Sunday, 31 July 2022

 व्यापार उद्योगाला पूरक धोरण राबवणारे सरकार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

जीएसटी , प्लास्टिक बंदी व एपीएमसी कायदा हे व्यापार उद्योगाचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार*

राज्यातील व्यापार उद्योग व कृषी क्षेत्राला पूरक असे आमचे सरकार असून राज्यातील व्यापार उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे आणि त्यांना चालना देण्याचे कार्य हे सरकार करेल तसेच जीएसटी , प्लास्टिक बंदी व एपीएमसी कायदा हे व्यापार उद्योगाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची घोषणा महाराष्ट्र चेंबरने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय व्यापारी परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबर ची माहिती दिली तसेच जीएसटी तरतुदी संबंधित अडचणी बाजार समिती कायदा प्लास्टिक बंदी यामुळे व्यापार उद्योगात होत असलेल्या अडचणींची माहिती थोडक्यात दिली. अन्नधान्यावरील जीएसटी कर रद्द करावे एपीएमसी कायद्यात बदल करण्यात यावा रद्द करण्यात यावा व प्लास्टिक बंदी स्थगिती द्यावी जोपर्यंत प्लास्टिकला पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्लास्टिक बंदीचा मिळण्याला स्थगिती देण्याची मागणी अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे अमेरिकेमध्ये आयोजित बिजनेस कॉन्फरन्सला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले.

महाराष्ट्र चेंबर तर्फे 2 ते 11 डिसेंबर 22 दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्सपो च्या माहितीपत्रकाचे अनावरण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्र चेंबरने राज्यातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र चेंबरने कृषी पूरक उद्योग यांच्या विकासासाठी काम करावे. राज्यातील कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र चेंबरने दिलेल्या प्रस्तावाला चालना देण्यात येईल. राज्यामध्ये वाढ गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घ्यावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल एग्रीकल्चर तर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यापारी महापरिषद छत्रपती संभाजीनगर सागर लॉन, जालना रोड येथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी,उपाध्यक्ष तनसुख झांबड, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल मालानी, महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे विजय जयस्वाल, घनश्याम गोयल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र भाटिया यांनी बाजार समिती कायदा याविषयी थोडक्यात माहिती दिली तसेच जीएसटी विषयी उमेश शर्मा यांनी माहिती दिली. याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आभार प्रदर्शन महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी यांनी केले.

महाराष्ट्र व्यापारी महापरिषदेला मोठ्या संख्येने राज्यातून व्यापारी उपस्थित होते.

* चौकट*

१)अन्नधान्यावरील जीएसटी कर रद्द करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणार.

2)प्लास्टिक बंदी च्या कायद्याचे अवलोकन करून त्याबाबत योग्य त्या दुरुस्ती करण्यात येईल.

3)महाराष्ट्र चेंबर तर्फे आयोजित या परिषदेमध्ये जीएसटी कर रद्द करणे प्लास्टिक बंदी ला स्थगिती देणे या तीन महत्त्वाच्या विषयां सह अन्य विषयावर महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्या समवेत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

फोटो कॅप्शन

1) महाराष्ट्र राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ,आमदार अब्दुल सत्तार, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी, उपाध्यक्ष तनसुख झांबड, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जयस्वाल, प्रफुल्ल मालानी आदि.

2) महाराष्ट्र चेंबर तर्फे आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय व्यापारी महापरिषदेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी उपाध्यक्ष तनसुख झांबड व्यापारी महासंघाचे विजय जयस्वाल, प्रफुल्ल मालानी आदि मान्यवर.

Thanks and Regards,


Lalit Gandhi | President

Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture (MACCIA

Head Office - Oricon House, 6th Flr, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400 001,

 



उपाययोजना,

 

 मुंबई, दि.30: राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1) -2, पालघर -1,रायगड- महाड- 2, ठाणे-2,रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 12 पथक तैनात आहेत.

नांदेड-1, गडचिरोली-1 असे एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती.

      राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे व 309 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. एकूण 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 112 नगरिकांनी आपला जीव गमावला आहे, तर 223 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 86 घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.

            राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्राप्त हा अहवाल आहे

00000


 


 


 

घरे पोलिस साठी

 पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार                 

                                        -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे व 205 पोलीस निवासस्थानांच्या इमारतीचे लोकार्पण

कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल. अशी ग्वाही आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे व 205 पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दादा भुसे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीसांच्या प्रश्नांच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील आहे. पोलीसांच्या घरांच्या बाबतीत मुंबईत बैठक घेण्यात आली आहे. येत्या काळात शासनाच्या सर्व गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून पोलिसांच्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येईल. मुंबई पोलिसांसाठी 50 हजार घरांची गरज आहे. मात्र सध्या 19 हजार घरे उपलब्ध आहेत. सद्यस्थितीतील घरांच्या डागडुजी व देखभालीची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शासन काम करत आहे.

सध्याचे सरकार हे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांचे सरकार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे काम शंभर टक्के झाले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन युद्ध पातळीवर काम करत आहे. लवकरच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणार आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वास्त केले.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कपात करून पाच रुपयांनी दर कमी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ग्रीडद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सरकारचा संकल्प लोकहिताचे कामे करण्याचा आहे. लोकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य हे शासनाचे ध्येय आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार दादा भुसे म्हणाले की, मालेगाव येथील पोलिसांसाठीचे 54 कोटी 49 लाख खर्चून सुसज्ज निवासस्थान झाले‌ आहे‌‌. उर्वरित अधिकारी -कर्मचारी यांच्यासाठी आणखी निवासस्थाने मंजूर करावीत. तसेच पोलीस शिपाई भरती करावी.

यावेळी 5 पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना प्रातिनिधीक स्वरूपात निवासस्थानाच्या किल्ल्या देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्याकडून या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. यावेळी मालेगाव पोलिसांच्या ताफ्यातील

Prohibeted


 

जय हो



 

पितृ भाषा

 🙏👍🚩*.....संस्कृती...*🚩👍🙏 


पोटा-पाण्यासाठी ते 'स्वित्झर्लंडला' गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे त्यांच्या मुलांची "मातृभाषा" तिथलीच असणार हे उघड आहे. 


*पण त्यांच्या स्वीस पत्नीने मात्र आग्रह धरला की आपल्या मुलांना त्यांची "'पितृ-भाषा'"ही यायला हवी. त्यासाठी या जोडप्याने 'मुंबईत' येऊन आपल्या मुलांना काही महिन्यांसाठी मराठी शाळेत घातलंय. यानिमित्ताने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतला "'पितृभाषा'" हा वेगळाच पैलू समोर आला आहे.*


*पालकांचा, मुलांचा, शिक्षकांचा, व्यवस्थापनाचा आणि एकूण मराठी समाजाचाच मराठी भाषेकडे, 'महाराष्ट्राच्या' "'मातृभाषे'"तल्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मराठीची गळचेपी करणारा आहे.* 


*असे असताना एक परदेशी जोडपे आपल्या दोन्ही मुलांना तीन-चार महिन्यां-साठी 'मुंबई'तल्याच एका मराठमोळ्या शाळेत घालते. त्यामागे आपल्या मुलांना मराठीतून शिकता आले पाहिजे, मराठी बोलता आली पाहिजे हा एकमेव हेतू असतो.*

 

*हे सगळं नवल वाटावं असंच आहे.*


*मूळचे 'मुंबई'चे "अमोल आखवे" आणि स्वीस नागरिक असलेली त्यांची पत्नी "कोरिना शार्कप्लाट्झ आखवे" सध्या 'मुंबई'त "अमोल" यांच्या मूळ घरी रहायला आलेत, तेही आपल्या आठ नि दहा वर्षांच्या दोन्ही मुलांना घेऊन. 'स्वित्झ फ्रँक्स'मध्ये मिळणाऱ्या भरभक्कम पगारावर चार महिन्यांसाठी पाणी सोडून हे दोघेही 'मुंबई'त एक ध्येय घेऊन आले आहेत. "मार्क" आणि "यान" हे त्यांचे दोन्ही मुलगे सध्या '"दहिसर'"च्या "शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी"च्या मराठी माध्यमाच्या शाळेत अनुक्रमे 'तिसरीत' आणि 'पहिलीत' शिकत आहेत. मुलांना काही काळापुरतं मराठी शाळेत घालायचं ही कल्पना "कोरिना"ची.* 


"अमोल" सांगतात, *‘आपली मुले स्वित्झर्लण्डमध्येच राहणार आहेत, तिथेच वाढणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आईची संस्कृती, तिची भाषा मुलांना समजणारच आहे पण मुलांच्या वडिलांची मुळे असलेली भारतीय संस्कृती, मराठी भाषा मुलांना कळावी, मातृभाषे सोबतच पितृभाषाही त्यांना यावी, हा "कोरिना"चा विचार मला महत्त्वाचा वाटला आणि मग इथे येण्याचा आम्ही निर्णय घेतला. परदेशी वंशाच्या आपल्या पत्नीबद्दल सांगताना "अमोल" यांच्या बोलण्यातून अभिमान ओसंडत होता.*


गेली १६-१७ वर्षे परदेशात राहिल्यामुळे तिथले नागरिकत्व सहज मिळत असतानाही आपले मराठमोळे पण जपण्यासाठी "अमोल" यांनी परदेशी नागरिकत्व नाकारले. 


*मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालून घरातही त्यांच्याशी इंग्रजीतच संवाद साधणाऱ्या मराठमोळ्या पालकांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे असताना, 'स्वित्झर्लण्ड' सारख्या '"जर्मन भाषिक'" बहुसंख्य असलेल्या देशात राहूनही "अमोल" मात्र मुलांच्या जन्मापासून त्यांच्याशी मराठीतूनच संवाद साधतात. त्यांची मुले त्यांना डॅडी किंवा पप्पा न संबोधता, 'बाबा' म्हणतात आणि "कोरिना" यांना ममा किंवा इथे मुंबईत आल्यावर 'आई' म्हणूनच हाक मारतात.*

 

हे सगळं चित्र पाहताना खरोखर अवाक होतो आपण.


*‘इट्स नेव्हर टू मच व्हेन इट्स युअर ओन मदरटंग’ असं सांगताना "कोरिना" यांचा आत्मविश्वास दिसून येतो. आपल्या नवऱ्याची मातृभाषा आपल्या मुलांना यावी यासाठी त्यांच्या मनात असलेली ओढ त्यांच्या बोलण्यातून सहज व्यक्त होते. तुम्ही राहत असलेला देश कोणताही असो, राज्य कोणतेही असो...* 

*तुमची मातृभाषा, मूळ भाषा आपल्याला यायलाच हवी या मतावर "कोरिना" ठाम आहेत. "मार्क" माझ्या पोटात असल्यापासून "अमोल" त्याच्याशी मराठीतच बोलतो, "यान"चेही तसेच झाले आहे. त्यामुळे  आमच्या मुलांना मराठी खूप छान समजते. आम्ही सध्या 'मुंबई'त आलो आहोत, त्यामुळे आमची मुले त्यांच्या 'बाबां'च्या भाषेशीच नव्हे तर इथल्या संस्कृतीशी, इथल्या जगण्याशी स्वतःला जोडून घेऊ शकणार आहेत, याचा मला फार आनंद आहे.*


*असे सांगताना "कोरिना" यांच्या डोळ्यात अभिमानाची चमक दिसते. 'मुंबई'तले त्यांचे शेजारी-पाजारी, नातेवाईक आपल्या मुलांना 'इंग्रजी' माध्यमाच्या शाळांमध्ये घालून घरातही 'इंग्रजी' वा 'पाश्चिमात्य संस्कृती' रुजवण्याचा अट्टहास धरत आहेत, याची खंत "अमोल" आणि "कोरिना" व्यक्त करतात.*


*"मार्क" आणि "यान" दोघेही मुले अगदी सहज मराठी बोलतात. दोघांनाही 'स्वित्झर्लण्ड'मध्ये राहूनही 'भारता'चे 'राष्ट्रगीत' पूर्ण तोंडपाठ आहे. मराठीतले स्वर कोणते, व्यंजने कोणती हे तिसरीतल्या "मार्क"ला सहज सांगता येते. मराठमोळ्या घरात दिवे-लागणीच्या वेळेला ‘चल बेटा, गॉडची प्रेअर म्हण’ किंवा ‘जेवताना इट बेटा, इट...’*

 

*असं इंग्रजाळलेले मराठी संवाद ऐकले की मराठी घरात मराठी भाषा कशी 'व्हेंटिलेटरवर' आहे, याचे दुख होते. या उलट "अमोल" यांच्या 'स्वित्झ' कुटुंबात वावरताना कुठेही परकेपणाचा लवलेशही नसतो. ‘शाळा आहे, लवकर आवर, अजून आंघोळ व्हायची आहे’, इतक्या सहज-सुंदर मराठीत "अमोल" आपल्या मुलांना धारेवर धरतात.*


*इथे आल्यावर सुरुवातीला "मार्क"ला 'स्वित्झर्लण्ड'च्या शाळेची फार आठवण आली. तो अक्षरशः  रडायचा. तिथल्या मित्रांशी व्हीडिओ कॉलवर गप्पा मारायचा आणि तिथे परत जायचे म्हणून हट्ट करायचा पण आता दोन्ही मुलांना आपली 'मुंबई'ची शाळा आवडली आहे. एकही दिवस दोघांनीही सुटी घेतली नाही, ११ वाजले की शाळेचे वेध दोघांना आपोआप लागतात, असे "कोरिना" सांगतात.*


*"अमोल" - "कोरिना" यांच्या निर्णयाबद्दल "शैलेंद्र विद्यालयातल्या" "यान"च्या वर्गशिक्षिका "अनिता राऊत" फारच कौतुकाने सांगतात. त्या म्हणतात, असे पालक मिळणे फार कठीण आहे. त्यांनी केवळ मुलांना इथल्या शाळेत घातले नाही, तर ते स्वतःही या शाळेचा एक भाग झाले आहेत. "यान" खूप लवकर सगळ्या गोष्टी आत्मसात करतो आहे. त्याचे पालक पहिल्यापासून त्यांच्याशी मराठीत बोलतात, हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून आम्हाला समजते. मुळात, या मुलांना शिकण्याची इच्छा आहे. तो वर्गात माझ्याशी मराठीतच बोलतो, काही शब्द उच्चारता येत नसतील तर प्रयत्न करतो, खुणांनी सांगतो, हे फारच कौतुकास्पद आहे.*


*"शैलेंद्र विद्यालया"चे प्राचार्य "सुदाम कुंभार" म्हणतात, पूर्वी 'मराठी' माध्यमात प्रवेश घेण्यासाठी लोक रांगा लावत असत. आता त्याच रांगा 'इंग्रजी' माध्यमात प्रवेश घेण्यासाठी लागतात. आपल्याकडे अशी परिस्थिती असताना "आखवे" कुटुंबीय हा आपल्यासाठी आदर्श ठरू शकतो. 'मुंबई'तल्या काही मोजक्या 'मराठी' शाळांमधून त्यांनी त्यांच्या मुलांसाठी "शैलेंद्र विद्यालयाची" निवड केली, हा आमचा बहुमान आहे. आमच्या शाळेतून या मुलांना आम्ही केवळ मराठीतून शिक्षणच देणार नाही, तर आम्ही त्यांना मराठी 'संस्कृती' , मराठीपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमचे शिक्षकही खूप मेहनत घेत आहेत.*


*मुलांना 'मुंबई'तल्या शाळेचा सर्वांंगीण अनुभव घेता यावा, यासाठी "अमोल" यांनी केवळ तीन महिन्यांसाठी शाळेचा गणवेशही घेतला आहे. तीन महिन्यांसाठी गणवेश का घेता, असा प्रश्न कुणी तरी विचारल्यावर मुलांना मुंबईतल्या शाळेची आयुष्यभर आठवण देणारी ती एकच खूण मी 'स्वित्झर्लण्ड'ला सोबत नेऊ शकतो, असे उत्तर "अमोल" यांनी दिले.*


*पालकत्व म्हणजे काय तर मुलांना जन्माला घालणे, त्यांना जेवू-खाऊ घालणे, गडगंज पैसा कमावून वर्षाकाठी एक-दोन वेळा फिरायला नेणे, मॉलमध्ये नेऊन महागडे शॉपिंग करणे आणि मग चांगल्या शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठय़ा ब्रॅण्डेड शाळांमध्ये खोऱ्याने फी भरून अभ्यास आणि स्पर्धेचे ओझे मुलांवर टाकणे...*


*दुर्दैवाने काही अपवाद वगळता हेच चित्र आपल्या आजुबाजूला  आजकाल दिसते. असे असताना "अमोल" यांचे उदाहरण कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे, यात वाद नाही.*


*'माध्यान्हभोजन'*


*"मार्क" आणि "यान" या दोघांनाही घरच्या डब्यापेक्षा जास्त शाळेत येणारे माध्यान्ह भोजन जास्त आवडले आहे. शाळेत येणारी खिचडी, पुलाव ही दोन्ही मुले चवी-चवीने खातात. सगळ्या मुलांबरोबर बसून हाताने व्यवस्थित न सांडवता ही मुले जे येईल ते नीट जेवतात, असे शाळेतल्या शिक्षकांनी सांगितले. म्हणजेच, केवळ मराठ-मोळ्या शिक्षणातून नव्हे तर, खाद्य संस्कृतीतूनही मराठीपण या मुलांच्या अंगात भिनेल, असे म्हणायला हरकत नाही...* 


 साभार 🙏🏻🙏🏻   ✍️    *"स्पृहा गानू"*

आपण सगळ्यांनी विचार करावा.

अनमोल






 

पुरा है विश्वास,पार्थ पे

 *BANK और WIFE* की विश्वसनियता इतनी गिर गई है कि लोग *गर्लफ्रैंड* के पास ही धन जमा करना ज्यादा सेफ समझते हैं . . . 😂🤣

_पार्थ चटर्जी 😎🤣

*# west bengal scam*

Saturday, 30 July 2022

कलाकाराची kaaaaaaalaaaaaa

 


येथे कर माझे जुळती

 🌿ग्रेट डॉ.अब्दुल कलाम सर🌿🙏🏻

आपल्यापैकी बर्‍याच जणांना विश्वास ठेवणे कठीण होईल.  परंतु हे *कलाम सरांचे सचिव श्री नायर यांनी लिहिले आहे.*

 *अविश्वसनीय आणि धक्कादायक माहिती वाचा.*

 डी. पोधीगाई यांनी श्री पी. एम. नायर यांची मुलाखत प्रसारित केली. (निवृत्त आयएएस अधिकारी जे  डॉ. अब्दुल कलाम सरांचे सचिव होते सर देशाचे राष्ट्रपती असताना.)

 भावनांनी ओथंबलेल्या आवाजामध्ये त्यांनी बोललेले मुद्दे मी थोडक्यात सांगतो.

  श्री नायर यांनी *"कलाम इफेक्ट"* नावाच्या पुस्तकाचे लेखन केले.

 १. अनेक राष्ट्रांना भेट देणाऱ्या राज्य प्रमुखांना भेटवस्तू देण्याची प्रथा असल्याने डॉ कलाम जेव्हा परदेशात गेले तेव्हा त्यांना महागड्या भेटवस्तू मिळत असत.

 ही भेट नाकारणे हा देशाचा अपमान आणि भारतासाठी पेच ठरेल.

 म्हणून, परदेशातुन परत आल्यावर डॉ. कलाम यांनी भेटवस्तूंचे छायाचित्र काढायला सांगितले आणि नंतर कॅटलॉज केले आणि ते संग्रहात सुपूर्द केले.

 त्यानंतर,त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेच नाही.  राष्ट्रपती भवन सोडताना मिळालेल्या भेटवस्तूंमधुन त्यांनी पेन्सिलही घेतली नाही.

 २. २००२ मध्ये, डॉ. कलाम यांनी पदभार स्वीकारला त्या वर्षी, *रमजान महिना जुलै-ऑगस्टमध्ये आला.*

 राष्ट्रपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन करणे ही नेहमीची प्रथा होती.

 *डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना विचारले की त्यांनी आधीच चांगले आहार घेतलेल्या लोकांना पार्टी का आयोजित केली पाहिजे ?* आणि त्यासाठी किती खर्च येईल हे शोधण्यास सांगितले.

श्री. नायर यांनी सांगितले की यासाठी सुमारे रुपये बावीस लाख रू.खर्च येईल.  

 डॉ. कलाम यांनी त्याला काही निवडक अनाथाश्रमांना अन्न, कपडे आणि ब्लँकेटच्या रूपात दान करण्यास सांगितले.अनाथ आश्रमांची निवड राष्ट्रपती भवनमधील एका टिमवर सोडली गेली होती आणि त्यात डॉ.कलाम यांची कोणतीही भूमिका नव्हती.निवड झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले आणि त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. ते म्हणाले की आपण त्याच्या वैयक्तिक बचतीतून काही रक्कम देत आहोत आणि ही माहिती कोणालाही दिली जाऊ नये.

श्री नायर यांना इतका धक्का बसला की तो म्हणाला, "सर, मी बाहेर जाऊन सर्वांना सांगेन. लोकांना माहित असावे की येथे असा मनुष्य आहे ज्याने फक्त सरकारचे पैसेच दान केले नाहीत तर तो स्वत: चे पैसेही देत ​​आहे."

 *डॉ. कलाम हे मुस्लिम असूनही त्यांनी राष्ट्रपती असताना इफ्तार पार्टी केली नव्हती.*

*Dr. डॉ. कलाम यांना "येस सर" प्रकारचे लोक आवडत नाहीत*.एकदा जेव्हा मुख्य न्यायाधीश आले आणि काही काळ डॉ. कलाम यांनी आपले मत व्यक्त केले आणि श्री. नायर यांना विचारले,"आपण सहमत आहात?"  श्री नायर म्हणाले "नाही सर, मी तुमच्याशी सहमत नाही ".

 सरन्यायाधीश आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या कानावर विश्वास बसला नाही. एखाद्या नागरी सेवकास राष्ट्रपतींशी सहमत नसणे अशक्य होते आणि तेही इतके उघडपणे.

श्री. नायर यांनी त्यांना सांगितले की राष्ट्रपती नंतर त्यांच्याशी का सहमत नाहीत असा प्रश्न विचारतील? आणि जर दिलेले कारण तर्कसंगत असेल तर ते 99% मत बदलतील.

 Dr. डॉ. कलाम यांनी आपल्या नातेवाईकांना दिल्ली येथे येण्याचे आमंत्रण दिले आणि ते सर्व राष्ट्रपती भवनात राहिले. त्यांनी त्यांच्यासाठी जे पैसे भरले होते त्या शहराकडे जाण्यासाठी त्यांच्यासाठी एक बस आयोजित केली.कोणतीही अधिकृत कार वापरली गेली नव्हती.  डॉ. कलाम यांच्या सूचनेनुसार त्यांचा सर्व मुक्काम आणि जेवणाची गणना केली गेली आणि त्यांनी भरलेले बिल 2 लाखांवर आले.

या देशाच्या इतिहासात कोणीही केले नाही.

 आता, *क्लायमॅक्सची वाट पाहा*, डॉ. कलाम यांचा मोठा भाऊ त्याच्याबरोबर संपूर्ण आठवडाभर खोलीत राहिला कारण डॉ. कलाम यांनी आपला भाऊ त्याच्याबरोबर राहावा अशी इच्छा व्यक्त केली.ते गेल्यावर डॉ. कलाम यांना त्या खोलीचे भाडेदेखील द्यायचे होते.

 *कल्पना करा की एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष ज्या खोलीत तो राहतो त्या घरासाठी भाडे देत आहे.*

  प्रामाणिकपणा हाताळण्यासाठी खूप जास्त मिळत आहे असा विचार करणार्‍या कर्मचार्‍यांनी हे कोणत्याही प्रकारे मान्य केले नाही !!!.

 कलाम सर जेव्हा कार्यकाळ संपल्यावर राष्ट्रपती भवन सोडणार होते, तेव्हा प्रत्येक स्टाफ सदस्याने जाऊन त्यांना भेट दिली.

 श्री. नायर त्यांच्या जवळ गेले. ते पलंगावर बसले होते. आणि डॉ कलाम यांनी त्यांची पत्नी का आली नाही असे विचारले.  एका अपघातामुळे ती पलंगावर असल्याचे नायर यांनी उत्तर दिले.

 दुसर्‍या दिवशी, श्री नायर यांनी आपल्या घराभोवती बरेच पोलिस पाहिले आणि काय झाले ते विचारले. ते म्हणाले की, भारताचे राष्ट्रपती त्यांच्या घरी त्यांच्या भेटीला येत होते.  ते येऊन आपल्या बायकोला भेटले आणि काही वेळ गप्पा मारल्या.

 श्री नायर म्हणतात की, *कोणत्याही देशाचे कोणतेही अध्यक्ष सरकारी सेवकाच्या घरी भेट देणार नाहीत आणि तेही अशा साध्या बहाण्याने*.

 मला वाटलं मी तुम्हाला माहितीचा तपशील द्यावा कारण तुमच्यातील बर्‍याच जणांनी टेलिकास्ट पाहिली नसेल आणि त्यामुळे ते उपयोगी पडेल.

 *एपीजे अब्दुल कलाम यांचा धाकटा भाऊ छत्री दुरुस्तीचे दुकान चालवतो*

 कलाम यांच्या अंत्यसंस्कारावेळी श्री. नायर जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा श्री. नायर व भाऊ यांच्याबद्दल आदर दर्शवताना त्याने त्यांच्या पायाला स्पर्श केला.

 अशी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सामायिक केली जावी कारण मुख्य प्रवाहातील मीडिया हे दर्शविणार नाही.

 *डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी मागे ठेवलेली मालमत्ता खालील प्रमाणे होती.*


 6 अर्धी चड्डी (2 डीआरडीओ गणवेश)

 4 शर्ट (2 डीआरडीओ गणवेश)

 2500 पुस्तके

 1 फ्लॅट (त्याने दान केलेला आहे)

 1 पद्मश्री

 1 पद्मभूषण

 1 भारतरत्न

 16 डॉक्टरेट

 1 वेबसाइट

 1 ट्विटर खाते

 1 ईमेल आयडी


 त्यांच्याकडे कोणताही टीव्ही, एसी, कार, दागिने, शेअर्स, जमीन किंवा बँक बॅलन्स नव्हते.


*त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी मागील 8 वर्षांची पेन्शन देखील दान केली होती.*


 🌱ते खरे देशभक्त आणि खरे भारतीय होते🌱


 *भारतरत्न डॉ. कलाम सर,हा देश कायम तुमचा आभारी राहील🙏🏻🌱🙏🏻

पिकल्या पानाचा


 

मेंदी चे हातावर

 



रोशनी art.

कथा है संत परंपरा की.

 *🛕संत नामदेवांना या देवळात मनाई केली म्हणून मंदिराने चक्क दिशाच बदलली...!!🚩*

*संकलन - संध्या सुर्यवंशी. पुणे.*

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. ऐन तारुण्यात समाधी घेणारे ज्ञानेश्वर असोत, जातपात झुगारून त्यामधून समाजाला बाहेर काढू पाहणारे संत तुकाराम असोत, संत ज्ञानदेवांच्या भगिनी मुक्ताई असोत, तिथपासून ते अगदी आधुनिक संत मानले जाणारे गाडगे बाबा.

महाराष्ट्रात संतांची यादी फार मोठी आहे. प्रत्येक संताचं कार्य, त्याची शिकवण या गोष्टींचे महत्त्व वेगळे आहे. ही संतपरंपरा जशी माणसाला चार शहाणपणाच्या गोष्टी शिकवते, *तशाच काही चमत्कार, अचाट गोष्टी घडल्या असल्याच्या निरनिराळ्या दंतकथा सुद्धा सांगते.*

संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव असणारी भिंत चालवून दाखवणं, तुकारामांचे अभंग इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगत पुन्हा वर येणं अशा अनेक दंतकथा तुम्ही ऐकल्या असतील. ज्ञानेश्वर माउलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले, ही दंतकथा तर आपण एवढ्यावेळा ऐकलेली असते, की ती आपल्याला अगदी तोंडपाठ असते. *खरं तर ती प्रतिकात्मक आहे. वास्तव समजून घ्यायला कोणी तयारच नाही.*

अशीच एक कथा संत नामदेव यांच्या बाबतीत सुद्धा घडली होती असं मानलं जातं. पंढरपूरच्या विठूरायाचे भक्त असणारे संत नामदेव महाराज, हे केवळ आपल्या महाराष्ट्रातच नाही, तर कबीर पंथी आणि शीख धर्मीयांमध्ये सुद्धा फार महत्त्वाचे मानले जातात, हे तर आपल्याला ठाऊक आहेच.

अशा या महान संताला मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही, म्हणून चक्क त्या मंदिराची दिशा बदलली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते.

कुठे आहे हे मंदिर?

महादेव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाणारे, ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंग. हे नेमके कुठे आहे याबद्दल दुमत आहे. काही भक्तांच्या मान्यतेनुसार गुजरातमधील द्वारकेजवळ नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तर काही भाविक असेही मानतात, की महाराष्ट्रातील मराठवाड्यात हे ज्योतिर्लिंग आहे.

हिंगोलीमधील औंध नागनाथ म्हणजेच १३ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर होय. हिंदू आणि शीख धर्मात हे मंदिर फारच महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण, या मंदिराचा संबंध संत नामदेव यांच्याशी जोडला गेला आहे.

संत नामदेव हे जसे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते, तसेच ते शंकराचे सुद्धा फार मोठे भक्त होते असं मानलं जातं.

मंदिराचा इतिहास आणि जन्मकथा

या मंदिराची स्थापना पांडवांनी केली आहे अशी आख्यायिका सांगण्यात येते. पांडव या परिसरात वास्तव्याला असताना, घडणारी चमत्कारिक घटना या मंदिराच्या निर्मितीस कारणीभूत ठरली.

पांडवांच्या गाई नदीवर पाणी पिण्यासाठी जात असत. मनसोक्त पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांच्या आचळातून आपोआप दूध स्रवू लागायचं. हे दूध नदीत अर्पण केलं जायचं. जणू काही या गाई एखादा अभिषेक करत असाव्यात.

ही गोष्ट लक्षात येताच भीमाने युधीष्ठीराला याविषयी सांगितलं. हा नक्कीच एक चमत्कार आहे आणि त्याचा शोध घ्यायला हवा असा पांडवांनी निश्चय केला. या शोधकार्यात पांडवांना यश आलं आणि तिथे असणारं महादेवाचं ज्योतिर्लिंग त्यांना सापडलं.

या लिंगाची स्थापना करून पांडवांनी त्याठिकाणी मंदिराची निर्मिती केली. आज हेच ठिकाण औंध नागनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार

या मंदिराचा पाय आणि एकूण मंदिराची रचना यात भिन्नता आढळते. याचं कारण म्हणजे या मंदिराचा करण्यात आलेला जीर्णोद्धार… मुघल शासक औरंगजेब याने अनेक हिंदू देवस्थानं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकीच एक म्हणजे औंध नागनाथ..

त्यावेळी मंदिर संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. कालांतराने याचा जीर्णोद्धार करण्यात आला. म्हणूनच आज अस्तित्वात असलेलं मंदिर पाहायला मिळतं.

या मंदिराचा पाया आणि कळस यांच्यात दिसणारी तफावत, हे या जीर्णोद्धाराचे कारण आहे. मुळात अस्तित्वात असलेलं मंदिर उध्वस्त झाल्यामुळे त्याच्या वरील भाग पुन्हा नव्याने बांधण्यात आला आहे.

नामदेवांची कथा

या मंदिरातील पुजारी जातीव्यवस्थेचे फार काटेकोरपणे पालन करत असत. शंकराचे भक्त असणारे नामदेव महाराज या मंदिरात गेले. त्यांनी महादेवाची भक्ती सुरु केली. मात्र ते खळवंग्या जातीचे असल्याचे कारण देत, पुजऱ्यांनी त्यांना मंदिरातून बाहेर काढलं.

उच्चजातीत जन्म झालेला नसल्याने, या मंदिरात येऊन भगवान शंकराची उपासना करण्याची परवानगी त्यांना नाही, असं पुजाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

एवढंच नाही, तर त्यांचा अपमान करण्यात आला. संत नामदेव मात्र शंकराचे फार मोठे भक्त होते. या घटनेनंतरही त्यांनी शंकराची उपासना थांबवली नाही. ते मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि त्यांनी त्यांची प्रार्थना, पूजाअर्चा सुरूच ठेवली.

त्यांनी भगवान शंकराचा धावा सुरु केला. जातीचं कारण देऊन त्यांना मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यांचा त्यांना राग आला नव्हता, मात्र ज्या भगवान शंकरानेच त्यांना या जातीत जन्माला घातलं, त्याच्यावरही हे इतर भक्त विश्वास ठेऊ शकत नाहीत, याबद्दल त्यांना वाईट वाटत होतं.

सर्वशक्तिमान भगवान शंकराने आता काहीतरी चमत्कार दाखवावा की त्याची शक्ती आणि नामदेवांची भक्ती यावर सगळ्यांचाच विश्वास बसेल, अशी त्यांची इच्छा होती. नामदेवांची श्रद्धा आणि भक्ती बघून भगवान शंकर प्रसन्न झाले.

भगवान शंकराने आपल्या दैवी शक्तीचा चमत्कार दाखवला आणि त्या मंदिराने थेट दिशाच बदलली. मंदिराचं द्वार विरुद्ध बाजूला फिरून संत नामदेवांच्या दिशेला आलं.

या भक्ताचा धावा ऐकून, त्याला कुठलाही त्रास होऊ नये, आणि आपले दर्शन व्हावे यासाठी शंकराने मंदिराचे प्रवेशद्वार नामदेवांच्या समोर आणून ठेवले.

भगवान शंकराच्या मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असते. औंध नागनाथ हे एकमेव असं ज्योतिर्लिंग मंदिर आहे, ज्याचं प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. याचं कारण हेच असल्याचं सांगितलं जातं. संत नामदेवांच्या भक्तीसाठी शंकराने हा चमत्कार करून दाखवला होता, अशी दंतकथा आजही सांगितली जाते.

मैत्री

 *आयुष्य जगताना*

*मिठासारख जगावं,*

*महाग नसावं पण*

*महत्त्वाच‌ असावं..‌


मैत्री din

 




 

G p f statment

 भविष्य निर्वाह निधी खात्यांचे

वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन उपलब्ध

 

            मुंबई, दि 29 : भविष्य निर्वाह निधीधारक राज्य शासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या सन 2021-22 या वर्षातील खात्याचे वार्षिक विवरणपत्र (स्लिप्स) प्रधान महालेखापाल कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ प्रणालीच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. भविष्य निर्वाह निधीधारकांनी हे वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळवावे, असे आवाहन उपमहालेखापाल (निधी) कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

            राज्यातील भविष्य निर्वाह निधीधारक सन 2021-22 या वर्षाचे वार्षिक विवरणपत्र पाहण्यासाठी/ डाऊनलोड करण्यासाठी/ प्रिंटिंगसाठी सेवार्थ प्रणालीच्या संकेतस्थळास भेट देऊ शकतात. राज्य शासनाने वर्ष 2019-20 पासून मूळ प्रती देणे बंद केले आहे. जीपीएफ खात्यासंदर्भात विवरणपत्रामध्ये विसंगती अथवा त्रुटी आढळल्यास उप महालेखापाल आणि प्रधान महालेखापाल कार्यालयाशी संपर्क साधावा. जमा आणि वजावटीतील तफावतजन्म दिनांक आणि नियुक्तीची तारीख विवरणपत्रावर छापील नसल्यास या नोंदीच्या पडताळणी आणि अद्ययावतीकरणासाठी प्रधान महालेखापाल यांच्या कार्यालयात पाठवाव्यात. तसेच agaeMaharashtra1@cag.gov.in हा ईमेल पत्ताही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 2 रा मजलाप्रतिष्ठा भवनन्यु मरीन लाईन्स१०१महर्षि कर्वे मार्ग मुंबई ४०० ०२० या पत्त्यावर तसेच022-22039680 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक, औरंगाबाद जिल्हा दौरा


            मुंबई, दि.29 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांकरिता नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत.

            शुक्रवार दि.29 जुलै रोजी सोयीनुसार मालेगाव (जि.नाशिक) कडे प्रयाण आणि मालेगाव येथे मुक्काम. शनिवार दि.30 जुलै रोजी मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांबाबत आढावा बैठक होईल. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना होणार असून तेथे त्यांचा मुक्काम असणार आहे.

            रविवार दि.31 जुलै रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होईल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन, भूमिपूजन आदी कार्यक्रम होतील. त्यानंतर मुख्यमंत्री सोयीनुसार मुंबईकडे रवाना होतील.

0000



 लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित

          मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाच्या जुलै-2022 या महिन्याच्या अंकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी समारंभ, कृषी विभागाच्या विविध योजना, महिला शेतक-यांच्या यशकथा हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

            राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले आहे. या अंकामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांचा परिचय, कृषी विभागाच्या विविध योजना, ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील महाराष्ट्राची कामगिरी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, शेळीपालन, वनहक्क कायदा, राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या महिला लाभार्थींच्या यशकथांचा अंकात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, वाचू आनंदे ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.


०००००



Friday, 29 July 2022

 राज्यपालांच्या उपस्थितीत अंधेरीतील चौकाचा नामकरण सोहळा संपन्न.

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी - गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  

            मुंबई दि. 29 : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

            चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.

            आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले.

            भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

००००

Governor Koshyari attends Andheri Chowk naming ceremony

Praises contribution of Rajasthani – Gujarati communities in making Mumbai financial capital.

            Mumbai Dated 29 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Inauguration and Naming Ceremony of Chowk after Late Smt Shantidevi Champalalji Kothari at J P Road, Andheri Mumbai on Friday (29 July).

            Member of Parliament Navneet Rana, MLAs Ravi Rana, Amit Satam, Nilesh Rane, Bharati Lavekar and Pankaj Bhoyar, Choreographer Remo D’Souza and Trustee Rakesh Kothari were prominent among those present.

            Speaking on the occasion the Governor hailed the contribution of Rajasthani - Marwari and Gujarati communities in making Mumbai the financial capital of India. The Governor said the Rajasthani Marwari community is living in various parts of the country and also in countries like Nepal, Mauritius and others. He said wherever members of the community go, they not only do business, but also do acts of philanthropy by creating schools, hospitals etc.

00000

 आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे येथे विधिवत पूजन करून साजरी



 आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे येथे विधिवत पूजन करून साजरी



आंख मारे ए


 

सूचना

 Important information - TRAI does not provide any NOC for installing mobile towers. If a fraudster brings a fake letter to you, inform the concerned service provider and the local police.

 ✨🌺✨✨🌺✨


*हसणे फार सुंदर आहे !* 

*दुसऱ्याला हसवणे त्याहून सुंदर* *आणि वंदनीय आहे..* 

*मात्र दुस-यावर हसणे निंदनीय* *आहे.* 

 

*स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...* 

*मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.* 

 

*“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”....* 



✨🌺✨ *शुभ दिवस*✨🌺✨


 



 

 


घरो घरी तिरंगा

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी.

            मुंबई, दि. 27 : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’अंतर्गत देशभरात दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम साजरा होणार आहे. या उपक्रमाकरीता ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांचे सर्व मुख्याधिकारी यांना पाठवि‍लेल्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचनांबाबत कळविण्यात आले आहे.

            दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, सर्व शासकीय / निमशासकीय / खासगी आस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. वरील तीन दिवसांच्या कालावधीत घरोघरी दररोज संध्याकाळी झेंडा उतरविण्याची गरज नाही. तथापि, कार्यालयांना यासंबंधी ध्वजसंहिता पाळावी लागेल. घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या सूचना व नियमावलीबाबत नागरिकांत जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे. जिल्हा स्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांची मदत घेवून स्थानिक वृत्तपत्रांत बातम्या, स्थानिक केबल, रेडीओ चॅनल, सोशल मीडीया, होर्डींग्ज, बॅनर इत्यांदी मार्फत प्रचार प्रसिद्धी करावी.

            घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या संकेतस्थळावर IEC आयईसी साहित्य उपलब्ध असून http://mahaamrut.org/Download.aspx या लिंकवरुन माहिती, शिक्षण व संवाद साहित्य डाऊनलोड करावे. गावस्तरापर्यंत झेंडे वितरण, संकलन आदी कामांची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे.

०००००

राज्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण सूचना जारी.

            मुंबई, दि. 28 : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनी सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांसाठी सर्वसाधारण सूचना जारी केल्या आहेत.

             ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसार, प्रचार व जाणीव जागृती मोहिमेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, जाहिराती, लघु चित्रपट, सेलिब्रिटीच्या माध्यमातून आवाहन, पोस्टर इ. याची निर्मिती केली आहे. ती शासनाच्या https://mahaamrut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर याबाबतची माहिती कोणत्याही विभागास / नागरिकाला उपलब्ध होऊ शकते. त्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यात यावा. ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या असून याबाबतचे शासन परिपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केले आहे.

             स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.

GST


 अन्नधान्य खाद्यपदार्थ व गुळावरील जीएसटी संबंधी नवीन नियमात आवश्यक त्या दुरुस्त्या करू : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन.

नवी दिल्ली: जीएसटी कौन्सिलच्या शिफारसी वरून केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या अन्नधान्य,खाद्यपदार्थ व गुळावरील जीएसटी आकारणी संबंधी या अधिसूचनेमध्ये असलेली क्लिष्टता दूर करून सामान्य ग्राहक व छोटे व्यापारी यांना याचा बोजा होणार नाही अशा पद्धतीने आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जातील असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर या राज्यातील व्यापार,उद्योग व कृषी उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी खासदार हेमंत गोडसे व शिष्टमंडळासह अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांची भेट घेऊन नवीन केलेली कर आकारणी रद्द करण्याची मागणी केली त्याप्रसंगी ते बोलत होते.

ललित गांधी यांनी याप्रसंगी व्यापारी व ग्राहक यांच्या वतीने भूमिका मांडताना कमी प्रमाणात खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहक व छोटे व्यापारी यांच्यावर या कराचा नवीन भुर्दंड पडणार आहे. पॅकिंग न करता विकलेल्या मालावर कर आकारणी होणार नसली तरीही सध्याच्या काळामध्ये पॅकिंग न करता वस्तू विकण्याची पद्धत जवळपास कालबाह्य झालेली आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता व अन्नधान्य खाद्यपदार्थांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी त्यांचे पॅकिंग करणे आवश्यक असते. त्यामुळे कराचा बोजा हा सामान्य ग्राहकाच्या वर पडणार आहे तसेच या कर रचनेमध्ये विवरणपत्रे भरण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असल्याने छोटा व्यापारी या गोष्टींची पूर्तता करताना अडचणीत येणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांनीही या कायद्यामध्ये बदल करून सामान्य ग्राहक व छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा असे आग्रही प्रतिपादन केले.

अर्थ मंत्रालयातील कर विभागाचा प्रभार असलेले अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने मांडलेली भूमिका योग्य असल्याचे मान्य करताना सांगितले की, केंद्र सरकारचा अशा प्रकारे अन्नधान्यावर कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता.

जीएसटी कौन्सिल मध्ये विविध राज्यांनी सातत्याने मागणी केल्याने, तसेच पूर्वीच्या कर उत्पन्नात घट झाल्याची माहिती समोर आल्याने सर्व पक्षांच्या अर्थमंत्र्यांच्या समावेश असलेल्या समितीने अशा प्रकारे कर करण्याचा प्रस्ताव सादर केला ज्याला जीएसटी कौन्सिलने मंजुरी दिल्याने कर आकारणी सुरू झाली आहे.

मात्र या कर आकारणीच्या प्रक्रियेमध्ये, यासंबंधीच्या आदेशामध्ये अनेक क्लिष्टता व विसंगती असल्याचे मंत्री महोदयांनी मान्य केले व यासंबंधी सर्व तांत्रिक बाबींचा तपशील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सादर करावा अशा सूचना केल्या. यासंबंधीच्या सर्व सूचनांचा योग्य विचार करून ताबडतोब यासंबंधीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या युवा उद्योजक समितीचे प्रमुख संदीप भंडारी, चेंबरचे दिल्ली प्रतिनिधी जे.के.जैन यांचा समावेश होता.

तत्पूर्वी ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करण्याच्या मागणीस अर्थ मंत्रालयकडे शिफारस करण्यासाठी जेष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री नारायण राणे,केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड,खासदार धनंजय महाडिक,खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय मंडलिक यांच्या समवेत स्वतंत्र बैठका घेऊन याविषयी सहकार्य करण्याची मागणी केली. ज्याला सर्वच मान्यवरांनी स्वीकृती देऊन हा कर रद्द करण्याची शिफारस करू असे आश्वासन ललित गांधी यांना दिले

*फोटो कॅप्शन: केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या समवेतच्या बैठकीत अन्नधान्यावरील जीएसटी संबंधी भूमिका मांडताना ललित गांधी, सोबत खासदार हेमंत गोडसे, संदीप भंडारी*

श्रावण आला रे घरी

 


Thursday, 28 July 2022

भवत्ताल


 

भवताल

 पावसाळ्यात दरवर्षी बुडणाऱ्या मुंबईची गोष्ट; भाग १

(भवतालाच्या गोष्टी ५१)

मुंबईमध्ये दर पावसाळ्यात दाणादाण उडते. हे सारे का? कशामुळे? या गोष्टींचा मागोवा घेताना एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते. ती म्हणजे- हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्याला कोणतेही एक सरळ उत्तर नाही. इथला भूगोल, पाऊस आणि माणसाने घातलेला घोळ या सर्वांचाच हा परिपाक आहे. विशेष म्हणजे पावणेदोनशे वर्षांपूर्वी पाणथळ जागा बुजवून मुंबईचा विस्तार करताना काही ठिकाणे पावसाळ्यात भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणार हे वास्तव स्वीकारलेले होते. पण आपली जीवनशैली बदलली आणि आपण या शहराकडून जास्त अपेक्षा करायला लागतो... पण मुळातच मर्यादा असल्यामुळे हे शहर आपल्या अपेक्षा पूर्ण कसे करणार?


या सर्व गुंगागुंतीची प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी सांगितलेली गोष्ट, भाग १.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Mumbai-Chitale-Part1

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५१ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


रस्ते विकास

 Continue    विशेष भर

            पालघर जिल्ह्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणावर विशेष भर दिल्यास दळणवळणाच्या अंतर्गत सुविधा विकसित होणार आहेत, त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन मुरबे-पालघर रस्त्यामुळे पालघरजवळील दापोलीकडे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होईल आणि ३५ कि.मी. चे अंतर कमी होईल. विश्वभारती फाटा- भिनार-वडपा मार्गाचे काम देखील मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

शीळफाटा-भिवंडी रस्त्याच्या मोबदल्याचा विषय मार्गी लावण्याचे निर्देश.

            शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या भूसंपादनापोटी देण्यात येणाऱ्या मोबदल्याचा विषय प्रलंबित असून तो तातडीने मार्गी लावावा. सर्व्हिस रोड- राजनोली ते दुर्गाडी मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याबरोबरच तेथील विस्थापितांसाठी ठाण्याच्या धर्तीवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

नियमबाह्य गतिरोधक काढून नियमांची अंमलबजावणी करा- मुख्यमंत्रीरस्ते विकास 

            बदलापूर मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक करण्यात आले असून हे नियमबाह्य गतिरोधक तातडीने काढण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना गतिरोधकांसंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


०००००

रस्ते प्रकल्प

 मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रकल्पांचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तत्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना.

            मुंबई, दि. 28 :- मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जनतेला तत्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्या.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांचेसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार महानगरपालिकांचे आयुक्त, ठाणे, रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुख्य गोदामे, लॉजिस्टिक्स केंद्रे, कंटेनर-ट्रक टर्मिनल्समुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात वाहनांची जास्त रहदारी असल्याने वाहतूक कोंडी होते, त्या भागातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी रस्ते आणि अनुषंगिक प्रकल्पांना गती द्यावी, नव्या प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

रस्ते प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होणार

            वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉरमुळे भिवंडी-कल्याण- डोंबिवली-उल्हासनगर या भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून त्याबरोबरच त्या भागाच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे, त्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

            आनंदनगर टोल नाका ते साकेत मार्ग, कोपरी-पटणी पूल, तीन हात नाका मार्गाची पुनर्बांधणी, भिवंडी जोडणारा पूल, ठाणे कोस्टल मार्ग, ऐरोली बोगदा ते काटई नाका मार्ग हे प्रकल्प जलदगतीने करण्यात येणार असून या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार

            चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गामुळे ठाण्यातील वाहतूकीचे विभाजन होऊन ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. या मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून त्यांनी हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. शीळ फाटा ते मानकोली, कल्याण ते बापगाव, कल्याण ते टिटवाळा, कल्याण ते पडघा, टिटवाळा ते बदलापूर हे रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 

पालघर जिल्ह्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणावर विशेष 

दीपपूजा

 *🪔 कशी साजरी करावी दीप अमावस्या🪔*


*आषाढ अमावस्या म्हणजेच "दिव्यांची अमावस्या".*

*काय करावे....*

*🪔 घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.*

*🪔 पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी.*

*🪔 आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते.*

*🪔 आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी.*

*🪔 गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.*

*🪔 आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे.*

*🪔 दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी.*

*🪔 या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात.*

*🪔 त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते.*

*🪔 पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.*

*🪔 ती प्रार्थना अशी 🪔 *

*‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥*

*अर्थ:*

_‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस._

*माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.*

*🪔 त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.*

*या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे.*

_तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले._

_मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा *दीप अमावास्येसाठी* सांगितली आहे._

॥ॐ श्री दत्त नारायण नमः शिवाय॥

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹

भूमीहीन करता जागा

 ग्रामीण भागात भूमीहीन लाभार्थींनाजागा देण्याबाबत निर्णय.

ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेतील लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या धर्तीवर 1 हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निश्चित करण्यात येईल. लाभार्थींनी खरेदी केलेल्या जागेकरीताच मोजणी शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येईल. 500 चौ. फूट कृषी जमीन खरेदी करतांना तुकडे बंदी कायद्यातील अट लागू होणार नाही अशी अधिनियमात सुधारणा करण्यात येईल. लाभार्थींना 2 मजली ऐवजी 4 मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात येईल. गायरान जागा लाभार्थींना भाडेपट्टयाने देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.  


ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांकडे सादर करून 90 दिवसाच्या आत मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले.

चॉईस तुमचा आहे.

 आषाढ अमावस्या निमित्त काही विचार,


दिव्याची अमावस्या कि गटारी अमावस्या 

*चॉईस तुमचा आहे ।*

पुरणाचे दिंड कि गाढवावरून धिंड

*चॉईस तुमचा आहे ।*

दिवे उजळायचे कि दिवे पाजळायचे

*चॉईस तुमचा आहे ।*

प्रकाशात न्हायचं कि गटारात लोळायचं

*चॉईस तुमचा आहे ।*

दीपज्योती नमोस्तुते कि चिअर्सची गीते

*चॉईस तुमचा आहे ।*

संस्कारांचं दिवाळं कि मदिरापानाचं सोहळं

*चॉईस तुमचा आहे ।*

धुऊन-पुसून दिव्यांचे पूजन,

की पिऊन आतड्यांची साफ-सफाई.

*चॉईस तुमचा आहे ।*

दिव्यांची आरास कि बाटली आणि गिलास

*चॉईस तुमचा आहे ।*

अंधाराला जिंकायचं कि टाईट्ट होऊन झिंगायचं

*चॉईस तुमचा आहे ।*

या लिखाणाला डिलीट मारायचं कि पुढं धाडायचं

*चॉईस तुमचा आहे*

🙏

दीप अमावस्येला 

*गटारी अमावस्या* असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करू नये.

गटारी स्पेशल


 

 ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेससुधारित प्रशासकीय मान्यता.

            औरंगाबाद जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास रु. 890.64 कोटींच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना ही ऊर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात असून जायकवाडी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सुमारे 65 गावामधील 20 हजार 265 हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. 

           ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना या प्रकल्पास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता सन 2009 मध्ये देण्यात आली होती. आजच्या निर्णयानुसार या प्रकल्पास जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सन 2018-19 च्या दरसूचीवर आधारित चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

-----०-----

जलसंपदा विभाग

भातसा, वाघूर प्रकल्पांच्या कामांनासुधारित प्रशासकीय मान्यता.

भातसा तसेच वाघूर प्रकल्पांच्या कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या 1491 कोटी 95 लाख रुपयांच्या कामांसाठी सुधारित मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पाच्या रु. 2288 कोटी 31 लाख किंमतीच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

-----०-----

सामाजिक न्याय विभागतन नवीन समाजकार्य महाविद्यालयांना मान्य ता.

राज्यात तीन नवीन समाजकार्य महाविद्यालयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार धुळे जिल्ह्यातील साक्री येथील संत तुकाराम सामाजिक संस्था, उस्मानाबाद जिल्ह्यातील अश्वमेध बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, जालना येथील दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या तीन संस्थांना कायम स्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

Wednesday, 27 July 2022

खटले मान्यता

 राजकीय, सामाजिक आंदोलनातीलखटले मागे घेण्यास मान्यता.

राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च 2022 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत, असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

त्याचप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर खटले दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीच्या वेळेस अडचणी येतात, ते दूर करण्यासाठी समितीकडून कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.

पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल. आंदोलनामुळे उद्भवलेल्या गुन्ह्यांत जीवित हानी झालेली नसावी, अशा घटनेत खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे गणेशोत्सव, दहीहंडी यामधील किरकोळ स्वरुपाचे गुन्हे देखिल मागे घेण्यासंदर्भात समितीने तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

-----०--

विद्युत मीटर

 राज्यात वीज वितरण प्रणाली मजबूत करणार

ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मिटर बसविणार

राज्यातील विद्युत वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेसाठी महावितरण कंपनीच्या रु. 39 हजार 602 कोटी व बेस्टच्या रु. 3 हजार 461 कोटी रकमेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली.

या योजनेनुसार 2024 - 25 पर्यंत एकूण तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी 12 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र, नवीन वाहिन्या यांची कामे करण्यात येतील.

राज्यातील ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. याचा सुमारे 1 कोटी 66 लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांना देखील मीटर बसविण्यात येईल. केवळ मीटर्स बसविण्यासाठी रु. 10 हजार कोटींचा निधी अपेक्षित आहे.

या वीज कंपन्यांची कार्यक्षमता सुधारुन ग्राहकांना अखंड, दर्जेदार आणि परवडणारा वीज पुरवठा देण्यासाठी

सुधारित वितरण क्षेत्र योजना – सुधारणा - अधिष्ठित आणि निष्पती - आधारित योजना राबविण्यात येईल. महावितरण आणि बेस्ट उपक्रमामार्फत ही योजना राबविणार आहे.



शेती लाभ योजना

 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजनाअतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश.

राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी रुपये निधी लागेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017 - 18, 2018 - 19 आणि 2019 - 20 हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली.

2017 - 18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून, 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून, 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अथवा 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली.

मात्र, 2018 - 19 अथवा 2019 - 20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. 50 हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2018 - 19 अथवा 2019 - 20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.

प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

-----०

 इट राईट’ च्या माध्यमातून पोषणवर्धनासाठी

फिल्म सिटी येथे अन्न व औषध प्रशासनातर्फे जन जागृती.

            मुंबई, दि. 26 : फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडर्स ॲथॉरीटी ऑफ इंडिया (FSSAI), नवी दिल्ली द्वारे नागरिकांचे आरोग्य व पोषणस्तर सुव्यवस्थित राहण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून, प्रतिवर्षी संपूर्ण भारतात इट राईट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर यावर्षीदेखील महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषधी प्रशासन विभाग (मुंबई विभाग) आणि पाथ (PATH) या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे इट राईट कार्यक्रमाचे आयोजन २२ जुलै रोजी आयोजन दादासाहेब फाळके चित्रपट नगरी (फिल्मसिटी) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन जाधव होते.

         यावेळी डॉ.जाधव यांनी मार्गदर्शन करताना इट राईट इंडिया कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. आपल्याला अन्नधान्याची कमतरता राहिली नाही, परंतु बदलत्या राहणीमानामुळे आपल्या आहारामध्ये कॅलरीज जास्त तर सूक्ष्म पोषक द्रव्यांच्या कमतरतेचे प्रमाण वाढले आहे. कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण - ५ (२०१९-२१) मध्ये भारतात तसेच महाराष्ट्रात एनिमिया आणि बालकांमधील वाढत्या कुपोषणाची समस्या अधोरेखित केली गेली. ५ वर्षाखालील दोन तृतीयांश मुलांमध्ये एनिमिया तर 50 टक्क्याहून अधिक महिलांमध्ये एनिमिया चे प्रमाण आढळले आहे. असे डॉ.जाधव यांनी सांगितले.

             पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाच्या सेवनाने शरीरात सूक्ष्म पोषणतत्वांची कमी दूर होण्यास मदत होते, या तांदळाद्वारे लाभार्थींना त्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि आवश्यक पोषकतत्वे मिळण्यास मदत होते, या तांदळात लोह, फॉलिक ऍसिड आणि बी - १२ जीवनसत्व असतात तसेच या तांदळात अजून ६ ऐच्छिक पोषकतत्वे टाकली जाऊ शकतात जसे कि, जीवनसत्व बी - १, बी - २, बी - ३, बी - ६, जीवनसत्व- ए आणि झिंक, या तांदळामुळे महाराष्ट्रातील एनिमियाच्या वाढत्या प्रभावास आळा बसण्यास मदत होईल. 

प्लास्टिकचा तांदुळ नाही - पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ

            पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ हा आपला नेहमीचाच तांदूळ असतो पण त्यात १०० : १ (१०० दाणे सध्या तांदळाचे आणि १ दाणा पोषणतत्व गुणसंवर्धन केलेला) या प्रमाणात असतो. समाजात सामाजिक माध्यमाद्वारे अनेक गैरसमज पसरवले जात आहेत त्या पैकी एक म्हणजे प्लास्टिक तांदूळ. प्लास्टिक तांदूळ हा अस्तित्वात नसतो, अशा गैरसमजामुळे सरकारच्या अशा महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोचू शकत नाही म्हणून असे गैरसमज दूर करण्यासाठी समाजामध्ये एकात्मिक बाल विकास सेवेची यंत्रणा मोठी भूमिका बजावू शकतात. मंचावरील मान्यवरांनी या कार्यक्रमात बोलताना अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.

            भारतातील आरोग्य व पोषण समस्यांना उत्तर म्हणून विविध योजनांची सुरुवात केली गेली तथापि, या समस्या अजूनही भेडसावत आहेत. याच संदर्भात केंद्र सरकारने सर्व सरकारी सामाजिक कार्यक्रमांद्वारे पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे वितरण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून, योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत, मार्च २०२१ मध्ये केंद्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि मध्यान्ह भोजन योजनेद्वारे पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे वितरण सुरु केले आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये या जिल्हांतील शिधा-पत्रिकाधारकांना देखील पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे वितरण सुरु केले जाणार आहे. योजनेच्या तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात मार्च २०२३ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात शिधा - पत्रिकाधारकांना पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे वितरण केले जाणार आहे, यासाठी शासन युद्धपातळीवर कार्य करते


 राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस

एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात

            मुंबई, दि. 27 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)च्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ तुकड्या तैनात आहेत.

           नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

            राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरते निवारा केंद्र तयार करण्यात आले असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.

                      राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल देण्यात येत आहे.

00000

 महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यातील सांस्कृतिक वारसा पाहण्याची संधी

सांस्कृतिक कार्य विभाग आणि संचालनालयामार्फत' लोकोत्सवाचे आयोजन.

            मुंबई, दि. 27 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारा आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम येत्या २९ ते ३१ जुलै २०२२ या कालावधी दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ओडिशा राज्यातील तीन कला समूह व महाराष्ट्रातील तीन कला समूह सादरीकरण करणार आहेत. भक्ती संस्कृती, शास्त्रीय संगीत नृत्य व लोककला या तीन प्रकारातील लोकोत्सव आंतरराज्य महोत्सवात प्रेक्षकांना पहावयास मिळतील.

            आंतरराज्यीय सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी आणि त्यातून एकात्मता जपली जावी यासाठी "एक भारत श्रेष्ठ भारत" हा उपक्रम देशभरात साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गतच महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांची आंतरराज्य सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जोडी निश्चित केलेली आहे.

            ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून ओडिशा व महाराष्ट्र राज्याची उच्च व समृद्ध संस्कृती दर्शविणाऱ्या लोकोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि. २९ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे सायंकाळी ६ ते रात्रौ १० या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे.

            लोककला, लोकपरंपरा तसेच सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या लोकोत्सव या तीन दिवसीय महोत्सवाच्या माध्यमातून ओडिशा व महाराष्ट्र राज्यातील विविध नृत्य, संगीत, लोककला प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.

            महाराष्ट्र व ओडिशा राज्यांची लोकसंस्कृती, लोककला, प्रथा-परंपरा यामध्ये बरेच साम्य आहे. या राज्यांमधील संस्कृतीची ओळख व्हावी या उद्‌देशाने लोकोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र व ओडिशा राज्यांची समृद्ध अशी लोकपरंपरा, भक्त‍ि संगीत व शास्त्रीय नृत्यांची जोपासना करणाऱ्या कलापथकाचे सादरीकरण होणार आहे. लोकोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात दि. २९ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ओडिशा लोककलेचे प्रसिद्ध कलाकार डॉ. मोहित कुमार स्वाइन आणि सहकलाकार यांची ओडिशा लोककला व शास्त्रीय नृत्यांच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा शुभदा वराडकर आणि संघ यांचे शास्त्रीय नृत्य सादर होणार आहे. दि. ३० जुलै २०२२ रोजी ओडिशा भक्तीसंगीत, मनोजकुमार पांडा व सहकलाकार आणि संजीवनी बेलांडे आणि सहकलाकार, यांच्या भक्त‍िगीतांचा कार्यक्रम होणार आहे. ३१ जुलै २०२२ रोजी राकेश शिर्के आणि सहकलाकार यांच्या लोककला व ओडिशा येथील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य कलाकार बसंतकुमार प्रदा आणि सहकलाकर आपली कला सादर करणार आहेत.

          ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा या आंतरराज्यातील लोकोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व-रसिक प्रेक्षकांना विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

०००

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिनेश वाघमारे यांची मुलाखत

            मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तसेच महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        गुरुवार, दि. 28 जुलै २०२२ रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

            देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने आझादी का अमृत.

दीप पूजा

 *दिव्यांची आवस अर्थात दिप अमावस्या/दर्श अमावस्या.*


दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जाते.

घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.

पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. 

पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी.

फुलांची आरास करावी.

सर्व दिवे प्रज्वलित करावेत.

हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी

आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी

कणकेचे उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा.

या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी.

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।

गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

अर्थात 

‘‘हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.

त्यानंतर दिव्यांची कहाणी करावी. 

घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.

सुप्रभात

 🎼🎼 🌺 काटा जरी काट्यासारख वागला तरी,💫💫          🎼🎼🌺 फुलानं आपल फुलणं सोडायचे नसतं,💫💫        🎼🎼🌺 जीवन कितीही खडतर असले तरीही ,💫💫       🎼🎼🌺 माणसानं आपलं जगणं सोडायच नसतं.

  🏃⛹️🏋️🚴🏇           

*प्रामाणिक राहून यश मिळत नाही असे काही लोक म्हणतात..............!!

*'प्रामाणिक राहणे...- हेच खूप मोठे यश आहे........!!!*

     🌸 शुभ प्रभात 🌸

सासरचे नमुने,काय देव्वा


 

 औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही

मुख्यमंत्र्यांचे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश.

            मुंबई, दि. 26 : आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाच्या औषधे, सर्जिकल्स साहित्य, कन्झुमेबल्स, रसायने व उपकरणे यांना स्थगितीच्या आदेशातून वगळण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

            राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी उप योजना तसेच विशेष घटक योजना इत्यादी निधीतून मंजूर करण्यात आलेल्या परंतू निविदा न काढलेल्या कामाच्या अंमलबजावणीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यासंबंधीचे रितसर प्रस्ताव तत्काळ सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर निर्णयार्थ सादर करण्यात यावेत, असे मुख्य सचिवांनी कळविले आहे.

            आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असून, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही सेवा राज्यातील जनतेला पुरविण्यात येते. वैद्यकीय शिक्षण देण्याचे व संशोधनाची कामेही करण्यात येतात.

            नुकत्याच आलेल्या कोविड महामारीमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढलेला आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजार / साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये बऱ्याच ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या असून, उपकरणाअभावी या सुविधा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी तसेच पावसाळ्यातील साथीचे आजार, कोविडसारखी जागतिक महामारी आणि आरोग्यविषयक अत्यावश्यक सुविधा हाताळण्यासाठी या स्थगिती आदेशामधून या दोन विभागांना वगळण्याचा निर्णय झाला आहे.

००००



सूचना महत्वाची

 यदि आपके पास केवाईसी दस्तावेजों/यूजर आईडी/पासवर्ड/डेबिट कार्ड संख्या/पिन/सीवीवी/ओटीपी आदि को अपडेट या सत्यापित करने संबंधी कोई ई-मेल/मैसेज में एम्बेडेड लिंक/कॉल आते हैं तो कभी भी इनका उत्तर ना दें। यदि आपने अनजाने में अपनी प्रामाणिकता उजागर कर दी हो तो तत्काल अपने पासवर्ड/सीवीवी/पिन को बदल दें।

Tuesday, 26 July 2022

26जुलै भवाताल

 मुंबईत २६ जुलैच्या महापुरातूनमा


र्ग काढणाऱ्या आई-मुलाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ५०)

आज २६ जुलै. सतरा वर्षांपूर्वी म्हणजे २००५ साली याच दिवशी मुंबईत प्रचंड ढगफुटी झाली. त्यामुळे आलेल्या महापुराने मुंबईला जबरदस्त धक्का दिला. जीवितहानी, आर्थिक नुकसान आणि आयुष्यभर जाणवेल असा मानसिक धक्का! या महापुरात सापडलेल्या, पण त्यातून हिमतीने मार्ग काढणाऱ्या एका आई-मुलाची ही गोष्ट! मुंबईतील २६ जुलैच्या संकटाला त्या दिवशी हजारो मुंबईकरांनी अशाच प्रकारे धीराने तोंड दिले. त्याचीच ही प्रातिनिधिक कहाणी...

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक -

https://bhavatal.com/Mumbai-26July

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५० वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

 गौण खनिज परवान्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात

विशेष शिबिराचे आयोजन करावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 26 : अल्पमुदतीचे गौण खनिजे परवान्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करुन यामधून चिरेखाण व्यावसायिकांना परवाने द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            रत्नागिरी येथील चिरेखाण व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार उदय सामंत, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह रत्नागिरीचे चिरेखाण व्यावसायिक उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोकणात चिरेखाणीबरोबरच मुरुममाती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी चिरेखाण व्यावसायिकांना अल्प मुदतीचा परवाना आवश्यक असतो. त्यामुळे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने येथे विशेष शिबिर घेऊन आवश्यक असणारे अल्पमुदतीचे परवाने द्यावे. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग आणि रायगड येथेही विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे.

            चिरेखाणी व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येत होत्या. मात्र आता या परवानग्या जिल्हास्तरावर देण्यात येत नसल्याने अनेक व्यावसायिकांना काम करण्यास अडचणी येतात. या व्यावसायिकांना परवानग्या देताना काही तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करावा. तसेच तात्पुरता परवाना जलदगतीने मिळण्यासाठी तातडीने रत्नागिरी येथे आणि तद्नंतर सिंधुदुर्ग येथे विशेष शिबिर आयोजित करुन एक आठवड्यात परवानग्या देण्याबाबतचे नियोजन करावे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


००००



Featured post

Lakshvedhi