Sunday, 30 April 2023

पूर्णब्रह्म -भाजलेल्या वांग्याचे फायदे.....*

 *भाजलेल्या वांग्याचे फायदे.....*


वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संक्रमित आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. भारतातील जवळपास सर्व भागांमध्ये वांग्याची शेती केली जाते. आदिवासी भागांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वांगे वापरले जाते. वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन, डायबिटीज इत्यादी समस्या दूर होतात. येथे जाणून घ्या, वांग्याचे काही खास उपाय आणि फायदे…


*खोकल्यावर गुणकारी...* 

पाताळकोट येथील आदिवासी वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकतात. यांच्या माहितीनुसार अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो.


*भूकेला शांत करते...* 

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स आढळून येतात, जे वजन कमी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज कमी होऊ शकतात. फायबर्सचे पोटातील प्रमाण वाढल्यामुळे भूक शांत होते.


*उच्च रक्तदाबाची समस्या ठीक होते...*

आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार ठीक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आधुनिक विज्ञानानुसार शरीरातील आयर्नचे जास्त प्रमाण नुकसानदायक ठरू शकते. वांग्यातील नासुनीन नावाचे रसायन शरीरातलं अतिरिक्त आयर्न नियंत्रित करते. या कारणामुळे हृदय संचालन सामान्य राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो.


*शांत झोप लागते...*

भाजलेल्या वांग्यावर चवीनुसार मध टाकून रात्री खाल्ल्यास शांत झोप लागते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होते. रक्ताची कमतरता दूर होते.


*अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते...* 

वांग्याचे सूप तयार करून त्यामध्ये हिंग आणि चवीनुसार लसुन टाकून सेवन केल्यास पोट फुगणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, अपचन इ. समस्या दूर होण्यास मदत होते.


*डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर...*

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते आणि यामधी कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे विरघळत नाहीत. यामुळे टाइप 2 डायबिटीज ग्रस्त रुग्णांनी नियमित वांग्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल.


नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

   

*नितीन जाधव,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत


 


            मुंबई, दि.३० :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावरील एकूण १,४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८०% उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.


            महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.



000000


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन


 


            मुंबई, दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिवादन केले.


 


            यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

लाल तांदूळ....👇 आरोग्यदायी


 *लाल तांदूळ....👇*रात्या तांदुळ (लाल तांदुळ) विकणे आहे..!
100/- रूपये प्रति किलो.
डायबिटीस, कॅन्सर इ. आजारांवर उपयुक्त..!
ईच्छुक ग्राहकांनी संर्पक साधावा :- 8975932044


   तांदूळ जगभरातील बरेच लोक खातात, आपल्या देशाच्या विशालतेत पांढरा पाॅलिश केलेला तांदूळ विशेषत: लोकप्रिय आहे,पण लाल तांदूळ हा दर्शनार्थि

 अप्रिय असला तरी, त्यांचे गुणधर्म अफाट आहे. लाल तांदळात ग्रुप बी चे अनेक जीवनसत्वे असतात. त्यामुळे नखे, केस, आणि त्वचा निरोगी राहते. तसेच हे धान्य मौल्यवान खनिजे सम्रुद्ध आहे. आयोडिन, फाॅस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

.........यात असलेले मॅग्नेशियम मायग्रेन व दमा विरूद्ध लढायला तयार करते. व मज्जासंस्था मजबूत होते. ह्रुदयविकार, हार्टअटक येत नाही, कॅल्शियम सह हा पदार्थ हाडांना मजबूत करतो.आॅस्टिओपोरोसिस व आर्थस्ट्रिसिसच्या विकासाला प्रतिबंध करतो.

             लाल तांदळाच्या कवचात असलेलं पोटॅशियम सांध्यातील मीठ काढून टाकण्यास मदत करते. आणि त्यांच्यातील वेदना, जळजळ कमी होते.. हे धान्य एक शक्तिशाली अॅंटिआॅक्सिडंट आहे. आपण नियमितपणे याचा वापर केल्यास शरीरात कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात, विशेषतः कोलन व स्तनाचा कर्करोग,) पॅरासिनाईडस्, या प्रकारचे तांदूळ एक वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग देतात. सुरकुत्या कमी होतात.

       लाल तांदुळ अतिशय पौष्टिक आहे, खुप सहज पचते, व शरिरावर भार टाकत नाही.हा तांदूळ मधुमेह रुग्णांना खूपच फायदेशीर आहे. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कोलायटिस असलेल्या व्यक्तीला फायदेशीर आहे. कारण हा पचायला हलका आहार आहे..


               


  लाल तांदळात कोलेस्टेरॉल कमी करण्याचि क्षमता आहे,. तसेच फायबर अधिक प्रमाणात असते त्यामुळे स्थूलता कमी होते, वजन नियंत्रणात राहते, व भात खाल्ल्याचे समाधान मिळतं., पोटातली जळजळ कमी होते, अॅसिडिटि समूळ नष्ट होते. यात असलेल्या.. cardiovascular diseasesचा धोका कमी होतो...serotonin आणि लाल रक्त पेशिंच्या वाढिसाठि आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी६ यात असतं. Dnaच्या निर्मितीसाठी मदत होते..

       हार्मोन्स असंतुलन दूर होतं, उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो, बाळंतिणीला दूध येतं याच्या सेवनाने.

मुत्रपिंडाचा विकार असणाऱ्यांनी लाल तांदळाचा भात नियमित पणे घेतल्यास आराम मिळतो.वर नमूद केल्याप्रमाणे हे धान्य खरोखरच बी व्हिटामिन चे स्टोअरहाउस आहे. तेव्हा हा तांदूळ जरी दिसायला फारसा चांगला नसला तरी गुणधर्म बघता, तुम्ही रोज तुमच्या आहारात समावेश करावा. व निरोगी राहावे...


 सुनिता सहस्रबुदे.

व्यायाम व्यायाम हे, आनंद का नाम है

 *😨😱🥱 अदभुत.........अद्भुत ऐसी रंगोली जो इंसान के तन से बनी हो ऐसी रंगोली आपने कभी नहीं देखी होगी पूरी वीडियो देखें और आनंद लें.......👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻*


अस्वस्थ करणारे गॅसेस आणि आयुर्वेद उपचार

 अस्वस्थ करणारे गॅसेस आणि आयुर्वेद उपचार

डॉ. आनंद ओक 

पोट जाड वाटू लागणे, पोटाचा आकार वाढणे, पोट गच्च होणे, किंवा तडस लागल्याप्रमाणे चढणीला लागणे, ढेकर येणे, गुद्द्वारावारे गॅस सरकणे सामान्यपणे वरील तक्रारी कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकास जाणवतातच. काहींना पोटात दुखते, छातीत दुखते, श्‍वास घेण्यास त्रास वाटतो, अस्वस्थ वाटू लागते. काय आहे हा त्रास? क्षु ल्लक स्वरूपाचे असूनही वारंवार उद्भवल्यास मात्र माणसाचे स्वास्थ पूर्णपणे बिघडवू शकतात. अशा तक्रारीपैंकी एक तक्रार म्हणजे पोटातील गॅसेस! ‘पोटात वायू धरणे’ असेही संबोधन यास वापरले जाते.


प्रत्येकाला कधी ना कधी तरी ही तक्रार झालेली असते. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरी उपचार करावे लागतातच असेही नाही. तरी देखील चौघात बसणे अशक्य करणार्‍या, मनस्वास्थ्य बिघडविणार्‍या या तक्रारीची शास्त्रीय माहिती प्रत्येकास असणे महत्त्वाचे वाटते. गॅसेस उत्पन्‍न होण्याची कारणे ः वास्तविक अन्‍नाचे पचन होत असताना अल्प प्रमाणात गॅस प्रत्येकातच उत्पन्‍न होत असतात; पण पचन क्रिया व्यवस्थित असल्यास ते आपोआप जीरूनही जातात. परंतु, पाचक शक्‍ती म्हणजेच पाचकस्रावांचे प्रमाण कमी असल्यास किंवा आतड्याच्या हालचालीस कोणत्याही कारणाने बाधा आल्यास गॅसेसचा त्रास सुरू होतो. पोटातील विविध अवयवांच्या वेगवेगळ्या आजारांमुळे पाचकरस व जठराची आतड्यांची हालचाल बिघडत असते. व गॅसेस उत्पन्‍न होत असतात. 


जठराचा दाह/सूज (गॅस्टायटीस) आतड्याचा दाह (कोलायटीस), अमिबियासीस, पित्त वाढणे हे विकार सामान्यपणे गॅसेसचा त्रास उत्पन्‍न करतात तर काही वेळा पित्तशयाची सूज, पित्तशयातील खडा, मूतखडा हे विकारही गॅसेस उत्पन्‍न करतात. बद्धकोष्ठता किंवा संडास साफ न होणे यामुळे गॅसेस वाढतात. वार्धक्यामुळे आतड्यांची शक्‍ती कमी झाल्याने हालचाल मंद असते. त्यामुळे गॅसेस उत्पन्‍न होतात. लहान बालकात आतड्याची शक्‍ती पुरेशी वाढलेली नसल्यामुळे गॅसेसचा त्रास होतो. 


वरील कारणांबरोबरच गॅसेस उत्पन्‍न करणारे पदार्थ जास्त किंवा वारंवार खाण्यात आल्याने गॅसेस होतात. तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे, कोणताही व्यायाम न करणे व सतत खाणे यामुळे गॅसेस उत्पन्‍न होतात. काही रुग्णांत मानसिक ताण काढल्यानंतर गॅसेसचा त्रास वाढल्याचेही वाढल्याचेही आढळते. अचानक झालेला पिण्याच्या पाण्यातील बदल अथवा अशुध्द पाणी पिण्यात आल्यानेही गॅसेसचा त्रास होतो. 

गॅसेस जास्त वाढविणारे पदार्थ ः बटाटा, शाबुदाणा, अंडी, मांसाहार, अतिप्रमाणात भात, पुरणपोळी, इडली, ढोकळा, उत्ताप्पा, भेळ, ब्रेड, उसळी, (कडधान्ये), इत्यादी पदार्थ गॅसेसचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. तसेच अतिप्रमाणात वारंवार काहीही खात राहणे व व्यायाम व फिरणे न करणे यामुळे सर्वच पदार्थांनी गॅसेस वाढतात. यामुळेच गॅसेसचा त्रास असणार्‍यांनी वरील पदार्थ नेेहमी टाळणे महत्त्वाचे असते.


4) गॅसेसची लक्षणे ः 


पोट जाड वाटू लागणे, पोटाचा आकार वाढणे, पोट गच्च होणे, किंवा तडस लागल्याप्रमाणे चढणीला लागणे, ढेकर येणे, तेवढ्यापुरते बरे वाटणे, गुद्द्वारावारे गॅस सरकणे सामान्यपणे वरील तक्रारी कमी अधिक प्रमाणात प्रत्येकास जाणवतातच. काहींना मात्र पोटात दुखू लागते, छातीत दुखते, श्‍वास घेण्यास त्रास वाटतो, छातीत चमका येतात, अस्वस्थ वाटू लागते. दरम्यान हृदयविकारात अशीच लक्षणे उत्पन्‍न होत असल्याचे पाहीलेले किंवा वाचलेले, ऐकलेले असते. त्यामुळे “हे हार्टचे दुखणे तर नाही ना?” अशी शंका मनात उत्पन्‍न होते. आणि एकदा अशी शंका उत्पन्‍न झाल्यावर “चिंते” मुळे छातीत धडधडू लागते. श्‍वास घेण्यास घेण्यास अधिकच त्रास वाटू लागतो, घाम येतो. मग डॉक्टरकडे नेल्यावर इ सी जी काढला जातो; पण तो ‘पूर्णपणे’ नॉर्मल असल्याचे कळते. गॅसेसचे औषध घेतल्यावर झटक्यात बरे वाटते. पण ‘शुल्लक वाटणारे गॅसेलसचे दुखणे मनात “भीती” मात्र निर्माण ठेवते. काहीजणात पाठीत दुखणे, कंबर दुखणे, डोके दुखणे या तक्रारी जाणवतात. 


5) गॅसेसचे दुष्परिणाम ः 


जडत्व, कोणतेही काम नकोसे वाटणे, मरगळ, निरुत्साहीपणा, कार्यक्षमता कमी होणे, पचन कमी झाल्यामुळे पोषकांश कमी मिळतात. सततचे गॅसेस दुर्लक्षित राहिल्यास त्याचा तब्येतीवरही परिणाम होतो. 


6) गॅसेसवरील उपचार ः


गॅसेसचा त्रास सुरू झाल्यावर अनेकजण जाहिरातीमधून कळलेल्या विविध औषधे तात्पुरती घेत असतात. गॅसेस सरकवण्याची क्रिया या औषधांनी झाल्यामुळे तात्पुरता आरामही मिळतो. पण “आपल्याला गॅसेस कोणत्या कारणांनी उत्पन्न होत आहेत? हे कळणे महत्त्वाचे असते. ते कारण दूर होणे गरजेचे असते. त्यामुळे गॅसेसचा त्रास झाल्यावर तज्ज्ञ डॉक्टरला दाखवून या कारणांचा शोध घेऊन त्या कारणाबरहूकूम उपचार करावे लागतात. 


वनस्पती औषधांपैकी सुंठ, मिरी, पिंपळी, हिंग, शेंदेलोण, पांदेलोण, जिरे, लसून, चिंचाक्षार, यवक्षार, सज्जीक्षार, लिंबू रस, शंखभस्म इत्यादी घटकांच्या सुंयक्‍त कल्पाचा रुग्णाच्या प्रकृतीनुसार वापर केला जातो. गॅसेस कमी करणारी ही औषधे अग्‍निमांद्य दूर करून पचनशक्‍ती देखील वाढवितात. या उपचारांच्या जोडीलाच क्षार किंवा लवणयुक्‍त तीळ तैल रोज रात्री 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने पोटाला लावावे व लगेच 10 मिनिटे पोट शेकावे. यामुळे उत्तमप्रकारे वातशमन होते. तसेच पोटातील स्नायुंची शक्‍ती वाढून आतड्याची गती सुधारते. काही वेळा गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात असल्यास मात्र, बस्तीचाही उपयोग करावा लागतो. तसेच गॅसेसचे कारण म्हणून सांगितलेल्या मूळ विकारांचे म्हणजे आतड्याची सूज इत्यादींचे उत्तम उपचार आयुर्वेदिक औषधांनी होतात. त्यामुळे गॅसेसवरील उपचाराबरोबरच मूळ विकाराचे देखील आयुर्वेदिक उपचार घ्यावेत.



Saturday, 29 April 2023

संसारातील गोडी सखरेविना थोडी.

 *#चिमुटभर_गोडी* ....*


" भाजीत चिमूटभर साखर घाल गं म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते " 


 स्वयंपाक करताना आजी म्हणायची भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते 

 मला नवल वाटतं आजीवर्गाचं 

त्यांना बरोबर माहित असायचं कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते 

पूर्वी घरोघरी कर्ता पुरूष म्हणजे करारी ,थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा.


 कुणाचं कश्यावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ," हो हो बरोबर आहे तुमचं" म्हणून होणारा वाद टाळायची नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची . 


चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो असं म्हणायची. 

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही.


 सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल ,चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो असं आई पण म्हणायची . 

म्हणूनच त्यांचे संसार विना कलह झाले.


कामवाल्या बाई बाबतही असच तिने कधी दांडी मारली ,कधी उशीरा आली तरी ती पण एक संसारी बाई आहे ,आपल्यापेक्षा तिला आव्हानं असतात जास्त मग अश्यावेळेस 

 का गं आज उशीर झाला ? बरी आहेस ना ?काळजी घे गं बाई.


चल दोन घास खाऊन घे म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहिल 

थोडी माणूसकी खूप मोठं काम करते . 


थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात.


आजी नेहमी म्हणायची आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण . 


एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं.


आताची सतत 

अरे ला कारे 

करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं .


*ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.*


थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू शकतो .😊👍✌️

अल्पसंख्याकांसाठीच्या कर्ज योजनांची परतफेडप्रक्रिया

 अल्पसंख्याकांसाठीच्या कर्ज योजनांची परतफेडप्रक्रिया आता अधिक सुलभऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर.

            मुंबई, दि. 29 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत (NMDFC) कर्ज स्वरुपात व राज्य शासनामार्फत भागभांडवल स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळाच्या या योजनांमधील कर्ज परतफेडीसाठी आता ऑनलाईन सेवा विकसित करण्यात आली असून त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.


            महामंडळाच्या कर्ज वसुलीसाठी आतापर्यंत लाभार्थ्याकडून आगाऊ दिनांकित धनादेश घेण्यात येत होते. महामंडळामार्फत आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्टेट बँक कलेक्ट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड सहजरित्या व सुलभपणे करणे लाभार्थ्यांना शक्य झाले आहे. कुठूनही ऑनलाईन पध्दतीने कर्जाच्या हप्त्याची परतफेड करणे शक्य झाले आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्याची पावती देखील ऑनलाईन पध्दतीनेच त्वरित लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.


      महामंडळामार्फत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी State Bank Collect प्रणालीला प्राधान्य देऊन त्याद्वारेच कर्जाची परतफेड करण्यात यावी, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्याना केले आहे

1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार

  

1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार


                                                 -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. २९: राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

            सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत.


            रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले.


            ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


            सांस्कृतिक कार्य विभागाने प्रस्तावित केल्यानुसार भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत. त्यासाठी दिल्ली, दमण दिव, तंजावर, अंदमान, बेळगाव, बडोदा, श्रीशैलम, उदयपूर, भोपाळ, दार्जिलिंग, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, पानिपत, भुवनेश्वर, लडाख, विजयपुरा, पाटणा, अमृतसर, पणजी ही ठिकाणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.


            शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होऊन त्या घटनेचे महत्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जनांसाठी ही महत्वाची घटना आहे. यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने त्याचे आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.


            सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात येणार त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा कुठलीही अडचण येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सोहळ्याच्या दिवशी शिभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सोहळ्याच्या समग्र नियोजनासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गडावर संबंधित लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.




संगणक टंकलेखन लघुळेखं संचलन नियम


 

जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी.

 महसूल मंत्र्यांचा जिल्हाधिकारी-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद   जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी.                                                                           

                    महसूल  -मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

         मुंबईदि. 29: सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी.,  असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले.

         महसूल मंत्री श्री. विखे - पाटील यांनी व्हीडीओ कॉनफरन्सिंगद्वारेराज्यातील जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरआणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

          महसूल मंत्री श्री. विखे - पाटील म्हणाले कीराज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती/वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर केले आहे. हे धोरण राबवितान असताना जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना अडचणी येऊ शकतात. यासाठी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पाठिशी जिल्हाधिकारी यांनी ठामपणे उभे रहावे.

        वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्तीं नष्ट करणे याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. विखे- पाटील म्हणाले कीराज्य शासनाने जाहीर केलेल्या रेती/वाळू धोरणानुसार रेतीचे/ वाळूचे उत्खननसाठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाळू/ रेतीचे सर्वंकष धोरण असावे याबाबतची मागणी होती. या नवीन धोरणामुळे सर्वसामान्यांना वाळू/रेती सोप्या पध्दतीने खरेदी करता येणार आहे. शिवाय अनधिकृत पध्दतीने होणारे रेती/वाळूचे उत्खनन यावर आळा बसणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत रेती/ वाळू उपलब्ध व्हावीवाळूची अवैध वाहतूक रोखली जावी यावर राज्य शासनाने भर दिला आहे.

         पूर परिस्थिती धोका कमी करणे,नदीपात्रातील दिशा सरळ करणे कामी आवश्यक असलेली रेती /वाळू नदीपात्रातून काढणे यासाठी जलसंपदा विभागाची मदत घेऊन अशी कामे प्राधान्याने करणेबाबत निर्देश दिले. वैयक्तिक घर बांधकामासाठी ठराविक प्रमाणात वाळू उपलब्ध करून देणे,नवीन वाळू धोरण करताना सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी,  नागरिकांना कमीत कमी दरात वाळू उपलब्ध देण्याचा शासनाचा मानस आहे.मुबलक वाळू पुरवठा उपलब्ध केल्यास त्याचा सर्व सामान्यांना लाभ मिळणे, हा शासनाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
           या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच 600 रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे. या धोरणानुसार स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इत्यादी खर्च देखील आकारण्यात येतील. वाळूचे उत्खननउत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूकडेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथूनच या रेतीची विक्री करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

         नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करूनत्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारीपोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तअपर जिल्हाधिकारीअधीक्षक अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारीभू-विज्ञान व खनिकर्म विभागभूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईलयाची दक्षता घेईल. विकास कामांसाठी वाळू उपलब्ध करण्याबरोबरच आजुबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये, म्हणून वाळूचे उत्खनन केले जाते. राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा बसणार आहे, असेही मंत्री श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

 

 

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे

 शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.*




ताकात विटामिन ” B 12 ”, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.



ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया ....

१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. 

३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. 

४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. 

५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

६) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. 

७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. 

८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. 

9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.

१०) महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. 


ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्ने

ही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




.it is just amazing पक्षी ही सुस्वरे गातसी

 *The world class Ornithologists and Photographers are ready to shoot and record the wonder of Singing Bird.


.it is just amazing*...... 👏👏👏👏👏

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत

 महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


 


मुंबई, दि. 29: मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून 25 टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. 


महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातफे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल. 


 


यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसमधून 50 टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी आशा आहे.


कोणाला सवलत मिळेल?


ही सुविधा 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, इयत्ता 12 वीपर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या 3 श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन), सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत. 


या सर्व सवलती मेट्रो लाइन 2 ए आणि 7 च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्रे दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला 30 दिवसांची वैधता राहील. मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.

0000

केस गळती*

 *केस गळती*


1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही Hair Loss थांबवण्यासाठी केसांची निगा संपूर्ण घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी आणखी काय करता येईल ते पुढे पाहू. 


2) मक्याचे तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याचा रस किंवा जास्वंदीची पाने उपलब्ध असल्यास त्यांचा रस मिक्स करून केसांना मालीश करावी. 


3) आवळा, कोथंबीर आणि लिंबू यांचे मिश्रण केसांना लावा. थोडयावेळाने केस धुवून घ्या. केस मजबूत होतील आणि तुटणार नाहीत. 


4) बदाम खालल्याने केसांना आवश्यक असणारे विटामिन्स मिळतात. 


5) केसांना डाय करणे, कलर लावणे, प्रेस करणे किंवा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहचेल अश्या गोष्टी करणे टाळा. 


6) पौष्टिक आणि योग्य आहार, व्यायाम, केसांना तेल लावणे, पाणी भरपूर प्यावे. 


7) वाईट व्यसनाच्या पासून दूर रहावे. 


8) Hair Loss Problem होण्यासाठी अनेक कारणे असतात त्यामध्येच एक Vitamin D ची कमतरता हे देखील एक कारण असू शकते. जसे इतर पोषक घटक केसांचे आरोग्य वाढवतात तसेच Vitamin D हे देखील केसांचे आरोग्य वाढवते. Vitamin D हे एक निशुल्क असा घटक आहे. Vitamin D केसांच्या वाढीसाठी मदत करतो. Vitamin D स्वताहून Iron and Calcium शोषून घेतो. Iron ची कमतरता पण Hair Loss होण्याचे कारण असते. तुम्ही दिवसातील १५ मिनिट सूर्यप्रकाशात राहिलात तरी तुमची त्यादिवाशाची Vitamin D ची आवश्यकता पूर्ण होते. सूर्यकिरण घेत असताना सकाळचे किंवा संध्याकाळचे सूर्यकिरण अंगावर घ्या प्रखर सूर्यकिरण त्वचेला अपाय करू शकतो हे पण लक्षात ठेवा. 


9) बरेचसे लोक असंतुलित खानपानाच्या सवयी मुळे Hair Loss Problem मध्ये फसतात. केवळ पौष्टिक आहार घेऊन Hair Loss Problem पासून दूर राहता येत नाही



*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_

मॉरिशसमधील उद्योजकांपुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली महाराष्ट्राची बलस्थानं

 मॉरिशसमधील उद्योजकांपुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली महाराष्ट्राची बलस्थानं


उद्योगात गुंतवणूक वाढविण्यासाठी ईडीबी-एमआयडीसी यांच्यात सामंजस्य करार


            मोका (मॉरिशस), 28 : इंडो-मॉरिशस बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मॉरिशसमधील उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची बलस्थानं सांगत त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी एक व्यासपीठ स्थापन करण्यात येणार असून यासाठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड, मॉरिशस (ईडीबी) आणि एमआयडीसी यांच्यात आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.


            महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी सहकार्य वाढविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, यासाठी यंत्रणा विकसित करणे, संस्थागत संबंध वाढविणे, क्षमता निर्माणाचे कार्य करणे आणि आर्थिक संबंधांना चालना देणे, हे उद्देश या सामंजस्य करारातून साध्य केले जाणार आहेत. मॉरिशसचे अर्थमंत्री डॉ.रेनगॅनाडेन पदयाची, परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, माहिती-तंत्रज्ञान मंत्री दीपक बालगोबिन तसेच भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला तसेच मॉरिशसमधील उद्योजक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ॲलन गानू यांनी येथे निमंत्रित करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार मानत देवेंद्र फडणवीस यांनी आजचा दिवस हा महाराष्ट्र-मॉरिशस यांच्या मैत्री संबंधातील ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले.


            महाराष्ट्र हे भारतातील एक अग्रेसर राज्य आहे. भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 25% आहे, देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 28% महाराष्ट्रात येते, औद्योगिक उत्पादनात वाटा 20% आहे. कोविड काळाचा अपवाद सोडला तर महाराष्ट्राचा सीएजीआर (कंपाऊंड ॲन्यूअल ग्रोथ रेट) हा सातत्याने 10% आहे. महाराष्ट्राची 57% लोकसंख्या ही 27 पेक्षा कमी वयाची आहे. सर्वाधिक विद्यापीठे महाराष्ट्रात आहेत. सर्वाधिक वीजनिर्मिती आणि वीजवापर महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राची डेटा क्षमता 65% आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी आहे. 80,000 पैकी 15,000 स्टार्ट अप आणि 100 पैकी 25 युनिफॉर्न हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र हे देशाची व्याघ्र राजधानी सुद्धा आहे आणि 700 किमीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            राज्य सरकार इज ऑफ डूइंग बिझनेस आणि कॉस्ट ऑफ डूइंग बिझनेस यावर सातत्याने काम करते आहे. आज जो सामंजस्य करार करण्यात आला, त्यामुळे मॉरिशस मधील उद्योजकांना एक मोठे दालन खुले होणार आहे. 'स्पीड ऑफ ट्रॅव्हल' आणि 'स्पीड ऑफ डेटा' हे महाराष्ट्राचे वैशिष्ट आहे. महाराष्ट्रात एकाहून एक पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू आहे आणि दुसरीकडे फायबरच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत इंटरनेट पोहोचविले जात आहे. आता त्याला 5-जी तंत्रज्ञानाची जोड प्राप्त होईल. आजचा करार हा महाराष्ट्र-मॉरिशस विकासाचा मानबिंदू ठरेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम राज्यांनी इतर देशांशी संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी आग्रही असतात. भारत हा राज्यांमध्ये वास्तव्य करतो, हीच त्यामागची त्यांची भावना आहे. आज जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य हीच वसुधैव कुटुंबकम् ची भावना घेऊन त्यांच्या नेतृत्वात भारत पुढे चालला आहे. कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर सुद्धा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम राखला आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.


००००

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला इकॉनॉमिक टाइम्स 'कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्' सोहळा

 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला इकॉनॉमिक टाइम्स 'कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्' सोहळा


पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


            मुंबई, दि. २८: राज्यात सध्या बुलेट ट्रेन, शिवडी न्हावाशेवा सी-लिंक, कोस्टल रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक अशी अनेक पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईत येत्या काही वर्षात मेट्रो मार्ग तयार होत असून देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे सांगत उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये इकॉनॉमिक टाइम्सच्या वतीने 'कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्' सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुखलाल मांडवीय, जी २० चे मुख्य शेर्पा अमिताभ कांत, बेनेट अँड कोलमन कंपनीचे संचालक विनीत जैन, इकॉनॉमिक टाईम्सचे मुख्य संपादक बोधिसत्व गांगुली, केंद्रीय वित्तसचिव टी. व्ही. सोमनाथन, यांच्यासह उद्योगपती, उद्योजक आणि उद्योग समूहांचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


            कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डस् च्या माध्यमातून इकॉनॉमिक टाइम्सने उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पायाभूत सुविधांचे जाळे मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असल्याने उद्योजकांचे महाराष्ट्र हे आवडते डेस्टीनेशन आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या विकास कामांना आम्ही गती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अनेक विकास कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.


            राज्यातील रखडलेली विकास कामे पुन्हा गतिमानपणे सुरू झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले, असे सांगत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्याच्या विकासाला निश्चित दिशा देण्यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर 'मित्रा'ची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ५ ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी बनवण्याचे स्वप्न पाहिले असून त्यात महाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलर्सची भर टाकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी राज्यातील उद्योजकांची साथ आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता राज्यात असून त्यामुळे या राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. यावेळी राज्याला उद्योग क्षेत्रात नवीन उंची मिळवून देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या सोहळ्यात पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

निरोगी रहा

 हे काही नियम पाळा निरोगी रहा.

१)रोज ४०शी नंतर पाण्यात गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्या.

२)दिवसात कमीत कमी तीन लिटर पाणी घ्या.

३)भोजनाची वेळ पाळा.

४)चौरस आहार घ्या.जिभेचे चोचले टाळा,जाऊ तिथे खाऊ धोरण टाळा.

५)जेवणा पुर्वी अर्धातास व जेवणानंतर एक तासाने पाणी प्या.

६)रोज तुळस,बेल,कडुलिंबाची पाच पाच पाने कुटून गोळी गिळा.

७)जंकफूड, पाव,चहा ,बेकरी आयटम कमी खा.

८)रोज त्रिफळा सकाळी दुधा बरोबर पुरक व रात्री गरम पाण्या बरोबर रेचक म्हणून घ्या.

९)सकाळी उठल्या वर थोडे पाणी घेऊन तोडातली पहीली लाळ गुळण्या करुन प्या अँसिडीटी कमी होईल.

१०)सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना गरमपाणी घ्या.

११)महीन्यातून एकदा ऐरंडेल घ्या कोठा म ऊ होतो.

१२)जेवणात मेथीचा प्रयोग करा,सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे चाऊन खा.

१३)महीन्यातून एकदा तरी लंघन उपवास करा हलके अन्न खा.

१४)प्राणायाम, योगा,चालणे कमीत कमी ४५मिनिटे करा.

१५)मन एखाद्या ठिकाणी एकाग्र करा.

१६)संगीताचा शरीरावर पुर्ण पाँझिटिव्ह इफेक्ट होत असल्याने सकाळी इनस्ट्रुमेंन्टल धून ऐकत जा.

स्वतः ला तणाव विरहित ठेवा.

आणि आनंदी जगा.

   ..आणि हो मोबाईलच्या आहारी जाऊन जागरण करू नका.

 पहा पटतंय का मंडळी.

