Thursday, 7 March 2024

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महो

 पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि

अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने

८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्री शक्तीचा

 

            मुंबईदि. ६ : सांस्कृतिक कार्य विभागपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळदादर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कला महोत्सव 2024- उत्सव स्त्री शक्तीचा’ या महोत्सवाचे आयोजन शुक्रवार8 मार्च ते रविवार10 मार्च2024 या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात रोज  संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत  विविध चर्चासत्रमुलाखतीनृत्यगाण्याचे कार्यक्रमनाटक सादर केले जातील.

            महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 8 मार्च2024 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून त्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत शिबानी जोशी घेतील. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीत शेतक-यांच्या विषयांवर भाष्य करणारे विनोदी लोकनाट्य दादला नको  गं बाई’ याचे सादरीकरण सम्यक कलांश  प्रतिष्ठानचे कलाकार सादर करतील.

            9 मार्च2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मिशन विश्व ममत्व फाऊंडेशननागपूर या संस्थेचे तृतीयपंथी कलाकार तू है शक्ति’ हा बहारदार नृत्याविष्कार सादर करतील. त्यानंतर सायंकाळी 6:45 ते 9.30 या कालावधीदरम्यान  प्रसिद्ध यूट्युबर आणि शेफ मधुरा बाचलवित्तीय सल्लागार रचना रानडे आणि वन्यजीव छायाचित्रकार ॠता कळमणकर यांची मुलाखत अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले घेतील. या कार्यक्रमांतर्गत धनश्री देशपांडे आणि श्रावणी वागळे यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमही होईलया कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित करतील.

            10 मार्च2024 रोजी सायंकाळी 6 ते 7.15 या कालावधीत अभिराम भडकमकर लिखित सीता’ या कादंबरीवर चर्चा आणि अभिवाचन लेखिका रोहिणी निनावेअभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर आणि लेखिका स्वरा मोकाशी करतील आणि सायंकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत विदुषी देवकी पंडित यांचा देवी - दिव्य शक्तींचे प्रतीक’ या संकल्पनेवरील रचना सादर होतील. त्याचे सूत्रसंचालन  डॉ. समीरा गुजर-जोशी करतील.

            अमर हिंद मंडळदादर येथे आयोजित हा महोत्सव सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

महाराष्ट्रः गोंड समुदाय' ग्रंथाचे सांस्कृतिक कार्य मंत्री

 महाराष्ट्रः गोंड समुदायग्रंथाचे सांस्कृतिक कार्य मंत्री

सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर येथे गुरुवारी प्रकाशन

आदिवासी गोंड जमातीचा सामाजिक पैलूवर प्रकाश टाकणारा ग्रंथ

            मुंबईदि. ६ :  राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटियर) विभागाने संपादित केलेल्या 'महाराष्ट्रः गोंड समुदायया विशेष प्रकाशनाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ७ मार्च) चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृह येथे सकाळी ११ वाजता होत आहे.

            भारतातील आदिवासी जमातींपैकी संख्येने सर्वांत मोठ्या जमातींपैकी एक अशी ही गोंड जमात आहे. थेट ओरिसापासून मध्यप्रदेशछत्तीसगढमहाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश पर्यंत ती पसरली असून गोंड जमातींनी व्याप्त प्रदेशाला 'गोंडवानाहे नाव प्रचलित आहे. महाराष्ट्रातविदर्भ विभागात प्रामुख्याने गोंड वस्ती असून विदर्भातल्या गडचिरोलीचंद्रपूरयवतमाळनागपूरभंडारागोंदियाआणि अल्प प्रमाणात नांदेडतसेच अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये गोंडांची वस्ती पाहावयास मिळते तर गडचिरोलीचंद्रपूर आणि यवतमाळात त्यांची दाट वस्ती आहे.

            चंद्रपूर व अन्य अनेक जिल्ह्यात या एका शुर वंशजांचे वास्तव्यराज्य कारभाराच्या ऐतिहासिक पाऊलखुणा पहावयास मिळतात तसेच यांचे वेगळेपण देखील अनुभवायास मिळते.'महाराष्ट्र : गोंड समुदायया ग्रंथात त्यांच्या सामाजिक संरचनेच्या विविध पैलुवर प्रकाश टाकून महत्व अधोरेखित करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न केला आहे. मानववंशशास्त्राचा काहीसा आधार घेऊन सामाजिक स्थितीधार्मिक जीवनपरंपराचालीरीती तसेच सांस्कृतिक पैलु


बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

 बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            ठाणेदि.6 (जिमाका) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. हा देश तरुणांचा देश आहे. या तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचे काम हे शासन करीत आहे. यापुढेही करीत राहीलबेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबध्द आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            ठाणे येथील मॉडेला मिल कंपाऊंडवागळे इस्टेटचेक नाका येथे कौशल्य विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

            यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाईउद्योग मंत्री उदय रविंद्र सामंतकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढाखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार प्रताप सरनाईकआमदार किसन कथोरेमाजी मंत्री अर्जुन खोतकरमाजी मंत्री सदाभाऊ खोतमाजी आमदार रविंद्र फाटकमाजी महापौर नरेश म्हस्केकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ताकौशल्य विकास आयुक्तालयाच्या आयुक्त श्रीमती निधी चौधरीकोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकरठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर,  जिल्हाधिकारी अशोक शिनगारेरत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंहमीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकरभिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्यउल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेखकौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेआज या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगार तरुणांना तसेच कुटुंबासाठी महत्वाचा असतो. आज या मेळाव्यात 30 हजार तरुणांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात सरकारच्यावतीने 6 हजार तरुणांना रोजगार दिला जात आहे. नमो महारोजगार मेळाव्यामुळे तरुणांमध्ये उत्साही वातावरण आहे. देशातील पहिले संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधनीचे आज उद्घाटन होत आहे. या केंद्रातून दरमहा 2 हजार मुलांना स्वच्छतेविषयक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासन सर्वांसाठी काम करत आहे. दावोस मधून 3 लाख 73 हजार कोटींचे करार झाले. महाराष्ट्र अनेक विभागात पुढे आहे. राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत 700 दवाखाने सुरू केले. सर्वसामान्य माणसाच्या गरजा काय असतात, त्यांचे दुःख काय असतेयाची मला माहिती आहे. म्हणूनच माझ्या इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे.

            ते पुढे म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे.  राज्यात केंद्र शासनाच्या मदतीने अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत.  ठाणे येथून लवकरच मेट्रो सुरू होणार आहे. राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. शासकीय नोकर भरती बंदी उठवली असून आतापर्यंत 1 लाख नोकऱ्या दिल्या असून 1 लाख स्वयंरोजगार  उभे केले आहेत.  यासाठी 11 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गअटल सेतू यासारखे अनेक प्रकल्प निर्माण होत आहेत. यामुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार आहे. उद्या देखील रोजगार मेळावा सुरु आहे.

            मंत्री श्री. लोढा यांनी आपल्या प्रास्ताविकात नमो महारोजगार मेळाव्याची माहिती दिली. राज्यातील हा सर्वात मोठा महारोजगार मेळावा असून या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला आहे. या मेळाव्यातून तरुणांना मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहे. यापुढेही कौशल्य विकास विभागाकडून अशा प्रकारे बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्धतता हे काम निरंतर सुरु ठेवण्यात येईल.

            कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राज्यगीताने झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 हजार 800 महिलांना शिलाई मशिन आणि घरघंटीचे वाटपरहिवाशी दाखलेहिट ॲक्शन प्लॅनचे उद्घाटनउष्ण्ता उपाययोजना कृती आराखडामहाराष्ट्र स्कोर कार्डचे प्रकाशन असे विविध उपक्रम झाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे ऑनलाईन लोकार्पण

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे लोकार्पण झाले. या प्रबोधिनीच्या माध्यमातून जपानजर्मनीइस्राईल आणि फ्रान्स या चार देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच जर्मनी सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला ज्या द्वारे 5 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे पण इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषा येणे अनिवार्य ठरणार आहे. अशा मागण्या लक्षात घेऊन बाहेर देशातील उपलब्ध रोजगार आणि त्यासाठी आवश्यक भाषाकौशल्य युवकांना मिळावे यासाठी या प्रबोधिनी मध्ये जपानीहिब्रूजर्मन आणि फ्रेंच या 4 भाषांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोबतच परदेशात जाण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा इच्छुकांना मिळाव्या यासाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटरची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

              बदलत्या डिजिटल युगाच्या गरजांसाठीस्वयंरोजगारासाठी या प्रबोधिनीच्या माध्यमातून आर्टिफिशीअल इंटलिजन्स सारख्या नाविन्यपूर्ण विषयाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था तसेच स्टार्टप्स साठी इनक्यूबेशन सेंटर ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

0000


रोजगार देणे पुण्याचे काम

 रोजगार देणे पुण्याचे काम

                                                           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 

भारतातील पहिल्या स्वच्छ भारत स्किल अकॅडमीच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

ठाणेदि. :- कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार मिळाला कीसंपूर्ण कुटुंबाला आधार मिळतो. म्हणूनच एखाद्याला रोजगार देणे हे पुण्याचे काम आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

येथील कोपरी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाईकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढामाजी आमदार रविंद्र फाटकमाजी महापौर नरेश म्हस्केकौशल्य विकास आयुक्तालयाच्या आयुक्त श्रीमती निधी चौधरीकुलगुरु अपूर्वा पालकरबी.व्ही.जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाडनॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे अजय रैना आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शासनाकडून निर्णय झाला होता कीराज्यातील बेरोजगार युवकांना 75 हजार शासकीय नोकऱ्या देणारमात्र प्रत्यक्षात एक लाख 60 हजार शासकीय नोकऱ्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. शासनाने शासकीय नोकर भरती बंदी उठविली. कौशल्य विकास विभागाने अतिशय उल्लेखनीय काम करून दाखविले असून या विभागाकडून आतापर्यंत लाख नोकऱ्या दिल्या गेल्या असून लाख स्वयंरोजगार  उभे करण्यात आले आहेत.

ते पुढे म्हणाले कीगरज म्हणून नोकरी तर करायला हवी मात्र नोकऱ्या देणारे हातही घडविले पाहिजे. बीव्हीजी चे हणमंतराव गायकवाड यांनी पुढच्या दहा वर्षात दहा लाख नोकऱ्या देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आजच लोकार्पण केलेले देशातील पहिले स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल डेव्हलपमेंट केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेतून समाजाच्या स्वस्थतेकडे जाण्याचा मार्ग दाखविला. हाच आदर्श समोर ठेवून या शासनाने देखील डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महानगरांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिलेच आहे. त्याच पद्धतीने डीप क्लिन ड्राईव्हचे अभियान सुरु आहे.

विविध सामाजिक संस्थांनीसामाजिक कार्यकर्त्यांनी बेरोजगारांची यादी बनवावी व ही यादी अशा संस्थांकडे द्यावी. या बेरोजगार तरुण-तरुणींना कौशल्य विकास प्रशिक्षणानंतर त्यांना तीस हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अनेकांनी आपले स्वयंरोजगार सुरू केले. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देखील दहा हजार आठशे महिलांना आपण शिलाई मशीन व घरघंटी दिल्या. ही व्यवसायाची सुरुवात आहेअशा छोट्या छोट्या व्यवसायातून तोच व्यवसाय व्यवस्थित केल्यानंतर भविष्यात ती व्यक्ती एक मोठी व्यावसायिक बनतेअसे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले,  महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहेमी स्वत:ला सीएम पेक्षा कॉमन मॅन समजतो. कार्यकर्ता समजतो. म्हणूनच मला सर्वसामान्यांचे दुःख समजते. सामान्य माणसाचे हे दु:ख समजून घेवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे सर्वत्र तयार होत आहे. समृद्धी महामार्गअटल सेतू यासारखे प्रकल्प हे गेम चेंजर प्रकल्प आहेत. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून राज्याचा जास्तीत जास्त विकास करण्याचे आमचे काम सुरू आहे. तीर्थक्षेत्रगड किल्ले स्वच्छ ठेवणेही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत अनेक तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्याचा या शासनाचा प्रयत्न सुरु आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारे हे सरकार आहे

