Monday, 31 October 2022

पाऊले चालती


 

आरोग्य तपासणी मुरुड रायगड

 


साहसी क्रीडा मोहिम


 

भू क मारी भी


 

ती एक कोकिळा


 

अवघ पाऊणशे वयोमान


 

राष्ट्र पुरुष


 

जिंदगी

 *अपने खराब मूड के समय बुरे शब्द ना बोलें, क्योंकि.. खराब मूड को बदलने के बहुत मौके मिलेंगें, पर शब्दों को बदलने के मोके नहीं...मिलेंगे*.!!!!

 

आपका दिन शुभ एवं मंगलमय हो!

Puppy रांगोळी? पहा


 

गरबा स्टाईल पहा


 

काय पन दिवाळी सर्व ok


 

सुबह





Sunday, 30 October 2022

म्हणून पाया पडायची पध्दत

 *म्हणून पाया पडायची पध्दत आहे...*


चागंली पध्दत‌आहे, पण कलियुगात वाईट घडते?


●● *नमस्काराचे महत्व* ●●


● *महाभारताचे युद्ध सुरु होते.* 

   *दररोज कौरवसेनेचे  मोठमोठे योद्धे*

   *मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*

   *ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून* 

   *देखील त्यांच्या सेनेची सतत हानी* 

   *होत होती..*


● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर* 

   *व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन* 

   *भीष्म पितामह घोषणा करतात की..*


● *"मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन.."*


● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या* 

   *शिबिरात पोहोचताच पांडवांची* 

   *अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या* 

   *क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..*


● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल* 

   *झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या* 

   *लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..* 


● *"माझ्या सोबत चल.."*


● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण* 

   *पितामहांच्या कक्षात पोहोचले.* 

   *ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर* 

   *उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,* 

   *आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..*

 

● *सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत* 

   *जाऊन पितामहांना प्रणाम करताच,* 

   *"अखंड सौभाग्यवती भव" असा* 

   *आशीर्वाद त्यांनी तिला दिला..*


● *त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,* 

   *"वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी* 

   *काय आलीस..??"* 


● *"माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे*

   *आले आहे आणि ते बाहेर थांबले* 

   *आहेत" असे द्रौपदीने सांगताच* 

   *श्रीकृष्णाला भेटायला पितामह* 

   *बाहेर आले आणि त्या दोघांनी* 

   *एकमेकांना प्रणाम केला..*


● *भीष्म पितामह म्हणाले..*

   *"माझ्या एका वचनाला दुसऱ्या* 

   *वचनाने मात देण्याचे काम फक्त*

   *श्रीकृष्णच करु शकतात.."*

 

● *शिबिरात परतताना श्रीकृष्ण* 

   *द्रौपदीला म्हणाले की, "बघ,* 

   *तुझ्या फक्त एक वेळ जाऊन* 

   *पितामहांना नमस्कार करण्यामुळे*

   *तुझ्या पतींना जीवनदान मिळाले,* 

   *हे तुझ्या लक्षात आले का..??*


● *जर तू दररोज नित्यनेमाने पितामह* 

   *भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या* 

   *मान्यवरांना नमस्कार केला असतास* 

   *आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या* 

   *पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू* 

   *पांडवांना नमस्कार केला असता तर* 

   *हि युद्धाची वेळच आली नसती..*


● *अशी असते नमस्कार* 

   *आणि आशीर्वादाची शक्ती..!!*


●● *तात्पर्य..*


● *वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की,*


*कळत नकळत आपल्या हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते..*


● *जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात..*

   *असे घर स्वर्ग बनू शकते..*


● *मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे*

   *कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही..* 

 

● *कारण..*


● *नमस्कारात प्रेम आहे..*

   *नमस्कारात विनय आहे..*

   *नमस्कारात अनुशासन आहे..*

   *नमस्कार आदर शिकवतो..*

   *नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..* 

   *नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..* 

   *नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..* 

   *नमस्कारात शीतलता आहे..*              

   *नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो..*

   *नमस्कार आपली संस्कृती आहे..*

   *ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..*


*🙏 आपणास माझा साष्टांग नमस्कार !! 🙏*

सल्ला

 मी नुकताच निवृत्त झालो आहे हे कळल्यावर डॉक्टरांनी मला खालीलप्रमाणे सल्ला दिला :


१. तुम्ही सारखं चालत रहा

२. शीतपेयं, बियर किंवा दारू टाळा

३. त्याऐवजी साधं पाणी प्या

४. स्वतः वाहन चालवू नका. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा

५. बाहेरचं खाणं टाळा. घरचंच खा.

