Thursday, 6 January 2022

 *बायकांचे ११ प्रकार*


१. *आळशी बायको*:- 👸🏻

स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा.

२. *धमकवणारी बायको*:- 🙄

कान खोलून ऐकून घ्या

या घरात 

मी राहीन किंवा तुमची आई राहील.

३. *इतिहासाची आवड असलेली बायको* :- 

👵🏻 सर्व जाणून आहे मी

तुमचं खानदान कसं आहे ते.

४. *भविष्य-वाचक बायको*:- 

😴 पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही. 

५. *गोंधळलेली बायको*:- 🙅🏻

तुम्ही माणूस आहात की पायजमा? 

६. *स्वार्थी बायको*:- 🙆🏻

ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे. तुमच्या बहिणींना मटकवण्यासाठी नाही. 

७. *शंकाळू बायको*:- 💁🏻

फोनवर कोणाशी बोलत होता 

इतक्या वेळेपासून?

८. *अर्थशास्त्रज्ञ बायको*:- 🙇🏻

कोणता खजिना जमा केलेला आहे 

जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?

९. *धार्मिक बायको*:- 😌

देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली. 

१०. *निराश बायको*:- ☺

माझ्या नशीबात हेच फुटकं भांड 

लिहिलेलं होतं का? 

आणि शेवटी ☆☆☆☆☆

११. *टिकाऊ बायको* :- 👩🏻

मी होते म्हणून टिकले

दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती.

यातून तुमची कोणती आहे? तपासून घ्या!😜😜😜😜😜

 *डॉ.सुधीर क्षीरसागर* *9822094196*

 *एम.बी.बी.एस.(पुणे), डी.ए.(औरंगाबाद)*

 *रजी.नं 58329*

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹               

          *घाबरू नका..*

*प्रत्येक ताप सर्दी खोकला हा कोरोना नसतो..*

*कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येवू शकते..*

*कोरोना ..९९% बरा होतो.*

*कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी हा औषधौपचार कमीत कमी पाच दिवस नक्की घ्या.*

*संशयित कोरोनाचा उपचार* *घरीच करा..*

*ताप-/अंगदुखी*

*Tab Calpol 500* 

*(स...दु...सं.)*

*सर्दी-*

*Tab Triz/Tab Levocet m* 

*(स‌‌....संध्याकाळ)*

*खोकला-*

*Tab Azee 500* 

*(रोज 1)* *आणि*

*Sy.Grilinctus BM 10 मिली.*

*(स--- दु--- सं)*

*जुलाब..*

*Tab O2*        

*(स....सं)* *आणि*

*Tab Ocid 20* 

*(स....सं)* 

*ORS Powder.*

*दिवसभर हवे तितके*

*उलटी मळमळ*

*Tab.Acilok RD* 

      *+स...संध्या)*..

         किंवा

*Tab Emcet 4mg* 

*जेवणापुर्वी एक ते दोन तास*

*सर्वांनी पाणी,पातळ पदार्थ भरपुर घ्या*

*------------------------- ०*

*खालील औषधे आजारी नसले तरी घ्या*

*Tab Limcee रोज १ (Vit C)* 

*लिंबू, संत्री*

*Tab Arovit. रोज १ (Vit A)* 

*गाजर, शेवगा*

*Tab Evoion रोज:१. (Vit E)*

*बदाम, शेंगदाणे*

*लहान मुलांच्या औषधौपचाराचे प्रमाणा साठी* 

*फोन करा...विनामुल्य सेवा*

*------------------------- ०*

*आपली नियमित चालू असलेली औषधे बंद करू नका !*

*---० आहारात 'क' जीवनसत्वयुक्त*

*---० पदार्थ भरपुर घ्या..*

*---० नियमित.. पौष्टिक अन्न !*

*---० नियमित..सलाग व्यायाम !*

       *(चालणे सर्वात उत्तम)*

*---० नियमित..पुरेशी झोप !*

*---० नियमित..आनंदी रहा !*

*---० नियमित..हसत रहा !*

*------------------------- ०*

 *उगीचच मोठ्या हॉस्पीटल्स, मध्ये अॕडमिट होऊन खिशाला कात्री लावून नका...*

*------------------------ ०*

*लक्षात ठेवा...*

*कोणाकडे ही *जादूची कांडी नाही.*.

*छोट्या आणि मोठ्या रुग्णालयांत एकाच प्रकारचा आणि सारखाच औषधौपचार केला जातो...*

*कोरोना टेस्ट कधीही आणि वारंवार सुध्दा पॉझिटिव्ह येवू शकते.* 

------------------------- ०

*लक्षात घ्या..*

*आजपर्यंत एकही नेता,अभिनेता, उद्योगपती, क्रिकेटपटू किंवा व्ही.आय.पी.* कोरोनाने मृत्यूमुखी पडला नाही...*

*याचे कारण त्यांनी *मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज केला म्हणून नाही तर "कोरोना" हा सौम्य आजार आहे म्हणून ते बरे झाले आहेत!*


*तुमच्या अज्ञानाचा आणि घाबरलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेवून तुम्हाला लुटले जाऊ शकते..*

*तेव्हा सावध व्हा!*

*१)डॉ‌.निलेश पाटील*

*२)डॉ.पल्लवी पाटील*

*३)डॉ.संग्राम पाटील.*

*४)श्री.संदिप माहेश्वरी* 

*यांच्या कोरोना सबंधित पोस्ट नक्की पहा..ऐका!*

*पाच दिवसांनंतर..बरे वाटले नाही किंवा खालील त्रास वाढला तरच..*

*जास्त ताप..*

*श्वासोश्वासास भयंकर त्रास होत असल्यास,*

*दम खुपच लागत असल्यास..*

*प्रचंड खोकला येत असल्यास..*

*इतर छातीचे आजार नसल्याची खात्री करणे ताप येणारे आजार नसल्याची खात्री करणे*

*नंतरच सरकारी दवाखान्याची संपर्क करा...*            

*नियमित..माणूसकी जपा!* 

*आपल्या सर्वांना आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक मंगलमय शुभेच्छा...*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आपलाच मित्र,*

*डॉ.सुधीर क्षीरसागर*

*कृपया ही पोस्ट आपली मित्र-मंडळी, स्नेही, परिवार आणि हितशत्रू यांना सुध्दा शेअर करा...*

************************************

 *कोरोना झाल्यावर काय कराल ?*

*सर्व प्रथम जाणून घ्या जर सर्दी झाली असेल आणि तुमचा mucous (शेम्बूड) पांढरा वाहत असेल तर अजून काही विपरीत परिणाम नाहीये.*

*जर mucous चा रंग पिवळा किंवा हिरवा असेल तर तुम्हाला अँटिबायोटिक्स ची नितांत गरज आहे आणि अशा अवस्थेत तुम्ही टेस्टिंग ला गेलात तर १००% तुमची टेस्ट POSITIVE येणार.*

*RTPCR टेस्टचा निकाल दोन दिवसांनी मिळतो आणि RTPCR टेस्टचा निकाल तुम्ही जलद सुद्धा करू शकता त्यानुसार तुम्हाला त्वरित कळेल की तुम्ही POSITIVE आहात की NEGATIVE आहात.* 

*जर तुम्ही POSITIVE झाले असाल तर सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की तुम्ही जगातील सर्वात " फुसक्या "आजाराला बळी पडला आहात. ह्याचा इलाज जर तुम्ही सरकारी दवाखान्यातून केला तर तुम्ही विनाखर्च १००% बरे होणार आहात.* 

*आपल्याकडे पैशांची कमतरता नाही, म्हणून या फुसक्या आजारावरील इलाजासाठी जर आपण खाजगी रुग्णालयात गेलात तर मात्र तुमची खैर नाही. ह्याचे कारण पुढीलप्रमाणे -*

*(०१)* 

*खाजगी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला सर्दी व ताप नियंत्रणात आणण्यासाठी गोळ्या औषधे आणि सलाईन दिले जातील.* 

*(०२)*

*सरकारी रिपोर्ट वर भरोसा नाही म्हणून पुन्हा RTPCR करण्यास भाग पाडतील त्यामुळे दोन दिवसांचे बेड चार्जेस वाढतीलच शिवाय RTPCR रिपोर्टसाठी रुपये ८०० द्यावे लागतील* . 

*(०३)*

*रिपोर्ट प्राप्त झाल्यावर RTPCR चिकित्सेनुसार स्कोर जास्त आसल्याचे आपणास सांगून, विषाणू किती खोलवर गेला हे समजण्यासाठी HTRSCAN टेस्ट करवून घेण्याचा निर्णय घेण्यात येईला व त्यासाठी येणारा कमीत कमी खर्च म्हणजे HTRSCAN टेस्टसाठी रुपये २५०० आणि ऍम्ब्युलन्स किमान खर्च रुपये १०००/- ते ३०००/-.*

*(०४)*

*या चिकित्सेनंतरच तुमच्यावर इलाज सूरू करण्यात येतील. सर्दी नियंत्रणासाठी कांही गोळ्या देण्यात येतील, तापासाठी काही वेळ्या गोळ्या देण्यात येतील, सांधे दुखत असल्यास व्हिटॅमिन डी३ च्या गोळ्या देण्यात येतील आणि चव आणि वास गेला असल्यास व्हिटॅमिन "क" च्या गोळ्या देण्यात येतील. वैध्यक शास्त्रानुसार याला उपचार समजले जात नाही.*

*(०५)*

*कांही दिवसानंतर तुम्हाला FABIFLUE 800 MG च्या गोळ्यांचा कोर्स चालू करण्यात येईल. ह्या FORTE प्रकारातील गोळ्यांची किंमत रूपये २५६० रुपये. एवढ्या महाग गोळ्या घेतल्यामुळे "कोरोना " या आजाराच्या भयानक तिव्रतेबाबत तुमची मानसीक खात्री होईलच आणि या १५ दिवसांच्या उपचारानंतर तुम्हाला घरी पाठविण्यात येते. या पंधरा दिवासांत तूमच्या खिशांतून राजरोसपणे किमान रुपये ३,००,००० लुटण्यात येतात.* 

*(०६)*

*किमान पंधरा दिवस वैध्यकिय सल्यानुसार नियमितपणे FABIFLUE 800 MG पॉवरच्या गोळ्या तुम्ही शरीरात ढकलत असल्यामुळे, आपल्या एक गोष्ट लक्षात येत नाही की भविष्यांत ह्याचा काही विपरीत परिणाम आपल्या शरीरावार होणार आहे का ?. झालाच तर तो आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर होईन हे भविष्यात कळेलच.* 

*(०७)*

*कोरोना वैध्यकिय उपचारांमुळे तुम्ही भावनिक होऊन डॉक्टरला हाथ जोडाल आणि तुम्हाला वाटेल त्यांच्या प्रयत्नामुळेच तुम्हाला जीवदान मिळाले. परंतु असे काही नाही त्याने पक्के तुम्हाला वेड्यात काढून तुमचे खिसे रिकामे केलेले असतील.* 

*मित्रांनो, सांगायची गम्मत अशी की ज्या FORTE प्रकारातील गोळ्या ही धुरंदर मंडळी तुम्हाला देत आहे त्याचा निर्माता आहे GLENPHARMA कंपनी. या औषधी गोळ्यां शरीरातील INFECTION दूर करण्या करिता ह्या गोळ्या बनविलेल्या आहेत बाकी काही नाही.*

*आपण जे म्हणतो की कोरोना वर इलाज नाही त्यावर हा उपाय एकदम बरोबर बसत आहे. त्यामुळे लोक बरे होत आहे.*  

*आपल्या हातात १० ते २० हजार रुपये किमतीचा महागडा फोन असून देखील आपण GOOGLE वर काही खात्री करून घेत नाही, ही सर्वात मोठी तुमची चूक म्हणावी लागेल.* 

*सरकारी दवाखान्यात ह्या महागड्या गोळ्या अजिबात दिल्या जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा HTRSCAN ही काढण्यास सांगण्यात येत नाही.*

*सरकारी दिल्या जातात त्या फक्त DOXY 1 - LDR च्या गोळ्या. या औषधी गोळ्या जर आपण स्वत: बाहेरून खरेदी केल्यात तर ह्याचे अवघे पाकीट ९५ रुपयांना मिळते आणि रोजच्या जेवणानंतर दोन गोळ्या अशा प्रकारे नियमितपणे पाच दिवस गोळ्या घेतल्यास तुमचा कोरोना कुठाल्या कुठे निघून जातो हे कळत देखील नाही. आणि तुम्ही अगदी ठणठणीत होऊन फिरण्यास मोकळे.*

*आता तुम्ही ठरवा खाजगी इलाज ३,००,०००/- रुपयांचा की सरकारी रू. ९५/- चा इलाज ?*   

*[ टिप - दोन्ही गोळ्यांच्या संदर्भात तुम्ही GOOGLE वर माहिती जाणून घेऊ शकता. ]*

***********************************

Wednesday, 5 January 2022


 

 तुम्ही जिथे सदस्य आहात त्या ग्रुपवर पोस्ट करा.

 जर तुम्हाला, जन्मापासून मूकबधीर असलेले कोणतेही मूल माहित असेल तर आता कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीच्या शोधामुळे या अपंग मुलाला बरे करणे शक्य झाले आहे.

 शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10 ते 12 लाख खर्च येतो, परंतु काळजी करू नका, आता रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी, जिल्हा 3141 च्या मदतीने, ही शस्त्रक्रिया SRCC हॉस्पिटल, मुंबई येथे विनामूल्य केली जाते.

 कृपया इतर ग्रुपवर पोस्ट करा जेणेकरून गरजू लोकांपर्यंत संदेश पोहोचेल.

 संपर्क :-

 रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी

 DG Rtn राजेंद्र अग्रवाल

 9820085149

 सादर. 🙏

Tuesday, 4 January 2022

 Continue.मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठवावे. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या दोन प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.

ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.

जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखण अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.

गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय मुंबई-32 येथे पाठवाव्यात.

शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधी विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.

2021 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे. तसेच, कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

विकास योजना संदर्भातील

समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार

ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात.विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

केंद्र शासनाचे “स्वच्छ भारत अभियान” आणि राज्य शासनाचे “स्वच्छ महाराष्ट्र अभियान”प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.

स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखण केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिद्धी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी “पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार” देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), यांच्या नावाने मुंबई येथील मुख्यालयातील पत्त्यावर पाठवावे.

छायाचित्रकार पुरस्कार

“तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार” स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.

महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार

विविधविकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.

या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे. 

प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.

इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.

0000



 राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2022 असा आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.inआणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे : -

पुरस्कारांची माहिती अ.क्र - पुरस्काराचेनाव -पारितोषिक

1.बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.   (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

2. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र).

3. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

4.मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

5यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

6.पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार रुपये,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

7 .तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये ,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

8.केकीमूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तr

51 हजाररुपये ,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

9.समाज माध्यम पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार rs (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

10.स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

11.पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार.

12.दादासाहेब पोतनीस पुरस्कार,

नाशिक विभाग,51 हजार रुपये.(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

13.अनंतराव भालेराव पुरस्कार,

औरंगाबाद आणि लातूर विभाग

51 हजाररुपये,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

14.आचार्य अत्रे पुरस्कार,

मुंबई विभाग

51 हजाररुपये.(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

15.नानासाहेब परूळेकर पुरस्कार,

पुणे विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

16 .शि.म.परांजपे पुरस्कार,

कोकण विभाग

51 हजाररुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

17.ग.गो.जाधवपुरस्कार,

कोल्हापूर विभाग

51 हजाररुपये (मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

18.लोकनायकबापूजीअणेपुरस्कार,

अमरावती विभाग.

51 हजाररुपये.(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

19.ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,

नागपूर विभाग.

51 हजाररुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे :-

नियम व अटी

राज्य / विभागीय पुरस्कार

पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील पाच वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठवावे. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या दोन प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.continue

अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील

 कोविड प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे

-शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

            मुंबई, दि. ३ : कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. याअनुषंगाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. आता १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरणास प्रारंभ झाला असल्याने सर्व शाळांनी नियोजन करून या वयोगटातील विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे. जेथे अद्यापही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नसेल तेथे त्यांनीही तातडीने लस घ्यावी. शाळांमध्ये कोविडसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून गर्दीचे उपक्रम टाळावेत. शाळेमध्ये गर्दी टाळण्यासाठी ५० - ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवावी. प्रात्यक्षिके गर्दी टाळून घ्यावीत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शक सूचनांचे पालन, लसीकरण आदींबाबत दक्षता घ्यावी. विद्यार्थी अथवा शिक्षक/ कर्मचारी कोविड संक्रमित झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन वर्ग अथवा शाळा गरजेनुसार बंद ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

            शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच लसीकरण होत असल्याने शाळांनी गर्दी टाळून योग्य नियोजन करावे. विद्यार्थी अथवा शिक्षक कोविड संक्रमित झाल्यास ती वर्गखोली सॅनिटाईज करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. बहुतांश जिल्ह्यांत १५ ते २० तारखेपर्यंत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभाग दक्ष आहे. राज्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ६५ लाख २३ हजार ९११ इतकी असून सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

            या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका/नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आदी ऑनलाईन उपस्थित होते.

००००

                                                                                                                 वि.वृ.क्र.12

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरिता

7 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारी 2022 रोजी होण

               मुंबई, दि.3 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 9 डिसेंबर 2021 पासून करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवारांनी 7 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार, 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत घेण्यात येणार आहे, असे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

            केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्रे नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व कोल्हापूर येथील प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून www.siac.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) अर्ज मागवण्यात येत आहेत. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना सन 1976 साली झाली असून महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांचा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत टक्का वाढावा या उदात्त हेतूने करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. सन 1976 पासून आजतागायत संस्थेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे व संस्थेत प्रशिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी देशातील वेगवेगळ्या राज्यात व परदेशात देखील भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत,अशी माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ.खुशपत जैन यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

00000



 

Featured post

Lakshvedhi