ता.क.दुपारी बिलकुल झोपू नका .डायबेटीस चा धोका वाढतो


वैद्य.गजानन


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*

 *मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*


*केळी* - कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. (मुलांना सतत कफ व सर्दी च्या तक्रारी नसल्यास)


*साय असलेले दूध* - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.


*भात -* यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चिकू* - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.


*मासे* - यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.


*सोयाबीन* - सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.


*डाळ* - यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चीज* - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.


*अंडी*- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.


*दही* - यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.


*संत्री* - यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.


*डाळिंब* - यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.


*पालक* - यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.


*पनीर* - यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी

 महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी

     -ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर.

            मुंबई, दि. 28: महाराष्ट्र देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरोवोद्गार ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले.


            महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. राज्याच्या जडणघडणीचा हा प्रवास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्याकडून 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या पुढील समाज माध्यमांच्या लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

            महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हा कार्यक्रम पाहता येतील.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR   


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.

co/MAHARASHTRADGIPR


महाराष्ट्र दिनी माहीम, शिवाजी पार्क, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध

 महाराष्ट्र दिनी माहीम, शिवाजी पार्क, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध


          मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर दि. ०१ मे २०२३ रोजी माहीम, शिवाजी पार्क आणि वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाण क्रियांना प्रतिबंध असल्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी काढले आहे.


            या परेड समारंभाच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उत्सवासाठी एकत्र येणे अपेक्षित आहे. त्याकरिता शिवाजी पार्क परिसरातील अवांछित कारवाया रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश ०१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 


00000

दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रीमंडळ व इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती

 दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रीमंडळ व इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती.

            मुंबई, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’या कार्यक्रमात मंत्रीमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.


            सहायक संचालक सागरकुमार कांबळे आणि निवेदक रिताली तपासे यांनी मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.


000

येवला आणि सिन्नर येथे दिवाणी न्यायालय;अधिसूचना जारी

 येवला आणि सिन्नर येथे दिवाणी न्यायालय;अधिसूचना जारी.

            मुंबई दि. २८ : दिवाणी न्यायालयीन अधिनियमानुसार नाशिक जिल्ह्यातील येवला आणि सिन्नर येथे दिवाणी न्यायालय सुरू करण्याबाबतची अधिसूचना विधि व न्याय विभागाने जारी केली आहे.


            येवला आणि सिन्नर येथील दिवाणी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश हे या न्यायालयाचे पीठासीन अधिकारी असतील. येवला आणि सिन्नर या न्यायालयाच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या सीमा या संबंधित महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रांशी समव्यापी व समाविष्ट असतील असे या अधिसूचनेत नमुद केले

 आहे.


.रूग्णालयात रूग्णांना अद्ययावत सुविधा पुरवाव्या

 .जे.रूग्णालयात रूग्णांना अद्ययावत सुविधा पुरवाव्यात

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६२ तक्रारींचे निराकरण

       मुंबई,दि.२८ : जे.जे. रूग्णालयातील रूग्णांना अद्ययावत सुविधा देण्यात याव्यात तसेच खाटांची संख्या वाढवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.


             पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १५८४ तक्रारी दाखल झाल्या असून, १६२ तक्रारींचे तत्काळ निराकरण मंत्री श्री. लोढा यांनी केले.       


           मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील ई वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ १ च्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त अजयकुमार यादव यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.      


          या परिसरातील ना.म.जोशी मार्गावर सौंदर्यीकरण करावे, स्थानिकांचे निवृत्ती वेतन तत्काळ सुरू करण्यात यावे, संजय गांधी निराधार योजनेचे नव्याने आलेले अर्ज तपासून घेवून मानधन देण्याची कार्यवाही करावी, अशा विविध तक्रारींची दखल घेऊन तत्काळ निराकरण करण्यात आले. 


            दरम्यान महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच या ठिकाणी बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.      


         एफ दक्षिण वॉर्ड येथील स्थानिक महिलांना समस्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) अंतर्गत ३१ मे पर्यंत दुपारी ३ ते ५.३० या वेळेत https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर अर्ज दाखल करावेत.

ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठीत

 ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठीत


९ मे पर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन.

            मुंबई, दि.२८ : केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याविचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.


            नागरिकांची मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार करण्यात येणार आहे. तरी या बाबत नागरिकांनी dycommr.enf1@gmail.com या ई-मेलवर दिनांक ९ मे २०२३ पर्यंत अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन राज्याच्या परिवहन आयुक्त, यांनी केले आहे.


            या विषयी अधिक माहितीसाठी कैलास कोठावदे, सहाय्यक परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. (मो. ९५५२८८३९३०/ ई-मेल- dycommt.enf1@gmail.com) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यांची लिंक अशी आहे. https://morth.nic.in/sites/default/files/notificationsdocument/Motor%20 Vehicle%20Aggregators 27112020150046.pdf

Friday, 28 April 2023

उन्हाळ्यात नियमित ताक प्या, आरोग्य सुधारा.....*

 *उन्हाळ्यात नियमित ताक प्या, आरोग्य सुधारा.....*


सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. या ऋतूमध्ये ताक, शहाळे, सरबत पिणे खूप महत्त्वाचे आहे. दही हे अत्यंत गुणकारी आहेच. त्यात दही थोडे पाणी घालून घुसळून त्याचे ताक केले असता ते जास्त गुणकारी आहे.


आयुर्वेदात ताकाचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. शरीराची पचन व्यवस्था स्वच्छ करणारे गुणधर्म असतात. जेवण झाल्यानंतर मीठ घातलेले ग्लासभर ताक पिण्याने अन्न पचण्यास खूप मदत होते. 


लोणी काढून झाल्यावर खाली राहणारे ताक हे अत्यंत गुणकारी, पाचक रस वाढवणारे आहे. लोणी न काढता केलेले ताक हे पौष्टिक आहे. परंतु ते पचण्यास जड व कफकारक आहे.


*ताक पिण्याचे फायदे...*


*१. ताकात सुंठ, काळी मिरी आणि पिप्पली घालून सेवन केले असता कफ दोष कमी होतो.


*२. नियमित ताक पिण्याने आपल्या शरीराची पचन शक्ति सुधारते. मूळव्याध, बद्धकोष्टता कमी होते. आयुर्वेदात मुळव्याधीवर नियमित ताक पिणे हा घरगुती उपाय सांगितला आहे.


*३. लघवी करताना वेदना होत असतील तर ताजे व पातळ ताक प्यावे. 


*४. गोड ताक हे पित्तशामक असते. गोड ताकामध्ये साखर घालून ते पिण्यामुळे पित्त कमी होते.


*५. वात दोष असल्यास अदमुरे ताक सुंठ व सैंधव घालून प्यावे.


दुपारचे जेवण झाल्यानंतर पिलेले ताक सर्वाधिक गुणकारी आहे. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी ताक घेऊ शकता. तेदेखील प्रकृतीस उत्तम आहे.


*ताक पिताना पुढील काळजी घ्यावी...*

पावसाळ्यात जास्त ताक पिऊ नये. तसेच खूप आंबट झालेले ताक पिऊ नये.


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


पोस्ट save करून ठेवा-4 महिने उन्हाळ्यात थंड पेय प्रमाणात सेवन करा* 29सरबत

 🛑 *उन्हाळ्या साठी थंड व शरीराला उपयुक्त असे 29 पेय*🛑


*पोस्ट save करून ठेवा-4 महिने उन्हाळ्यात थंड पेय प्रमाणात सेवन करा*


https://chat.whatsapp.com/F59rIS69C1LJUWbtWQF07I


*१) लाजामण्ड*


म्हणजे लाह्यांचे पाणी. साळीच्या लाह्या उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवून नंतर कुस्करून गाळून त्या पाण्यात चवीपुरते मीठ आणि साखर घालून प्यावे. हे पाणी तहान घालविणारे, भूक वाढविणारे, पचण्यास अगदी हलके, शरीराचे पोषण करणारे, साम्य टिकवून ठेवणारे, सर्व ऋतुंमध्ये पिण्यास उत्तम, शरीराची आग, ताप, चक्कर येणे यांवर प्रभावी आणि विशेष म्हणजे लहान मुले, म्हातारे लोक, स्त्रिया, नाजूक व्यक्तींसाठी जास्त चांगले.


*२) धन्याचे पेय*


थंड पाण्यात धनेपूड, कापूर, लवंग, वेलची, मिरे आणि साखर घालून ते ढवळून प्यावे. ते पित्त कमी करणारे, जिभेला चव देणारे असते.


*३) मनुकांचे पेय*


 मनुका गरम पाण्यात भिजवून, काही काळ ठेवून नंतर कुस्करून गाळून ते पाणी प्यावे. ते थकवा घालविणारे, तहान, चक्कर, शरीराची आग कमी करणारे पण पचायला जड असते.


*४) खर्जूरादि मंथ*


 खजूर, डाळिंब, मनुका, चिंच, आवळा, फालसा हे सर्व पाण्यात एकत्र भिजत ठेवून थोड्या वेळाने रवीने घुसळून, गाळून प्यावे. गोड- आंबट चवीचे, अतिमद्यपानाने होणारे त्रास, शरीराची आग इ. साठी उपयुक्त, शरीराला पोषक, ताकद देणारे होय.


*५) पियुष*


साहित्य :-

सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस ,दहा चमचे साखर ,छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.

कृती :-

दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.

लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्‍याच वेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.


*६) फळांचे सरबत*

 

साहित्य:-

१ अननस , २ संत्री, २ मोसंबी, २ निंबू

कृती:- 

सर्वांचा रस काढून मोजावा. रसाच्या दीडपट साखर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पाक करून घ्यावा. थंड झाल्यावर वरील रस बॉटल मध्ये भरावा. तो १५ ते २० दिवस सहज टिकतो. आयते वेळी थंड पाण्यात घालून सरबत घेता येते, त्यात किंचित मीठ घातले तरी चालेल.


*७) खस सरबत*


साखर व पाणी एकत्रित करून गरम करा त्यास चांगली उकळी येऊ द्या, थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात खस इंसेस व रंग घाला पाहिजे तेव्हा थंड पाण्यात सरबत घालून प्या.


*८) अननसाची लस्सी*


साहित्य :- 

ताक किंवा दही, अननसाचे तुकडे, विलाईचि पूड. किंचित साखर

कृती :- 

अननसाचा रस काढून सर्व एकत्रित करून मिक्सर काढा,त्यात बर्फ घालून ग्लास मध्ये लस्सी द्या, त्याला छान सुगंध येतो .