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व राज्यगीताने झाली. सूत्रसंचलन शिबानी जोशी यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्यामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित महत्वपूर्ण करार झाला. कौशल्य विकास आणि रोजगार या विषयात उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बी.व्ही.जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाडनॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे अजय रैना यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कुलगुरु अपूर्वा पालकर यांनी स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. आज वाढती कार्यक्षेत्रे, मॉल्स, रुग्णालये, औद्योगिक आस्थापना, शैक्षणिक संस्था इत्यादी सर्वांना सुविधा स्वच्छ ठेवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. सुविधा क्षेत्र विकसित होत असून असून या क्षेत्रात 2024 सालात 3 लाख 50  हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 2023 च्या तुलनेत ही वाढ 15 ते 20 टक्के जास्त असेल.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीद्वारे विविध प्रकारचे प्रमाणपत्रे आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. अभ्यासक्रमाची रचना उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरज लक्षात घेऊन करण्यात आली असून नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश आहे. येथे मॅकेनाईज्ड हाऊसकिपींग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहेअशी माहिती दिली.

या अकॅडमीची वैशिष्ट्ये

·         सुविधा व्यस्थापनातील आवश्यक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवण्यासाठी लघु आणि दीर्घ कालावधीचे शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

·         सुविधा क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान देण्यावर भर.

·         उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सोयी आणि उपकरणांनी सज्ज.

·         भारत विकास ग्रुपचे सर्वांगीण व्यस्थापनासाठी सहकार्य.

00000


 

मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम एप्रिलपासून मुंबईत झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी

 मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम


एप्रिलपासून मुंबईत झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी


मुंबईकरांना आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्र्यांची आपला दवाखान्याला अचानक भेट


 


            मुंबई, दि. 7 : मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला.


            मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल पासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्री यांचे अचानक आगमन झाले. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्ता गृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्री यांनी संवाद साधत ‘आपला दवाखाना’ विषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.


            यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस,पेपरलेस मिळत आहेत.


            मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.


            यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त वेलारासू, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.


००००

Wednesday, 6 March 2024

पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग

 पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा

 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ

रेल्वेमेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

       मुंबई, दि. 6 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी - चिंचवड महानगरपालिका ते निगडीपुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपुणे मेट्रोला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

            प्रधानमंत्री यांनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील या मेट्रो प्रकल्पांची दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी झाले होते.

            प्रधानमंत्री लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.

            यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे या पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते आणि आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

            प्रधानमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

            हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.

            मागील पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे.

            आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे.

            वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे.

            सर्व प्रकल्प आणि विकासकामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

0000


१६ ते २२ मार्च कालावधीत ‘जलजागृती सप्ताह

 १६ ते २२ मार्च कालावधीत ‘जलजागृती सप्ताह’

 

            मुंबई दि. ५ :- आंतराष्ट्रीय स्तरावर २२ मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ ("Water for Peace") म्हणून साजरा केला जाणार आहे.  या निमित्ताने राज्यात १६ ते २२ मार्च२०२४ या कालावधीत "जलजागृती सप्ताह" साजरा करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाचे उपसचिव (लाक्षेवि) म. रा. वानखेडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi