Thursday, 1 May 2025

भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावर

 भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव


भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावर

 


WAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा


 


19 जानेवारी 2019 रोजी मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रेरणादायी स्वप्न मांडले ते म्हणजे “आपण एका परिषदेपासून सुरुवात करू आणि तिला डाव्होसच्या धर्तीवर जागतिक परिषद बनवू.” या दृष्टिकोनाला साकार करणारा एक भव्य उपक्रम म्हणजे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025.


 


भारताची सांस्कृतिक आणि मनोरंजनाची राजधानी, मुंबई, 1 ते 4 मे 2025 दरम्यान या अभूतपूर्व जागतिक सोहळ्याचे यजमानपद भूषवणार आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या सहकार्याने हा सोहळा मुंबईत आयोजित केला आहे. WAVES 2025 हे भारताला जागतिक कंटेंट हब म्हणून स्थापित करण्याचे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जिथे सर्जनशीलता, नवप्रवर्तन आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा एकत्र येणार आहे. जगात प्रथमच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे."


            “कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज” या ब्रीदवाक्यासह, WAVES 2025 ही भारतातील पहिली जागतिक मीडिया आणि मनोरंजन परिषद आहे, जी मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजनासाठी सज्ज झाले आहे. हा चार दिवसांचा महोत्सव भारताच्या 54 अब्ज अमेरिकी डॉलरच्या (2026 पर्यंत) मीडिया आणि मनोरंजन बाजारपेठेला नव्या उंचीवर नेण्यासाठी आकारला गेला आहे. या परिषदेत भारताच्या कथाकथन परंपरेला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अॅनिमेशन, VFX, गेमिंग, AR/VR/XR, कॉमिक्स, चित्रपट, माहितीपट, सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म आणि प्रसारण यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांशी जोडले जातील. ही परिषद केवळ एक इव्हेंट नाही, तर सर्जनशीलतेचा महासागर आणि नवप्रवर्तनाची लाट आहे, जी भारताला जागतिक सर्जनशील केंद्र बनवण्यासाठी सज्ज झाले आहे. 


WAVES 2025 मध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 40 जागतिक मंत्री आणि नेटफ्लिक्स, गुगल, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, सोनी पिक्चर्स, अॅडोब, एपिक गेम्स यासारख्या दिग्गज कंपन्या सहभागी होतील. जागतिक बॉलिवूडचे वरिष्ठ कलाकार शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, चिरंजीवी, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि दिलजीत दोसांज यांच्या सल्लागार मंडळाने या परिषदेला पाठिंबा दिला आहे. नेटफ्लिक्सचे टेड सरांडोस, अॅमेझॉनचे माइक हॉपकिन्स आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती WAVES परिषदेला जागतिक स्तरावर ओळख देईल. या परिषदेचा मुख्य उद्देश भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे आणि नवप्रवर्तनाला गती देणे आहे. भारत आणि इतर देशांमधील सर्जनशील उद्योगांमधील भागीदारी वाढवणे, AI आणि गेमिंगसारख्या तंत्रज्ञानांचा वापर करून उद्योगाला नवे आयाम देणे आणि 2027 पर्यंत 36.1 अब्ज डॉलरची सर्जनशील अर्थव्यवस्था उभारणे हा या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. यामुळे 2–3 लाख रोजगार निर्माणही होतील, सोबतच महिला-नेतृत्वातील स्टार्टअप्स आणि 12–19 वयोगटातील क्रिएटर्सना प्राधान्य देऊन त्यांचा समावेशकता वाढेल. 

गो उत्पादन वस्तूंच्या मंत्रालय येथील दोन दिवसीय प्रदर्शनाला उर्त्स्फूत प्रतिसाद

 गो उत्पादन वस्तूंच्या मंत्रालय येथील

 दोन दिवसीय प्रदर्शनाला उर्त्स्फूत प्रतिसाद

 

            मुंबईदि. ३० : पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गो उत्पादन दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दोन दिवसीय गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात पंचगव्यांपासून बनवलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या. या प्रदर्शनास मंत्रालयातील अधिकारीकर्मचारी तसेच अभ्यांगतांनी भरघोस प्रतिसाद दिला.

 

३० एप्रिल हा दिवस यावर्षीपासून गो उत्पादन दिन म्हणून साजर करण्यात येत आहे. त्यानिमित्त  मंत्रालयात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात राज्यातील विविध जिल्ह्यातील गो शाळांच्या प्रतिनिधींनी सुबक आणि उत्कृष्ट वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यामध्ये पंचगव्यांपासून बनवण्यात आलेल्या वस्तू भीमसेन कापूरबिना बांबू अगरबत्तीधूपसांबरणी धूप आदी पुजेच्या साहित्यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त लक्ष्मीची पाऊलेश्रीयंत्रगणेश मूर्तीकृष्ण मूर्तीतोरणकी चैनलटकनदिवेराखी यासारख्या शोभेच्या वस्तू प्रदर्शनाचे आकर्षण होत्या. याबरोबर या प्रदर्शनात उत्तम शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक पंच्यगव्यापासून तयार केलेले तेलफंगल इन्फेक्शन स्प्रेपचनशक्ती / रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्कजखमेसाठी मलमडोळे आणि कानात टाकण्यासाठी श्रवण थेंब या वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

 

याशिवाय सौंदर्यवर्धनासाठी सुगंधी उटणेगोरस सोपउटणेदंतमंजन या वस्तू खरेदी करण्याकडे कल दिसून येत होता. याशिवाय गोवऱ्यागांडूळ खतशुद्ध तूप या वस्तू देखील होत्या. पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या औषधांचे फायदे यासंदर्भात पुस्तकांचे दालन देखील प्रदर्शनात होते.

 

या प्रदर्शनात धुळे जिल्ह्यातून श्रीकृष्ण गोशाळावाशिमची छत्रपती गोशाळानागपूरची गो विज्ञान अनुसंधान केंद्रअहिल्यानगरची यशोदानंद गोशाळासोलापूरच्या पंढरपूर येथील गोपाळनाथ गो शाळा आणि राधेकृष्ण गोशाळाभिवंडीतील ग्रामीण प्रगती फाउंडेशन गोशाळाकोल्हापूर शिरोळ येथून वेद खिल्लार गोशाळाअहिल्यानगरची गो धाम गोशाळामुंबईची देवता कला केंद्रजळगावची सातपुडा परिसर आदिवासी विकास संघ आणि नाशिक येथून गोकुळधाम गो सेवा प्रतिष्ठान या गोशाळांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; दि ५ मे रोजी फेर परीक्षा होणार राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून खुलासा

 एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी;

दि ५ मे रोजी फेर परीक्षा होणार

राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून खुलासा

 

मुंबई, दि. ३० : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.

त्यामुळे या सत्रातील सर्व उमेदवारांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेर परीक्षा दि. ५ मे २०२५ रोजी होणार आहेअशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.

यावर्षी एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान १५ सत्रांमध्ये १९७ परीक्षा केंद्रांवर पार पडली. एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४,२५,५४८ उमेदवारांनी परीक्षा दिली. २७ एप्रिलच्या सकाळी घेतलेल्या सत्रात इंग्रजीमराठी व उर्दू माध्यमांतून एकूण 27837 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर काही उमेदवार आणि पालकांनी इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी असल्याबाबत तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने राज्य सीईटी कक्षाने  तज्ञांमार्फत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता२१ प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे आढळले. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून 27837 उमेदवारांची फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी अधिकृत www.mahacet.org या वेबसाइटवर भेट देऊन अद्ययावत माहितीची नोंद घ्यावीअसे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.


लालबाग येथे घुमणार ढोल ताशाचा आवाज महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल पथकांच्या सादरीकरणाचा ढोल गर्जना सांस्कृतिक कार्यक्रम

 लालबाग येथे घुमणार ढोल ताशाचा आवाज

महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल पथकांच्या सादरीकरणाचा

ढोल गर्जना सांस्कृतिक कार्यक्रम

 

मुंबई दि. ३० : महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ढोल ताशा पथकांच्या सादरीकरणाचा ढोलगर्जना हा सांस्कृतिक कार्यक्रम दि१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:०० ते १०:०० वा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लालबाग मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडलालबागमुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

    या कार्यक्रमात राज्यभरातून दहा विविध ढोल ताशांचे पथक आपली कला सादरीकरण करतील. महिला पथकांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे.

    ढोल गर्जना या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा आढाव

 अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला आढावा

 

मुंबई, दि. 30 : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

 

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या कीमौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा. जैन आर्थिक विकास महामंडळासाठी केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. या महामंडळाअंतर्गत कर्जासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सोय करून देण्यात यावी.  कर्ज वाटपाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात यावे. कर्ज वसुली संदर्भात धोरण आखण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

 

जास्तीत जास्त अल्पसंख्यांक वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तक्रारींसाठी १८२२५७८६ हा टोल फ्री क्रमांक जास्तीत जास्त लोकांपर्यत पाहोचवावा. पंजाबी साहित्य अकादमी आणि उर्दु साहित्य अकादमीसाठी मिळणाऱ्या निधीचा योजनेअंतर्गत असलेल्या कार्यक्रमासाठी वापर करून जास्तीत जास्त साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिली.

 

हज यात्रेसाठी १८ हजार ९४९ हाजी जात असून त्यांच्या प्रवासाचे नियोजनसोयी सुविधा आणि सुरक्षिततेची सोय करावी अशा सूचनाही राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी केल्या.

 

मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती महाराष्ट्र शासन सोबत काम करणार

 मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाव्यक्ती

महाराष्ट्र शासन सोबत काम करणार

सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक व विरेंद्र सिंह यांची माहिती

 

मुंबईदि. 30 : मानसिक आरोग्य क्षेत्रात मूलभूत सुधारणांची गरज लक्षात घेता शासन आता या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्ती यांच्यासोबत काम करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक आणि सचिव विरेंद्र सिंह यांनी सांगितले. मानसिक आरोग्य यासंदर्भात जी. टी. रुग्णालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

 

            यावेळी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधीमानसोपचारतज्ज्ञअधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विविध विभागातील या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

प्राथमिक आणि सामुदायिक स्तरावर मानसिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज व्यक्त करून सचिव निपूण विनायक म्हणाले कीराष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणाशी जोडून राज्य शासन मूल्यमापन करण्याचे काम करणार आहे. तसेच या क्षेत्रात क्षमता बांधणी महत्वाची असून त्यामध्ये शिक्षकपोलीस यांच्यासह शासकीय मानसोपचार तज्ज्ञ यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलेपरीक्षार्थी विद्यार्थीयुवक यांच्यासह समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांसाठी मानसिक आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सचिव विनायक यांनी सांगितले.

 

             बैठकीमध्ये शासकीय रुग्णालयमानसोपचार केंद्रपुनर्वसन केंद्रसंस्थाना येणाऱ्या विविध अडचणी शासकीय पुनर्वसन केंद्र उभारणेमनोरुग्णालयांचा दर्जा सुधारणे यासह शासकीय संस्थांमधील कर्मचारीनर्सेस व इतर स्टाफ यांच्या प्रशिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मानसिक आरोग्याच्या समस्या प्राथमिक स्तरावर सोडवण्याविषयीही चर्चा करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून

स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली

                                           - राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबई, दि. 29 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या शैक्षणिकसामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे महिला विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य हे केवळ कायदेशीर सुधारणा नव्हेतर समाजाच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली,  असे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात महिलांना दिलेले अधिकार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे नुकतेच करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटक  म्हणून राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.  चर्चासत्रात माजी आमदार भाई गिरकरमाजी खासदार मनोज कोटकबार्टीचे महासंचालक  सुनिल वारेॲङ माधवी नाईकडॉ. मेधा सोमय्या आणि  रश्मी जाधव उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या कीडॉ. बाबासाहेब आंबेडकर  एक व्यक्ती नव्हे तर एक विचार होते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे शोषितवंचितमागास आणि विशेषतः महिलांच्या हक्कासाठीचा संघर्ष होता. त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली असून वारसा हक्कविवाहघटस्फोटपुनर्विवाह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.

बाबासाहेबांचे ठाम मत होते कीशिक्षित स्त्री म्हणजे परिवर्तनाची खरी शक्ती. आणि म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणावर विशेष भर दिला.  आज  स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रातप्रशासकीय सेवांमध्येसामाजिक चळवळीतव्यवसायात आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहेतते केवळ बाबासाहेबांच्या दूरदृष्टी आणि कार्यामुळेच आहे. या साऱ्या संघर्षातजिच्या मूक साथीनं बाबासाहेब आज बोधीसत्त्व ठरलेती म्हणजे माता रमाई. रमाईंचा त्यागत्यांची सहनशीलताबाबासाहेबांसाठी त्यांनी घेतलेली कष्टांची वाट हे सगळं आपल्याला विसरता येणार नाही, असेही श्रीमती. मिसाळ यांनी सांगितले.

राज्यशासन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना राबवत आहे. महिलांचे आर्थिकसामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे या सर्व योजनांचे उद्दिष्ट आहे. शासनाच्या प्रयत्नांमुळे अनेक महिला आज नव्या क्षितिजांकडे वाटचाल करत आहेत. पण अजूनही प्रवास पूर्ण झालेला नाही. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितरित्या सलोख्याने काम करणे गरजेचे असल्याचेही श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी प्रमुख वक्त्यांनी संविधानातील महिलांच्या हक्कांबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत करण्यात आली. उद्घाटकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिलांविषयीच्या कार्याचा गौरव केला आणि संविधानामध्ये महिलांसाठी केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींबाबत प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन  योजना ठोकळे,  समिता कांबळे आणि  क्रांती कुंदर यांनी केले.  दरम्यान मी रमाई या नाट्यप्रयोगाद्वारे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाईंच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. 

Featured post

Lakshvedhi