*९) चिंचेचे सरबत*


वाळलेली चिंच घ्यावी त्यांतील चिंचोके काढून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी. काही वेळाने चिंच कुस्करून घ्यावी व चिंच काढून घ्यावी.चिंचेच्या पाण्यात साखर,मीठ, सोप व जिरे पूड टाकावी व बर्फ टाकून पिण्यास द्यावे.


*१०) टोमाटो व काकडी*


साहित्य -: 

तीन कप टोमाटोचा ज्यूस दन चमचे लिंबाचा रस,दोन लवंगा एक दालचिनी काडी, एक लहान कांदा किसून, अर्धा कप काकडीचा कीस, चवीपुरते मीठ, तीन चमचे साखर व बर्फाचे क्युब्ज .

कृती -: 

कांदा व काकडी किसून घ्यावी, व्र्फ सोडून सर्व घटक पदार्थ एकत्र करून फ्रीज मध्ये एकतास भर ठेवावेंन्त्र गाळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून प्रत्येक ग्लासात घालून बर्फाचा क्युब्ज धालाव्यात व हे मिश्रण ओतावे.


*११) कलिंगडचे सरबत*


साहित्य -: 

एक कलिंगड, चवीपुरते मीठ, दालचिनी/ मिरपूड , साखर एका लिंबाचा रस.

कृती -: 

कलिंगड कापून त्याच्या लालबुंद मधल्या भागातील गर स्कुपने( गोल आकाराचा चमचा आईस्क्रीम काढण्याचा ) काढून ते गोळे एका बाउल मध्ये घालून फ्रीज मध्ये ठेवावे. आणि मग उरलेल्या कलिंगडचा लाल भाग अगदी बारीक चिरून त्याच्या बिया काढून त्याचा रस काढून तो गाळून घ्यावा. त्यात मीठ,साखर, दालचिनी पूड किंवा मिरपूड,लिंबाचा रस घालून तासभर फ्रीज मध्ये ठेऊन थंड करावे.सर्व्ह करतेवेळी प्रत्येक ग्लासात थंड सरबत काढून ठेवलेल्या कलिंगड च्या तुकड्यातील एक दोन तुकडे त्या सरबतात घालून प्यायला द्यावे. या सरबतात बर्फ क्यूब्ज घालू नये.


*१२) सफरचंदा चे पेय*


साहित्य -: 

२५० ग्राम सफरचंद चवी पुरती साखर, एक लिंबू, मीठ.

कृती -:  

स्वच्छ धुवून साला सकट बारीक चिरून घ्यावी. साखरेवर लिंबाची साल किसून घ्यावी. व ती सफरचंदात मिसळावी. तीन कप उकळीचे पाणी त्यातओतावे व झाकण घालून ठेवावे. थंड झाल्यावर गाळून घ्यावे.चवी पुरती साखर घालावी. मीठ रुची प्रमाणे घालावे किंवा नाही घातले तरी चालेल. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून बर्फ घालून लहान लहान ग्लासातून सर्व्ह करावे.


*१३) जिंजरेल*


साहित्य-: 

एक किलो प्रत्येकी बेताच्या आकाराचा एक कप आल्याचा रस व लिंबाचा रस त्याच कपाने मोजून चार कप पाणी .

कृती -: 

साखर व पाणी एकत्रित करून साखर पाण्यात चांगली मिसळू द्यावी. ते पानी पाच ते सात मिनिटे उकळावे. गार झाल्यावर आल्याचा रस व लिंबाचा रस गाळून व्यवस्थित मिसळावा. हे टिकाऊ करण्यासाठी दोन चमचे पाण्यात अर्धा चमचा पोट्यशियम मेटाबाय सल्फाईड गाळून ते मिश्रण त्या रसात मिसळावे. सर्व्ह करताना उंच ग्लासमध्ये दोन चमचे करड बर्फ व थोडा जिंजरेल सोडा किंवा पाणी गाळून द्यावे.


*१४) कोरफड रस*


कोरफड रस चवीला तुरट असली तरी, या रसात डिहाइड्रेशन यासारख्या समस्यांना प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते. आपल्या शरीराला थंडावा देण्याव्यतिरिक्त कोरफड रस हा आपल्या त्वचेचा ग्लो कायम राखण्यास मदत करतो. कोरफडाच्या पानांचा गर काढताना, त्यावरील पिवळ्या रंगाचा थर काढुन टाका कारण यामुळे कोरफड रस हा कडवट होण्याची शक्यता असते. कोरफडचा पांढरा गर काढून घेतल्यावर, त्याला मिक्सरमध्ये चांगल्यापद्धतीने वाटुन घ्यावा. आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार चाट मसाला किंवा मीठ घालावे.


*१५) दही शेक*


दहीमध्ये मीठ, जिरा पावडर आणि चवीनुसार हिंग घालून ब्लेंडरमध्ये चांगल्या पद्धतीने ब्लेंड करुन घ्या. नंतर यामध्ये बर्फ घालून या थंडगार पेयाचा आस्वाद घ्या. या दही शेकमुळे आपल्या पोटातील आग आणि पित्त दूर होते.


*१६) अमरबेल सरबत*


अमरबेलाच सरबत उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देतो. सगळ्यात आधी अमरबेल मधील साऱ्या बिया काढून त्याला मिक्सरमध्ये चांगल्या पद्धतीने वाटून घ्या. त्यानंतर या ज्युसला चांगल्या पद्धतीने फिल्टर करुन घेऊन त्यामध्ये चाट मसाला घालून, अमरबेल पेयाचा आस्वाद घेण्यास तयार आहे.


*१७) पुदिना सरबत*


पुदिन्याच सरबत हे ऊन्हाळ्यात आपल्या शरीराला डिहाइड्रेशन आणि लू पासुन वाचवतो, हे सरबत बनवताना सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पुदीना, साखर, मध, काळ मीठ,

मिरपूड आणि जीरा पावडर घालून चांगल्या पद्धतीने वाटुन घ्या. या तयार झालेल्या पेस्टला कमी मात्रा असलेल्या पाण्यात मिक्स करुन पुदिना पेयाचा आस्वाद घेण्यास तयार आहे.


*१८) जलजीरा*


साहित्य-

१ टेबलस्पून भाजलेल्या जिर्‍याची पावडर

अर्धा टेबलस्पून पुदिन्याची पेस्ट

अर्धा टेबलस्पून कोथिंबीरीची पेस्ट 

१ टीस्पून आमचूर पावडर

अर्धा टीस्पून काळं मीठ

अर्धा टीस्पून साखर

अर्ध्या लिंबाचा रस 

१ ग्लास थंड पाणी

चवीपुरते मीठ

कृती :

गार पाण्यात सारे साहित्य एकत्र करून घ्या.त्यानंतर मिश्रण ढवळून घ्या.सजावटीसाठी त्यात थोडी कोथिंबीर व पुदीना टाका.गारेगार जलजीराचा आस्वाद घ्या.


*१९) पंजाबी लस्सी*


साहित्य:-

ताजे घट्ट दही – २ १/२ कपसाखर १/२ कपबर्फाचे तुकडे गरजेनुसारदूध – १/२ कपताजे दूधक्रीम २ चम्मचविलायची व सुका मेवा

कृती:-

-दही आणि साखर चांगल्या प्रकारे मिळवून घ्या.

-मिक्सरच्या पॉट मध्ये हे मिश्रण टाकून त्यात बर्फाचे तुकडे टाका.

-त्यात दुध व दुधक्रीम टाका.

-विलायची बारीक करून टाका

-मिक्सर फिटवून मिश्रण एकजीव होऊ द्या.

-ग्लास मध्ये काढून त्यावर दुधाचे क्रीम व सुका मेवा बारीक करून टाका. थंड लस्सी तयार आहे.

टिप्स:-

दही व दूध ताजे असावे.लस्सी बनविताना ताजे पदार्थच वापरावे.दही व इतर पदार्थ चांगल्याप्रकारे मिळविण्यासाठी मिक्सरचा वापर करावा.घट्टपणा कमी करण्यासाठी जास्त बर्फ किंवा पाणी घाला.लस्सीमध्ये केसराचा वापर अधिक स्वाद व रंगासाठी करता येतो.लस्सीमध्ये वाटेल तितके दूध क्रीम टाका.दूधक्रीम चांगल्या प्रतीचे व त्यास फेटू नये.


*२०) कैरीचे पन्हे प्रकार १*


साहित्य :

५०० ग्रॅम कैऱ्या

साखर

१ चमचा मीठ

कृती :

कैरीची साले काढून त्या अख्ख्या किंवा फोडी करून स्टीलचा भांड्यातून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर कैरीचा गर व साखर मिक्सरमधून अथवा पुरणयंत्रामधून काढावा. जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घातली तर ते व्यवस्थित गोड होते व हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते. पन्हे करताना थोड्या गरात थंड पाणी व किंचित मीठ घालावे. याची चव फारच छान लागते.


*२१) कैरीचे पन्हे प्रकार २*


साहित्य :

५०० ग्रॅम कैऱ्या

मीठ

गूळ

वेलची पूड चवीप्रमाणे

कृती :

वर दिल्याप्रमाणे कैरी शिजवून घ्यावी. मिक्सर अथवा पुरणयंत्रातून काढल्यानंतर त्यात मीठ व गूळ चवीनुसार घालून मिश्रण सारखे करावे. चवीपुरती वेलची पूड घालावी. देताना थोड्या गरात पाणी घालून द्यावे.


*२२) कैरीचे पन्हे प्रकार ३*


५०० ग्रॅम कैऱ्या

मीठ

साखर

चवीप्रमाणे वेलची पूड

कृती :

कैरीचे साल काढून ती किसून घ्यावी. नंतर थंड पाण्यात हा कीस टाकून तो कुस्करून घ्यावा. नंतर त्यात अंदाजाने मीठ व साखर घालावी. गाळण्यातून गाळून घ्यावे व नंतर त्यात वेलची पूड टाकावी. हे पन्हे आयत्यावेळी करता येते.


*२३) कैरीचे पन्हे प्रकार ४*


साहित्य :

५०० ग्रॅम कैऱ्या

चवीप्रमाणे साखर

मीठ१ चमचा 

केशरी रंग

वेलची पूड

चुरा केलेला बर्फ

कृती :

शिजवलेली कैरी व साखर यांचे मिश्रण घेऊन त्यात थोडा केशरी रंग, वेलची पूड, थंडगार पाणी, चवीप्रमाणे मीठ व बर्फ एकत्र करावे. व्यवस्थित ढवळून सर्व्ह करावे.


*२४) ऊसाचा मिल्क शेक*


साहित्य :

१ कप उसाचा रस

१ कप दूध

बर्फ

१ चमचा आल्याचा रस

मिऱ्याची किंवा जिऱ्याची पावडर

कृती :

उसाचा रस, दूध, बर्फ व आल्याचा रस एकत्र करून मिक्सरमधून घुसळणे, आवडीप्रमाणे मिरे वा जिरेपूड घालावी.


*२५) व्हॅनीला मिल्क शेक*


साहित्य :

१ लि.दूधसाखर

४ मोठे कप व्हॅनिला आईस्क्रिम

भुगा केलेला बर्फ

कृती :

दुधात साखर एकत्र करावी. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतावे. त्यात दोन कप आईस्क्रीम घालावे. भुगा केलेला बर्फ घालून मिक्सरमधून काढावे. थंडगार मिल्कशेक व त्यावर (उरलेले) थोडेसे आईस्क्रीम टाकावे.


*२६) कैरीचे सरबत*


साहित्य :

१ किलो कैरीचा गर

दीड कि.साखर

१ लि.पाणी

अर्धा चमचा सोडियम मेटाबाय सल्फाइड

मीठ चवीनुसार

अर्धा चमचा वेलची पूड

कृती :

कैरीची साले काढून कैऱ्या कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. त्यानंतर त्याचा गर तयार करावा.गर मिक्सरमध्ये फिरवताना त्यात वेलची व हवे असल्यास मीठ, केशर घालावे. त्यानंतर दीड किलो साखरेत १ लि. पाणी घालून गॅसवर ठेवावे व ढवळत राहावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. पाक गार झाल्यावर त्यात कैरीचा गर एकत्र करून त्यात अर्धा चमचा सोडियम मेटाबाय सल्फाइड घालावे. सरबत देताना पाव भाग कैरीचे तयार मिश्रण व पाऊण भाग पाणी व बर्फाचा खडा घालून द्यावे.


*२७) द्राक्षाचे सरबत*


साहित्य :

साधारण २ कि.द्राक्षे

१ लि.रसाला १ लि.पाणी

२ कि. साखर

अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड

१ चमचा सोडियम बेन्झॉइट

१ चमचा टोनोग्रीन इसेंस (रंग व इसेंस एकत्र असतो.)

कृती :

प्रथम द्राक्षे धुऊन घ्यावीत. (काळी, हिरवी) व ५ मिनिटे पाण्यात शिजवून व पुरण यंत्रातून काढावीत. निघालेला रस १ लि. असेल तर १लि. पाणी घ्यावे. ११ लि. पाणी साखरेत एकत्र करून अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे. एक उकळी येईपर्यंत ढवळावे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. गार झाल्यावर त्यात द्राक्षाचा रस ओतून त्यात १ चमचा सोडियम बेन्झॉइट घालावे. पाव भाग सिरप, पाऊण भाग पाणी, बर्फाचा खडा, चवीला हवे असल्यास मीठ टाकावे.


*२८) चटकदार सरबत*


साहित्य :

१ काकडी

१ गाजर

२ लिंबे

मीठ

साखर

हिंग पावडर

कृती :

प्रथम काकडी, गाजर किसून त्याचे वेगवेगळे रस काढून घ्यावेत. नंतर एका भांड्यात ते एकत्र करून चवीप्रमाणे साखर व मीठ त्यात घालावे. किंचित हिंग घालावा. आवडत असल्यास जिरे पूड घालावी. मावेल तेवढेच पाणी त्यात घालावे. आरोग्याच्या दृष्टीने हे सरबत चांगले आहे.


*२९) पेरुचे सरबत*


साहित्य :

अर्धा किलो पेरू

६०० मिली.पाणी

२५० ग्रॅ.साखर

अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड

चिमुटभर पोटॅशिअम मेटा बाय सल्फाइड

बर्फाचा चुरा

कृती :

पेरूची साले व बिया काढून पेरूच्या गरात ३०० मिली. पाणी टाकून मिक्सरमधून लगदा करून घ्यावा. नंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. उरलेल्या पाण्यात साखर व सायट्रिक अ‍ॅसिड घालून उकळ्या आणाव्यात. त्यात पेरूचे मिश्रण घालून पुन्हा उकळून घ्यावे. थंड झाल्यावर पोटॅशिअम मेटा बाय सल्फाइड घालून बाटलीत भरून ठेवावे. आयत्यावेळी देताना पाणी व बर्फाचा चुरा घालून सर्व्ह करावे. हे सरबत खूप दिवस टिकते.


गारवा उन्हाळा तला

 🛑 *उन्हाळ्या साठी थंड व शरीराला उपयुक्त असे 29 पेय*🛑


*पोस्ट save करून ठेवा-4 महिने उन्हाळ्यात थंड पेय प्रमाणात सेवन करा*


https://chat.whatsapp.com/F59rIS69C1LJUWbtWQF07I


*१) लाजामण्ड*


म्हणजे लाह्यांचे पाणी. साळीच्या लाह्या उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवून नंतर कुस्करून गाळून त्या पाण्यात चवीपुरते मीठ आणि साखर घालून प्यावे. हे पाणी तहान घालविणारे, भूक वाढविणारे, पचण्यास अगदी हलके, शरीराचे पोषण करणारे, साम्य टिकवून ठेवणारे, सर्व ऋतुंमध्ये पिण्यास उत्तम, शरीराची आग, ताप, चक्कर येणे यांवर प्रभावी आणि विशेष म्हणजे लहान मुले, म्हातारे लोक, स्त्रिया, नाजूक व्यक्तींसाठी जास्त चांगले.


*२) धन्याचे पेय*


थंड पाण्यात धनेपूड, कापूर, लवंग, वेलची, मिरे आणि साखर घालून ते ढवळून प्यावे. ते पित्त कमी करणारे, जिभेला चव देणारे असते.


*३) मनुकांचे पेय*


 मनुका गरम पाण्यात भिजवून, काही काळ ठेवून नंतर कुस्करून गाळून ते पाणी प्यावे. ते थकवा घालविणारे, तहान, चक्कर, शरीराची आग कमी करणारे पण पचायला जड असते.


*४) खर्जूरादि मंथ*


 खजूर, डाळिंब, मनुका, चिंच, आवळा, फालसा हे सर्व पाण्यात एकत्र भिजत ठेवून थोड्या वेळाने रवीने घुसळून, गाळून प्यावे. गोड- आंबट चवीचे, अतिमद्यपानाने होणारे त्रास, शरीराची आग इ. साठी उपयुक्त, शरीराला पोषक, ताकद देणारे होय.


*५) पियुष*


साहित्य :-

सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस ,दहा चमचे साखर ,छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.

कृती :-

दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.

लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्‍याच वेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.


*६) फळांचे सरबत*

 

साहित्य:-

१ अननस , २ संत्री, २ मोसंबी, २ निंबू

कृती:- 

सर्वांचा रस काढून मोजावा. रसाच्या दीडपट साखर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पाक करून घ्यावा. थंड झाल्यावर वरील रस बॉटल मध्ये भरावा. तो १५ ते २० दिवस सहज टिकतो. आयते वेळी थंड पाण्यात घालून सरबत घेता येते, त्यात किंचित मीठ घातले तरी चालेल.


*७) खस सरबत*


साखर व पाणी एकत्रित करून गरम करा त्यास चांगली उकळी येऊ द्या, थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात खस इंसेस व रंग घाला पाहिजे तेव्हा थंड पाण्यात सरबत घालून प्या.


*८) अननसाची लस्सी*


साहित्य :- 

ताक किंवा दही, अननसाचे तुकडे, विलाईचि पूड. किंचित साखर

कृती :- 

अननसाचा रस काढून सर्व एकत्रित करून मिक्सर काढा,त्यात बर्फ घालून ग्लास मध्ये लस्सी द्या, त्याला छान सुगंध येतो .


*९) चिंचेचे सरबत*


वाळलेली चिंच घ्यावी त्यांतील चिंचोके काढून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी. काही वेळाने चिंच कुस्करून घ्यावी व चिंच काढून घ्यावी.चिंचेच्या पाण्यात साखर,मीठ, सोप व जिरे पूड टाकावी व बर्फ टाकून पिण्यास द्यावे.


*१०) टोमाटो व काकडी*


साहित्य -: 

तीन कप टोमाटोचा ज्यूस दन चमचे लिंबाचा रस,दोन लवंगा एक दालचिनी काडी, एक लहान कांदा किसून, अर्धा कप काकडीचा कीस, चवीपुरते मीठ, तीन चमचे साखर व बर्फाचे क्युब्ज .

कृती -: 

कांदा व काकडी किसून घ्यावी, व्र्फ सोडून सर्व घटक पदार्थ एकत्र करून फ्रीज मध्ये एकतास भर ठेवावेंन्त्र गाळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून प्रत्येक ग्लासात घालून बर्फाचा क्युब्ज धालाव्यात व हे मिश्रण ओतावे.


*११) कलिंगडचे सरबत*


साहित्य -: 

एक कलिंगड, चवीपुरते मीठ, दालचिनी/ मिरपूड , साखर एका लिंबाचा रस.

कृती -: 

कलिंगड कापून त्याच्या लालबुंद मधल्या भागातील गर स्कुपने( गोल आकाराचा चमचा आईस्क्रीम काढण्याचा ) काढून ते गोळे एका बाउल मध्ये घालून फ्रीज मध्ये ठेवावे. आणि मग उरलेल्या कलिंगडचा लाल भाग अगदी बारीक चिरून त्याच्या बिया काढून त्याचा रस काढून तो गाळून घ्यावा. त्यात मीठ,साखर, दालचिनी पूड किंवा मिरपूड,लिंबाचा रस घालून तासभर फ्रीज मध्ये ठेऊन थंड करावे.सर्व्ह करतेवेळी प्रत्येक ग्लासात थंड सरबत काढून ठेवलेल्या कलिंगड च्या तुकड्यातील एक दोन तुकडे त्या सरबतात घालून प्यायला द्यावे. या सरबतात बर्फ क्यूब्ज घालू नये.


*१२) सफरचंदा चे पेय*


साहित्य -: 

२५० ग्राम सफरचंद चवी पुरती साखर, एक लिंबू, मीठ.

कृती -:  

स्वच्छ धुवून साला सकट बारीक चिरून घ्यावी. साखरेवर लिंबाची साल किसून घ्यावी. व ती सफरचंदात मिसळावी. तीन कप उकळीचे पाणी त्यातओतावे व झाकण घालून ठेवावे. थंड झाल्यावर गाळून घ्यावे.चवी पुरती साखर घालावी. मीठ रुची प्रमाणे घालावे किंवा नाही घातले तरी चालेल. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून बर्फ घालून लहान लहान ग्लासातून सर्व्ह करावे.


*१३) जिंजरेल*


साहित्य-: 

एक किलो प्रत्येकी बेताच्या आकाराचा एक कप आल्याचा रस व लिंबाचा रस त्याच कपाने मोजून चार कप पाणी .

कृती -: 

साखर व पाणी एकत्रित करून साखर पाण्यात चांगली मिसळू द्यावी. ते पानी पाच ते सात मिनिटे उकळावे. गार झाल्यावर आल्याचा रस व लिंबाचा रस गाळून व्यवस्थित मिसळावा. हे टिकाऊ करण्यासाठी दोन चमचे पाण्यात अर्धा चमचा पोट्यशियम मेटाबाय सल्फाईड गाळून ते मिश्रण त्या रसात मिसळावे. सर्व्ह करताना उंच ग्लासमध्ये दोन चमचे करड बर्फ व थोडा जिंजरेल सोडा किंवा पाणी गाळून द्यावे.


*१४) कोरफड रस*


कोरफड रस चवीला तुरट असली तरी, या रसात डिहाइड्रेशन यासारख्या समस्यांना प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते. आपल्या शरीराला थंडावा देण्याव्यतिरिक्त कोरफड रस हा आपल्या त्वचेचा ग्लो कायम राखण्यास मदत करतो. कोरफडाच्या पानांचा गर काढताना, त्यावरील पिवळ्या रंगाचा थर काढुन टाका कारण यामुळे कोरफड रस हा कडवट होण्याची शक्यता असते. कोरफडचा पांढरा गर काढून घेतल्यावर, त्याला मिक्सरमध्ये चांगल्यापद्धतीने वाटुन घ्यावा. आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार चाट मसाला किंवा मीठ घालावे.


*१५) दही शेक*


दहीमध्ये मीठ, जिरा पावडर आणि चवीनुसार हिंग घालून ब्लेंडरमध्ये चांगल्या पद्धतीने ब्लेंड करुन घ्या. नंतर यामध्ये बर्फ घालून या थंडगार पेयाचा आस्वाद घ्या. या दही शेकमुळे आपल्या पोटातील आग आणि पित्त दूर होते.


*१६) अमरबेल सरबत*


अमरबेलाच सरबत उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देतो. सगळ्यात आधी अमरबेल मधील साऱ्या बिया काढून त्याला मिक्सरमध्ये चांगल्या पद्धतीने वाटून घ्या. त्यानंतर या ज्युसला चांगल्या पद्धतीने फिल्टर करुन घेऊन त्यामध्ये चाट मसाला घालून, अमरबेल पेयाचा आस्वाद घेण्यास तयार आहे.


*१७) पुदिना सरबत*


पुदिन्याच सरबत हे ऊन्हाळ्यात आपल्या शरीराला डिहाइड्रेशन आणि लू पासुन वाचवतो, हे सरबत बनवताना सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पुदीना, साखर, मध, काळ मीठ,

मिरपूड आणि जीरा पावडर घालून चांगल्या पद्धतीने वाटुन घ्या. या तयार झालेल्या पेस्टला कमी मात्रा असलेल्या पाण्यात मिक्स करुन पुदिना पेयाचा आस्वाद घेण्यास तयार आहे.


*१८) जलजीरा*


साहित्य-

१ टेबलस्पून भाजलेल्या जिर्‍याची पावडर

अर्धा टेबलस्पून पुदिन्याची पेस्ट

अर्धा टेबलस्पून कोथिंबीरीची पेस्ट 

१ टीस्पून आमचूर पावडर

अर्धा टीस्पून काळं मीठ

अर्धा टीस्पून साखर

अर्ध्या लिंबाचा रस 

१ ग्लास थंड पाणी

चवीपुरते मीठ

कृती :

गार पाण्यात सारे साहित्य एकत्र करून घ्या.त्यानंतर मिश्रण ढवळून घ्या.सजावटीसाठी त्यात थोडी कोथिंबीर व पुदीना टाका.गारेगार जलजीराचा आस्वाद घ्या.


*१९) पंजाबी लस्सी*


साहित्य:-

ताजे घट्ट दही – २ १/२ कपसाखर १/२ कपबर्फाचे तुकडे गरजेनुसारदूध – १/२ कपताजे दूधक्रीम २ चम्मचविलायची व सुका मेवा

कृती:-

-दही आणि साखर चांगल्या प्रकारे मिळवून घ्या.

-मिक्सरच्या पॉट मध्ये हे मिश्रण टाकून त्यात बर्फाचे तुकडे टाका.

-त्यात दुध व दुधक्रीम टाका.

-विलायची बारीक करून टाका

-मिक्सर फिटवून मिश्रण एकजीव होऊ द्या.

-ग्लास मध्ये काढून त्यावर दुधाचे क्रीम व सुका मेवा बारीक करून टाका. थंड लस्सी तयार आहे.

टिप्स:-

दही व दूध ताजे असावे.लस्सी बनविताना ताजे पदार्थच वापरावे.दही व इतर पदार्थ चांगल्याप्रकारे मिळविण्यासाठी मिक्सरचा वापर करावा.घट्टपणा कमी करण्यासाठी जास्त बर्फ किंवा पाणी घाला.लस्सीमध्ये केसराचा वापर अधिक स्वाद व रंगासाठी करता येतो.लस्सीमध्ये वाटेल तितके दूध क्रीम टाका.दूधक्रीम चांगल्या प्रतीचे व त्यास फेटू नये.


*२०) कैरीचे पन्हे प्रकार १*


साहित्य :

५०० ग्रॅम कैऱ्या

साखर

१ चमचा मीठ

कृती :

कैरीची साले काढून त्या अख्ख्या किंवा फोडी करून स्टीलचा भांड्यातून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर कैरीचा गर व साखर मिक्सरमधून अथवा पुरणयंत्रामधून काढावा. जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घातली तर ते व्यवस्थित गोड होते व हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते. पन्हे करताना थोड्या गरात थंड पाणी व किंचित मीठ घालावे. याची चव फारच छान लागते.


*२१) कैरीचे पन्हे प्रकार २*


साहित्य :

५०० ग्रॅम कैऱ्या

मीठ

गूळ

वेलची पूड चवीप्रमाणे

कृती :

वर दिल्याप्रमाणे कैरी शिजवून घ्यावी. मिक्सर अथवा पुरणयंत्रातून काढल्यानंतर त्यात मीठ व गूळ चवीनुसार घालून मिश्रण सारखे करावे. चवीपुरती वेलची पूड घालावी. देताना थोड्या गरात पाणी घालून द्यावे.


*२२) कैरीचे पन्हे प्रकार ३*


५०० ग्रॅम कैऱ्या

मीठ

साखर

चवीप्रमाणे वेलची पूड

कृती :

कैरीचे साल काढून ती किसून घ्यावी. नंतर थंड पाण्यात हा कीस टाकून तो कुस्करून घ्यावा. नंतर त्यात अंदाजाने मीठ व साखर घालावी. गाळण्यातून गाळून घ्यावे व नंतर त्यात वेलची पूड टाकावी. हे पन्हे आयत्यावेळी करता येते.


*२३) कैरीचे पन्हे प्रकार ४*


साहित्य :

५०० ग्रॅम कैऱ्या

चवीप्रमाणे साखर

मीठ१ चमचा 

केशरी रंग

वेलची पूड

चुरा केलेला बर्फ

कृती :

शिजवलेली कैरी व साखर यांचे मिश्रण घेऊन त्यात थोडा केशरी रंग, वेलची पूड, थंडगार पाणी, चवीप्रमाणे मीठ व बर्फ एकत्र करावे. व्यवस्थित ढवळून सर्व्ह करावे.


*२४) ऊसाचा मिल्क शेक*


साहित्य :

१ कप उसाचा रस

१ कप दूध

बर्फ

१ चमचा आल्याचा रस

मिऱ्याची किंवा जिऱ्याची पावडर

कृती :

उसाचा रस, दूध, बर्फ व आल्याचा रस एकत्र करून मिक्सरमधून घुसळणे, आवडीप्रमाणे मिरे वा जिरेपूड घालावी.


*२५) व्हॅनीला मिल्क शेक*


साहित्य :

१ लि.दूधसाखर

४ मोठे कप व्हॅनिला आईस्क्रिम

भुगा केलेला बर्फ

कृती :

दुधात साखर एकत्र करावी. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतावे. त्यात दोन कप आईस्क्रीम घालावे. भुगा केलेला बर्फ घालून मिक्सरमधून काढावे. थंडगार मिल्कशेक व त्यावर (उरलेले) थोडेसे आईस्क्रीम टाकावे.


*२६) कैरीचे सरबत*


साहित्य :

१ किलो कैरीचा गर

दीड कि.साखर

१ लि.पाणी

अर्धा चमचा सोडियम मेटाबाय सल्फाइड

मीठ चवीनुसार

अर्धा चमचा वेलची पूड

कृती :

कैरीची साले काढून कैऱ्या कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. त्यानंतर त्याचा गर तयार करावा.गर मिक्सरमध्ये फिरवताना त्यात वेलची व हवे असल्यास मीठ, केशर घालावे. त्यानंतर दीड किलो साखरेत १ लि. पाणी घालून गॅसवर ठेवावे व ढवळत राहावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. पाक गार झाल्यावर त्यात कैरीचा गर एकत्र करून त्यात अर्धा चमचा सोडियम मेटाबाय सल्फाइड घालावे. सरबत देताना पाव भाग कैरीचे तयार मिश्रण व पाऊण भाग पाणी व बर्फाचा खडा घालून द्यावे.


*२७) द्राक्षाचे सरबत*


साहित्य :

साधारण २ कि.द्राक्षे

१ लि.रसाला १ लि.पाणी

२ कि. साखर

अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड

१ चमचा सोडियम बेन्झॉइट

१ चमचा टोनोग्रीन इसेंस (रंग व इसेंस एकत्र असतो.)

कृती :

प्रथम द्राक्षे धुऊन घ्यावीत. (काळी, हिरवी) व ५ मिनिटे पाण्यात शिजवून व पुरण यंत्रातून काढावीत. निघालेला रस १ लि. असेल तर १लि. पाणी घ्यावे. ११ लि. पाणी साखरेत एकत्र करून अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे. एक उकळी येईपर्यंत ढवळावे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. गार झाल्यावर त्यात द्राक्षाचा रस ओतून त्यात १ चमचा सोडियम बेन्झॉइट घालावे. पाव भाग सिरप, पाऊण भाग पाणी, बर्फाचा खडा, चवीला हवे असल्यास मीठ टाकावे.


*२८) चटकदार सरबत*


साहित्य :

१ काकडी

१ गाजर

२ लिंबे

मीठ

साखर

हिंग पावडर

कृती :

प्रथम काकडी, गाजर किसून त्याचे वेगवेगळे रस काढून घ्यावेत. नंतर एका भांड्यात ते एकत्र करून चवीप्रमाणे साखर व मीठ त्यात घालावे. किंचित हिंग घालावा. आवडत असल्यास जिरे पूड घालावी. मावेल तेवढेच पाणी त्यात घालावे. आरोग्याच्या दृष्टीने हे सरबत चांगले आहे.


*२९) पेरुचे सरबत*


साहित्य :

अर्धा किलो पेरू

६०० मिली.पाणी

२५० ग्रॅ.साखर

अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड

चिमुटभर पोटॅशिअम मेटा बाय सल्फाइड

बर्फाचा चुरा

कृती :

पेरूची साले व बिया काढून पेरूच्या गरात ३०० मिली. पाणी टाकून मिक्सरमधून लगदा करून घ्यावा. नंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. उरलेल्या पाण्यात साखर व सायट्रिक अ‍ॅसिड घालून उकळ्या आणाव्यात. त्यात पेरूचे मिश्रण घालून पुन्हा उकळून घ्यावे. थंड झाल्यावर पोटॅशिअम मेटा बाय सल्फाइड घालून बाटलीत भरून ठेवावे. आयत्यावेळी देताना पाणी व बर्फाचा चुरा घालून सर्व्ह करावे. हे सरबत खूप दिवस टिकते.



🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा* 

किंवा लिंकला टच करा व join व्हा


https://chat.whatsapp.com/F59rIS69C1LJUWbtWQF07I

देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती


महाराष्ट्रात सात ठिकाणी एफएम केंद्रांचा शुभारंभ  


 


            मुंबई, दि. २८ : देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ झाला. “डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळाला. हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील आणि महिला बचत गटांसाठी ते उपयुक्त ठरतील”, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.


            यावेळी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा या सात ठिकाणी एमएफ सेंटर्सचा शुभारंभ करण्यात आला.


देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९१ एफएम ट्रान्समीटरच्या लोकार्पणप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा हा विस्तार ऑल इंडिया एफएम होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ऑल इंडिया रेडिओच्या या एफएम प्रसारणाचा हा शुभारंभ म्हणजे देशातील ८५ जिल्ह्यांतील २ कोटी नागरिकांना भेट असल्याचे त्यांनी सांगितले.


            माहितीचा वेळेवर प्रसार, शेतीसाठी हवामान अंदाज, किंवा महिला बचत गटांना नवीन बाजारपेठेशी जोडणे यामध्ये एफएम ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. रेडिओच्या माध्यमातून ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे स्वच्छता अभियान, बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप आल्याचे प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


००००

Upay##वातदोष.... उपाय...*👇

 *###वातदोष.... उपाय...*👇


..१) ५०-५० ग्राम मेथिचे

 दाणे, हळद सुंठ व अश्वगंधा चूर्ण २५ ग्राम हे समप्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून सकाळ संध्याकाळ, नाश्ता नंतर घ्या. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर घ्यावे..

२) दोन चमचे एरंडेल तेल गरम दूधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्या.

३) ४ग्राम मोहरिचे चूर्ण, ४ग्राम गूळात मिसळून सकाळी संध्याकाळी कोमट पाण्याने घ्या.

४) हिरडे, सुंठ, व ओवा समप्रमाणात घेऊन याचे चूर्ण तयार करून ते कोमट पाण्याबरोबर घ्यावे.

५) सुंठ चूर्ण १\२चमचा, जायफळ पूड पाव चमचा, कोरफड गर सोबत घ्यावे..

६) लसुणाच्या पाकळ्या तुपावर परतून सकाळी पाण्यासोबत घ्या.

७) अद्रक रस व जुना गुळ बकरिच्या दूधातून घ्यावे.

८) त्रिफळा चूर्ण १\४चमचा, अर्धा चमचा कोथिंबीर, १\४ विलायचि पावडर एकत्र वाटून हे दिवसातून दोन वेळा घ्या

९) दालचिनी चूर्ण मधात मिसळून द्यावे

१०) सिंहनाद गुग्गुळ वटि एक एक जेवणानंतर घ्या दोन वेळा..

११) वातहारि वटि एक एक जेवणानंतर घ्या.

१२) महायोगराज गुग्गुळ एक एक जेवणानंतर घ्या

१३) रोज सकाळी अळिवाचि फिर दूधात शिजवून खावि. 

१४) दशमूलारिषट दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घ्या

१५) मेथिची पुड पाण्यासोबत घ्या सकाळी रिकाम्या पोटी..

१६) महासुदर्शन चुर्ण दोन वेळा पाण्या सोबत घ्यावे

१७) निर्गुंडि पाने पाण्यात उकळून याने स्नान करावे..


... वरील उपाय केल्यास वातदोष शांत होतो....


   आयुर्वेद अभ्यासक.... सुनिता सहस्रबुद्धे... निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार..🌿☘️


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


खडी साखर ॲसिडिटी, उष्णता, आणि इतर अनेक आजारांवर रामबाण उपाय : l*

 *ॲसिडिटी, उष्णता, आणि इतर अनेक आजारांवर रामबाण उपाय : खडी साखर* 


खडीसाखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. खडीसाखरेचे दोन प्रकार आहेत. यापैकी एका खडीसाखरेचा आकार ओबडधोबड असतो, तर दुसरी खडीसाखर प्रमाणबद्ध असते. यापैकी आकार नसलेली आणि ओबडधोबड असणाऱ्या खडीसाखरेमध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात.


पित्त विकार, उष्णतेचा त्रास, ॲसिडिटी अशा काही आजारांवर खडीसाखर रामबाण उपाय आहे. जाणून घेऊया खडीसाखर खाण्याचे इतर फायदे.


*तोंडाला दुर्गंधी :-* 


मुखदुर्गंधीचा त्रास अनेक जणांना असतो. दररोज 2 वेळा स्वच्छ दात घासूनही तोंडाचा वास जात नाही. अशा लोकांना नियमितपणे खडीसाखर खाणे फायद्याचे ठरते. यासाठी जेवण झाल्यानंतर खडीसाखरेचा 1 खडा आणि थोडीशी बडीशेप तोंडात टाका आणि चावून चावून खा. तोंडाची दुर्गंधी कमी होईल.


*खोकल्यावर गुणकारी :-* 


सतत कोरडा खोकला येण्याचा त्रास होत असेल, तर अशावेळीही खडीसाखर चांगली उपयोगी पडते. ज्या लोकांना खास करून रात्री झोपल्यानंतर खोकल्याची उबळ येते, त्यांनी खोकला सुरू झाल्यावर खडीसाखरेचा एक तुकडा तोंडात ठेवून चघळावा. काही वेळातच खोकला कमी होईल.


*ॲसिडिटीसाठी उत्तम :-* 


खडीसाखर ही नैसर्गिकदृष्ट्या थंड असणारा पदार्थ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे उष्णतेचे त्रास कमी होण्यासाठी खडीसाखर खावी. छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी असा त्रास ज्यांना होतो, त्यांनी खडीसाखरेचे पाणी प्यावे. ॲसिडिटी लगेचच कमी होईल. हा उपाय केल्यामुळे मळमळ होण्याचा त्रासही कमी होतो.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





मन की बात जन तक


 

बायकोचे वय

 


माकड खेळते नारळ हांडी

 


महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी

 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता.

            मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ७.१५ वाजेपूर्वी किंवा ९ वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


            या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे राज्यपाल हे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. तर विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तसेच, संबंधित तहसिलदार हे तालुका मुख्यालयी ध्वजारोहण करतील.


            राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘राष्ट्रगीत’ म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. त्यानंतर 'राज्यगीत' म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/(ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल, याचीही दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.


            महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख महाराष्ट्र दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हे परिपत्रक शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


0000

धर्मादाय रुग्णालयांबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करा

 धर्मादाय रुग्णालयांबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करा


- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत


 


            मुंबई, दि. २७ : धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा व सवलतीच्या दरात उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.


            धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात आरोग्यमंत्री श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांच्यासह सार्वजनिक आरोग्य, विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. सावंत म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना जलद व तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी विभागाने धर्मादाय रुग्णालयात राखीव असलेल्या दहा टक्के उपलब्ध खाटांची माहिती देणारे ॲप प्राधान्याने तयार करावे. तसेच हे ॲप सर्वसामान्य नागरिकांना सहज हाताळता येईल, असे असावे. रुग्णांची शिधापत्रिका आणि तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, अशा सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिल्या.


             धर्मादाय रुग्णालयात आरोग्य सेवक पदाची भरती आरोग्य विभागाकडून तात्काळ करण्यात यावी. जेणेकरून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवाकामार्फत योग्य ती मदत अधिक तत्परतेने मिळेल. या योजनांचा लाभ अधिकाधिक गरीब आणि दुर्बल रुग्णांना मिळावा या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारेसुदानमध्ये अडकलेले

 महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारेसुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल.

            नवी दिल्ली, 27 : सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचे वातावरण असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरु केले आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नागरिकांना महाराष्ट्र सदन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्यात आले आहे.


थोडक्यात तपशील


            ऑपरेशन कावेरी अंतर्गत विशेष विमान एसवी-3620 जेडाह (सौदी अरब) येथून बुधवारी रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली येथे दाखल झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता.


महाराष्ट्र सदन सहकार्य कक्ष सुरु


             परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.


            सुदान मधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.


            सुदान येथून दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वय केला जात आहे. विमानतळाहून नागरिकांना महाराष्ट्र सदनापर्यंतची वाहतूक व्यवस्था तसेच निवास, भोजन व्यवस्था या कक्षामार्फत करण्यात येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६० तक्रारींचे निराकरण

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात१६० तक्रारींचे निराकरण.

            मुंबई, दि. २७ : जी उत्तर वॉर्ड येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात दाखल झालेल्या तक्रारींपैकी १६० तक्रारींचे तत्काळ निराकरण महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. तसेच माहिम कापडबाजार, ढाणागल्ली येथील अंगणवाडीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले. 


         दादर येथील मुंबई महापालिकेच्या जी उत्तर वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले की, सन २००७ पासून माहिम येथील कापडबाजार, ढाणागल्ली येथे असलेल्या अंगणवाडीसाठी जागेची दीर्घ कालावधीपासूनची मागणी लक्षात घेता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी निर्देशित केले.       


       यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जी उत्तर वॉर्ड येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.      


            भायखळा ई वॉर्ड येथे गुरूवार दिनांक २८ एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी तीन ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठीhttps://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते

Featured post

Lakshvedhi