६. मांसाहार, मत्स्याहार शक्यतो करू नका. शाकाहार वाढवा.

त्यावर डॉक्टरांना मी विचारलं, " डॉक्टर, मला काय झालंय ?"

डॉक्टर म्हणाले,

 *"तुमचा पगार आता बंद झालाय."*

😃😃

खरी संपत्ती

 *🌹खरी संपत्ती🌹*


*शरीर ओके तर ठिकाणावर डोके,*

*एक लक्षात असु द्या...*

*आपल्या वडिलांचे*  

*नांव व संपत्ती,*

*आपल्याला मिळू शकते,*

*पण आरोग्य,शरीर,*

*आपले आपल्यालाच कमवावे लागते,*

*ते वारसाहक्काने मिळत नाही.*

*आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता,*

*पण...*

*इथुनपुढे ज्याचं आरोग्य उत्तम,*

*तोचं खरा श्रीमंत...*

*असचं म्हटलं जाईल...*

*प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप आहे,*

*पण खाता येत नाहीये,*

*हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,*

*म्हणून शरीर,आरोग्य हे जपा..!!*

*पण त्याचबरोबर..*

*चांगली माणसं ही जपा...*

*कारण...*

*जसे उत्तम शरीराशिवाय,*

*आनंद नाही,*

*तसेच चांगले नातेवाईक,*

*जिवलग मित्र-मैत्रीण शिवाय,*

*जीवन नाही...*

*जगताना स्वतःच्या बोलण्यात,*

*इतका सरळपणा...*

*व तिखटपणा ठेवा...*

*की,वाईट लोकांना त्याचा ठसका,*

*आणि चांगल्या लोकांना त्याची,*

*चवच लागली पाहिजे...!*

 *प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात,*

*"प्रेम, काळजी आणि आदर"..*

*पहिल्या दोन तुम्ही दिल्या कि तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते...*

*कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*, *प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं*.. 

*पाण्यापेक्षा* *तहान* *किती आहे याला जास्त किंमत असते* 

*मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते*  

*या जगात नाते तर सर्वच जोडतात*.. 

*पण नात्यापेक्षा* *विश्वासाला* *जास्त किंमत असते*

*मोठ्यामोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होतं.* 

*आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो*

*शब्द देवुन "आस" निर्माण करण्यापेक्षा,,,,,*

*साथ देवुन "विश्र्वास " निर्माण करा,,*

*एकमेकांना धीर देण सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं....*

     *भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही...*


🏮🪔🏮🪔

असामान्य


 

Saturday, 29 October 2022

घर पोहोच फराळ


 

कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाशी पंगा घेऊ नका*

 *कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाशी पंगा घेऊ नका*

*एक वृद्ध नागरिक बँकेत जातो, आणि काउंटरवरील रोखपाल ला (कॅशियर) 1000/-चा धनादेश देतो.*


 रोखपाल: सर, तुम्ही बाहेरील एटीएममधून इतकी छोटी रक्कम काढावी आणि माझा वेळ वाया घालवू नका.*

 *वृद्ध : मला 1000/- रोख द्यायला काय हरकत आहे?*

 रोखपाल: माफ करा सर, हे होऊ शकत नाही. तुम्ही एकतर एटीएममध्ये जा किंवा पैसे काढण्याची रक्कम वाढवा.*

 *वृद्ध : ठीक आहे, मला माझ्या खात्यातून किमान अनिवार्य रकमेपैकी संपूर्ण शिल्लक काढायची आहे*


 *कॅशियर वृद्ध व्यक्तीच्या खात्यातील शिल्लक तपासतो, आणि ते रु. 80 लाख आहे


 *तो म्हणतो_ "सध्या आमच्याकडे तिजोरीत इतके पैसे नाहीत. पण तुम्ही मला 80 लाख रुपयांचा धनादेश दिलात तर उद्या आम्ही रोख रकमेची व्यवस्था करू"*.


 *वृद्ध : आता तुम्ही मला किती रक्कम देऊ शकता?*


 रोखपाल: (बँकेची रोकड शिल्लक तपासतो) सर, मी तुम्हाला थेट 10 लाख देऊ शकतो.*


 *वृद्ध नागरिक रु. 1000/- चा चेक फाडतो, रु. 10 लाखाचा नवीन चेक लिहून कॅशियरला देतो*

 जेव्हा रोखपाल तिजोरीत रोख जमा आ णण्यासाठी जातो तेव्हा तो शेजारील जुन्या सार्वजनिक शेल्फमधून रोख ठेव स्लिप काढतो आणि भरतो.

 * रोखपाल आत बँकेच्या तिजोरीतून रोख घेऊन परत येतो, काळजीपूर्वक 10 लाख रुपये मोजतो, म्हाताऱ्याला देतो आणि म्हणतो - "महाराज, तुम्ही ही रक्कम घेऊ शकता. आता ही रक्कम तुम्हाला स्वतः घरी घेऊन जावी लागेल, पण काउंटर सोडण्यापूर्वी मोजणे, नंतर कोणतीही तक्रार नाही."*


 * वृद्धाने 500/- रु च्या दोन नोटा काढतो आणि त्याच्या पर्समध्ये ठेवतो आणि म्हणतो - "माझा तुझ्यावर विश्वास आहे, बेटा, मला मोजण्याची गरज नाही. आता ही आहे रोख ठेव स्लिप. ₹ 9,99,000/- कृपया." माझ्या खात्यात परत जमा करा आणि मला एक मुद्रांकित स्वाक्षरीयुक्त काउंटरफॉइल द्या.*

 *आणि हो, तुम्हीही माझ्या उपस्थितीत रोख मोजा ."*


  *कॅशियर बेशुद्ध*


  *कथेचा नैतिक सारांश:*


  *ज्येष्ठ नागरिकांशी गल्लत करू नका, विशेषत: ते निवृत्त झाले असले तरी त्यांची बुद्धिमत्ता हे त्यांचे शस्त्र आहे त्यामुळे मी मी म्हणणाऱ्यांना पाणी पाजण्याची ताकद त्यांच्या शस्त्रात आहे.अति हुशार माणसाला ते योग्य जागा दाखवतात कारण अनेक अनुभवांचे पावसाळे त्यांनी अंगावर घेतलेले असतात .*

  *सर्व ज्येष्ठ नागरिकांना आदरपूर्वक सन्मान द्या* 🙏🙏🙏

कॉपी पेस्ट

सामान्य ज्ञान



 

ग्रंथपालन परीक्षेच्या फेरगुण मोजणीसाठी

 ग्रंथपालन परीक्षेच्या फेरगुण मोजणीसाठी

३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबत

 मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबतच्या प्रशिक्षणातील माहितीची

काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल

 

            मुंबईदि. 28 : येत्या 3 नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षणादरम्यान देण्यात आलेल्या माहितीचा व प्रात्यक्षिकांचा उपयोग  काटेकोरपणे व शिस्तबद्धरीत्या करावा"असे निर्देश या पोटनिवडणुकीसाठी नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल (भा.‌प्र.से.) यांनी दिले आहेत.

             अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री.देवल बोलत होते. कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटीलसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण कटाळेउपजिल्हाधिकारी रवींद्र हजारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दोन सत्रात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे दीड हजार  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

            यंदाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पाटील यांनी सांगितले कीद्विस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम हा दोन‌ ठिकाणी घेण्यात आला. प्रशिक्षणाचा पहिला भाग हा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे घेण्यात आला. या अंतर्गत उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणकीय सादरीकरणाच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे आयोजन हे विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दीक्षित रोड महानगरपालिका शाळा संकुल येथे करण्यात आले होते. या शाळेमध्ये असणाऱ्या वर्गखोल्यांचे सूक्ष्मस्तरीय सुनियोजिन करून या ठिकाणी मतदान प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.

            या प्रशिक्षण कार्यक्रमात नाट्यगृहातील खुर्च्यांना असणाऱ्या आसन क्रमांकाचा एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण वापर करण्यात आला. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रानुसार आसन क्रमांक निर्धारित करण्यात आले होते. हे निर्धारित आसन क्रमांक लघु संदेशांद्वारे आधीच कळविण्यात आले होते. तसेच याबाबतची माहिती प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर देखील प्रदर्शित करण्यात आली होती.

            मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणादरम्यानची आसन व्यवस्था मतदान केंद्रनिहाय करण्यात आली होती. ज्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणादरम्यान एकाच रांगेत शेजारी - शेजारी आसनस्थ होते. यामुळे येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकमेकांशी ओळख मतदानाच्या काही दिवस आधी झाली आहे. परिणामीमतदान केंद्रांच्या स्तरावर पूर्वतयारी करताना आवश्यक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यास यामुळे मदत होणार आहेअसेही श्री.पाटील यांनी प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य नमूद करताना आवर्जून सांगितले.

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्वविधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या दि.०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत.  मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षणयंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सीलबंद करणेमतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारीमतदान केंद्राध्यक्षसहाय्यक मतदान केंद्राध्यक्षमतदान अधिकारीपोलीस कर्मचारीकेंद्र सरकारी कर्मचारी असणारे 'मायक्रो ऑब्जरव्हरयासह समन्वय अधिकारीविविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी 'अंधेरी पूर्वमतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावेअसे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.


दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा

 दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

 

            मुंबई दि. 28 :- दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावेअसे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झालीत्यावेळी ते बोलत होते.

            दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकरसंयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा गॅबॉन प्रजासत्ताक देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकल मौस्सा अडामो प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत श्रीमती रूचिरा कंबोज यांनी केले.

            भारत 2022 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचा अध्यक्ष आहे. या समितीमध्ये सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 देशांतील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक भारतात होत आहे. उद्या दिल्ली येथे बैठक आहे. मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीने 'दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढाया विषयावर अनौपचारिक चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. यात स्थानिक आणि क्षेत्रीय पातळीवरील उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली.

            परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर म्हणालेदहशतवाद विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. दहशतवाद आणि त्यांच्या प्रायोजकांविरुद्ध ठोस कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थानेप्रशिक्षण स्थळे शोधून त्यांना असलेले राजकीय समर्थन आर्थिक आणि वैचारिक संरक्षण नष्ट करणे आवश्यक आहे.

            गेल्या काही वर्षांतदहशतवादी गटांनी त्यांना मिळत असलेल्या मिळकतीच्या पद्धतीमध्ये  विविधता आणली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. वित्तपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या अनामिकतेचा फायदा घेऊन व्हर्च्युअल चलने वापरून निधी उभारणी सुरु केली आहे. या संदर्भातअधिक विचारमंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला विचारात घेऊन नाविन्यपूर्ण उपाय योजण्यासाठी उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या समितीच्या विशेष बैठकीत चर्चा होईलअशी अपेक्षा डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केली.

दहशतवादविरोधी लढाई सामूहिकपणे लढणे गरजेचे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

          दहशतवादविरोधी लढाई ही सर्वांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने लढणे गरजेचे आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केले. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीची महत्वपूर्ण परिषद मुंबईत झाली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ज्या ताजमहाल हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला तेथे या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल संयुक्त राष्ट्र समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना त्यांनी मनापासून धन्यवाद दिले.

            देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या सुरक्षेविषयी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसह सर्व राज्याचे गृहमंत्री उपस्थित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली.

26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

          सुरूवातीला दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. गॅबॉन प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री तथा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष मायकेल मौस्सा अडामो यांच्यासह भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रूचिरा कंबोज यांनी केले.

0000

महत्वाची क्षणचित्रे :-

·        श्रद्धांजली वाहताना उपस्थित सदस्यांमध्ये गॅबॉनमेक्सिकोभारतनॉर्वेघानाचीनयुकेमाल्टायुएईमोझांबिकअल्बानियाइक्वाडोरब्राझीलस्वित्झर्लंडरशियाजपानयुएसएयुएसजी युएनओसिटीफ्रान्सआयर्लंडएईडी सिटीईडीयुएनआरसीकेनियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

·        दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी मनोगत व्यक्त केले. यात छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर जखमी झालेली देविका रोतवालहवाई सुंदरी निधी चाफेकरताज हॉटेलचे महाव्यवस्थापक करणबीर सिंग यांनी आपले अनुभव कथन केले. तरत्यावेळी दोन वर्षाचा असलेला मोशे याने ध्वनिचित्रमुद्रीत संदेश दिला.

·        शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या पत्नी श्रीमती वैशाली तुकाराम ओंबळे यांच्या समवेत उपस्थित सदस्यांनी छायाचित्र घेतले.

 ·        केंद्र शासनाचे सहसचिव शफी रिझवी यांनी 'दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढाया विषयावर सादरीकरण केले.

 ·        केंद्रीय सह सचिव पंकज ठाकूर यांनी 26/ 11 रोजी झालेला हल्लात्यात हुतात्मा झालेले लोकतपासाची पद्धती आणि काही महत्वपूर्ण घडामोडींबाबत यावेळी सादरीकरण केले. दहशतवादी साजिद मीर याची कट रचत असताना करत असलेल्या संवादाची ध्वनीफीत देखील ऐकविली.

·        यावेळी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या सदस्य राष्ट्राच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. यात युकेयुएसएयुएईब्राझिलरशियाफ्रान्सआयर्लंडकेनियामॅक्सिकोनॉर्वेचीन आदींचा समावेश होता.

·        संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नुकतीच हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली होती. या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

 ·        26/11चा हल्ला आणि त्याविषयाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. यासंदर्भातील प्रदर्शन यावेळी लावण्यात आले.

·        हा कार्यक्रम परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आयोजित केला होता.

00000


 

Cyber inteligence युनिट

 महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार

सुरजकुंड येथील बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 

            सुरजकुंडहरयाणादि. 28 : सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरजकुंड येथील चिंतन शिबिरात दिली.

            केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या बैठकीला संबोधित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक विषयांवर या बैठकीत मंथन करण्यात आले.

            या बैठकीत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीसायबर इंटिलिजन्स युनिट हा एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक मॉडेल तयार होईल. सरकारी आणि खासगी बँकावित्तीय संस्थासोशल मीडिया संस्थानियामक संस्थासायबर पोलिसतंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असूनत्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर असेल. अलिकडच्या काळात आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत येणाऱ्या काळात कदाचित या गुन्ह्यांचीच संख्या अधिक असेल. ही संस्था आधीच त्यादृष्टीने सज्जता असेल.

            ही बैठक आयोजित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीकोणताही गुन्हा किंवा कायदा-सुव्यवस्था हा प्रश्न केवळ कोणत्याही एका राज्याचा प्रश्न नसतोतर अनेक राज्यांना एकाचवेळी त्याचा सामना करावा लागतो. या बैठकीच्या माध्यमांतून केंद्र आणि राज्यात समन्वयाची उत्तम व्यवस्था तयार करण्यात आलीयाबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो.

