगर लेव्हल नियंत्रीत राहण्यास मदत होते परंतू इसबगोलाच्या अतिसेवनाने रक्तातील शुगरचे प्रमाण कमी होऊ शकते.


◼️गर्भिणी स्रीने इसबगोल खाणे टाळावे.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,


_*(

Featured post

Lakshvedhi