Tuesday, 31 December 2024

कूछ तो लोग कहेंगे

 लोक माझ्याबद्दल  काय विचार करतात?लोक माझ्याबद्दल काय बोलतात? लोक माझ चुकीच  valuation करतात. एक ना अनेक प्रकारे  आपण लोकांचा विचार करत असतो. आपण इतका लोकांचा विचार करतो की आपण स्वतः पण ह्या जगात आहोत ह्याचा आपल्याला विसर पडतो. 


मी चांगला म्हणून  पूर्ण जगसुद्धा चांगल असलच पाहीजे असा विचार करणं म्हणजे ओढ्याप्रमाणे ऊन्हाळ्यात समुद्रही सुकायलाच हवा अशी अपेक्षा करणं.


एक तर आपल स्वतःचं व्हॕल्युएशन आपल्याखेरीज दुसरं कोणीच करू शकत नाही,कारण प्रत्येक व्यक्ती  तिच्या तिच्या  विचारसरणीप्रमाणे, त्या दृष्टीने  तुमच्याकडे  बघणार, जे कधीच पूर्णतः  खर नसणार. त्यामुळे कोण आपल काय व्हॕल्युएशन करतय ह्यापेक्षा  मी स्वतःला किती ओळखते हे महत्त्वाचं आहे. 


आता मुद्दा राहीला लोक काय विचार करतील ,काय बोलतील आपल्याबद्दल हा  तर तिथेही हाच नियम आहे,जशी त्यांची विचारसरणी तशी त्यांची कृती. एक लक्षात  ठेवायचं तुमच्या  बद्दल बोलावस वाटतय तुमच्या बद्दल विचार करावासा वाटतोय त्यांना म्हणजे  तुम्हि महत्त्वाचे आहात त्यांच्यासाठी. कारण महत्त्व  नसलेल्या गोष्टींवर विचार केला जात नाहि किंवा त्यावर बोललपण जात नाहि.  त्यामुळे ऊगीच स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्यापेक्षा, आपण महत्त्वाचे आहोत हा विचार करायचा आणि अधिकाधिक स्वतःवर फोकस करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं. बस इतकच......

माझे माहेर पंढरी भारतातील पहिलं माहेरघर सामाजिक

 भारतातील पहिलं माहेरघर  

लेखक: निरेन आपटे 


माहेरी जाऊन राहावसं वाटतंय? तिथे आपले लाड व्हावेत असंही वाटतंय? आणि सोबत मैत्रिणींना नेता आलं तर?...स्वतःच्या माहेरी हे सगळं कदाचित होणार नाही, पण असं एक माहेरघर आहे जिथे सगळं होईल. असं महेरघर उभं केलं आहे प्रभाताई शिर्के ह्यांनी. बदलापूरमध्ये. ह्या घराबद्दल आणि प्रभाताईंच्या प्रेरक प्रवासाबद्दल सांगत आहेत निरेन आपटे. 


बदलापूरमध्ये प्रभाताईंनी बंगला घेतला आहे तो महिलांना आणि पुरुषांनाही माहेरचा आनंद घेता यावा ह्यासाठी. बंगल्याच्या दारात महिला आल्या की त्यांना ओवाळले जाते. भाकर तुकड्याने नजर काढली जाते, गरम पाण्याने पाय धुतले जातात आणि प्रभाताई हसतमुखाने ह्या महिलांना माहेरवाशीण असल्याचा आनंद देतात. जेवायला पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, पुरी भाजी असे जे मागाल ते मिळते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार आहेत.  शिवाय इथे राहायची, भरपूर गप्पा मारायची, गाणी गायची आणि नाचायचीही सोय आहे. हे सगळं करताना प्रभाताईंचा सहभाग असतो. प्रत्येक महिलेला काय हवं ते त्या स्वतः पाहतात. चहा, नाश्ता असे सगळे लाड पुरवतात. डोहाळजेवण, व्याहीजेवण, केळवण, वाढदिवस असे कार्यक्रम करतात. पुरुषांचं माहेर नसतं, पण प्रभाताईंनी तीही सोय केली आहे. माहेरवाशिणींचे लाड करणं हा प्रभाताईंचा व्यवसाय आहे आणि नव्या जीवनशैलीमुळे अनेक ग्रुप त्यांच्याकडे येत आहेत. त्यासाठी त्या अत्यंत माफक दर आकारतात. 


माहेरवाशिणींचे लाड करण्याचा हा व्यवसाय भारतातला बहुदा पहिलाच व्यवसाय आहे. ह्या अनोख्या संकल्पनेमुळे अनेक महिलांना आनंद मिळत आहे. हा आनंद देणाऱ्या प्रभाताईंचा प्रवासही खूप काही शिकवणारा, प्रेरणा देणारा आहे. विशेषतः ज्या महिलांसमोर संकट उभं राहतं. ऐन उमेदीत दुःखाचं आभाळ कोसळतं त्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रभाताईंचा  जीवनप्रवास नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो. 


प्रभाताईंचे यजमान आकाशवाणीवर बासरी वाजवण्याचे, संगीत देण्याचे काम करत असत. दोघांचा प्रेमविवाह झाल्यामुळे संसार चांगला सुरु झाला होता. पण दैवाने उलटे फासे टाकले. यजमान रियाज करत असताना त्यांना हार्ट ऍटॅकचा झटका आला. त्यांची तडफड पाहून प्रभाताई क्षणभर हवालदिल झाल्या. पण लगेच खंबीर होऊन हालचाल केली आणि यजमानांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा कसाबसा जीव वाचवला. त्यांचा जीव वाचला खरा, पण अपंगत्व आले. ते अंथरुणाला खिळून राहिले. त्यांची सेवा करण्यात प्रभाताईंचा दिवस जाऊ लागला. आर्थिक परिस्थिती खराब होत गेली. चार पैसे मिळावेत म्हणून त्या काही घरांमधून पोळी-भाजी बनवण्याचं काम करू लागल्या. एकीकडे डॉक्टरांकडे चकरा चालू होत्या. यजमानांवर उपचार होत होते. तो खर्च वाढत होता. त्यात डॉक्टरांनी सल्ला दिला की मुलबाळ होऊ देऊ नका. कारण पित्याच्या अशा स्थितीमुळे मुलामध्ये व्यंग येण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रभाताईंसमोर काहीही भविष्य उरलं नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. यजमानांना जगवण्यासाठी धावपळ सुरु केली. आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे हे लक्षात आल्यावर त्यांनी जिममध्ये इंस्ट्रक्टर होण्यासाठी तळवलकर जिममध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्या इंस्ट्रक्टर झाल्या. एकीकडे पोळी भाजीचे डबे पोहचवत होत्या. यजमानांकडे पाहत होत्या आणि आता स्वतःचं जिम सुरु केलं. वॉकर आणि सायकल घेऊन महिलांसाठी जिम सुरु केलं. सगळ्यांशी त्या प्रेमाने वागत होत्या. त्यामुळे ६ महिन्यात गर्दी वाढली आणि आणखी मोठी जागा घ्यावी लागली. 

पहाटे लवकर उठून रात्री उशिरापर्यंत राबायला सुरुवात झाली. प्रभाताईंच्या हाताला अनोखी चव होती. त्यांचे डबे सगळ्यांना आवडू लागले. एकदा एकावेळी ५०० पुराणपोळ्यांची ऑर्डर आली. प्रभाताईंनी ठरवलं होतं की कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही. कमी वेळात इतक्या पुरणपोळ्या बनवण्याचं आवाहन त्यांनी स्वीकारलं. त्या पुरणपोळ्या इतक्या रुचकर बनल्या की प्रभाताईंना सगळे सुगरण मानू लागले. त्या कामात बुडून गेल्या. सकाळी घरातून निघताना यजमान म्हणायचे की लवकर ये! त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून प्रभाताईंना वाईट वाटे. ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्या मुलुंडला राहतं होत्या. घर छोटं होतं. आपला एक बंगला असावा असं स्वप्न होतं आणि स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल ते कष्ट करायची तयारी होती.


अशात बदलापूरला जागा मिळत होती. पण ती विकत घेता येईल इतके पैसे नव्हते. तेव्हा प्रतिभाताई पिळगावकर ह्यांनी मोठी रक्कम देऊ केली. शिवाय बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेच्या मॅनेजरने त्यांचा जिम आणि खानावळीचा व्यवसाय पाहिला. आपल्या समोर आलेला ग्राहक शून्यातून सगळं निर्माण करत आहे हे पाहून मॅनेजर भारावला आणि त्यांनी कर्ज मंजूर केलं. 


यजमानांची सेवा केल्यामुळे बदलापूरच्या जागेत आपण वृद्धाश्रम सुरु करावा आणि वृद्धांची सेवा करावी असा विचार मनात आला. पण तोवर स्वतःच वय वाढलं होतं. शिवाय यजमानांकडे पाहायची जबाबदारी होतीच. त्या जागेत जिम चांगलं चालू लागलं. तिथे डायटेशियन आणि डॉक्टर नेमला. पण जितक्या प्रभाताई कणखर, तितकीच नियती कठोर होती. २००५ साली पूर आला आणि पुराचं पाणी घरात शिरलं. सगळे कष्ट पाण्यात बुडाले. पुन्हा शून्यापासून उभं करायची वेळ आली. त्यावेळी विजूताईनी खूप मदत केली. दरवेळी कोणी ना कोणी महिला मदतीसाठी उभी राहायची. संकट इथेच थांबलं नाही. यजमानांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी सल्ला दिला की ते वाचणार नाहीत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेऊन आणखी खर्च करू नका! अखेरीस जे विधिलिखित होतं तेच घडलं. यजमानांनी प्रभाताईंसमोर प्राण सोडला. हा घात इतका मोठा होता की आत्महत्येचे विचार मनात यायला लागले.आसपासचे लोक धीर द्यायला येत होते. शेवटी जे घडेल ते स्वीकारायचं हे मनाशी ठरवून पुन्हा उभं राहायचं ठरवलं. जिवलग मैत्रीण सुवर्ण जोशी हिने सल्ला दिला की तुझ्या जागेत महिलांसाठी माहेर सुरु कर. ही अभिनव संकल्पना होती. प्रभाताईंनी सुरुवात केली. पहिल्यांदा १५ महिलांचा ग्रुप आला. त्यांना दारात ओवाळून आत घेतलं. गरम पाण्याने पाय धुतले. सायंकाळी शुभंकरोती म्हणून घेतलं आणि त्यांना पुलाव-कढी बनवून खायला घातली. त्या महिलांना स्वतःच्या आईकडे आल्यासारखे वाटले. त्यांना इतकं प्रेम मिळालं की त्यांनी आणखी काही जणांना सांगितलं. अशाप्रकारे ह्या माहेरचा प्रचार होत गेला आणि एकामागून एक ग्रुप येऊ लागले आणि प्रभाताईंना एक नवीन काम मिळालं.  हे काम करताना मनाशी एक निर्णय घेतला की ज्या महिला परिस्थितीने पिचून गेल्या आहेत त्यांना मदत करायची. म्हणून त्यांनी स्वतःच्या माहेर घरात अनेक गरजू महिलांना स्वयंपाक, साफ सफाई अशी कामे दिली. रोजगार मिळवून दिला. ह्यापुढे आणखी गरजू महिलांना काम द्यायचं त्यांचं ध्येय आहे. अनेक पीडित महिलांचे संसार उभे करावे असं स्वप्न आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी इतकी जपली की २०१९ साली आलेल्या पुरात पन्नास लोकांना स्वतःच्या घरात आश्रय दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था केली. बदलापूर शहर अध्यक्ष वामनदादा म्हात्रे ह्यांना ही गोष्ट कळली. त्यांनी येणारी मदत प्रभाताईंकडे फिरवली आणि तिथून ती अनेक बदलापूरकरांना मिळत गेली. म्हणजे स्वतः संकटे झेलुनही प्रभाताई इतरांना संकटात मदत करू लागल्या. कष्ट, जिद्द, चिकाटीने फक्त त्यांचं नाही तर अनेकांचं भलं केलं.  


दरम्यान माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या महिलांची संख्या पुन्हा वाढू लागली. आनंदी झालेल्या महिलांनी ह्या माहेरघराचे विडिओ बनवून समाज माध्यमांवर टाकले. ते विडिओ अमेरिकेतही गेले. आपोआप ह्या माहेरघरात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यांचे लाड पुरवताना चकल्या, पुरणपोळ्या, मोदक, आम्रखंड अशा पदार्थांची ऑर्डर घेणे चालू होते. एकदा एकावेळी ७०० पुराणपोळ्यांची ऑर्डर आली. कोणतीही ऑर्डर आली तर नाकारायची नाही हे ठरवलेच होते. त्यामुळे आसपासच्या महिलांना सोबत घेऊन ऑर्डर पूर्ण केली. ग्राहक समाधानी होत गेले आणि त्यांची मागणीही वाढत गेली. नियती जणू प्रभाताईंची परीक्षा घेत होती. लॉक डाउनचही संकट येऊन गेलं. पण प्रभाताईंनी हार मानली नाही. दोन्ही लॉक डाउननंतर पुन्हा अनेक महिला माहेरवाशिणीचं सुख घ्यायला येत आहेत. एका ७० वर्षाच्या आजोबांनी तर फोन करून कळवलं की फक्त महिलांचे लाड करू नका, पुरुषांनाही माहेरपणाचं सुख द्या. तिथून पुरुषांचही स्वागत सुरु झालं आहे. सगळंच अनोखं आहे. 


संकटे येतात. अक्षरशः आयुष्य उध्वस्त करून जातात. जीवलगांचा मृत्यू, पूर-दुष्काळ, आर्थिक अडचणी, बेरोजगारी पाचवीलाच पुजलेली असते. पण त्यातून यशाचा मार्ग काढता येतो. प्रभाताई शिर्के ह्यांचा जीवनप्रवास हाच संदेश देत आहे. कष्ट, जिद्द, चिकाटी ह्या बळावर मोठी संकटही दूर करता येतात.

प्रभा शिर्के ह्यांचा संपर्क क्रमांक: + 91 9923564125


हे अनोखं माहेरघर तुमच्या मित्र-मैत्रिणींना कळवण्यासाठी हा लेख इथून कॉपी-पेस्ट करून whatsapp किंवा फेसबुकवर पोस्ट करू शकता.

मृत्यु नंतर सुद्धा पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे

 *मृत्यु नंतर सुद्धा  पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय*

***********************************

🔜 *(1). = कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रन्थ भैंट करा , जेव्हा कोणी त्याचे पठण करेल तेव्हा पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(2). = एक व्हील चेयर , कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दान करा, जेव्हा कोणताही रुग्ण त्याचा उपयोग करेल , पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(3). = कोणत्याही अन्नक्षेत्र साठी, मासिक ब्याज वाली एफ. डी बनवा, जेव्हा त्याच्या व्याजा पासून कोणी जेवण करेल पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(4). = कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाटर कुलर लावा, नेहमी पुण्य मिळेल*❗️

🔜 *(5). = कोण्या अनाथला शिक्षित करा, तो आणि त्याची येणारी पिढीही तुमच्या सुखाची प्रार्थना करेल , तर पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(6). = तुमच्या मुलांना परोपकारी बनवू शकाल तर ,  सदैव पुण्य मिळत राहील*❗️

🔜 *( 7). = सर्वात सोपी आहे की ह्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा एकाने जरी या पैकी एक गोष्ट पूर्ण केली तर पुण्य तुम्हाला लागेल*❗️ 

🔺 *सर्वात पहिले सेंड करा कारण जो पर्यंत कोणी हा  MSG वाचत राहील*

*तुमच्या नावाचे पुण्याचे झाड लागत राहतील आणि तुम्हाला फळ मिळत राहील , म्हणूनच बोलतोय थांबू नका , निरंतर चालू रहा।* 


*🙏 जय श्रीराम 🙏*

कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर

 कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील 100 दिवसांमध्ये परिवहन विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा

 

मुंबईदि. 30 : परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षितसुंदर आणि  शाश्वत ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याकरण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहनबंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

परिवहन सेवेला गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सीमॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर देण्यात यावा. जुनी 13 हजार शासकीय वाहने भंगारात काढली जावी अशा सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीटॅक्सीऑटोशहर बस सेवेच्या तिकीट दरासंदर्भातही निर्णय घेण्यात यावेत. वडसा-गडचिरोली तसेच सोलापूर-धाराशीव येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे. राज्य परिवहन सेवेच्या 15 वर्षे झालेल्या बसेस भंगारात काढून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. तसेच सी.एन.जी. यंत्रणा बसविण्यात यावी जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. बसेसच्या सुरक्षेसाठी एस.ओ.पी. निश्चित करण्याच्याही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर अभियांत्रिकी उपाययोजना शोधून काढावी. यावेळी बंदरे तसेच विमानतळ प्राधिकरण आदिंबाबतची चर्चा झाली.

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलारग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरेवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताअपर मुख्य सचिव राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव संजय सेठीमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव रणजीतसिंह देओलप्रधान सचिव एकनाथ डवलेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीसचिव विरेंद्र सिंहसचिव रविंद्र सिंहपरिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

भवताल मासिक : डिसेंबर २०२४

 भवताल मासिक : डिसेंबर २०२४


नमस्कार,
‘भवताल मासिका’चा डिसेंबर २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

* ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’चा अदृश्य विळखा सोडवण्यासाठी
अँटिबायोटिक औषधांना न जुमानणारे गंभीर जीवाणू विकसित होण्याची क्रिया अदृश्यपणे सुरू आहे. त्यातून ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’चा गंभीर विळखा घट्ट होत चालला आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरात लाखो मृत्यू होत आहेत. हा विळखा सोडवण्यासाठी जागरुकता आणि कृती यांची आवश्यकता आहे. या विषयावरील विवेचन...
- अभिजित घोरपडे

* दीडशे वर्षांपूर्वी मुंबई होती तरी कशी?
मुंबई महानगरात शंभर ते दोनशे वर्षांपूर्वी वाघाचे अस्तित्व होते, यावर विश्वास ठेवणे कठीणच! मात्र, हे वास्तव आहे. दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी मुंबईचे वन्य जीवन समृद्ध होते, असे अनेक जुन्या नोंदी आणि लिखाणावरून निदर्शनास येते. तेव्हा, अर्थात १८०० ते १९५० या दीडशे वर्षांच्या कालखंडात मुंबई होती तरी कशी? याचा हा आढावा...
- संजीव नलावडे

* भवताल : देवाण-घेवाण विशेषांक
‘भवताल’चा यंदाचा दहावा दिवाळी विशेषांक. ‘देवाणघेवाण’ ही वेगळी थीम. आगळा-वेगळा महाराष्ट्र जगापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. हा अंक महाराष्ट्रासंदर्भात दस्तावेज तर आहेच, शिवाय ‘भवताल’ने भूमिका घेऊन केलेले स्टेटमेंटसुद्धा !

* भवताल बुलेटिन
भवतालचे विविध उपक्रम व घडामोडींची माहिती देणारे सदर...

* इको अपडेट्स
अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा.
.........
सोबत अंकाची पीडीएफ प्रत, कव्हर आणि नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. कव्हर व नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

मासिकाच्या नावनोंदणीसाठी लिंकः 

(आम्ही आपणाला 'भवताल मासिका'ची २०२५ या वर्षाची रु. ७९० इतकी वर्गणी भरण्याचे आवाहन करत आहोत, जेणेकरून आम्हाला त्याचा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी QR code:

Bhavatal Foundation.jpg

बँकेचे तपशील:
अकाउंट नेम- Bhavatal Foundation
अकाउंट नंबर- 033805009849
IFS Code- ICIC0000338

दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत

 दिलखुलास', 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 

डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत

 

मुंबई दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात दि. 3 जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. 

दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 2, शुक्रवार दि. 3, शनिवार दि. 4 आणि सोमवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी तर दुसरा भाग मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणासाठीच लढा दिला नाहीतर त्यांनी देशातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अस्पृश्यताबालविवाहसती प्रथाविधवा पुनर्विवाहाला बंदी यासारख्या वाईट गोष्टींचा त्यांनी विरोध केला. आयुष्यभर त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे तसेच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहेहे सावित्रीबाईंनी ओळखले आणि यासाठी त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्यासह मोठी कामगिरी बजावली. त्यांचे योगदान आणि विचार आजही कसे मार्गदर्शक आहेत, याविषयी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे.

०००

 


शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

- कृषीमंत्री  अॅड. माणिकराव कोकाटे

 

 मुंबई, दि. 30 कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषीमंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषीमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते.

             कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात राबवताना अधिक समन्वय साधला जाईल. कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. प्राधान्याने हाती घ्यावयाचे विषय, नवीन धोरणे यांचा अभ्यास करण्यात येईल. शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असल्याचेही कृषीमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावलेउपसचिव हेमंत म्हापनकर, उपसचिव संतोष कराडउपसचिव प्रतिभा पाटीलउपसचिव अंबादास चंदनशिवेउपसचिव प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते

*मृत्यु नंतर सुद्धा पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय* ***********************************

 *मृत्यु नंतर सुद्धा  पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय*

***********************************

🔜 *(1). = कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रन्थ भैंट करा , जेव्हा कोणी त्याचे पठण करेल तेव्हा पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(2). = एक व्हील चेयर , कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दान करा, जेव्हा कोणताही रुग्ण त्याचा उपयोग करेल , पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(3). = कोणत्याही अन्नक्षेत्र साठी, मासिक ब्याज वाली एफ. डी बनवा, जेव्हा त्याच्या व्याजा पासून कोणी जेवण करेल पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(4). = कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाटर कुलर लावा, नेहमी पुण्य मिळेल*❗️

🔜 *(5). = कोण्या अनाथला शिक्षित करा, तो आणि त्याची येणारी पिढीही तुमच्या सुखाची प्रार्थना करेल , तर पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(6). = तुमच्या मुलांना परोपकारी बनवू शकाल तर ,  सदैव पुण्य मिळत राहील*❗️

🔜 *( 7). = सर्वात सोपी आहे की ह्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा एकाने जरी या पैकी एक गोष्ट पूर्ण केली तर पुण्य तुम्हाला लागेल*❗️ 

🔺 *सर्वात पहिले सेंड करा कारण जो पर्यंत कोणी हा  MSG वाचत राहील*

*तुमच्या नावाचे पुण्याचे झाड लागत राहतील आणि तुम्हाला फळ मिळत राहील , म्हणूनच बोलतोय थांबू नका , निरंतर चालू रहा।* 


*🙏 जय श्रीराम 🙏*

Monday, 30 December 2024

वेळ अमावास्या*

 *वेळ अमावास्या*


संकलन - सुधीर लिमये पेण 


वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.


मार्गशीर्ष महिन्यात शुभदिवशी स्नान करून त्यानंतर शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे. शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध, फुले,धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे.


वेळा अमवस्याच्या आदल्या दिवशी रात्री भाकरी करतात. भाकरीला त्या दिवशी भाकर न म्हणता ‘रोडगा’ म्हणतात. त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भजी, खीर, आंबील, सजगुरऱ्याचे (बाजरीचे) व ज्वारीचे उंडे, तिळाच्या भाकरी, भजी, शेंगदाण्याचे लाडू हे नैवेद्याचे पदार्थ करून ठेवतात. आदल्याच दिवशी सगळा भाजीपाला आणि ‘आळंदे’ खरेदी केले जाते. 'आळंदे' म्हणजे एक लहान बिंदगी (लहान मडके) आणि त्यावर झाकायला एक येळणी (खापराची प्लेट). या ‘आळंद्यात सकाळी घरातील एका माणसाने आंबील भरून शेतात घेऊन जायचे असा रिवाज आहे.


वर्षाच्या सर्व उत्सवांमध्ये वेळामावास्या हा एकमेव उत्सव असा आहे की, या उत्सवासाठीचा स्वयंपाक हा आदल्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने खातात. काहीजण तर आंबील आणि तत्सम पदार्थ शेतातच ठेवून दोनदोन दिवस त्यावर ताव मारतात.


पूर्वी बैलगाडीमध्ये हे सर्व साहित्य भरून घरचा सगळा लवाजमा याच बैलगाडीत धडधड आदळत आपटत मस्त सफर करत शेताला जायचा. आता मात्र सवडीप्रमाणे मोटारसायकल, ऑटोचा वापर केला जातो. काहीजण डोक्यावर डालगे (मोठे टोपले) घेऊन शेतात जातात. या दिवशी आपल्या कामानिमित्त बाहेगावी असणारी माणसे वेळामावस्याला मात्र आपापल्या गावी आवर्जून सहकुटुंब येतात आणि आनंदाने हा उत्सव एकत्र साजरा करतात.


शेतात आल्यानंतर एका झाडाखाली पाच पांडव मांडतात. त्यांना चुन्याने रंगवतात. त्यावर कडब्याच्या पाच पेंढ्या उभ्या करून एक सुंदर खोप (कोप) करतात. लाल शालीने ते बांधतातही. डालग्यातून साहित्य काढतात. पांडवासमोर हिरवे कापड ठेऊन लक्ष्मीची पूजाही मांडतात. नैवेद्य म्हणून भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबटभात, ज्वारी आणि बाजरीचे उंडे ठेवतात. कोणतीही आरती किंवा मंत्र न म्हणता पांडवाची पूजा करतात. शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने पूजा संपवतात, हा नैवेद्य एका माठात भरतात.


पूजाविधी झाल्यानंतर लगेच जेवणाची पंगत बसते. यात काल रात्री केलेल्या सर्वच पदार्थांचे आनंदाने सेवन केले जाते. या मजेच्या वनभोजनात शेजारी पाजारी, मित्रवर्ग, सगेसोयरे यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन एकत्रित जेवण करतात. एखादी अनोळखी व्यक्ती जरी जवळून बांधाने जात असेल, तर तिलाही आवर्जून बोलावतात. जेवायला नको म्हटले तर किमान आंबिलीचा थोडा स्वाद तरी घ्यायचा आग्रह केला जातो.


थंडगार बिंदगीतली आंबील पिली की, एक प्रकारची मस्त झिंग येते. ( झिंग म्हणजे नशा नाही!) जेवण करून, आंबिलीचा आस्वाद घेऊन झाडाखाली एक छान झोप घेतात. काहीजण शेताशेतांतील आमंत्रणाचा मान स्वीकारत फिरत असतात. अशी फिरस्तीचीही मजा वेगळीच असते.


या मार्गशीर्ष महिन्यात गहू, ज्वारी, करडई, हरभरा, वाटाणा, तुरी, ऊस ही रब्बीची पिके जोमात आलेली असतात. शेतात निसर्गाची उधळण झालेली असते. बोरांच्या झाडाला बोरे लगडलेली असतात. आंब्याला नुकताच मोहोर फुटायला सुरुवात झालेली असते होतो. वातावरणात गुलाबी गारवा असतो. जणू निसर्गाने हिरवा शालूच पांघरल्याचा भासच व्हावा अशी हिरवळ असते. जेवण झालं की, काहीजण झोका बांधून झोक्यावर हिंदोळे घेतात. मुली ‘भजी रोडगा, आंबट भात खिचडा’ असे म्हणत झोक्यावर झुलण्याचा आनंद घेतात. काही पुरुष, पोरे हातात कुऱ्हाड नाहीतर एखादा विळा घेऊन मधमाश्यांचे मोहोळ शोधायची मोहीम हातात घेतात. सोबत एखादी काडीपेटी आणि पांघरायला एखादे कापड. झाडाझुडपात नजर बारीक करून पाहात पाहात चालत राह्यले की अवघड जागी एखादे मोहाळ दिसते. मग सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून पोरे मधमाशांचा हल्ला सहन करून ते शेवटी मधाचा गड्डा ओढून घेतात. आणि ताठ छाती करून ते मोहाळ घेऊन येतात. महाकष्टाने घेऊन झाडलेल्या त्या मोहाळाच्या गोडगोड मधाचा सर्व मिळून आस्वाद घेतात. आंबटगोड बोरे-ऊस तोडतात आणि खातात.


गोल आकाराच्या मडक्यावर चुन्याने बोटे ओढतात. कुंकू, काव यांचेही पट्टे ओढतात आणि नंतर त्यात काठोकाठ आंबील भरतात. बाजरीचे मुटके, ज्वारीचे मुटके, पुरणपोळी यांचा नैवेद्य करतात. शेतात पिकलेल्या पालेभाज्या शिजवून त्याचा गरगटा तयार करतात जातो, व एका मडक्यात भरतात. शेतात आल्यावर शेतकरी आपल्या डोक्यावर मडके घेतो व घोंगड्याच्या खोळीने झाकतो. तसे करून तो संपूर्ण शेताच्या बांधावरून “ओलगे ओलगे ..सालम पोलगे, पाची पांडव सहावी द्रौपदी. हर हर महादेव... हर भगत राजोss हारभलंss..!!!’च्या घोषात 'काळ्या आईचं चांगभलं” असा पुकारा करीत, शेताला फेरी मारतो. नंतर तो काला शेतात फेकतो. एका झाडाखाली खड्डा करतात. तेथे माठाची पूजा करतात. सगळेजण माठातील आंबील, पुरणपोळी यांचे सेवन करतात. रिकामा माठ पांढरे फडके गुंडाळून खड्यात पुरतात. पाच खडे घेऊन त्यांचीही पूजा केली जाते.


संध्याकाळी छोट्या मटक्यात दूध आणि शेवया शिजवतात. त्याला उतू येऊ देतात. ते दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला पुढील वर्षी चांगले पीक येईल असा समज असतो. थोड्या वेळात पेंढ्या पेटवतात. त्या पेटत्या पेंढ्या घेऊन पिकाच्या भोवती शेताला प्रदक्षिणा घालतात. यामुळे पिकांवर कसल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही असा समज असतो. काही ठिकाणी त्या पेंढ्या तशाच पेटत्या ठेऊन गावात आणतात आणि मारुतीच्या देवळाला एक फेरी मारून मंदिरासमोर टाकतात. ज्यांची शेते दूर आहेत असे शेतकरी इथेच पेंढ्या पेटवतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथेच मंदिरासमोर टाकतात. शेतातली सर्व मंडळी सूर्यास्ताच्या वेळी दिवसभरात हा अनोखा आनंदोत्सव साजरा करून सुखासमाधानाने घरी येतात.


या दिवशी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात शाळेला सुट्टी असते. वेळामावसेच्या पूर्वसंध्येला बसलाही खूप गर्दी असते. सर्वजण या दिवसासाठी रजेची मागणी करतात. जणू शेतकऱ्यांसाठी हा सणांचा राजाच असतो. येळवशीची भजी दोन दिवस पुरवून खातात. भज्यांमधे वाटाणे, हरबरा, तूर, मेथी, कोथिंबीर, गाजर, वांगे, आले, लसूण यांचे सुरेख मिश्रण असल्याने ती चविष्ट असतातच मग ती एकमेकांना भेट देऊन, बायका एकमेकींचे कौतुक करतात. कर्नाटकातली सून असेल, तर पातळ पापडासारख्या बाजरीच्या भाकरी असतात.


मातीचे मडके हे मानवी शरीराचे प्रतीक आहे. मडके मातीत गाडले जाते त्याप्रमाणेच माणूस गेल्यावर त्याची राखही मातीत पुरली जाते. पिके आणि भूमी यांना अन्न देण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक म्हणून काला शेतात फेकला जातो. माठावरचे चुना, कुंकू हे रंग शुचिता आणि समृद्धीचे प्रतीक होत. काळी घोंगडी अंथरून घेण्यात जणू शेतकरी काळी माती अंगभर माखण्यात धन्यता मानतो असा आशय ध्वनित होत असावा असा याचा प्रतीकात्मक आशय सांगितला आहे.



स्त्रोत: विकिपीडिया.

पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना

 पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना


निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण १९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर केली होती.  तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले,  'माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी  हल्ला केला, व त्यात तिचा गर्भपात  झाला आणि गर्भाशय कायमचे  निकामी झाले' यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला.   मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले.  अंत्यत भावनिक होत त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली, पश्चाताप केला होता. वेणुताई अत्रेंना म्हणाल्या  भाऊ त्यानिमित्ताने तरी घरी आला.असे उदगार काढले होते. तेव्हा अत्रेंना अश्रू अनावर झाले होते.  आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले.  ही महाराष्ट्रातील नेत्यांची  त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती. ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत  ? हा यशवंतराव साहेबांचा  महाराष्ट्र... आजची संस्कृती म्हणजे  तुला चप्पलने मारतो, कानशिलात मारतो, कोथळा काढतो वगैरे वगैरे . आज यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने विशेष लेख🙏🙏🙏


#YashwantraoChavhan

#MaharashtraCM

#politicalikon

T N शेषन, का दर्द

 


दरवर्षी आम्ही जी करतो ती उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा दहा एप्रिल ला आहे.

 दरवर्षी आम्ही जी करतो ती उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा दहा एप्रिल ला आहे. 


म्हणजे आधी दहा एप्रिल ला उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा व नंतर २६ मे २०२५ ला समुद्र पंचक्रोशी परिक्रमा येत आहे.


इच्छुक साधकसंख्या समजली कि मग कुणीतरी उत्साही व अनुभवी साधक पुढाकार घेउन सारे नियोजन करतील.

समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा!*

 *समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा!*

(येती सोमवती अमावास्या २६ मे २०२५ ला आहे, या दिवशी आपण ही समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा आपल्याकडून करवून घेण्याची प्रार्थना मैय्याला करत आहोत! तरी इच्छूक नर्मदाभक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा!)


नर्मदामाईची परिक्रमा हा एक अपूर्व सोहळाच असतो. अनेक जण ही परिक्रमा करतात. ती जिथे रत्नसागराला (अरबी समुद्र) मिळते तेथील काही तीर्थांच्या दर्शनाचा लाभ सर्व भक्तांना होणार आहे. दक्षिण किनाऱ्यावरील श्री कोटेश्वर आणि श्री विमलेश्वर यांचं दर्शन झालं. भरुच जवळच्या हांसोट जवळचा हा संपूर्ण परिसर म्हणजे नर्मदा माईचा विशाल त्रिभुज प्रदेशच आहे. याच दोन ठिकाणी ती दक्षिण बाजूने सागर विलीन होते. तेथील दर्शन झाल्यावर एक अपूर्व योग जुळून येतो तो योग असतो, नर्मदा पंचक्रोशी परिक्रमा करण्याचा. ही परिक्रमा सोमवती अमावास्येला हजारो भक्त वर्षानुवर्षे करत आली आहेत! 


येती सोमवती अमावास्या २६ मे २०२५ ला आहे, या दिवशी आपण ही समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा आपल्याकडून करवून घेण्याची प्रार्थना मैय्याला करत आहोत! तरी इच्छूक नर्मदाभक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा!


ह्या परिक्रमेला हिंदीमध्ये 'समुद्र पंचकोशी परिक्रमा' म्हणतात. उत्तरेत विविध तीर्थक्षेत्रांमध्ये पंचकोशी परिक्रमा केल्या जातात. तशी ही समुद्र पंचक्रोशी परिक्रमा! नर्मदा मैय्या सागराला मिळते तेथील उत्तर किनाऱ्यावर ही परिक्रमा केली जाते. पंचक्रोशी म्हणजे पाच कोसांचा परिसर! एक कोस म्हणजे दोन मैल किंवा ३.१२ किलोमीटर. म्हणजेच ही परिक्रमा साधारणपणे १५.०६ किलोमीटर परिसरात होते. येत ढोबळमानाने, ती २० किलोमीटर आहे. ती चालत किंवा वाहनाने करता येते. मी वाहनाने केली. ती जवळपास २५ किलोमीटर होते.


गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील वागरा तालुक्यातील या पंचक्रोशी परिक्रमा मार्गात दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन आल्यामुळे तिथल्या गावांमध्ये एकसंधता आली आहे. या मार्गात मुख्यत्वे पाच गावे आहेत. दहेज, अंभेटा, जागेश्वर, लुवारा आणि लखीगाम ही ती गावे. 


या समुद्र पंचक्रोशी परिक्रमेला 'नवनाथ परिक्रमा' असंही म्हणतात. या मार्गावर महादेवाची नऊ स्थाने असल्याने हे नाव प्रचलित आहे. प्रत्येक स्थान विशिष्ट आहे. त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यांची स्थापना देव आणि ऋषींच्या हस्ते झाली आहे. आजवर तेथे हजारो अनुष्ठाने झाली आहेत. तिथल्या अनेक कहाण्या आहेत. सर्व मंदिरे प्राचीन असल्याचे अनेक पुरावे आहेत. शासनाने रस्ते जोडणी उत्तम केली आहे. शिवाय मंदिर  परिसर कात टाकत आहेत. त्यामुळे यात्रा सुफळ संपूर्ण होते.


*गुढार्थ:* पंचक्रोशी अथवा पंचकोशीचा अर्थ स्थूलातील तीर्थयात्रेचा किंवा अंतराचा नसून ही सूक्ष्मातील पंचकोश यात्रा आहे, ही अध्यात्मिक विकासयात्रा, अंतरातील यात्रा आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश असा साधनामार्ग प्रवास करायचा आहे. या अशा यात्रेतून आम्हाला बाहेरचे भटकणे थांबवून अंतरानंदात स्थिर व्हायचे आहे, हा अनंरानंद प्रवास आहे. याला किती दिवस लागतील ते आपापल्या स्थितीवर, प्रयत्नांवर, साधनेवर आणि भगवत्कृपेवर अवलंबून आहे. या अशा यात्रेतून आमचे संसारमागणे थांबवून कुठेतरी आतला प्रवास सुरू करायचा आहे. ही सिद्धस्थाने आपले भगवद्प्रेम वाढवून पंचकोशीच्या अंतर्प्रवासात मदत करतात.


*समुद्र पंचक्रोशी अथवा नवनाथ यात्रा क्रम:*

*(१) मीठीतलाई गोलकुंड, भीमनाथ*¹ तीर्थ (परशुराम संकल्प स्थान)*


*(२) हरीधाम तीर्थ, जमदग्नी तपोभुमी (मार्कंडेश्वर, शुकेश्वर):* श्री हरि महाराज आश्रम या सुंदर ठिकाणी हे मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींनी हे शिवलिङ्ग स्थापित केलं आहे. हरि महाराज आश्रमात राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आणि पुरातन हवेली प्रमाणे रचना आहे. इथे काही लोक गुजरात मधील विविध ठिकाणांहून नियमित सेवेसाठी येत असतात.


*(३) परशुराम तीर्थ:* या मार्गावरील अति-प्राचीन स्थळ! स्वतः भगवान परशुराम यांनी हे शिवलिङ्ग स्थापन केलं आहे. इतक्या शतकांच्या गाळात भर पडून पडून आता जमीन मंदिराच्या शिखराला भिडली आहे. साहजिकच दर्शन घ्यायचं असेल तर खाली उतरून जावं लागतं. मंदिराचं बांधकाम साधं आहे. पुजारी सभामंडपातच राहतात. आलेल्या सर्वांची बडदास्त ठेवतात. नियमित भोजन प्रसाद देतात. आजूबाजूचे रहिवासी सुद्धा खूप सेवाभावी आहेत. या ठिकाणी शेकडो संत महंत साधना करून गेले असल्याने साधकांसाठी ही योग्य अशी जागा आहे.


*(४) लोटणेश्वर, समुद्र व रेवा संगम स्थान, लख्खाबावा (लक्ष्मणगिरी महाराज) समाधी:* या परिक्रमा मार्गावर पांडव येऊन गेल्याचे काही दाखले आहेत. त्यापैकी ही एक जागा आहे. भीमाने तप करून सिद्धी मिळवली ती ही जागा असं काही लोक सांगतात. साक्षात नंदिकेश्वर यांनी हे शिवलिङ्ग स्थापन केलं आहे. त्याचं रक्षण व्हावं म्हणून भीमाने त्यावर लोटा ठेवला होता म्हणून लोटेश्वर असे नाव पडले. काही लोक त्याला लुटणेश्वर देखील म्हणतात. या शिवलिङ्गाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार. नंदिकेश्वरांनी जिथे पाय ठेवला तिथेच हे शिवलिङ्ग तयार झालं. त्यामुळे त्याचा आकार गायीच्या खुरांसारखा आहे. त्यामुळे लोक त्याला 'गाय नी खरी' (खुर) शिवलिङ्ग सुद्धा म्हणतात. हे देखील प्राचीन स्थळ असल्यानं आपल्याला जमिनीत उतरून जावं लागतं.


*श्री लखाबावा दादा मंदिर:* लोटेश्वर महादेव प्रांगणातच येथील प्रसिद्ध सिद्धपुरुष श्री लखाबावा दादा यांचं समाधी स्थळ आहे. नर्मदाभक्त आणि सिद्धी प्राप्त असलेले हे प्राचिनकालीन स्थानिक कोळी समाजातील संत पुरुष आहेत. निपुत्रिक आणि व्यावसायिक अडचणी असलेल्या लोकांना इथे प्रचिती येत असल्याने नवस फेडणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. समाधीवर शिवलिङ्ग स्थापित असून गाभाऱ्याच्या दरवाजावर लखाबावा दादा यांचं 'स्थान' आहे. खूप वेगळी अशी ही जागा आहे. (काही मराठी लोक - विशेषतः काही मराठी युट्युबर परिक्रमावासी, बाबांच्या नावाचा उच्चार लख्खाबाबा करतात पण तो तसा नसून लखाबावा दादा असाच करावा असं स्थानिकांनी आवर्जून सांगितलं!) जवळच लखाबावा दादांच्या गुरूंची समाधी देखील आहे. मंदिर प्रांगण नीटनेटकं आहे. सर्व सोयीसुविधा आहेत. जवळच लखाबावा दादांचे तळे आहे. त्याला साधारणपणे वर्षभर पाणी असतं.


*(५) भूतनाथ*²-कुंडनाथ*³-तुंडनाथ*⁴:* येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश लिङ्ग स्वरूपात स्थापित आहेत.  त्यांची स्थापना महादेवांनी केली आहे. जवळच श्री सिकोतर माता मंदिर आहे. मंदिराजवळ दाट बाभळीचं वन आहे. भीमाने बाण मारून तयार केलेलं बाणेश्वर कुंड आणि शिवलिङ्ग आहे. पुरातन कालीन स्मशान आहे. दाट झाडी असल्याने व आजूबाजूला औद्योगिक क्षेत्र झाल्याने हा जंगल भाग निलगायी, साप, तरस, कोल्हे आणि शेकडो पक्षी यांचा अधिवास झाला आहे. सोबतीला अनेक साप आणि शेकडो मोर आहेत. दानशूर गुजराती समाजाच्या उपक्रमांमुळे सहज अन्न उपलब्ध होत असल्याने अक्षरशः मयूर-वन आहे की काय असं वाटावं इतके मोर इथे आहेत. लोकांसाठी अन्न दान नियमितपणे सुरू असतं. अनेक तंत्र साधक इथे मुक्कामाला असतात अशी माहिती मिळाली. सेवेसाठी वडोदरा (बडोदा) आणि भरुचहून अनेक जण नेहमी येतात. 


*(६) मोक्षतीर्थ अथवा मोखडेश्वर अर्थात मोक्षनाथ*⁵:* हे दिव्य क्षेत्र शक्ती स्थापित असून त्यांस श्री मनकामेश्वर महादेव मंदिर असंही संबोधलं जातं. मुख्य मंदिराचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे. प्रांगणात नर्मदा मैय्याचं देखणं मंदिर आहे.


*(७) दुधेश्वर, दुधनाथ*⁶, दाहेजग्राम:* हे शिवलिङ्ग दधिची ऋषींनी स्थापन केलं आहे. दधिची ऋषींची तपोभूमी म्हणून दाधिच गावाचे कालांतरानं 'दहेज' नामाभिधान झालं. मंदिर प्रांगण अतिशय देखणं आहे. गाभाऱ्यात गेल्यावर उज्जैनच्या महाकालेश्वर महादेवाची आठवण यावी, अशी एकंदर रचना आहे. इथे नित्य स्वरूपात विविध अनुष्ठाने होत असल्यानं त्यासाठी एक वेगळा हॉल आणि पुजाऱ्यांची- भाविकांची निवास व्यवस्था चांगली आहे. अंगणात पक्ष्यांच्या राहण्याची सुंदर सोय केलीय.


*(८) नीलकंठेश्वर, दाहेजग्राम:* दहेज गावाच्या दिशेनं निघाल्यावर अगदी मुख्य हमरस्त्यावर दिसणारं हे मंदिर नीलकंठ महादेव स्थापित आहे. सध्या इथेही जीर्णोद्धार जोरात सुरू आहे. हे शिवलिङ्ग बाणलिङ्ग स्वरूप आहे. प्रांगणात बेल, वड आणि पिंपळ वृक्ष आहेत.  निवास आणि पूजन व्यवस्था आहे.


*(९) चंद्रमौलेश्वर, अंबेठाग्राम अर्थात उमियानाथ*⁷:* अंभेटा गावातील श्री कृष्णानंद आश्रमाच्या सात्त्विक आणि देखण्या प्रांगणात हे मंदिर आहे. देवळापासून रेवा संगम जवळ असल्यानं परिक्रमावासियांच्या निवासाची सुंदर व्यवस्था इथे आहे. महादेवाजवळ माता आशापुरा, श्री उमियानाथ, नर्मदा मैय्या आणि कालभैरव मंदिरे आहेत. येथून जवळच एक तलाव आहे.


*(१०) सिगनाथ*⁸, सुवाग्राम*


*(११) जागेश्वर अर्थात जागनाथ*⁹ मीठीतलाई गोलकुंड:* जागेश्वर गावाचे मुख्य तीर्थक्षेत्र असलेलं हे जागनाथ महादेव मंदिर आहे. मंदिर प्रांगण खूप मोठं आहे. व्यवस्था उत्तमच आहे. देवळात गणपती, हनुमान, कालिका, सरस्वती, दुर्गा विग्रह आहेत. गावकऱ्यांच्या उपक्रमांसाठी आणि परिक्रमावासियांच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या इमारती आहेत. महंत वृक्षप्रेमी आहेत; त्यामुळे असंख्य फुलझाडं उत्तमरित्या सांभाळली आहेत. वैयक्तिक अनुष्ठाने आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी निवास आहेत.


जागेश्वर जवळच *मिठीतलाई* आहे. याच ठिकाणी परिक्रमावासी रेवा संगम पार करून उत्तर तटावर उतरतात. सध्या गुजरात शासनातर्फे परिक्रमावासियांना तटावर येणं सोपं व्हावं म्हणून विशाल जेट्टी बांधली जात आहे. या जेट्टीजवळ दहेज-घोघा (भावनगर) रो-रो फेरी सर्व्हिस जेट्टी आहे. दक्षिण गुजरात मधून सौराष्ट्रात जाण्याचा जवळचा मार्ग यामुळे उपलब्ध झाला आहे. मिठीतलाई मध्ये मोठा आश्रम असून उत्तम निवास व्यवस्था आहे. नर्मदा मैय्याचं मोठं मंदिर आहे.


*तर अशी नऊ महादेव (नवनाथ*) स्थाने झाली की आपली समुद्र पंचक्रोशी परिक्रमा पूर्ण झाली!* 


सोबत हा यात्राक्रम सुंदर व योग्य अशा पौराणिक माहितीसह दोन भागात देत आहे, जो यात्रा करण्यापूर्व नर्मदाभक्तांनी अवश्य जाणून घ्यावा.


(१) https://youtu.be/tlu-AvHDr8g?si=D91--YQID6tfQeFF


(२) https://youtu.be/Gu69djMP_v4?si=Kzai3594NOxRtdvQ


 

*नमामि देवी नर्मदे!*

श्रीकृष्ण वसंत पुराणिक

Sunday, 29 December 2024

Govt News फॉर सीनिअर सिटिझन

 


पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य...*

 *पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य...*


अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच/तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना कश्या काय निर्माण करता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं...

हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील ह्या संकल्पना मान्य केल्या आहेत. डेन_ब्राऊन सारखा लोकप्रिय लेखक सुध्दा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर कादंबरी लिहितो.

ही पंच महाभूतं म्हणजे जल, वायू, आकाश, पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे.

आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिर आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ?

फार थोड्या लोकांना.त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिर,भगवान शंकराची मंदिर आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ट्य किंवा रहस्य नाही.


* मग वैशिष्ट्य कशांत आहे...?

पंच महाभूतांच्या ह्या पाच मंदिरांचं वैशिष्ट्य किंवा रहस्य यात आहे की यातील तीन मंदिरं, जी एकमेकांपासून काही शे किलोमीटर लांब आहेत, ती एका सरळ रेषेत आहेत..!


होय.अक्षरशः एका सरळ रेषेत आहेत..!!


]]] ती तीन मंदिर आहेत [[[


श्री कालहस्ती मंदिर

श्री एकंबरेश्वर मंदिर,कांचीपुरम

श्री तिलई नटराज मंदिर,त्रिचनापल्ली


आपण पृथ्वीवर एखादी जागा ठरविण्यासाठी कोआर्डिनेटस चा उपयोग करतो, ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश म्हणतो. यातील अक्षांश (Lattitude) म्हणजे पृथ्वीवर आडव्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा. जसं विषुववृत्त, कर्कवृत्त वगैरे. आणि रेखांश (Longitude) म्हणजे उभ्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा.


या तीन मंदिरांचे अक्षांश–रेखांश आहेत


१.श्री कालहस्ती मंदिर 13.76 N 79.41 E वायू


२.श्री एकंबरेश्वर मंदिर 12.50 N 79.41 E पृथ्वी


३.श्री तिलई नटराज मंदिर 11.23 N 79.41 E आकाश


यातील रेखांश हा तिन्ही मंदिरांसाठी 79.41 E आहे. अर्थात तिन्ही मंदिरं एका सरळ रेषेत आहेत. कालहस्ती आणि एकंबरेश्वर मंदिरांमधील अंतर सव्वाशे किलोमीटर आहे तर एकंबरेश्वर आणि तिलई नटराज मंदिरांमधील अंतर हे पावणे दोनशे किलोमीटर आहे. ही तिन्ही मंदिरं नक्की केंव्हा बांधली, ते सांगता यायचं नाही. या भूभागावर राज्य केलेल्या पल्लव, चोल इत्यादी राजांनी ह्या मंदिरांचे नूतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. पण किमान तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त, ही मंदिरं जुनी असतील हे निश्चितपणे म्हणता येईल.

आता इथे खरं आश्चर्य हे आहे, की साधारण तीन हजार वर्षांपूर्वी, इतक्या लांबच्या लांब अंतरावरील ही मंदिरं एकाच उभ्या सरळ रेषेत कशी बांधली असतील..?

याचा अर्थ, त्या काळात नकाशाशास्त्र इतकं प्रगत होतं की अक्षांश–रेखांशांच ज्ञान त्यांना होतं ? पण अक्षांश–रेखांशांचं परिपूर्ण ज्ञान असलं तरी एका सरळ रेषेत मंदिर बांधण्यासाठी नकाशा शास्त्रा बरोबरच कंटूर मेप चं ज्ञान त्यांना आवश्यक होतंच!

की

इतर कुठली एखादी पध्दत त्या काळात वापरली गेली, जी आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे..?


सारंच अतर्क्य.....!


ही गंमत इथेच संपत नाही, तर इतर दोन मंदिरांबरोबर जेंव्हा ह्या एका सरळ रेषेत असलेल्या मंदिरांना जोडलं जातं, तेंव्हा झालेल्या रचनेतून विशिष्ट कोण निर्माण होतात.


याचा अर्थ, त्या काळातली आपल्या वास्तुविशारदांची झेप लक्षात घ्या. जमिनीच्या, काही हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या भूभागावर ते पंच महाभूतांच्या पाच शैव मंदिरांचा मोठा पट मांडतात.आणि त्या रचनेतून आपल्याला काही_सुचवू पाहतात. आपलं दुर्भाग्य की आपण त्यांची ती ज्ञानाची कूट भाषा समजू शकत नाही.


या पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे, तर उरलेली चार, तामिळनाडू मधे आहेत. यातील वायू तत्वाचं प्रतिनिधित्व करणारं, श्री कालहस्ती मंदिर, हे आंध्र प्रदेशातल्या चितूर जिल्ह्यांत, तिरुपतीहून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. स्वर्णमुखी या लहानश्या नदीच्या तीरावर हे मंदिर उभारलेले आहे. हजारों वर्षांपासून ह्याला ‘दक्षिण कैलास’ किंवा ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते.


हे मंदिर अत्यंत प्राचीन असले तरी मंदिराचा आतला गाभाऱ्याचा भाग पाचव्या शतकात तर बाहेरचा, गोपुरांचा भाग हा अकराव्या शतकात बांधलेला आहे. पल्लव, चोल आणि नंतर विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी आणि बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात. आदी शंकराचार्य ह्या मंदिरात येऊन गेल्याचे उल्लेख अनेक साहित्यात मिळतात. खुद्द शं‍कराचार्यांच्या ‘शिवानंद लहरी’ मधे ह्या मंदिराचा आणि येथील ‘भक्त कणप्पा’ चा उल्लेख आहे.

हे मंदिर पंच महाभूतांपैकी वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करते. याचे काही चित्तवेधक संदर्भ मिळतात/दिसतात.


या मंदिरातील शिवलिंग हे पांढरे असून ते स्वयंभू आहे असे मानले जाते. या शिवलिंगाला (हे वायुतत्व असल्यामुळे) कधीही स्पर्श केला जात नाही. मंदिराचे पुजारी सुध्दा ह्या मुख्य लिंगाला कधीच स्पर्श करीत नाहीत. अभिषेकासाठी आणि पूजेसाठी एक वेगळे उत्सव लिंग बाजूला ठेवले आहे. गंमत म्हणजे ह्या मंदिराच्या गाभार्‍यात एक दिवा सतत जळत असतो आणि तो सतत फडफडत असतो. हे थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. कारण मंदिराचा गाभारा हा लहान असुन त्याला कोठेही हवा यायला जागा नाही. पुजाऱ्यांनी मुख्य द्वार बंद केलं तरी त्या दिव्याच्या ज्योतीचं फडफडणं चालूच असतं..! कुठलाही वारा नसताना, दिव्याची ज्योत फडफडत राहणं हे कां होतं ?

याचं कोणतंही शास्त्रीय कारण आजतागायत मिळू शकलेलं नाही.


मात्र येथील शिवलिंग हे वायुतत्व असल्याने दिव्याची ज्योत सतत फडफडत असते, असं येथील लोकांचं म्हणणं आहे!!


या मंदिरापासून साधारण सव्वाशे किलोमीटर दक्षिणेला अगदी सरळ रेषेत पंच महाभूतांपैकी दुसरे मंदिर आहे – श्री एकंबरेश्वराचे मंदिर.


तामिळनाडूच्या प्रसिध्द कांचीपुरम मधे हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर आहे.

पृथ्वी तत्व असल्याने हे शिवलिंग मातीचे बनले आहे. असे मानले जाते की शिवशंकराच्या प्राप्तीसाठी एका आंब्याच्या झाडाखाली, पार्वती ने आराधना केली. आणि ती देखील मातीच्या शिवलिंगाच्या स्वरूपाची. म्हणूनच ह्याला एकंबरेश्वर म्हणतात. तामिळ मधे एकंबरेश्वर म्हणजे आंब्याच्या झाडाचा देव. आजही मंदिराच्या आवारात एक प्राचीन आंब्याचे झाड उभे आहे. कार्बन_डेटिंग ने ह्या झाडाचे वय साडेतीन हजार वर्षे निघाले आहे, असे म्हटले जाते. ह्या झाडाला चार वेदांचे प्रतीक समजले जाते. असं म्हणतात, ह्या झाडाला चार वेगवेगळ्या स्वादाचे आंबे लागतात.


हे मंदिर, ‘कांचीपुरम’ ह्या मंदिरांच्या शहरात आहे. कांचीपुरम हे ‘कांजीवरम’ साड्यांसाठी जगप्रसिध्द आहे.ह्या मंदिरात तामिळ, तेलगु, इंग्रजी आणि हिंदीत एक फलक लावलाय की हे मंदिर ३,५०० वर्ष जुनं आहे. नेमकं किती जुनं हे सांगता येणं कठीण आहे. पुढे पाचव्या शतकात पल्लव, नंतर चोल आणि पुढे विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी केल्याचे उल्लेख आढळतात.


ह्या दोन मंदिरांच्याच अगदी सरळ रेषेत, दक्षिण दिशेत, ह्या एकंबरेश्वर मंदिरापासून साधारण पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर पंच महाभूतांचे तिसरे मंदिर आहे – तिलई नटराज मंदिर. आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर, तामिळनाडू च्या चिदंबरम या शहरात आहे.


खुद्द पतंजली ऋषींनी स्थापन केलेले हे अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. नेमके केंव्हा बांधले हे सांगणं कठीण आहे. मात्र पाचव्या / सहाव्या शतकात, पल्लव आणि चोल राजांनी याची डागडुजी आणि काही नवीन बांधकाम केल्याचे उल्लेख आढळतात. ह्या मंदिरात ‘भरतनाट्यम’ च्या १०८ विभिन्न मुद्रा दगडी खांबांवर कोरलेल्या आहेत. याचाच अर्थ, अत्यंत विकसित असं भरत नाट्यम हे नृत्य शास्त्र काही हजार वर्षांपूर्वी सुध्दा अस्तित्वात होतं, हे सिध्द होतं..!


मात्र


कोठेही खांबांवर, शंकराच्या अनेक मुद्रा कोरल्या असल्या तरी, नटराज ची मूर्ती किंवा मुद्रा कोरलेली नाही. ती मुख्य गर्भगृहात विराजमान आहे.


येथे भगवान शंकर हे नटराजाच्या रुपात असुन सोबत शिवकामी अर्थात पार्वती ची प्रतिमा ही आहे. मात्र नटराजाच्या रूपातील शिवप्रतिमेच्या उजव्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे, तिला ‘चिदंबरा रहस्यम’ असे म्हटले जाते. या मोकळ्या जागेला सोन्याच्या चकत्यांच्या हारांनी सजवले जाते. येथील मान्यतेनुसार ही मोकळी जागा, मोकळी नसून ते (आकारहीन) आकाशतत्व आहे.


पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी ही मोकळी जागा लाल पडद्याने आच्छादित असते. पूजेच्या वेळेला हा लाल पडदा बाजूला करून त्या (आकारहीन) शिव तत्वाची अर्थात आकाश तत्वाची पूजा केली जाते.अशी मान्यता आहे की येथे शिव आणि कालीमातेच्या स्वरुपात पार्वती, ह्यांनी नृत्य केले होते.


ह्या चिदंबरम पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर कावेरी नदी समुद्राला जाऊन मिळते. या भागात आठव्या/नवव्या शतकात चोल राजांनी जहाजांसाठी गोदी बांधली होती. ह्या जागेचं नाव आहे – पुम्पुहार. एके काळी हे फार मोठे आणि पूर्व किनाऱ्यावरचे फार प्रसिध्द बंदर होते. आज मात्र ते एक लहानसे गाव राहिले आहे.


या पुम्पुहार मधे काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने उत्खनन केलं आणि त्यांना अक्षरशः खजिना गवसला.


सुमारे दोन/अडीच हजार वर्षांपुर्वीचे एक अत्यंत समृध्द आणि विकसित शहर त्यांना सापडले. या नगराचे नियोजन, त्यातील रस्ते, घरं, नाल्या, पाण्याचा निचरा इत्यादी गोष्टी बघून आजही थक्क व्हायला होतं.


एकुणात काय, तर आजपासून किमान दोन/तीन हजार वर्षांपूर्वी ह्या परिसरात एक अत्यंत समृध्द आणि विकसित अशी संस्कृती नांदत होती, ज्या संस्कृतीने पंचमहाभूतांच्या पाच मंदिरांचा एक मोठा पट, ह्या विशाल जागेत मांडला होता..!


ह्या तीन मंदिरांनी तयार केलेल्या सरळ रेषेशी विशिष्ट कोण करून उभं आहे, पंच महाभूतांपैकी चौथं मंदिर – जंबुकेश्वर मंदिर. त्रिचनापल्ली जवळ, तिरुवनाइकवल गावात हे मंदिर आहे. पंच महाभूतांपैकी जल तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे, कावेरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगाखाली पाण्याचा लहानसा पण खळाळता झरा आहे. त्यामुळे हे शिवलिंग सतत पाण्यात बुडलेले असते.


ब्रिटीश काळात फर्ग्युसन ह्या पुरातत्ववेत्त्याने या मंदिराबाबत बरेच संशोधन केले, जे अनेकांनी प्रमाण मानले. त्याच्या मते चोल वंशाच्या प्रारंभिक काळात या मंदिराचे निर्माण झाले. मात्र त्याची निरीक्षणं_चुकीची_होती हे आता समोर येतंय. मंदिरात आढळलेल्या एका शिलालेखावरून हे मंदिर इसवी सनापूर्वी काही शे वर्ष अस्तित्वात होते हे सिध्द झालेले आहे.


त्या सरळ रेषेत असलेल्या तीन मंदिरांशी विशिष्ट कोण केलेले, पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी शेवटचे, मंदिर आहे – अरुणाचलेश्वर मंदिर. तामिळनाडू च्या तिरुअन्नामलई मधे असलेलं हे मंदिर, पंच महाभूतांच्या अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. भारतातल्या मोठ्या मंदिरांपैकी हे एक आहे. एका पहाडावर बांधलेले हे मंदिर, विशाल परिसरात पसरलेले आहे. सातशे फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या भिंतींच्या आत बांधलेल्या ह्या मंदिराच्या गोपुरांची उंची १४ मजली इमारती च्या बरोबर आहे.


☆☆☆☆☆

ही पाच शिव मंदिरं आणि त्यांची जमिनीवरची रचना अक्षरशः अद्भुत आहे. यातील तीन मंदिरं एका सरळ रेषेत असणं हा योगायोग असू शकत नाही. अत्यंत विचारपूर्वक, आंध्र आणि तामिळनाडू च्या विस्तीर्ण पटावर बांधलेली ही मंदिरं म्हणजे चमत्कार आहे. त्यांच्या रचनेतून निर्माण होणारी कूट भाषा आपण जर समजू शकलो तर प्राचीन काळातील ज्ञानाची अनेक रहस्यं आपल्यापुढे उलगडू शकतील..!!cp

एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली राबविण्यात येणार

 एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली राबविण्यात येणार

 

माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सैनिकांसाठी,

त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविणार

 

मुंबईदि. 28 :- महाराष्ट्र हे नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध राज्य असून आपल्या गड-किल्ल्यांनी ऐतिहासिक- सांस्कृतिक वारसा जपला आहे. महाराष्ट्राचा हा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून वृद्धिंगत करण्यासाठी गतीने प्रयत्न करावेत. त्यातून स्थानिक विकासालाही चालना देण्यात यावी, असे निर्देश पर्यटनखनिकर्ममाजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात पर्यटनखनिकर्ममाजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी पर्यटनखनिकर्ममाजी सैनिक कल्याण  विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत  तीनही विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयरमाजी सैनिक कल्याण विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजखनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोकेपर्यटन संचालक डॉ. व्ही.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशीभूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे उपसंचालक श्री.कडू,  माजी सैनिक कल्याण विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरेमाजी सैनिक कल्याणचे संचालक कर्नल दिपक ढोंगेमेस्कोच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लढ्ढा आदी अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले कीयेणाऱ्या काळात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटन वाढीसाठी  योग्य नियोजन व नवीन नियमावली तयार करुन पर्यटन विभागाची कामे  मार्गी लावण्यात यावीत. प्रचार व प्रसिद्धीसाठी पर्यटन विभागाचे ब्रॅण्डींग करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करावीअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच

त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

        मुंबई दि. 28 :- महाराष्ट्राला कृषीवीज निर्मितीउद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

            महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

 

            मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे आहे. त्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्या लागतील. भविष्यात त्यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे लिस्टिंग करण्याबाबत विचार करावा लागेल. ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत कंपन्यांबाबत येणाऱ्या तक्रारी कालमर्यादेत सोडविण्यासाठी जिल्हाविभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यात यावीअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री तथा मंडळाच्या उपाध्यक्ष मेघना बोर्डीकरमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीकंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आभा शुक्लासंचालक लोकेश चंद्राराधाकृष्णन बी.अनुदीप दिघेस्वतंत्र संचालक विश्वास पाठकनीता केळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000000

राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या

 राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी

विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या

                                            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 28 :- राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्तेजलहवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यात हवाई वाहतुकीच्या वाढीला मोठा वाव आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उडाण योजनेसह राज्याच्या निधीतून विमानतळांचा विकासत्यांचे विस्तारीकणनाईट लँडिंगची सुविधाधावपट्टीची लांबी वाढविणेविमानतळांवर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. रिलायंसच्या ताब्यात असणारी विमानतळे राज्याच्या ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र उद्योग विकास मंडळाने तातडीने कार्यवाही करावी. मोठ्या शहरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने युद्धपातळीवर कार्यवाही करावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीशिर्डीअमरावती (बेलोरा)पुरंदरकराडचंद्रपूर (मोरवा)सोलापूरधुळेफलटणअकोलागडचिरोली या विमानतळांच्या कामांच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा देखील घेतला. मिहान क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जीएमआर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी देण्यात येणाऱ्या 786.56 हेक्टर क्षेत्रासंदर्भात करावयाच्या कराराचा आढावा घेतला. यासंदर्भातील करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

बैठकीस वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानगरविकासचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगलमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेउद्योग विभागाचे सचिव अन्बलगनएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासूनागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर आदी उपस्थित होते.

000000

देशातील अग्रेसर राज्याचा लौकिक कायम ठेवण्यासाठी ‘मित्रा’ संस्थेने विविध प्राधान्य क्षेत्रांत दिशादर्शक काम करा

 देशातील अग्रेसर राज्याचा लौकिक कायम ठेवण्यासाठी

मित्रा’ संस्थेने विविध प्राधान्य क्षेत्रांत दिशादर्शक काम करावे

                                                         - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

        मुंबई दि. 28 :- देशातील अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्यासाठी वित्तीय सुधारणाखनिकर्मगटशेतीसौरऊर्जा प्रकल्पजैव इंधनआंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी यासारख्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेने दिशादर्शक काम करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनची (मित्रा) बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीगटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सामूहिक विकासाला चालना देण्यात येत आहे. राज्यात साधारण 400 गट कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश गटांनी चांगली कामगिरी केली आहे. कृषीजलसंधारणफलोत्पादनपणन आदी विभागांच्या योजनांचा एकत्रित लाभ देऊन गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक-सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध योजनांच्या अभिसरणाचे एक मॉडेल तयार करण्यात यावेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

   

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजकोषीय तूट कमी करणेभांडवली गुंतवणुकीवर भर देणेमालमत्तांचे सनियंत्रण करणेयोजनांचे अभिसरणजलसंधारणाचे अपूर्ण प्रकल्प गतीने पूर्ण करणेराज्याची डेटा पॉलिसीखनिकर्म पॉलिसी जाहीर करणे यासारख्या बाबींना प्राधान्य द्यावेअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी जायकवाडी प्रकल्पातील सौर ऊर्जा प्रकल्पशेतीमधील टाकाऊ बाबींपासून बायोगॅस निर्मितीगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आदी विषयांचाही सविस्तर आढावा घेतला.

 

बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीवित्त विभागाच्या सचिव शैला ए.कृषी व पर्यटन सचिव जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीमित्रा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिकचा विकास करावा

 पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिकचा विकास करावा

पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिक जिल्ह्याला विकासित करावे. श्रीरामाचा जन्म जरी अयोध्येत झाला असला तरी श्रीरामाचा बराचसा काळ नाशिकमध्ये गेल्याचा इतिहास आहे. केंद्रीय विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला 'राम-काळ-पथयोजनेसाठी निधी मंजूर झाला असून त्यामाध्यमातून रामाचा इतिहास सांगणारे थीम पार्क तयार करण्यात यावेअशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी दिल्या.  पर्यटन धोरणांची अंमलबजावणीपर्यटन विषयक योजना, पदांचा सविस्तर आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला.

 

खनिकर्म विभागाचा आढावा घेत असताना मंत्री श्री. देसाई म्हणाले कीखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुलभ होण्यासाठी एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली राबविण्यात यावीजेणेकरुन अवैध खनिज वाहतुकीला आळा बसून महसूल वाढीस चालना मिळेल.

 

राज्यातील वीर पत्नीवीर माता-पितामाजी सैनिकमाजी सैनिक विधवा पत्नी व त्यांच्यावर  अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे कल्याण व पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. तसेच सैनिक कल्याण विभागात कंत्राटी मनुष्यबळ भरताना आजी व माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात यावेअशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी दिल्या. तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळांतर्गत (मेस्को) माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध करुन देताना सुरक्षा रक्षकांबरोबरच लिपिकतांत्रिक पदासाठी भरती प्रक्रिया राबवावीअसेही त्यांनी यावेळी सूचविले. तसेच त्यांनी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थाछत्रपती संभाजीनगर व मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थानाशिक यांच्याही कामकाजाचा आढावा घेतला.

 

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच

त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

        मुंबई दि. २८ :- महाराष्ट्राला कृषीवीज निर्मितीउद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

            महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

 

            मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे आहे. त्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्या लागतील. भविष्यात त्यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे लिस्टिंग करण्याबाबत विचार करावा लागेल. ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत कंपन्यांबाबत येणाऱ्या तक्रारी कालमर्यादेत सोडविण्यासाठी जिल्हाविभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यात यावीअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री तथा मंडळाच्या उपाध्यक्ष मेघना बोर्डीकरमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीकंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आभा शुक्लासंचालक लोकेश चंद्राराधाकृष्णन बी.अनुदीप दिघेस्वतंत्र संचालक विश्वास पाठकनीता केळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000000

Featured post

Lakshvedhi