            ‘सीसीटीएनएस’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक गतीने कार्यवाही पूर्ण केली. ‘अ‍ॅम्बीस’च्या माध्यमांतून सुद्धा मोठी प्रगती राज्य सरकार करते आहे. सुमारे 6 लाखांहून अधिक गुन्हेगारांचे बायोमेट्रीक रेकॉर्ड तयार करण्यात आले आहेत. याला सीसीटीएनएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे नाव बदलून अन्य राज्यांत पुन्हा गुन्हे करणाऱ्यांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होणार आहे. सीसीटीव्हीच्या जाळ्याला सायबर पोलिसांशी जोडल्यामुळे गुन्ह्यांचा तपास वेगाने होणार आहे. चालान प्रणाली आणि एकच ऑनलाईन कोर्ट यामुळे मनुष्यबळाची सुद्धा बचत होते आहे. ऑनलाईन ट्रेनिंग प्रणालीमुळे प्रशिक्षणाला गती मिळते आहे. राज्यात 20 हजार पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईला गती देण्यात आली असूनयात केंद्र सरकारची मोठी मदत मिळत आहे. शहरी नक्षलवादाचा धोका मोठा आहे. त्याविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांतून अपराध सिद्धीचा दर वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे. सागरी सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहेअशीही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली.

0000




Today


 

Art








 

Chhat पूजा























 

Anadashram khopoli🌈🌈🌈

 Anadashram khopoli🌈🌈🌈

*"मला फक्त मज्जा हवीये"* (Todays Goal of Every Youth)

तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? 

प्राचीन काळी "ज्ञानप्राप्ती आणि परमार्थसाधना" हे उदात्त उत्तर मिळत असे.

अर्वाचीन काळी "प्रापंचिक सुख" हे व्यवहारात बसेल इतपत उत्तर देत असत. 

आत्ता काल-परवा "पैसा, समाधान, शांती" हे शब्द ऐकू यायचे. 

हल्ली थेट विकेट पडते -

"मला फक्त मज्जा करायचीये". 

विषय संपला. 

 "मज्जा केलीच पाहीजे" ही बळजबरी माणसं एकमेकांच्या ऊरावर पांघरू लागलीयेत.

इथे "मज्जा" ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती "निकड" झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; ती समाजातल्या "मॉडर्न" शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी. 

तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा -

"बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी..."

"पार्टी नाही? शी..."

"फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी... पथेटिक..."

तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला!? फारच बोरिंग ....

"तू आजवर कधी पब मध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं..."

"वेलेन्टाईन डे; आणि नो रोजेस? शी, बोअर..."

"डेटवर चाललायस? आणि हातात नो गिफ्ट्स? So sad..."

"वीकेन्ड घरच्यांबरोबर? नो फ्रेन्ड्स? नो आऊटिंग? शी..."

यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले. 

तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात।पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच. 

TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला. 

न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून "आजचं बघा" हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं. 

सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या. 

"अनलिमिटेड बुफे" च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे "त्यात काय एवढं?" असं झालं.

जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन "लिनन"च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं. 

एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं "big fat पंजाबी वेडिंग" झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले "इवेन्ट्स" झाले. 

मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.

तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या "प्रेमाचं" मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल. 

कमवा; आणि उडवा. 

तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho !!

भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा. 

विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही "वीड", "ग्रास" हे शब्द येऊ लागलेत. 

यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही. 

या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले "रॉकस्टार्स" आणि "rap singers" आहेत ना! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. "मनाली ट्रान्स" म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवणऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो मुक्तहस्ते सपोर्ट करणारा !!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या !!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं. 


चील... एंजॉय... पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग. 

मग मेलात तरी चालेल. 


आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?


चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. "आम्ही कित्ती आनंदात आहोत", "आमचं कित्ती मस्त चालू आहे", "आम्ही कित्ती एंजॉय करतोय", *हे दुसऱ्याला दाखवणं*, हा चंगळवादाचा अट्टहास असतो. 


ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो. 


मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती "cool" आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना; त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो. 

तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं. 


मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने "सो पथेटिक" म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात. 


गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात.

त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग "तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही", अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात. 


हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यातली बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच. 


जागे होऊया रे.

स्वत्व नको विकूया आपण. 

दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत !!  


उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंतकाळ चमकतो.

आपण सूर्य निवडू या. 

👍👍👍

Featured post

Lakshvedhi