Wednesday, 29 November 2023

राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाने अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करावेत

 राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाने अंदाजे 

९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करावेत

            मुंबई, दि. 28 : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे  प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व  33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            राज्यातील काही जिल्ह्यांत २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्राबाबत आज २८ नोव्हेंबर २०२३ रोजी  कृषी विभागाकडून प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूरमुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे., पालघर जिल्ह्यातील पालघरवसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहेनाशिक जिल्ह्यातील कळवणनांदगावनाशिकनिफाडत्र्यंबकेश्वरसटाणादिंडोरीपेठसुरगाणाइगतपुरीसिन्नर, चांदवडयेवला तालुक्यातील  ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदाद्राक्षसोयाबीनमकागहूऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्रीशिरपूरशिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळीपपईकापूसहरभरानंदुरबार जिल्ह्यातील नवापूरअक्कलकुवानंदुरबारशहादातळोदाअक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भातकापूसतूरमिरचीमकाकांदा पिकांचेजळगाव जिल्ह्यातील जळगावभुसावळयावलरावेरमुक्ताईनगरअमळनेरचोपडाएरंडोलपारोळाचाळीसगावजामनेरपाचोराधरणगावबोदवडभडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदाहरभरागहूमकाज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.  

                अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोलेकोपरगावपारनेरराहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेडआंबेगावशिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगरपैठणगंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील  केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे,

         जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षकेळीकांदाखरीप ज्वारीगहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीबीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहेहिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणीगंगाखेडजिंतूरपाथरीपूर्णापालम मानवत सोनपेठसेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारीकापूससीताफळपेरूभाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहेनांदेड जिल्ह्यातील नांदेडमुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहेबुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणानांदुरालोणारसिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोदमलकापूरखामगावशेगावमोताळानांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे.

            नुकसान झालेले क्षेत्र हे प्राथमिक अंदाजानुसार आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केल्या आहेत.

                                                                        *****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi